शहरं
Join us  
Trending Stories
1
Raj Thackeray : मोर्चाला कोण येणार नाही हेही मला बघायचंय; राज ठाकरेंची हिंदी सक्तीविरोधात भव्य मोर्चाची घोषणा
2
इराण-इस्त्रायल युद्धातून भारताने घेतला धडा; आता 'ही' क्षमता दुप्पट करण्याची तयारी
3
ती मुलगी मला पसंत नव्हती, तरी...; २३ वर्षांच्या नवरदेवाने सोशल मीडियावर पोस्ट लिहिली अन् केलं कांड!
4
भारताच्या मित्र देशात सत्तांतराचं मोठं षडयंत्र अयशस्वी; प्रमुख आर्कबिशप यांच्यासह १४ जण अटकेत
5
Two Wheeler Toll: आता दुचाकींनाही टोल; १५ ऑगस्टपासून 'या' मार्गांवरून जाण्यासाठी मोजावे लागणार पैसे
6
"मला आणि माझ्या मुलाला इच्छामरणाचा अधिकार द्या" मुंबईकराचं फडणवीसांना पत्र, कारणही सांगितलं!
7
युद्धविराम झाला तरी...! इराणचे खामेनी बेपत्ता, इस्रायलचे सिक्रेट ऑपरेशन सुरूच
8
लाखावर दर गेल्यावर युरोप मागतोय अमेरिकेकडे सोने; रस्त्याच्या खाली आहे लाखो टन सोने...
9
"...तर आईची भाषा घरा बाहेर गेलीच समजा’’, वैभव मांगलेंची खरमरीत पोस्ट, उपस्थित केले असे प्रश्न 
10
'नमस्कार फ्रॉम स्पेस...', अंतराळातून शुभांशू शुक्लांचा नवीन Video; काय म्हणाले पाहा...
11
'या' तरुणीने रील बनवून कमावले ४१ कोटी! रोज कमावते अडीच लाख रुपये! कोण आहे 'द रिबेल किड'?
12
‘यूं ही चला चल…’ गाणे ऐकले अन्...; हवाई दलाचे वैमानिक ते अंतराळवीर अशी भरारी, असा आहे शुभांशू शुक्ला यांचा प्रवास
13
'शांत हो श्रीगुरुदत्ता' हे विनवणीपर कवन टेंबे स्वामींना का लिहिले? त्याक्षणी नेमके घडले तरी काय?
14
"दिवा विझल्यावर.…’’, भास्कर जाधवांची नाराजी व्यक्त करण्यासाठी ‘स्टेटस’नीती, चर्चांना उधाण
15
Maharashtra Politics : “तुझ्या अंगावरचे कपडे आम्ही दिलेत, बापाला पेरणीला पैसेही”, भाजपाच्या लोणीकरांचं वादग्रस्त विधान
16
मुंबईत ३० व्या मजल्यावरून उडी घेत अल्पवयीन मुलीची आत्महत्या; कुटुंबीयांकडून घातपाताचा संशय
17
FASTag वापरणाऱ्यांसाठी खूशखबर! आता फक्त टोल नाही, तर पार्किंग-चार्जिंगसह 'या' कामांसाठीही वापरता येणार?
18
मित्रांसोबत इकडं जा... तिकडं जा खेळ रंगला अन् सराव कमी पडला! पृथ्वी शॉला चूक कळली, आता...
19
Video: धक्कादायक! रील बनवण्यासाठी महिलेने चक्क रेल्वे रुळांवरून चालवली कार, अखेरीस...  
20
Viral Video: धापा टाकत रुग्णालयात पोहोचला, डॉक्टरांनी विचारताच उघडली बॅग, पाहून अनेकांची बोलती बंद!

जि.प.चे ओबीसी कर्मचारी पदोन्नतीपासून वंचित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2021 04:09 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : जिल्हा परिषदेच्या सामान्य प्रशासन विभागांतर्गत (जीएडी) सद्य:स्थितीत पदोन्नतीची प्रक्रिया राबविली जात आहे; ...

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : जिल्हा परिषदेच्या सामान्य प्रशासन विभागांतर्गत (जीएडी) सद्य:स्थितीत पदोन्नतीची प्रक्रिया राबविली जात आहे; परंतु या प्रक्रियेपासून ओबीसी प्रवर्गातून निवडीने नेमणूक दिलेल्या मर्यादित स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण कर्मचाऱ्यांना डावलल्या जात असल्याचा आरोप काही कर्मचाऱ्यांकडून करण्यात येत आहे. एकप्रकारे ओबीसी कर्मचाऱ्यांच्या तोंडचे पाणी पळविण्यात आल्याची चर्चा जि. प. वर्तुळात सुरू आहे. जि. प. च्या सर्वसाधारण सभेतही हा मुद्दा गाजला होता. सदस्या अवंतिका लेकुरवाळे यांनी हा प्रश्न उपस्थित केला होता. हे विशेष.

जि.प.अंतर्गत कनिष्ठ सहायक कर्मचाऱ्यांसाठी मर्यादित स्पर्धा परीक्षा विभागीय आयुक्तालयाद्वारे घेण्यात येते. ही परीक्षा उत्तीर्ण केलेल्या कर्मचाऱ्यांना वरिष्ठ सहायक पदावर निवडीने नेमणूक देण्याची तरतूद महाराष्ट्र जि.प. जिल्हा सेवा (सेवाप्रवेश) नियम १९६७ अन्वये करण्यात आली असल्याचे कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे. तसेच ग्राम विकास विभागाचे पत्र क्र. एपीटी १०९२/१०२६ सीआर ६०२/१३ २१ सप्टेंबर १९९२ अन्वये निवडीने भरण्यासाठी मागासवर्गीयांच्या प्रत्येक गटातील व्यक्तीसाठी राखून ठेवण्याचे आरक्षणाचे प्रमाण सेवाप्रवेश नियमामध्ये नामनिर्देशनासाठी विहित केलेल्या आरक्षणाच्या प्रमाणानुसार ठरविण्यात यावे व त्यासाठी स्वतंत्र १०० बिंदू नामावली ठेवण्यात यावी, असे निर्देश आहेत. याच नियमांतर्गत आजतागायत कार्यवाही होऊन स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण कर्मचाऱ्यांना नागपूर जि.प.ने त्यांचे स्वत: चे आदेशान्वये वरिष्ठ सहायक पदावर निवडीने नेमणूक दिलेली आहे.. मात्र, या नियमाची व स्वत:च्याच नेमणूक आदेशाचे विस्मरण जि.प.च्या जीएडीला झाले असून, निवडीने नेमणूक दिलेल्या कर्मचाऱ्यांची नेमणूक ही पदोन्नती आहे, किंवा नामनिर्देशनाव्दारे नेमणूक आहे, याबाबत संभ्रम निर्माण झाला आहे. या कारणावरून अनेक परीक्षा उत्तीर्ण मागासवर्गीय कर्मचाऱ्यांना पदोन्नतीपासून वंचित ठेवण्यात आल्याचा आरोप कर्मचाऱ्यांनी केला आहे. त्यातही ओबीसी कर्मचाऱ्यांना पदोन्नतीमध्ये कोणतेही आरक्षण नसताना अशा ओबीसी प्रवर्गातून परीक्षा उत्तीर्ण करून निवड झालेल्या कर्मचाऱ्यांनादेखील जि.प.ने पदोन्नतीपासून दूर ठेवल्याचा आरोप होत आहे.