शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
2
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
3
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
4
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
5
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
6
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
7
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
8
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
9
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
10
गुजरात पोलिसांची मोठी कारवाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
11
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
12
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
13
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
14
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा
15
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
16
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
17
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
18
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
19
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
20
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात

चार प्रकल्पांत ४६ टक्के साठा

By admin | Updated: November 6, 2014 13:40 IST

जिल्ह्यातील चार मोठय़ा प्रकल्पांमध्ये आजघडीला ५१.६५ तर मध्यम प्रकल्पात ४१.८ टक्के पाणी शिल्लक आहे.

नांदेड : जिल्ह्यातील चार मोठय़ा प्रकल्पांमध्ये आजघडीला ५१.६५ तर मध्यम प्रकल्पात ४१.८ टक्के पाणी शिल्लक आहे. सर्वाधिक ७४ टक्के पाणी विष्णूपुरीत असले तरी, पुढील तीन महिन्यानंतर शहरवासियांना पाणीटंचाईचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे. तर शेतकर्‍यांची रबीही संकटात सापडली आहे.
विष्णूपुरी बंधार्‍यामुळे शहरवासियांचा पाणीप्रश्न सुटला होता. या धरणाची क्षमता जवळपास ८0 दलघमी आहे. यंदा हे धरण १00 टक्के भरले होते. परंतु आजघडीला त्यात फक्त ५९.९ दलघमी पाणी शिल्लक आहे. त्यामुळे मनपाला येत्या तीन महिन्यानंतर पाणीटंचाईचे नियोजन करावे लागणार आहे. परंतु त्यापूर्वी फेब्रुवारीमध्येच शहरवासियांना पाणीटंचाईची समस्या भेडसावण्याची दाट शक्यता आहे. 
जिल्ह्यातील मोठय़ा प्रकल्पांमध्ये ५१.७५ टक्के जलसाठा आहे. त्यात इसापूर प्रकल्पात ७२ टक्के पाण्याचा जिवंत साठा आहे. तर लोअर मनार प्रकल्पात-२४ टक्के, अप्पर मनार प्रकल्पात-३७ टक्के पाणी शिल्लक आहे. तर मध्यम प्रकल्पांमध्ये फक्त ४१.८ टक्के पाणी आहे. त्यात आमदुरा प्रकल्पात सर्वाधिक २३.७0 दलघमी एवढे पाणी आहे. दिग्रस प्रकल्पात-१८.७८ दलघमी, कारडखेड-५.२३ दलघमी, कुंदराळा- ३.३0१ दलघमी पाणी आहे. तर बाभळी बंधार्‍यात मात्र शून्य टक्के पाणीसाठा आहे. 
त्यामुळे जिल्हावासियांवर पाणीटंचाईचे भीषण संकट ओढवण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यात शेतकर्‍यांकडून रबी हंगामासाठी पाणी सोडण्याची मागणी होत आहे. परंतु पिण्यासाठीच सध्या प्रशासनाकडून पाणी आरक्षित करण्यात येत आहे. त्यामुळे शेतकर्‍यांची रबीही संकटात सापडली आहे. 
त्यात नुकतेच दुष्काळामुळे हातातोंडाशी आलेला घास गेलेल्या शेतकर्‍यांना रबीपासून असलेल्या थोड्याफार अपेक्षांचा भंग होण्याची चिन्हे आहेत. /(प्रतिनिधी)