शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प प्रशासनाचा नवा नियम! नवीन व्हिसा ऑर्डरनुसार, लठ्ठपणा किंवा मधुमेहामुळे अमेरिकेत प्रवेश मिळणार नाही; इतर आजारांचाही उल्लेख
2
धक्कादायक! ऑनलाइन क्रीम खरेदी केली, महिलेच्या शरीरावर सापासारखे व्रण; १० वर्षांत १२ लाख रुपये खर्च
3
हिवाळी अधिवेशन ८ डिसेंबरपासूनच, दोन आठवड्यांचे कामकाज; २८ नोव्हेंबरपासून सचिवालय नागपुरात, पत्र आले
4
अधिकाऱ्यांना वाचवण्याच्या नादात दोघांचा मृत्यू; सॅण्डहर्स्ट रेल्वे अपघातामध्ये मुलीचा मृत्यू; आई जखमी
5
सरकार कुणालाही पाठीशी घालणार नाही, अहवालात जो दोषी आढळेल त्याच्यावर कारवाई, जमीन घोटाळ्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांची स्पष्टोक्ती
6
Women's World Cup : भारताच्या लेकींसह प्रेक्षकांनीही रचला इतिहास; ते पाहून ICC चा ऐतिहासिक निर्णय!
7
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
8
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
9
पाकिस्तानला बेकायदेशीर अणु कारवायांचा इतिहास, आम्ही ट्रम्प यांच्या विधानाची दखल घेतली: भारत सरकार
10
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
11
माझ्या नवऱ्याला महिन्यापासून दारु पाजून जरांगेविरुद्ध षडयंत्र रचलं; अमोल खुणेंच्या कुटुंबीयांनी सगळंच सांगितलं
12
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
13
IPL 2026 : डेफिनेटली! MS धोनी पुन्हा मैदानात उतरण्यास तयार; CSK च्या ताफ्यातील आतली गोष्ट आली समोर
14
धोत्रे हत्या प्रकरण: अत्यंविधीला आला आणि पोलिसांनी पकडला, स्मशानभूमीत लावला होता सापळा
15
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
16
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान
17
बेळगावमध्ये ऊस आंदोलन पेटले! हत्तरगी टोल नाक्यावर शेतकऱ्यांकडून दगडफेक
18
Maharashtra Crime: तुकाराम स्वत:च लपून बसला आणि अपहरणाचा बनाव केला; पण असं का केलं?
19
"धन्या, तू आता पक्का अडकला"; धनंजय मुंडेंचा एकेरी उल्लेख, मनोज जरांगेंनी थेट ऑडिओ क्लिपच ऐकवली
20
AI Industry: 'एआय'चा फुगा फुटू लागला? अमेरिकेमध्ये १.५ लाख लोकांनी नोकऱ्या गमावल्या; गुंतवणूकदारही झाले अलर्ट

जिल्ह्यात लाॅकडाऊनच्या काळात झाले ७ बालविवाह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 9, 2021 04:14 IST

शासनाकडून बालविवाह रोखण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. यासाठी मुलींना शिक्षणाच्या विविध संधी प्राप्त करून दिल्या आहेत. मात्र आजही ग्रामीण ...

शासनाकडून बालविवाह रोखण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. यासाठी मुलींना शिक्षणाच्या विविध संधी प्राप्त करून दिल्या आहेत. मात्र आजही ग्रामीण भागात अनेक पालक आपल्या मुलीला नववीत असतानाच लग्नाचा विचार करतात. दहावीपर्यंत शिक्षण होवू न देता मुलीचे लग्न लावून देतात. यामध्ये ग्रामीण भागासोबतच शहरी भागातही प्रमाण वाढले आहे. विशेषत: लाॅकडाऊनमध्ये घरच्या घरी गुपचूप विवाह लावून देण्यात आले. प्रशासनाची नजर चुकवून असे विवाह वाढल्याचे चित्र आहे. बालविवाह रोखण्यासाठी महिला व बालकल्याण विभाग, चाईल्ल्ड लाईन आणि सामाजिक कार्यकर्ते प्रयत्न करीत असले तरी असे विवाह वाढत असल्याने समाज जागृतीची गरज निर्माण झाली आहे.

जिल्ह्यात लाॅकडाऊनच्या काळात बालविवाह झाले आहेत. असे असले तरी आम्ही वेबिनारच्या माध्यमातून समाजात जनजागृतीचे काम केले आहे. त्यासाठी विविध कार्यशाळा, व्याख्यानाचे व संवादाचे ऑनलाईन कार्यक्रम घेतले. शाळास्तरावरही विविध कार्यक्रम घेतले. जिल्ह्यात सर्वच गावात समित्या स्थापन करण्यात आल्या असून त्यांचे काम सुरू आहे. -विद्या आळणे,

कोरोनाच्या आठ महिन्यात जिल्ह्यात बालविवाह वाढले

मार्च २०२० मध्ये कोरोना महामारीमुळे देशभरात लाॅकडाऊन करण्यात आला होता. सुरूवातीचे दोन, तीन महिने सर्व व्यवहार ठप्प होता. मात्र हळहळू लाॅकडाऊनमध्ये शिथिलता येवू लागली. आणि मे, जून या महिन्यात विवाह सोहळे गुपचूप होवू लागले. यामध्ये बालविवाहाची संख्या अधिक आहे. प्रशासनाची नजर चुकवून हे विवाह लावले.

कोरोनामुळे करता आले नाही समित्यांना काम

जिल्ह्यात सर्वच गावात बाल संरक्षक समित्या स्थापन करण्यात आल्या आहेत. या समित्यांमध्ये ग्रामसेवक हे बालविवाह प्रतिबंधक अधिकारी म्हणून काम पाहतात. तसेच सरपंच य समितीचे अध्यक्ष असून समितीत अंगणवाडी सेविका, पोलीस पाटील, तलाठी, आशा वर्कर्स आदींचा समावेश असतो. बालविवाह रोखण्याची जबाबदारी समित्यावर आहे.

बालविवाह कायदा काय आहे?

१८ वर्षापेक्षा कमी वयात मुलीचा आणि २१ वर्षापेक्षा कमी वयात मुलाचा विवाह लावल्यास तो बालविवाह ठरतो. बालविवाह प्रतिबंधक कायद्यांतर्गत आई, वडील, नातेवाईकावर गुन्हा दाखल केला जाऊ शकतो. यात दोषी आढळल्यास शिक्षेस पात्रही ठरू शकतात.