शहरं
Join us  
Trending Stories
1
‘लाडक्या बहिणीं’साठी अजित पवार यांनी आभाळातून पैसे आणायचे का? मंत्री मुश्रीफ यांचा टोला
2
पहलगाम हल्ल्यानंतर भारताला मिळाली जपानची साथ; संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी मानले आभार
3
लक्षात ठेवा, नापास झाल्याने आयुष्य संपत नाही ! सचिन तेंडुलकर, नागराज मंजुळे झाले होते नापास
4
Sensex २९५ आणि Nifty ११४ अंकांच्या तेजीसह बंद; 'या' शेअर्समध्ये मोठा चढ-उतार
5
रशियाचा भारताला पाठिंबा! 'पहलगामच्या गुन्हेगारांना सोडता कामा नये'; पुतिन यांचा पीएम मोदींना फोन
6
मोदी सरकार देतंय ₹५ लाख लिमिट असलेलं क्रेडिट कार्ड; कसा मिळेल फायदा, जाणून घ्या
7
"ऋषभ पंतला पुन्हा फॉर्मात यायचे असेल तर त्याने धोनीला फोन करावा"; दिग्गज फलंदाजाचा सल्ला
8
Nashik Crime: तिन्ही कोयत्यांवर जाधव बंधूंच्या रक्ताचे डाग आहेत तसेच; महाजनच्या घरात सापडली शस्त्रे
9
Ather Energy IPO चं अलॉटमेंट 'असं' करा चेक, ग्रे मार्केट प्रीमिअम काय देतोय संकेत?
10
POK नाही तर 'लाहोर'वरही भारताचा ताबा होता; UNSC च्या मध्यस्थीनं कसा वाचला पाकिस्तान?
11
आम्हाला वाचवा...भारताच्या मित्रराष्ट्रांसमोर पाकने पसरले हात; अमेरिका-रशियाने दिले 'हे' उत्तर
12
Mumbai: केतकीपाडा, फिल्मसिटी, दामूनगर येथील झोपड्यांवरील कारवाईला आठ दिवसांची मुदतवाढ
13
संतोष देशमुखांच्या कन्येचे 12वीत घवघवीत यश; वैभवीने मिळवले 85.33 टक्के गुण...
14
शाब्बास पोरी! ३ वेळा नापास होऊनही मानली नाही हार, मजुराची लेक झाली IAS अधिकारी
15
PF Account मधून किती रक्कम तुम्ही काढू शकता? काय आहेत नियम आणि अटी
16
परीक्षेत नापास, आयुष्यात पास! दहावीत मुलगा ६ विषयांत झाला फेल तरी पालकांनी कापला केक, कारण...
17
गायीच्या शेणापासून बनवलेल्या रंगानेच सरकारी कार्यालये रंगवा; CM योगी आदित्यनाथ यांचे आदेश 
18
खळबळजनक! मनाविरुद्ध लग्न होताच काढला पतीचा काटा; बॉयफ्रेंडसह ७ जणांना अटक
19
'गँग्ज ऑफ वासेपूर', 'दबंग' फेम प्रसिद्ध कलाकाराचं दुःखद निधन, बॉलिवूडवर पसरली शोककळा
20
"पाकिस्तानी आर्मी तिथल्या तरुणांना आवडत नाही", बॉलिवूड सिंगरचा दावा, म्हणाला- "ते म्हणाले की तुम्ही भाग्यवान..."

प्रवाशांअभावी १६५ बसेसला लागला ब्रेक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2021 04:13 IST

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या नांदेड विभागातून दररोज ४६३ नियते नियमितपणे चालविली जात होती. परंतु मार्च २०२० मध्ये कोरोना ...

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या नांदेड विभागातून दररोज ४६३ नियते नियमितपणे चालविली जात होती. परंतु मार्च २०२० मध्ये कोरोना महामारीने देशात अन् राज्यातही लॉकडाऊन करण्यात आले. तेव्हापासून जवळपास १८० दिवसांहून अधिक कालावधीसाठी एसटी जागेवरच थांबली. त्यानंतर राज्य शासनाच्या वतीने विविध नियम व अटी घालून प्रवाशांची वाहतूक सुरू करण्यात आली. दरम्यान, १ जूनपासून अनलॉक प्रक्रिया झाली असून सर्वच नियते सुरू करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या. परंतु ग्रामीण भागात पेरण्या सुरू असल्याने आणि शाळा, महाविद्यालये बंद असल्याने जवळपास १६५ बस बंद आहेत. त्यात मानव विकास मिशन अंतर्गतच्या ६३ बसेसचा समावेश आहे.

ग्रामीण भागाची रक्तवाहिनी म्हणून ओळखली जाणारी लालपरी मागील दीड वर्षांपासून अनेक गावपाड्यांवर पोहचली नाही. ग्रामस्थांची मागणी असतानाही प्रवाशांअभावी नियमितपणे बस चालविणे एसटी प्रशासनाला परवडणारे नाही. त्यामुळे गावखेड्यातील बससेवा टप्प्याटप्प्याने सुरू केली जात असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले. आजघडीला नांदेड विभागातून २९८ नियते चालविली जात आहेत. त्यातून दररोज सरासरी ३० ते ३२ लाख रुपये उत्पन्न मिळत आहे. यातून नियमित होणारा खर्च अन् पगार निघणेही कठीण झाले आहे.

चौकट .........

ग्रामीण भागातील दळणवळणाला अडथळा

ज्या ठिकाणी रेल्वे अथवा खासगी वाहने पोहचली नाहीत, अशा ठिकाणीही एसटी बससेवा पोहचली. त्यामुळेच लालपरीला ग्रामीण भागाची रक्त वाहिनी म्हणून संबोधले जाते. परंतु कोरोना महामारीनंतर अनेक गावखेड्यातील बससेवा बंद झाल्याने प्रवाशांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यात नांदेड जिल्ह्यातील आदिवासी बहुल भाग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या किनवट, माहूर हिमायतनगर आदी तालुक्यातील गावपाड्यांमध्ये नागरिकांना दळणवळणासाठी पर्यायी वाहनांचा शोध घ्यावा लागत आहे.

चौकट .........

एसटीला माल वाहतुकीचा आधार

कोरोना महामारीमुळे प्रवासी संख्या घटल्याने एसटी प्रशासनाने माल वाहतुकीवर भर दिला आहे. नांदेड विभागात असणाऱ्या १५ बस ट्रकच्या माध्यमातून मागील महिनाभरात २३ लाख ८४ हजार रुपयांचे अतिरिक्त उत्पन्न नांदेड विभागाला मिळाले आहे. त्यात अकोला, बुलडाणा, रत्नागिरी, औरंगाबाद, अमरावती आदी ठिकाणी शेतमाल व इतर मालाची वाहतूक करण्यात आली आहे.

एसटी पार्सल सुविधाही पुरविणार

मालवाहतुकीला मिळणारा प्रतिसाद पाहता एसटी महामंडळाकडून आता कुरिअर सेवाही दिली जाणार आहे. ही सेवा गावखेड्यापर्यंत चालविण्याचा विचार एसटी प्रशासन करीत आहे. त्या अनुषंगाने वरिष्ठ कार्यालयाकडून सूचना मागविण्यात आल्या आहेत. प्रवासी वाहतुकीतून मिळणाऱ्या उत्पन्न बरोबर इतर उत्पन्नाचे स्त्रोत एसटी महामंडळाकडून निर्माण केले जात आहे.