शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणी नेत्यांच्या सुरक्षेसाठी पाकिस्ताननं अख्खी ताकद पणाला लावली; कसं केले होते नियोजन?
2
Latest Marathi News LIVE: आशा भोसले यांच्या अंत्ययात्रेला सुरुवात; शिवाजी पार्क स्मशानभूमीत होणार अंत्यसंस्कार
3
श्रीलंकेत भारताची मोठी खेळी; खरेदी केली मोठी शिपबिल्डिंग कंपनी, चीन पाहतच राहिला
4
आशा भोसलेंची नात जनाईला धीर द्यायला पोहोचला 'मानलेला भाऊ' मोहम्मद सिराज, पाहा VIDEO
5
MPSC भरती प्रक्रियेत मोठा बदल; राज्य मंत्रिमंडळाने घेतले ७ महत्त्वाचे निर्णय, जाणून घ्या
6
आले कधी अन् गेले कधी, समजलंच नाही! आयपीएलमध्ये सर्वात कमी धावसंख्येवर ऑलआउट झालेले संघ
7
८ व्या वेतन आयोगाची बंपर भरती; १.८० लाख रुपये महिना पगार, जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
8
पत्नीला काम सांगायचे म्हणून मुलाने केला पित्याचा खून; गडचिरोलीतील धक्कादायक घटना
9
Kalyan Accident: कल्याण-अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ११ जणांचा मृत्यू, दोन गंभीर
10
IPL 2026: "सरळ मैदानाबाहेर जा...!" लाईव्ह सामन्यात सुनील गावस्कर आरसीबीच्या खेळाडूवर भडकले
11
इस्रायलचा महात्मा गांधी हॉस्पिटलवर हल्ला; सगळीकडे विध्वंस, इराणनं शेअर केला Video
12
पाकिस्तानचा दुहेरी डाव! US-इराण शांतता चर्चा निष्फळ ठरताच १३००० सैनिक सौदीत पाठवले, कारण काय?
13
IPL 2026: बॉल बॉयनं पाय धरताच व्यंकटेश अय्यरनं केलं असं काही, सर्वत्र होतंय कौतुक! 
14
'एक अब्ज डॉलर आणि लग्नासाठी एक सुंदर तरुणी द्या, अन्यथा...', या देशाच्या लष्कर प्रमुखाची तुर्कीला धमकी
15
"हृदयात काबा आणि डोळ्यांत मदिना..."; कोण आहेत सभांमध्ये गाणे गाणाऱ्या TMC खासदार सायनी घोष?
16
भावनांचा बांध फुटला! आशा भोसले यांच्या अंत्यदर्शनावेळी नात जनाई भावुक, तब्बूने केलं सांत्वन
17
घराची सफाई करताना सापडलं 'सर्वात सुंदर' नाणं; १.३७ कोटी रुपयांना झाली विक्री, काय आहे खास?
18
VIDEO: लाडक्या 'आशाताईं'ना शेवटचा निरोप देताना सचिन तेंडुलकरला अश्रू अनावर
19
कागदावर २५ हजार सॅलरी अन् प्रत्यक्षात १५००० देतात...; कंपन्यांकडून शोषण, कर्मचारी भडकले
20
IPLमध्ये भाऊबंदकी, पांड्या बंधूंमध्ये बेबनाव? MI Vs RCB लढतीत दिसलं असं दृश्य, चाहत्यांना धक्का
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्याची आरोग्य यंत्रणा हाताळायला जिल्हा परिषद अपयशी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 23, 2021 04:08 IST

नागपूर : जिल्ह्यात कोरोनाचे वाढते संक्रमण, सोबतच मृत्यूची वाढती संख्या लक्षात घेता जिल्हा परिषदेची आरोग्य यंत्रणा कोरोनाची परिस्थिती हाताळायला ...

नागपूर : जिल्ह्यात कोरोनाचे वाढते संक्रमण, सोबतच मृत्यूची वाढती संख्या लक्षात घेता जिल्हा परिषदेची आरोग्य यंत्रणा कोरोनाची परिस्थिती हाताळायला अपयशी ठरली असल्याचा ठपका जिल्हा परिषदेच्या सदस्यांनीच ठेवला आहे.

१५ व्या वित्त आयोगातून जिल्हा परिषदेला मिळणाऱ्या निधीतून २५ टक्के खर्च हा आरोग्यावर करायचा होता. या खर्चातून जिल्ह्यातील रुग्णांसाठी सरपंच भवनाच्या इमारतीत कोविड सेंटर उभे करता आले असते, असे सदस्यांचे म्हणणे आहे. सध्या ग्रामीण भागामध्ये वाढत्या कोरोना रुग्णांंमुळे परिस्थती बेजार झाली आहे. रामटेक, पारशिवनी मध्ये कोविड केअर सेंटरची मागणी होत आहे. गंभीर झालेल्या रुग्णांना शहरात उपचारासाठी आणले असता, रुग्णालयाच्या चकरा माराव्या लागत आहेत. अशा परिस्थितीत जिल्हा परिषदेचे स्वत:चे ग्रामीण भागातील रुग्णांसाठी शहरात कोविड सेंटर तयार केले असते तर शहरात बेड मिळेपर्यंत त्यांच्यावर प्राथमिक उपचार झाले असते. जिल्हा परिषदेची स्वत:ची आरोग्य यंत्रणा आहे. सरपंच भवनासाठी शहरातील मध्यवर्ती ठिकाणी वास्तूदेखील आहे. १०० बेडची व्यवस्था येथे सहज करता आली असती. पण त्यासाठी कुणीच पुढाकार घेतला नाही. आम्ही वर्षभरात ग्रामीण जनतेसाठी काहीच करू शकलो नाही, अशी खंत सदस्यांनी व्यक्त केली. ग्रामीण भागात लोकांचा रोष वाढतो आहे. लोकप्रतिनिधींना सहन करावे लागत आहे. अजूनही वेळ गेलेली नाही. जिल्हा परिषदेचे पदाधिकारी, अधिकारी यांनी याकडे गांभीर्याने घेणे गरजेचे आहे.

- अध्यक्षांनी आरोग्याचा कारभार इतरांना सोपवावा

जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष मनोहर कुंभारे यांचे न्यायालयाच्या निर्णयानुसार सदस्यत्व रद्द झाल्यानंतर त्यांच्याकडे असलेल्या आरोग्य व बांधकाम समितीचा कारभार अध्यक्षाकडे हस्तांतरित झाला. अध्यक्षांकडे यासोबतच आणखी जबाबदाऱ्या आहेत. त्यामुळे आरोग्याकडे त्यांचे दुर्लक्ष होत आहे. कोरोनामुळे जिल्ह्यातील आरोग्याची स्थिती अतिशय बिकट आहे. परिस्थितीचे भान ठेवून त्यांनी चांगल्या सदस्यांची निवड करून, त्यांच्याकडे ही जबाबदारी सोपवावी.

संजय झाडे, सदस्य, जि.प.

- आरोग्य केंद्रासाठी सभापतींची सीईओंकडे मागणी

कृषी सभापती तापेश्वर वैद्य यांनी धानला येथील नवीन आरोग्य केंद्राच्या इमारतीत आरोग्य केंद्र तत्काळ सुरू करण्याची मागणी केली आहे. त्यांनी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना पत्र पाठवून परिस्थितीची जाणीव करून दिली आहे.