शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
2
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला दिला स्पष्ट संदेश
3
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
4
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
5
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
6
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
7
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
8
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
9
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
10
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
11
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
12
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
13
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
14
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
15
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
16
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
17
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
18
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
19
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
20
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 

जिल्ह्यात १३ हजार लाभार्थी दुसऱ्या टप्प्यातील अनुदानाच्या प्रतीक्षेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2021 04:17 IST

या योजनेअंतर्गत जिल्ह्यात १८ हजार ६५१ घरकुलांचे काम पूर्ण झाले असून २९ हजार ५१३ घरांचे काम अपूर्ण आहे. घरकुल ...

या योजनेअंतर्गत जिल्ह्यात १८ हजार ६५१ घरकुलांचे काम पूर्ण झाले असून २९ हजार ५१३ घरांचे काम अपूर्ण आहे. घरकुल पूर्ण होण्याची टक्केवारीही ३९ टक्के इतकीच आहे. त्यामुळे या योजनेच्या लाभार्थ्यांना आपले घर पूर्ण कधी होईल, याची प्रतीक्षा आहे. जिल्ह्यात ४४ हजार १८७ घरकुलांना मंजुरी प्राप्त झाली आहे, तर आणखी ३० हजार ७३८ घरकुलांना ऑनलाइन मंजुरी मिळाली नाही. ३४ हजार ५२६ लाभार्थ्यांना पहिल्या हप्त्याचे वितरण करण्यात आले आहे. अजूनही १३ हजार ११२ लाभार्थ्यांना दुसऱ्या हप्त्याची प्रतीक्षा आहे. प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत जिल्ह्यात १३ हजार ११२ लाभार्थ्यांना दुसऱ्या टप्प्यातील अनुदानाची प्रतीक्षा आहे. त्यामुळे गेल्या सहा महिन्यांपासून घराचे काम रखडल्याने आता राहायचे कसे, असा प्रश्न या लाभार्थ्यांपुढे उभा राहिला आहे.

जिल्ह्यात प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत ४८ हजार ९२५ घरकुले उभारण्याचे उद्दिष्ट आहे. त्यात ४४ हजार २०४ घरांना मंजुरी देण्यात आली आहे. या घरकुल लाभार्थ्यांना चार टप्प्यांत अनुदान वितरित केले जात आहे. घरकुलासाठी १ लाख २० हजार रुपये ग्रामीण भागात दिले जात असून घरकुल मंजुरीनंतर १५ हजार रुपये ॲडव्हान्स उपलब्ध करून दिले जात आहे. पायाभरणीनंतर दुसऱ्या टप्प्यातील ४५ हजार, तिसऱ्या टप्प्यातील ४० हजार आणि काम पूर्ण झाल्यानंतर २० हजार असे अनुदान वाटप केले जात आहे.

या योजनेअंतर्गत जिल्ह्यात १८ हजार ६५१ घरकुलांचे काम पूर्ण झाले असून २९ हजार ५१३ घरांचे काम अपूर्ण आहे. घरकुल पूर्ण होण्याची टक्केवारीही ३९ टक्के इतकीच आहे. त्यामुळे या योजनेच्या लाभार्थ्यांना आपले घर पूर्ण कधी होईल, याची प्रतीक्षा आहे. जिल्ह्यात ४४ हजार १८७ घरकुलांना मंजुरी प्राप्त झाली आहे तर आणखी ३० हजार ७३८ घरकुलांना ऑनलाइन मंजुरी मिळाली नाही. ३४ हजार ५२६ लाभार्थ्यांना पहिल्या हप्त्याचे वितरण करण्यात आले आहे. अजूनही १३ हजार ११२ लाभार्थ्यांना दुसऱ्या हप्त्याची प्रतीक्षा आहे.

प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत घरकुल मंजूर झाल्यानंतर आनंद झाला. कामही सुरू केले. पहिला हप्ता मिळाला, पण आता दुसऱ्या हप्त्याची प्रतीक्षा असून काम थांबले आहे. पावसाळ्यापूर्वी काम करण्याची घाई झाली आहे. परंतु हातात पैसेच नसल्याने काम करायचे कसे, असा प्रश्न समोर आहे. ऊन, वाऱ्यापासून संरक्षण करायचे कसे? आहे ते घरही नव्या घरकुलासाठी पाडून ठेवले आहे.

- जमुनाबाई सुरेवाड, हदगाव

खेड्यामध्ये राहणाऱ्या गरिबांसाठी प्रधानमंत्री आवास योजना मोलाची आहे. या योजनेअंतर्गत घरकुल मिळवण्यासाठी मोठे प्रयत्न केले. अखेर यादीत नाव आले. कामही सुरू केले. जिल्ह्यातील वाळूचे भाव गगनाला भिडल्याने सुरुवातीपासूनच काम हळूहळू होत आहे. त्यात सरकारकडून मिळणाऱ्या अनुदानाचेही चार टप्प्पे करण्यात आले आहेत. त्यामुळे काम गतीने पूर्ण होईना. दुसऱ्या टप्प्यातील अनुदानासाठी तालुकास्तरावर वारंवार फेऱ्या मारूनही निराशाच येत आहे.

- सुलोचना वाघमारे, नरसी

प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना झालेल्या कामानुसार अनुदान वितरित करण्यात येत आहे. घराचे काम ज्या टप्प्यात पूर्ण झाले आहे त्या टप्प्यापर्यंतचे पैसे थेट लाभार्थ्यांच्या खात्यात जमा केले जात आहेत. सुरुवातीला निधीचा प्रश्न होता. परंतु तो आता सुटला आहे. आता लगेच लाभार्थ्यांना कामानुसार पैसे दिले जात आहेत. विशेष म्हणजे हे अनुदान ऑनलाइन पद्धतीने थेट खात्यात जमा केले जात असल्याने तक्रारी कमी झाल्या आहेत.

-डॉ. शरद कुलकर्णी, प्रकल्प संचालक, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा

डोक्यावरील छप्पर गेल्याने हाल

ग्रामीण भागात घरकुलांसाठी लाभार्थ्यांनी राहते घर पाडले आहे. नव्या घराचे काम अर्धवट असल्याने आता लाभार्थ्यांना चिंता लागली आहे. बांधाकाम साहित्याचे वाढलेले दर, वाढलेली मजुरी तसेच वाळूही उपलब्ध होत नसल्याने कसेबसे करत काम सुरू आहे. योजनेचा पहिला हप्ता प्राप्त झाला असला तरीही दुसरा हप्ता मिळण्याची प्रतीक्षा आहे. तालुकास्तरीय अधिकाऱ्यांकडे वारंवार फेऱ्या माराव्या लागत आहेत. परंतु सध्या तोडक्या-मोडक्या घरातच गुजराण करावी लागत आहे.