शहरं
Join us  
Trending Stories
1
ठरले! महादेव बाबर NCPमध्ये करणार प्रवेश; DCM अजित पवार राहणार उपस्थित, पुण्यात ताकद वाढणार
2
इस्रायलचा इराणवर मोठा हल्ला, ५० हून अधिक लढाऊ विमानांचा कहर; महत्त्वाच्या लष्करी तळांवर तुफान बॉम्बिंग
3
"२०२२ मध्ये केवळ वादळ होतं, २०२७ मध्ये....", पोटनिवडणुकीच्या निकालानं केजरीवाल खूश, केली मोठी भविष्यवाणी
4
खामेनेई पळून जाण्याच्या तयारीत! इराणच्या माजी युवराजांचा दावा, 'सुप्रीम लीडर'बद्दल काय म्हणाले?
5
"तमीज से खेलने के चक्कर में..." कडक खेळी शिवाय पंतची 'मन की बात' चर्चेत (VIDEO)
6
राजाच्या पैशानेच बनली त्याच्या मृत्यूची योजना! लग्नाआधीच सुरू केलेलं नवं खातं, सोनमनं तेच पैसे वापरले अन्... 
7
रिषभ पंतला तोड नाय! सेंच्युरीसह रचला इतिहास; स्टेडियम स्टँडमधून गावसकरांचा 'कोलांटी उडी' मार असा इशारा
8
इराणने अशी कोणती मिसाईल डागली? इस्रायलमध्ये ना अलर्ट आला ना सायरन वाजला; हायफावर कोसळली...
9
२८ जुलैचा दावा खरा होणार? तिसरे महायुद्ध अटळ? बाबा वेंगा-नास्त्रेदमस यांची मोठी भविष्यवाणी
10
"वाटलं भारताने अण्वस्त्र हल्लाच केला, पाकिस्तानकडे फक्त...', नेमकं काय म्हणाले बिलावल भुट्टो
11
KL राहुलनं शतकी खेळीसह साधला विक्रमी डाव! लिटल मास्टर गावसकरांसह द्रविडलाही टाकले मागे
12
'मी राज्यसभेवर जाणार नाही...', स्वतः अरविंद केजरीवालांनी लावला चर्चांना पूर्णविराम
13
इराण-इस्त्रायल युद्ध पेटले! ४० मिनिटे इस्रायलवर क्षेपणास्त्रांचा मारा, थरकाप उडवणारे व्हिडिओ व्हायरल!
14
७६ लाख रहस्यमय मतांबाबतच्या याचिकेवर हायकोर्टात सुनावणी पूर्ण; प्रकाश आंबेडकरांनी मांडली बाजू
15
आषाढी वारीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ सहभागी होणार; दिवसभर दिंडीसोबत चालणार
16
“विकासासाठीचा प्रत्येक रुपया सर्वसामान्यांपर्यंत पोहोचला पाहिजे”: DCM एकनाथ शिंदे
17
तिसऱ्या महायुद्धाला तोंड फुटण्याची भीती...! इराण इस्रायल युद्धात आणखी एका देशाची उडी; कुणाला देणार साथ?
18
“भास्कर जाधव नौटंकी, जनताच संन्यास देणार, तो काही एवढा मोठा माणूस नाही”; कुणी केली टीका?
19
गोव्याला जायचा प्लान करताय? ‘मुंबई-गोवा वंदे भारत’ट्रेनच्या शेकडो फेऱ्या रद्द; कारण आले समोर
20
क्रूरतेच कळस! हुंड्यात कार न मिळाल्याने पती झाला हैवान; पत्नीला मारलं, मणक्याचं हाड तोडलं अन्... 

कंधार तालुक्यातील २७ गावातील १२४ जण अपात्रः

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 29, 2020 04:16 IST

कंधार : गत ग्रामपंचायत निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यापासून विहित रितीने व विहित मुदतीत निवडणूक खर्चाचा हिशोब सादर केला नाही. ...

कंधार : गत ग्रामपंचायत निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यापासून विहित रितीने व विहित मुदतीत निवडणूक खर्चाचा हिशोब सादर केला नाही. तालुक्यात अशा १२४ जणांंना ५ वर्षाकरिता ग्रा.पं.निवडणूक लढविण्यास अपात्र ठरविण्यात आले. त्यात पुरूषांपेक्षा महिलांची संख्या जवळपास दुप्पट असल्याचे समोर आले आहे. आता सुरु असलेल्या ग्रामपंचायत निवडणूक प्रक्रियेत महिलेसाठी आरक्षित जागेवर उमेदवारी देताना गावपुढाऱ्यांची कसोटी लागत असल्याचे ग्रामीण भागातील चित्र आहे.

ग्रामपंचायत निवडणूक लढविणाऱ्या व्यक्तीने निवडणूक निकाल जाहीर झाल्यानंतर निवडणूक खर्चाचा हिशोब विहित रितीने व विहित मुदतीत दाखल करावे लागते. परंतु तसे केले नाही तर ग्रामपंचायत सदस्य राहण्यास किंवा सदस्य होण्यासाठी निवडणूक लढविण्यास अपात्र ठरविले जाते. गत निवडणुकीतील तालुक्यातील २७ गावातील १२४ उमेदवारांनी खर्चाचा हिशोब वेळेत दाखल केला नाही. त्यामुळे त्यांना अपात्र ठरविण्यात आले आहे. त्यात पुरूष संख्येपेक्षा जवळपास दुप्पट संख्या महिलांची आहे.

१२४ अपात्र जणाची गावनिहाय अशी आहे. दाताळा -२ ,वरवंट -१ ,चौकीमहाकाया -१ ,मानसिंगवाडी -७ ,कळका -१ ,महालिंगी -१ ,देवयाचीवाडी -७ ,नंदनवन -९, हटक्याळ -५ ,शिर्शी बु. -६ ,कौठा -७ ,मरशिवणी -१ ,आंबुलगा -२ ,कुरूळा -१ ,गोणार -३ ,शिराढोण -१ ,जाकापूर- ७ ,वहाद-१० ,लाठ खु.-९ ,पेठवडज -६ ,बहाद्दरपूरा -१ ,काटकंळबा -१० ,बाचोटी -१ ,वाखरड-४, नावंदयाचीवाडी -७ ,भुत्याचीवाडी -५ ,उस्माननगर -९ आदींचा समावेश आहे.

अपात्र ठरविल्याने निवडणुकीची फेर राजकीय आखणी

आपल्या गटातील उमेदवार अपात्र ठरल्याने आताच्या राजकीय स्थितीची फेर आखणी करण्याचा प्रसंग गावच्या प्रस्थापित पुढाऱ्यांवर ओढवला आहे. काटकंळबा ,उस्माननगर ,पेठवडज ,वहाद ,कौठा आदी गावातील निवडणुका अतिशय चुरशीच्या ठरतात. गावची सत्ता ताब्यात घेण्यासाठी गत काही दिवसापासून राजकीय डावपेच आखले जात होते. त्यानुसार वॉर्डातील उमेदवारी निश्चित केली जात होती. परंतु अपात्रतेचा निर्णय धडकताच नवीन समीकरणे जुळवावी लागत असल्याचे चित्र आहे.

ग्रामपंचायत निवडणुकीत गावपुढारी आपल्या वॉर्डातील राजकीय दबदब्यासाठी महिलांच्या आरक्षित जागेवर कुटुंबातील महिलांना उमेदवारी देतात. आणि सत्तेचा मार्ग सोपा करतात. मात्र अपात्रतेत महिलांची संख्या अधिक असल्याने पुढाऱ्यांची मोठी गोची झाली आहे. काहींनी गतवेळा पराभव स्वीकारत या निवडणुकीत विजय मिळविण्यासाठी खटाटोप चालविला होता. काहींना सलग विजयाची आशा होती. परंतु अपात्रतेमुळे अपेक्षाभंग झाला आहे. त्यामुळे नव्या राजकीय समीकरणाची जुळवणी करावी लागत असल्याचे ग्रामीण भागातील चित्र आहे.