शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळमध्ये भारतीय बसवर हल्ला, प्रवाशांना लुटले, पर्यटकांना विमानाने परत आणले
2
नेपाळवर बोलण्यापूर्वी पक्षाची परवानगी घ्या; वादानंतर भाजपचे सर्व मंत्री, नेते अन् इतरांना निर्देश
3
धक्कादायक! तक्रार करणाऱ्याला गाडीने चिरडले, DMK नेत्याला पोलिसांनी केली अटक
4
कोण आहे अविष्कार राऊत?; नेपाळमधील Gen Z आंदोलनापूर्वी केलेले जोरदार भाषण व्हायरल
5
एका शेअरवर ४ बोनस शेअर्स देणार ही कंपनी; ३ महिन्यांत पैसे केले डबल, कंपनीत स्टेट बँकेचीही गुंतवणूक
6
Infosys चं बायबॅक 'शॉपिंग'; १९% प्रीमिअमवर खरेदी करणार आपलेच शेअर्स, स्टॉक सुस्साट
7
'पोलंडमध्ये रशियाची घुसखोरी चुकीची, हे सर्व लवकरच संपेल'; ट्रम्प यांनी नाराजी व्यक्त केली, फ्रान्सने राफेल पाठवले
8
उमेश-प्रियाची 'बिन लग्नाची गोष्ट', १३ वर्षांनी पडद्यावर आली रिअल लाईफ जोडी; कसा आहे सिनेमा? वाचा रिव्ह्यू
9
पितृपक्ष २०२५: पितृअष्टमीला करा गजलक्ष्मी व्रत; लक्ष्मीपूजनाएवढेच महत्त्व, सुख संपत्तीने नांदतात सर्व!
10
Pitru Paksha 2025: पितृपक्षाचा एक आठवडा शिल्लक; पितृदोष कसा ओळखावा? उपाय कोणते? ते पाहू
11
ब्राझीलच्या माजी राष्ट्रपतींना सुनावली २७ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा, निवडणूक हरल्यानंतर केलेली ती कृती भोवली
12
Python Hunting: अजगर मारून त्याचं मांस शिजवलं, दोन जणांना अटक! 
13
सिक्कीममध्ये निसर्गाचा कोप! भूस्खलनात ४ जणांचा मृत्यू, ३ जण बेपत्ता, बचावकार्य सुरू
14
PPF अकाऊंट होल्डरचा अचानक मृत्यू झाल्यास कशी होईल सेटलमेंट? रक्कम मॅच्युअर होण्याची वाट पाहावी लागेल का?
15
सरकारचा जीआर कोणाला सरसकट आरक्षण देत नाही; मुख्यमंत्री फडणवीसांनी स्पष्ट केली भूमिका
16
नेपाळचा पुढचा पंतप्रधान कोण? जेन झी तरुणांची राष्ट्राध्यक्ष रामचंद्र पौडेल यांच्याशी दुसऱ्यांदा चर्चा
17
अमेरिकेत भारतीय वंशाच्या व्यक्तीची निर्घृण हत्या, पत्नी आणि मुलासमोरच केले कुऱ्हाडीने वार
18
नवरा सुपरस्टार तरीही पाय जमिनीवर, गर्वाचा लवलेशही नाही; भरत जाधव यांच्याप्रमाणेच त्यांची पत्नीही आहे अगदी साधी
19
आसुरी अहंकार नको, संस्कृतीसोबत सत्कृतीही जोपासायला हवी : मोरारीबापू
20
नेपाळचा पंतप्रधान कोण? आंदोलकांमध्येच जुंपली; भारत समर्थक म्हणून सुशीला कार्की यांना एका गटाने नाकारले

चार प्रकल्पांत ४६ टक्के साठा

By admin | Updated: November 6, 2014 13:40 IST

जिल्ह्यातील चार मोठय़ा प्रकल्पांमध्ये आजघडीला ५१.६५ तर मध्यम प्रकल्पात ४१.८ टक्के पाणी शिल्लक आहे.

नांदेड : जिल्ह्यातील चार मोठय़ा प्रकल्पांमध्ये आजघडीला ५१.६५ तर मध्यम प्रकल्पात ४१.८ टक्के पाणी शिल्लक आहे. सर्वाधिक ७४ टक्के पाणी विष्णूपुरीत असले तरी, पुढील तीन महिन्यानंतर शहरवासियांना पाणीटंचाईचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे. तर शेतकर्‍यांची रबीही संकटात सापडली आहे.
विष्णूपुरी बंधार्‍यामुळे शहरवासियांचा पाणीप्रश्न सुटला होता. या धरणाची क्षमता जवळपास ८0 दलघमी आहे. यंदा हे धरण १00 टक्के भरले होते. परंतु आजघडीला त्यात फक्त ५९.९ दलघमी पाणी शिल्लक आहे. त्यामुळे मनपाला येत्या तीन महिन्यानंतर पाणीटंचाईचे नियोजन करावे लागणार आहे. परंतु त्यापूर्वी फेब्रुवारीमध्येच शहरवासियांना पाणीटंचाईची समस्या भेडसावण्याची दाट शक्यता आहे. 
जिल्ह्यातील मोठय़ा प्रकल्पांमध्ये ५१.७५ टक्के जलसाठा आहे. त्यात इसापूर प्रकल्पात ७२ टक्के पाण्याचा जिवंत साठा आहे. तर लोअर मनार प्रकल्पात-२४ टक्के, अप्पर मनार प्रकल्पात-३७ टक्के पाणी शिल्लक आहे. तर मध्यम प्रकल्पांमध्ये फक्त ४१.८ टक्के पाणी आहे. त्यात आमदुरा प्रकल्पात सर्वाधिक २३.७0 दलघमी एवढे पाणी आहे. दिग्रस प्रकल्पात-१८.७८ दलघमी, कारडखेड-५.२३ दलघमी, कुंदराळा- ३.३0१ दलघमी पाणी आहे. तर बाभळी बंधार्‍यात मात्र शून्य टक्के पाणीसाठा आहे. 
त्यामुळे जिल्हावासियांवर पाणीटंचाईचे भीषण संकट ओढवण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यात शेतकर्‍यांकडून रबी हंगामासाठी पाणी सोडण्याची मागणी होत आहे. परंतु पिण्यासाठीच सध्या प्रशासनाकडून पाणी आरक्षित करण्यात येत आहे. त्यामुळे शेतकर्‍यांची रबीही संकटात सापडली आहे. 
त्यात नुकतेच दुष्काळामुळे हातातोंडाशी आलेला घास गेलेल्या शेतकर्‍यांना रबीपासून असलेल्या थोड्याफार अपेक्षांचा भंग होण्याची चिन्हे आहेत. /(प्रतिनिधी)