शहरं
Join us  
Trending Stories
1
“१०० टक्के ठाकरे बंधूंना १०० जागा मिळतील, युतीची केवळ घोषणा बाकी, जागावाटप पूर्ण”: संजय राऊत
2
दीपूचंद्र दासच्या मित्रांनीच केली 'गद्दारी', मारणाऱ्या धर्मांध जमावातच झाले सामील अन्...! सामोर आलं धक्कादायक सत्य
3
महाविकास आघाडी फुटणार? सुप्रिया सुळे म्हणाल्या, "...तर आम्ही इतर पर्यायांचा विचार करू"
4
इंडिगो एअरलाइन्स मार्चनंतर तुर्कीकडून घेतलेली विमानांचे उड्डाण करणार नाही; DGCA ने दिला स्पष्ट नकार
5
सोलापुरात अजित पवारांचा भाजपाला धक्का! अतुल पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश
6
आठ कोटी, बारा पानांची चिठ्ठी आणि स्वतःवरच झाडली गोळी; Ex IPS अमर सिंग चहल यांची प्रकृती गंभीर, असा निर्णय का घेतला?
7
८ लाखांच्या गुंतवणुकीवर मिळवा ३,२८,००० रुपये फिक्स व्याज! ज्येष्ठ नागरिकांसाठी पोस्टाची 'खास' भेट
8
"मनसेचे जे काही नगरसेवक निवडून येतील, तेदेखील पळवतील", भाजपचा राज ठाकरेंना सावधगिरीचा सल्ला
9
गॅल्व्हेस्टनजवळ मेक्सिकन नौदलाच्या विमानाचा भीषण अपघात, पाच जणांचा मृत्यू
10
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
11
२०२५चे शेवटचे पंचक: ५ दिवस अशुभ, पण ‘ही’ कामे करणे शुभ; दोष लागणार नाही, नेमके काय टाळावे?
12
Bigg Boss Marathi: लावणी डान्सरला 'बिग बॉस मराठी'ची ऑफर? म्हणाली- "मला त्यांच्याकडून मेल आलाय..."
13
बांगलादेशात युनूस सरकार उलथवून टाकण्याची तयारी सुरू! उस्मान हादीच्या संघटनेने दिला मोठा इशारा
14
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, ट्रम्प प्रशासनाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
15
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
16
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २३ डिसेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मितभाषी राहून मतभेद दूर करू शकाल
17
बांगलादेशात आणखी एका नेत्याची निर्घृण हत्या; आसाममध्ये हाय अलर्ट, सीमेवर अधिक दक्षता
18
संपादकीय: एप्स्टीन फाइल्स, भारत अन् न झालेला राजकीय भूकंप!
19
कोकाटे यांची आमदारकी तूर्त वाचली; सर्वोच्च न्यायालयाकडून २ वर्षांच्या शिक्षेला स्थगिती 
20
पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला आणखी एक झटका; मुद्रांक शुल्क सवलतीचे इरादा पत्र अखेर केले रद्द 
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात १३ हजार लाभार्थी दुसऱ्या टप्प्यातील अनुदानाच्या प्रतीक्षेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2021 04:17 IST

या योजनेअंतर्गत जिल्ह्यात १८ हजार ६५१ घरकुलांचे काम पूर्ण झाले असून २९ हजार ५१३ घरांचे काम अपूर्ण आहे. घरकुल ...

या योजनेअंतर्गत जिल्ह्यात १८ हजार ६५१ घरकुलांचे काम पूर्ण झाले असून २९ हजार ५१३ घरांचे काम अपूर्ण आहे. घरकुल पूर्ण होण्याची टक्केवारीही ३९ टक्के इतकीच आहे. त्यामुळे या योजनेच्या लाभार्थ्यांना आपले घर पूर्ण कधी होईल, याची प्रतीक्षा आहे. जिल्ह्यात ४४ हजार १८७ घरकुलांना मंजुरी प्राप्त झाली आहे, तर आणखी ३० हजार ७३८ घरकुलांना ऑनलाइन मंजुरी मिळाली नाही. ३४ हजार ५२६ लाभार्थ्यांना पहिल्या हप्त्याचे वितरण करण्यात आले आहे. अजूनही १३ हजार ११२ लाभार्थ्यांना दुसऱ्या हप्त्याची प्रतीक्षा आहे. प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत जिल्ह्यात १३ हजार ११२ लाभार्थ्यांना दुसऱ्या टप्प्यातील अनुदानाची प्रतीक्षा आहे. त्यामुळे गेल्या सहा महिन्यांपासून घराचे काम रखडल्याने आता राहायचे कसे, असा प्रश्न या लाभार्थ्यांपुढे उभा राहिला आहे.

जिल्ह्यात प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत ४८ हजार ९२५ घरकुले उभारण्याचे उद्दिष्ट आहे. त्यात ४४ हजार २०४ घरांना मंजुरी देण्यात आली आहे. या घरकुल लाभार्थ्यांना चार टप्प्यांत अनुदान वितरित केले जात आहे. घरकुलासाठी १ लाख २० हजार रुपये ग्रामीण भागात दिले जात असून घरकुल मंजुरीनंतर १५ हजार रुपये ॲडव्हान्स उपलब्ध करून दिले जात आहे. पायाभरणीनंतर दुसऱ्या टप्प्यातील ४५ हजार, तिसऱ्या टप्प्यातील ४० हजार आणि काम पूर्ण झाल्यानंतर २० हजार असे अनुदान वाटप केले जात आहे.

या योजनेअंतर्गत जिल्ह्यात १८ हजार ६५१ घरकुलांचे काम पूर्ण झाले असून २९ हजार ५१३ घरांचे काम अपूर्ण आहे. घरकुल पूर्ण होण्याची टक्केवारीही ३९ टक्के इतकीच आहे. त्यामुळे या योजनेच्या लाभार्थ्यांना आपले घर पूर्ण कधी होईल, याची प्रतीक्षा आहे. जिल्ह्यात ४४ हजार १८७ घरकुलांना मंजुरी प्राप्त झाली आहे तर आणखी ३० हजार ७३८ घरकुलांना ऑनलाइन मंजुरी मिळाली नाही. ३४ हजार ५२६ लाभार्थ्यांना पहिल्या हप्त्याचे वितरण करण्यात आले आहे. अजूनही १३ हजार ११२ लाभार्थ्यांना दुसऱ्या हप्त्याची प्रतीक्षा आहे.

प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत घरकुल मंजूर झाल्यानंतर आनंद झाला. कामही सुरू केले. पहिला हप्ता मिळाला, पण आता दुसऱ्या हप्त्याची प्रतीक्षा असून काम थांबले आहे. पावसाळ्यापूर्वी काम करण्याची घाई झाली आहे. परंतु हातात पैसेच नसल्याने काम करायचे कसे, असा प्रश्न समोर आहे. ऊन, वाऱ्यापासून संरक्षण करायचे कसे? आहे ते घरही नव्या घरकुलासाठी पाडून ठेवले आहे.

- जमुनाबाई सुरेवाड, हदगाव

खेड्यामध्ये राहणाऱ्या गरिबांसाठी प्रधानमंत्री आवास योजना मोलाची आहे. या योजनेअंतर्गत घरकुल मिळवण्यासाठी मोठे प्रयत्न केले. अखेर यादीत नाव आले. कामही सुरू केले. जिल्ह्यातील वाळूचे भाव गगनाला भिडल्याने सुरुवातीपासूनच काम हळूहळू होत आहे. त्यात सरकारकडून मिळणाऱ्या अनुदानाचेही चार टप्प्पे करण्यात आले आहेत. त्यामुळे काम गतीने पूर्ण होईना. दुसऱ्या टप्प्यातील अनुदानासाठी तालुकास्तरावर वारंवार फेऱ्या मारूनही निराशाच येत आहे.

- सुलोचना वाघमारे, नरसी

प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना झालेल्या कामानुसार अनुदान वितरित करण्यात येत आहे. घराचे काम ज्या टप्प्यात पूर्ण झाले आहे त्या टप्प्यापर्यंतचे पैसे थेट लाभार्थ्यांच्या खात्यात जमा केले जात आहेत. सुरुवातीला निधीचा प्रश्न होता. परंतु तो आता सुटला आहे. आता लगेच लाभार्थ्यांना कामानुसार पैसे दिले जात आहेत. विशेष म्हणजे हे अनुदान ऑनलाइन पद्धतीने थेट खात्यात जमा केले जात असल्याने तक्रारी कमी झाल्या आहेत.

-डॉ. शरद कुलकर्णी, प्रकल्प संचालक, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा

डोक्यावरील छप्पर गेल्याने हाल

ग्रामीण भागात घरकुलांसाठी लाभार्थ्यांनी राहते घर पाडले आहे. नव्या घराचे काम अर्धवट असल्याने आता लाभार्थ्यांना चिंता लागली आहे. बांधाकाम साहित्याचे वाढलेले दर, वाढलेली मजुरी तसेच वाळूही उपलब्ध होत नसल्याने कसेबसे करत काम सुरू आहे. योजनेचा पहिला हप्ता प्राप्त झाला असला तरीही दुसरा हप्ता मिळण्याची प्रतीक्षा आहे. तालुकास्तरीय अधिकाऱ्यांकडे वारंवार फेऱ्या माराव्या लागत आहेत. परंतु सध्या तोडक्या-मोडक्या घरातच गुजराण करावी लागत आहे.