शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
‘उद्धवसेनेसाठी मुंबई सोन्याची अंडी देणारी कोंबडी’,एकनाथ शिंदे यांची टीका  
3
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
4
अवजड ट्रक नियंत्रण सुटून कारवर उलटला, भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू 
5
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
6
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
7
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
8
खरंच दारूच्या नशेत बेधुंद होते इंग्लंड क्रिकेटपटू? ECB नं चौकशीची तयारी दाखवली, पण...
9
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
10
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
11
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
12
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
13
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
14
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
15
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
16
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
17
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
18
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
19
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
20
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात लाॅकडाऊनच्या काळात झाले ७ बालविवाह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 9, 2021 04:14 IST

शासनाकडून बालविवाह रोखण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. यासाठी मुलींना शिक्षणाच्या विविध संधी प्राप्त करून दिल्या आहेत. मात्र आजही ग्रामीण ...

शासनाकडून बालविवाह रोखण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. यासाठी मुलींना शिक्षणाच्या विविध संधी प्राप्त करून दिल्या आहेत. मात्र आजही ग्रामीण भागात अनेक पालक आपल्या मुलीला नववीत असतानाच लग्नाचा विचार करतात. दहावीपर्यंत शिक्षण होवू न देता मुलीचे लग्न लावून देतात. यामध्ये ग्रामीण भागासोबतच शहरी भागातही प्रमाण वाढले आहे. विशेषत: लाॅकडाऊनमध्ये घरच्या घरी गुपचूप विवाह लावून देण्यात आले. प्रशासनाची नजर चुकवून असे विवाह वाढल्याचे चित्र आहे. बालविवाह रोखण्यासाठी महिला व बालकल्याण विभाग, चाईल्ल्ड लाईन आणि सामाजिक कार्यकर्ते प्रयत्न करीत असले तरी असे विवाह वाढत असल्याने समाज जागृतीची गरज निर्माण झाली आहे.

जिल्ह्यात लाॅकडाऊनच्या काळात बालविवाह झाले आहेत. असे असले तरी आम्ही वेबिनारच्या माध्यमातून समाजात जनजागृतीचे काम केले आहे. त्यासाठी विविध कार्यशाळा, व्याख्यानाचे व संवादाचे ऑनलाईन कार्यक्रम घेतले. शाळास्तरावरही विविध कार्यक्रम घेतले. जिल्ह्यात सर्वच गावात समित्या स्थापन करण्यात आल्या असून त्यांचे काम सुरू आहे. -विद्या आळणे,

कोरोनाच्या आठ महिन्यात जिल्ह्यात बालविवाह वाढले

मार्च २०२० मध्ये कोरोना महामारीमुळे देशभरात लाॅकडाऊन करण्यात आला होता. सुरूवातीचे दोन, तीन महिने सर्व व्यवहार ठप्प होता. मात्र हळहळू लाॅकडाऊनमध्ये शिथिलता येवू लागली. आणि मे, जून या महिन्यात विवाह सोहळे गुपचूप होवू लागले. यामध्ये बालविवाहाची संख्या अधिक आहे. प्रशासनाची नजर चुकवून हे विवाह लावले.

कोरोनामुळे करता आले नाही समित्यांना काम

जिल्ह्यात सर्वच गावात बाल संरक्षक समित्या स्थापन करण्यात आल्या आहेत. या समित्यांमध्ये ग्रामसेवक हे बालविवाह प्रतिबंधक अधिकारी म्हणून काम पाहतात. तसेच सरपंच य समितीचे अध्यक्ष असून समितीत अंगणवाडी सेविका, पोलीस पाटील, तलाठी, आशा वर्कर्स आदींचा समावेश असतो. बालविवाह रोखण्याची जबाबदारी समित्यावर आहे.

बालविवाह कायदा काय आहे?

१८ वर्षापेक्षा कमी वयात मुलीचा आणि २१ वर्षापेक्षा कमी वयात मुलाचा विवाह लावल्यास तो बालविवाह ठरतो. बालविवाह प्रतिबंधक कायद्यांतर्गत आई, वडील, नातेवाईकावर गुन्हा दाखल केला जाऊ शकतो. यात दोषी आढळल्यास शिक्षेस पात्रही ठरू शकतात.