शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
7
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
8
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
9
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
10
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
11
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
12
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
13
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
14
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
15
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
16
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
17
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
18
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
19
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
20
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार

गुणवंत विद्यार्थिनीला नीटमध्ये दिले शून्य गुण!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 20, 2020 10:53 IST

High court Nagpur News नीट परीक्षेमध्ये ६०० गुण मिळण्याची अपेक्षा असताना शून्य गुण देण्यात आल्यामुळे अमरावती येथील वसुंधरा भोजने या गुणवंत विद्यार्थिनीने मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात रिट याचिका दाखल केली आहे.

ठळक मुद्दे केंद्र व राज्य सरकारला नोटीस जारी

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : नीट परीक्षेमध्ये ६०० गुण मिळण्याची अपेक्षा असताना शून्य गुण देण्यात आल्यामुळे अमरावती येथील वसुंधरा भोजने या गुणवंत विद्यार्थिनीने मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात रिट याचिका दाखल केली आहे. त्यात न्यायमूर्तीद्वय अतुल चांदुरकर व नितीन सूर्यवंशी यांनी सोमवारी केंद्र सरकार, राज्य सरकार व नॅशनल टेस्टिंग एजन्सी यांना नोटीस बजावून यावर २६ ऑक्टोबरपर्यंत उत्तर सादर करण्याचे निर्देश दिले.

७२० गुणांच्या नीट परीक्षेचा १६ ऑक्टोबर रोजी निकाल जाहीर करण्यात आला. काहीतरी तांत्रिक चूक झाल्यामुळे वसुंधराला शून्य गुण दाखविण्यात आले. परिणामी, तिने त्याच दिवशी नॅशनल टेस्टिंग एजन्सीला ई-मेलवर निवेदन सादर करून चूक दुरुस्त करण्याची मागणी केली. परंतु, तिला काहीच प्रतिसाद मिळाला नाही. तिला दहावीमध्ये ९३.४ तर, बारावीमध्ये ८१.८५ टक्के गुण मिळाले होते. याचिकाकर्तीतर्फे अ‍ॅड. अश्विन देशपांडे यांनी कामकाज पाहिले.

ओएमआर शीट वेबसाईटवर नाहीनियमानुसार नीट परीक्षेची ऑप्टिकल मार्क्स रेकॉगनिशन शीट नॅशनल टेस्टिंग एजन्सीच्या वेबसाईटवर अपलोड करणे आवश्यक आहे. विद्यार्थ्यांना स्वत:चे गुणांकन तपासता यावे हा त्यामागील उद्देश आहे. परंतु, वसुंधराची शीट वेबसाईटवर अपलोड करण्यात आली नाही.

 

 

टॅग्स :High Courtउच्च न्यायालय