शहरं
Join us  
Trending Stories
1
इम्रान खान जिवंत की मृत? तुरुंगात भेटायला गेलेली डॉक्टर बहीण बाहेर आली, म्हणाली... 
2
भाजपचे उमदेवार अजय अग्रवाल बोगस मतदान करुन घेत असल्याचा खळबळजनक आरोप ! फार्म हाऊसवर मिळाले महत्वाचे पुरावे
3
रोहित तयार, पण किंग कोहलीच्या मनात वाजतंय "आम्ही नाही जा.." गाणं; गंभीर-आगरकरचा 'तो' डाव फसणार?
4
“शिंदे मालवणात आले, येताना बॅगेतून काय आणले?”; थेट व्हिडिओ दाखवत संजय राऊतांचा सवाल
5
हसावे की...! मतदान केंद्रातील कर्मचारी बोटाला शाई लावायची सोडून गप्पा हाणत बसला; मतदार मतदान करून...
6
Travel : भारतीयांसाठी व्हिसा फ्री एन्ट्री! पण, मलेशिया फिरायला किती खर्च येतो? जायचा विचार करताय तर जाणून घ्या...
7
आकाशाला गवसणी! चंद्र-ताऱ्यांची स्वप्न पाहणारी भारताची मिसाईल वुमन; पुरस्काराने झाला सन्मान
8
१.१७ कोटींची बोली लावली, प्रसिद्धी मिळविली, आता म्हणतोय...'नको'; HR 88 B 8888 नंबर प्लेटचा पुन्हा लिलाव होणार
9
२०२५ संपताना हवं ते देणार, ८ राशींना सगळं मिळणार; गुरु-बुधाचा षडाष्टक योग, सोन्यासारखे दिवस!
10
IPL 2026 Auction: भारताच्या 'या' Top 10 स्टार क्रिकेटपटूंनी लिलावासाठी केली 'रजिस्ट्रेशन'
11
इथे मतदान करा, तिकडचे बटन दाबा...! आमदार संतोष बांगर यांच्याकडून मतदान केंद्रातच महिलेला सूचना, गुन्हा दाखल...
12
आधी फिरून येऊ म्हणाला, मग भांडण उकरून काढलं; संतापलेल्या रिक्षा चालकानं गर्लफ्रेंडला काचेच्या बाटलीनं मारलं!
13
पिण्याच्या पाण्यासाठी 'पादत्राणांचा त्याग', परमेश्वर कदम यांच्या सेवाभावी कार्याचा 'महाराष्ट्र समाजभूषण' पुरस्काराने गौरव!
14
“नगरपालिका निवडणुकीत सत्ताधाऱ्यांचा रडीचा डाव, बोगस मतदानावर कठोर कारवाई करा”: सपकाळ
15
फ्रिज मॅग्नेटचे चाहते आहात... दरवाजा सजवताना वीज बिलही वाढतं का? कंपन्यांनीच दिलं उत्तर
16
"मी पंकज कपूर यांचा मुलगा आहे, पण इंडस्ट्रीत एकटा लढलो", शाहिद कपूर स्पष्टच बोलला
17
हर्षित राणाला गौतम गंभीर इतक्या वेळा संधी का देतो? व्हायरल VIDEO मध्ये सापडलं उत्तर
18
सोन्यापेक्षा चांदीची किंमत दुप्पट! चांदीने दिला ८५% रिटर्न, लवकरच २ लाख रुपये प्रति किलोचा टप्पा पार करणार?
19
केंद्राचा मोठा निर्णय; पंतप्रधान कार्यालयाचे नाव बदलले, ‘सेवा तीर्थ’ नावाने ओळखले जाणार
20
कमाल झाली! चाहता मैदानात घुसला; सामना थांबला आणि हार्दिक पांड्यानं हसत सेल्फीसाठी दिली पोझ
Daily Top 2Weekly Top 5

चार प्रकल्पांत ४६ टक्के साठा

By admin | Updated: November 6, 2014 13:40 IST

जिल्ह्यातील चार मोठय़ा प्रकल्पांमध्ये आजघडीला ५१.६५ तर मध्यम प्रकल्पात ४१.८ टक्के पाणी शिल्लक आहे.

नांदेड : जिल्ह्यातील चार मोठय़ा प्रकल्पांमध्ये आजघडीला ५१.६५ तर मध्यम प्रकल्पात ४१.८ टक्के पाणी शिल्लक आहे. सर्वाधिक ७४ टक्के पाणी विष्णूपुरीत असले तरी, पुढील तीन महिन्यानंतर शहरवासियांना पाणीटंचाईचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे. तर शेतकर्‍यांची रबीही संकटात सापडली आहे.
विष्णूपुरी बंधार्‍यामुळे शहरवासियांचा पाणीप्रश्न सुटला होता. या धरणाची क्षमता जवळपास ८0 दलघमी आहे. यंदा हे धरण १00 टक्के भरले होते. परंतु आजघडीला त्यात फक्त ५९.९ दलघमी पाणी शिल्लक आहे. त्यामुळे मनपाला येत्या तीन महिन्यानंतर पाणीटंचाईचे नियोजन करावे लागणार आहे. परंतु त्यापूर्वी फेब्रुवारीमध्येच शहरवासियांना पाणीटंचाईची समस्या भेडसावण्याची दाट शक्यता आहे. 
जिल्ह्यातील मोठय़ा प्रकल्पांमध्ये ५१.७५ टक्के जलसाठा आहे. त्यात इसापूर प्रकल्पात ७२ टक्के पाण्याचा जिवंत साठा आहे. तर लोअर मनार प्रकल्पात-२४ टक्के, अप्पर मनार प्रकल्पात-३७ टक्के पाणी शिल्लक आहे. तर मध्यम प्रकल्पांमध्ये फक्त ४१.८ टक्के पाणी आहे. त्यात आमदुरा प्रकल्पात सर्वाधिक २३.७0 दलघमी एवढे पाणी आहे. दिग्रस प्रकल्पात-१८.७८ दलघमी, कारडखेड-५.२३ दलघमी, कुंदराळा- ३.३0१ दलघमी पाणी आहे. तर बाभळी बंधार्‍यात मात्र शून्य टक्के पाणीसाठा आहे. 
त्यामुळे जिल्हावासियांवर पाणीटंचाईचे भीषण संकट ओढवण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यात शेतकर्‍यांकडून रबी हंगामासाठी पाणी सोडण्याची मागणी होत आहे. परंतु पिण्यासाठीच सध्या प्रशासनाकडून पाणी आरक्षित करण्यात येत आहे. त्यामुळे शेतकर्‍यांची रबीही संकटात सापडली आहे. 
त्यात नुकतेच दुष्काळामुळे हातातोंडाशी आलेला घास गेलेल्या शेतकर्‍यांना रबीपासून असलेल्या थोड्याफार अपेक्षांचा भंग होण्याची चिन्हे आहेत. /(प्रतिनिधी)