शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Blast: २ वर्षांपासून सुरू होता स्फोटकं जमवण्याचा जीवघेणा खेळ; डॉ शाहीन शाहिदची कबुली
2
प्रशांत किशोर यांची भविष्यवाणी खरी होणार? बिहार निवडणुकीच्या एक्झिट पोलने केले शिक्कामोर्तब!
3
रेखा झुनझुनवालांच्या पोर्टफोलिओतील पेनी स्टॉकची पुन्हा भरारी! ६ महिन्यात तोटा भरुन काढत ३४ टक्के वाढ
4
जपानचे १,००,००० येन भारतामध्ये किती रुपये होतात? तुम्हाला फायदा होतो की नुकसान, जाणून घ्या
5
सीमेपासून अवघ्या २० किमी अंतरावर नवं आव्हान?; बांगलादेश सैन्यानं भारताला दिलेला शब्द मोडला
6
Tata घराण्यात मोठा बदल, नोएल टाटांच्या मुलाला मिळाली मोठी जबाबदारी; परदेशातून घेतलंय शिक्षण
7
एके-47 ठेवणाऱ्या डॉ. शाहीनचे थेट महाराष्ट्राशी कनेक्शन; जैशच्या महिला विंगची निघाली मास्टरमाईंड
8
“जनतेची काम करतो म्हणून प्रत्येक समाज घटक ८-८ लाखाच्या फरकाने निवडून देतात”: अजित पवार
9
दिल्लीतील स्फोटामुळे 'कॉकटेल २'चं शूट पुढे ढकललं, आजपासूनच होणार होती सुरुवात
10
एकही रुपया न गुंतवता दरवर्षी कमावू शकता ₹२.८८ लाख; पाहा PPF च सीक्रेट, लोकही विचारतील कसं केलं?
11
धर्मेंद्र यांना रुग्णालयातून डिस्चार्ज; सनी देओलच्या टीमने दिलं स्टेटमेंट, 'त्यांचं तुमच्यावर..."
12
Govinda Hospitalised : ६१ वर्षीय गोविंदाची अचानक तब्येत बिघडली, झाला बेशुद्ध, जुहूच्या रुग्णालयात दाखल
13
ATP Finals 2025: खेळ पाहण्यासाठी आलेल्या दोन चाहत्यांचा मृत्यू, क्रीडाविश्वात शोक!
14
इंजिनीअरिंग, फार्मसी, एमबीएची सीईटी वर्षातून दोनदा, यंदा एप्रिलमध्ये पहिली, तर मेमध्ये दुसरी सीईटी परीक्षा
15
महायुतीच्या त्सुनामीमुळे विरोधकांत भीती, आशिष शेलार यांचा टोला
16
आजचे राशीभविष्य, १२ नोव्हेंबर २०२५: आजचा दिवस आनंदी; पण 'या' राशीला स्त्रीमुळे अडचणीचा धोका
17
पोस्टरमुळे समोर आला डॉक्टरांचा दहशतवादी कट; स्फोटकांचा तपास यशस्वी, पण दिल्लीत कशी झाली चूक?
18
Delhi Blast: दिल्ली बॉम्बस्फोटावर पाकिस्ताननं काय म्हटलं? तुर्कीनं तर हद्द ओलांडली!
19
Dharmendra Health Update: धर्मेंद्र यांना हॉस्पिटलमधून डिस्चार्ज, डॉक्टरांनी दिले हेल्थ अपडेट
20
कार चालविणाऱ्या डॉक्टरचे दहशतवादी मॉड्युलशी संबंध, ठार झालेल्यांत समावेश

कंधार तालुक्यातील २७ गावातील १२४ जण अपात्रः

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 29, 2020 04:16 IST

कंधार : गत ग्रामपंचायत निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यापासून विहित रितीने व विहित मुदतीत निवडणूक खर्चाचा हिशोब सादर केला नाही. ...

कंधार : गत ग्रामपंचायत निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यापासून विहित रितीने व विहित मुदतीत निवडणूक खर्चाचा हिशोब सादर केला नाही. तालुक्यात अशा १२४ जणांंना ५ वर्षाकरिता ग्रा.पं.निवडणूक लढविण्यास अपात्र ठरविण्यात आले. त्यात पुरूषांपेक्षा महिलांची संख्या जवळपास दुप्पट असल्याचे समोर आले आहे. आता सुरु असलेल्या ग्रामपंचायत निवडणूक प्रक्रियेत महिलेसाठी आरक्षित जागेवर उमेदवारी देताना गावपुढाऱ्यांची कसोटी लागत असल्याचे ग्रामीण भागातील चित्र आहे.

ग्रामपंचायत निवडणूक लढविणाऱ्या व्यक्तीने निवडणूक निकाल जाहीर झाल्यानंतर निवडणूक खर्चाचा हिशोब विहित रितीने व विहित मुदतीत दाखल करावे लागते. परंतु तसे केले नाही तर ग्रामपंचायत सदस्य राहण्यास किंवा सदस्य होण्यासाठी निवडणूक लढविण्यास अपात्र ठरविले जाते. गत निवडणुकीतील तालुक्यातील २७ गावातील १२४ उमेदवारांनी खर्चाचा हिशोब वेळेत दाखल केला नाही. त्यामुळे त्यांना अपात्र ठरविण्यात आले आहे. त्यात पुरूष संख्येपेक्षा जवळपास दुप्पट संख्या महिलांची आहे.

१२४ अपात्र जणाची गावनिहाय अशी आहे. दाताळा -२ ,वरवंट -१ ,चौकीमहाकाया -१ ,मानसिंगवाडी -७ ,कळका -१ ,महालिंगी -१ ,देवयाचीवाडी -७ ,नंदनवन -९, हटक्याळ -५ ,शिर्शी बु. -६ ,कौठा -७ ,मरशिवणी -१ ,आंबुलगा -२ ,कुरूळा -१ ,गोणार -३ ,शिराढोण -१ ,जाकापूर- ७ ,वहाद-१० ,लाठ खु.-९ ,पेठवडज -६ ,बहाद्दरपूरा -१ ,काटकंळबा -१० ,बाचोटी -१ ,वाखरड-४, नावंदयाचीवाडी -७ ,भुत्याचीवाडी -५ ,उस्माननगर -९ आदींचा समावेश आहे.

अपात्र ठरविल्याने निवडणुकीची फेर राजकीय आखणी

आपल्या गटातील उमेदवार अपात्र ठरल्याने आताच्या राजकीय स्थितीची फेर आखणी करण्याचा प्रसंग गावच्या प्रस्थापित पुढाऱ्यांवर ओढवला आहे. काटकंळबा ,उस्माननगर ,पेठवडज ,वहाद ,कौठा आदी गावातील निवडणुका अतिशय चुरशीच्या ठरतात. गावची सत्ता ताब्यात घेण्यासाठी गत काही दिवसापासून राजकीय डावपेच आखले जात होते. त्यानुसार वॉर्डातील उमेदवारी निश्चित केली जात होती. परंतु अपात्रतेचा निर्णय धडकताच नवीन समीकरणे जुळवावी लागत असल्याचे चित्र आहे.

ग्रामपंचायत निवडणुकीत गावपुढारी आपल्या वॉर्डातील राजकीय दबदब्यासाठी महिलांच्या आरक्षित जागेवर कुटुंबातील महिलांना उमेदवारी देतात. आणि सत्तेचा मार्ग सोपा करतात. मात्र अपात्रतेत महिलांची संख्या अधिक असल्याने पुढाऱ्यांची मोठी गोची झाली आहे. काहींनी गतवेळा पराभव स्वीकारत या निवडणुकीत विजय मिळविण्यासाठी खटाटोप चालविला होता. काहींना सलग विजयाची आशा होती. परंतु अपात्रतेमुळे अपेक्षाभंग झाला आहे. त्यामुळे नव्या राजकीय समीकरणाची जुळवणी करावी लागत असल्याचे ग्रामीण भागातील चित्र आहे.