शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाकिस्तान डीजीएमओंची हॉटलाईन कनेक्ट होऊ शकली नाही; थोड्या वेळाने पुन्हा प्रयत्न करणार
2
संरक्षण दलांसोबत अधिक समन्वयाने काम करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे सुतोवाच
3
भारताच्या सीमेवर अवकाशातूनही करडी नजर; ISRO लॉन्च करणार RISAT-1B, काय आहे खास वैशिष्टे?
4
विराट कोहलीच्या कसोटी निवृत्तीवर 'हेड कोच' गौतम गंभीरचे ट्विट, सिंहाशी तुलना करत म्हणाला...
5
अमेरिका आणि चीनमधील व्यापार युद्धाला अखेर पूर्णविराम; ट्रम्प आता किती टॅरिफ आकारणार?
6
Technology: तुटलेल्या केबलचे चार्जर वापरणे ताबडतोब थांबवा; होईल मोठे नुकसान!
7
एल्विशची सिस्टम हँग होणार! सापाचे विष आणि ड्रग्जच्या वापराप्रकरणात युट्यूबरला कोर्टाचा दणका
8
SSC Result 2025: दहावीचा निकाल उद्या जाहीर होणार! विद्यार्थ्यांना कधी आणि कुठे पाहता येणार? जाणून घ्या
9
पाकिस्तानात आज पुन्हा भूकंपाचे धक्का; ७ दिवसांत तिसऱ्यांदा हादरली पाकची जमीन
10
सचिन वर्सेस विराट; कसोटीत कोण ठरलं भारी! इथं पाहा खास रेकॉर्ड
11
एका झटक्यात सोन्याच्या दरात २००० रुपयांपेक्षा अधिक घसरण; खरेदीपूर्वी पाहा सोन्या-चांदीचे नवे दर
12
Mehraj Malik : "रेशनचा मोठा तुटवडा; दुकानांमध्ये पीठ, तांदूळ, साखर उपलब्ध नाही, जनतेमध्ये भीतीचं वातावरण"
13
Virat Kohli Test Retirement: 'किंग कोहली'ची कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती; १४ वर्षांचा 'विराट' प्रवास थांबवला!
14
"देशात परिस्थिती काय अन् ही थायलंडमध्ये...", नेटकऱ्यांच्या ट्रोलिंगमुळे भारती सिंहला रडू कोसळलं
15
व्यवसायातही कोहलीची 'विराट' कामगिरी; फक्त टॅक्सच ६६ कोटींचा भरला; नेटवर्थ किती असेल?
16
अरेच्चा! तालिबान सरकारने अफगाणिस्तानात बुद्धिबळ खेळावर घातली बंदी, कारण...
17
7 मे रोहित अन् 12 मे विराट; टेस्ट क्रिकेटमधून 'ROKO' युगाचा अंत, अशी होती दोघांची कारकीर्द
18
हैदराबादच्या प्रसिद्ध 'कराची बेकरी'ची तोडफोड; पाकिस्तानविरोधी घोषणा देत केली 'ही' मागणी
19
लग्नाच्या पहिल्याच रात्री पती टेरेसवर झोपला, नववधूचा शाळेपासूनचा प्रियकर आला, अन्...
20
Suicide Blast: पाकिस्तानात दहशतवाद्यांचा पोलिसांच्या गाडीजवळ आत्मघाती बॉम्बस्फोट, २ ठार

हळदीपाठोपाठ तुरीच्या भावातही वाढ,

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2021 04:16 IST

नांदेड : कोरोना महामारी काळात आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना आपला माल व्यापाऱ्यांना बेभाव द्यावा लागला; परंतु आज शेतकऱ्यांकडे माल ...

नांदेड : कोरोना महामारी काळात आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना आपला माल व्यापाऱ्यांना बेभाव द्यावा लागला; परंतु आज शेतकऱ्यांकडे माल नसताना हळद, तूर, मूग आदींची मागणी वाढल्याने भावातही वाढ होत आहे. आता त्याचा फायदा शेतकऱ्यांना कमी आणि व्यापाऱ्यांना अधिक होत आहे.

नांदेड जिल्ह्यात ऊस, केळीबरोबर हळद, कापूस आणि सोयाबीनचे पीक घेणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या अधिक आहे; परंतु मागील काही दिवसांत शेतकऱ्यांना योग्य मोबदला मिळत नसल्याने त्यांनी पीक पद्धती बदलली आहे. जिल्ह्यात आजघडीला सोयाबीनचे पीक सर्वाधिक घेतले जाते. त्यापाठोपाठ केळी, ऊस, हळद आदी पिकांचा समावेश आहे. जिल्ह्यात आंतरपीक म्हणून तूर सर्वाधिक घेतली जाते. यंदाच्या हंगामात जिल्ह्यात जवळपास ७४ हजार हेक्टरवर तुरीची पेरणी झालेली आहे; परंतु यंदाचे हवामान आणि ऐन फुले-शेंगा लागण्याच्या काळात ढगाळ वातावरण आणि अवकाळी पावसामुळे उत्पादनात घट झाली. त्याचा फटका तूर उत्पादक शेतकऱ्यांना बसला आहे, तर बहुतांश शेतकऱ्यांच्या तुरीला शेंगा लागल्याच नाहीत. दरम्यान, आजघडीला तुरीला साडेपाच ते आठ हजार रुपये प्रतिक्विंटल भाव मिळत आहे. काही दिवसांपूर्वी हळदीला तेजी आली असून, नऊ हजार रुपये प्रतिक्विंटलपर्यंत हळद विकली गेली. हळदीपाठोपाठ तुरीच्या भावात झालेली वाढ दिलासादायक आहे; परंतु आज तूर अथवा हळद शेतकऱ्यांकडे नसून व्यापारी, अडते यांच्याकडे आहे. सदर भाववाढ ही व्यापारी वर्गाला लाभदायी ठरणारी आहे. मार्च, एप्रिल महिन्यात नवीन हळद बाजारात येईल तेव्हा हळदीला हाच भाव राहिला तर नक्कीच शेतकऱ्यांना दिलासा मिळेल.

यंदा कोरोनामुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. दरम्यान, काही दिवसांपासून बाजारपेठ पूर्वपदावर येत आहे. त्यात हळदीपाठोपाठ तुरीचेही भाव वाढले. अशीच भाववाढ सर्वच शेतमालाची झाली तर शेतकऱ्यांना दिलासा मिळेल.