शहरं
Join us  
Trending Stories
1
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
2
संगमनेरचे आमदार अमोल खाताळ यांच्यावर हल्ला, सुरक्षारक्षकांनी हल्लेखोर तरुणाला घेतले ताब्यात
3
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
4
ना बनवणार, ना विकणार! 'या' ८ जिल्ह्यांमध्ये फटाक्यांवर बंदी; नियमांचे पालन न केल्यास ५ वर्षांचा तुरुंगवास
5
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
6
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
7
नाशिकच्या देवळाली कॅम्पजवळ सैनिकाचे हँग ग्लायडर एका घरावर कोसळले; सरावादरम्यान दुर्घटना
8
नागपूर महामेट्रोच्या वित्त संचालकांना सायबर गुन्हेगारांकडून गंडा, गुगलवर बँकेचा नंबर शोधणे पडले महागात
9
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
10
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
11
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
12
विश्वासघातकी पक्षांनी 'समृद्ध उत्तर प्रदेश' ही ओळखच मिटवली; CM आदित्यनाथ यांचा सपा, काँग्रेसवर हल्ला
13
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
14
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
15
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
16
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
17
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
18
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
19
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
20
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर

हळदीपाठोपाठ तुरीच्या भावातही वाढ,

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2021 04:16 IST

नांदेड : कोरोना महामारी काळात आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना आपला माल व्यापाऱ्यांना बेभाव द्यावा लागला; परंतु आज शेतकऱ्यांकडे माल ...

नांदेड : कोरोना महामारी काळात आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना आपला माल व्यापाऱ्यांना बेभाव द्यावा लागला; परंतु आज शेतकऱ्यांकडे माल नसताना हळद, तूर, मूग आदींची मागणी वाढल्याने भावातही वाढ होत आहे. आता त्याचा फायदा शेतकऱ्यांना कमी आणि व्यापाऱ्यांना अधिक होत आहे.

नांदेड जिल्ह्यात ऊस, केळीबरोबर हळद, कापूस आणि सोयाबीनचे पीक घेणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या अधिक आहे; परंतु मागील काही दिवसांत शेतकऱ्यांना योग्य मोबदला मिळत नसल्याने त्यांनी पीक पद्धती बदलली आहे. जिल्ह्यात आजघडीला सोयाबीनचे पीक सर्वाधिक घेतले जाते. त्यापाठोपाठ केळी, ऊस, हळद आदी पिकांचा समावेश आहे. जिल्ह्यात आंतरपीक म्हणून तूर सर्वाधिक घेतली जाते. यंदाच्या हंगामात जिल्ह्यात जवळपास ७४ हजार हेक्टरवर तुरीची पेरणी झालेली आहे; परंतु यंदाचे हवामान आणि ऐन फुले-शेंगा लागण्याच्या काळात ढगाळ वातावरण आणि अवकाळी पावसामुळे उत्पादनात घट झाली. त्याचा फटका तूर उत्पादक शेतकऱ्यांना बसला आहे, तर बहुतांश शेतकऱ्यांच्या तुरीला शेंगा लागल्याच नाहीत. दरम्यान, आजघडीला तुरीला साडेपाच ते आठ हजार रुपये प्रतिक्विंटल भाव मिळत आहे. काही दिवसांपूर्वी हळदीला तेजी आली असून, नऊ हजार रुपये प्रतिक्विंटलपर्यंत हळद विकली गेली. हळदीपाठोपाठ तुरीच्या भावात झालेली वाढ दिलासादायक आहे; परंतु आज तूर अथवा हळद शेतकऱ्यांकडे नसून व्यापारी, अडते यांच्याकडे आहे. सदर भाववाढ ही व्यापारी वर्गाला लाभदायी ठरणारी आहे. मार्च, एप्रिल महिन्यात नवीन हळद बाजारात येईल तेव्हा हळदीला हाच भाव राहिला तर नक्कीच शेतकऱ्यांना दिलासा मिळेल.

यंदा कोरोनामुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. दरम्यान, काही दिवसांपासून बाजारपेठ पूर्वपदावर येत आहे. त्यात हळदीपाठोपाठ तुरीचेही भाव वाढले. अशीच भाववाढ सर्वच शेतमालाची झाली तर शेतकऱ्यांना दिलासा मिळेल.