शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी कारवाई...! दिल्ली स्फोटानंतर काश्मीरात 500 ठिकाणी छापे, 600 जण ताब्यात; 'व्हाईट कॉलर टेरर' मॉड्यूलच्या फास आणखी आवळला
2
अल-फलाह विद्यापीठ संशयाच्या कचाट्यात, वेबसाइटवरील खोट्या मान्यतेच्या दाव्याबद्दल चौकशी सुरू; NAAC कडून नोटीस जारी
3
कॅशने घर घेताय? थांबा! होम लोनचा असा करा 'स्मार्ट' वापर! गृहकर्ज फिटेपर्यंत कोट्यधीश व्हाल
4
दिल्ली स्फोट : गाडीतील मृतदेह डॉक्टर उमरचाच; डीएनए जुळला! नक्की कशी पार पडली फॉरेन्सिक प्रक्रिया?
5
"प्रत्येक काश्मीरी दहशतवादी नाही", दिल्ली स्फोटावर मुख्यमंत्री उमर अब्दुल्लांची प्रतिक्रिया
6
जगात सर्वात शक्तिशाली सैन्य असणाऱ्या देशांची यादी जारी; अमेरिका टॉपवर, भारताचा कितवा नंबर?
7
Rashmika Mandanna : रश्मिका मंदानाचं 'फिटनेस सीक्रेट'; बिझी शेड्यूलमध्ये स्वत:ला अभिनेत्री कसं ठेवते फिट?
8
Delhi Blast: दिल्लीत बॉम्बस्फोट घडवणाऱ्यांना धडा शिकवला जाणार, अमित शहांची गुप्तचर अधिकाऱ्यांसोबत बैठक
9
रस्त्यावर फक्त माणसाचा पायच दिसला, पण तो व्यक्ती कोण?; इंदापूरला हादरवून टाकणारी घटना
10
Exit Poll अंदाजाने सुखावणाऱ्या NDA साठी हा आकडा ठरतोय डोकेदुखी; बिहारच्या निकालात उलटफेर होणार?
11
रुपाली ठोंबरेंना दुसरा धक्का, स्टार प्रचारकांच्या यादीत स्थान नाही; पक्षाने साइडलाइन केले?
12
“अजित पवारांना सत्तेतून बाहेर पडावे लागेल अशी स्थिती निर्माण केली जाणार”: विजय वडेट्टीवार
13
बॉलिवूडच्या या अभिनेत्रीच्या घरी हलला पाळणा, छोट्या परीला घेतलं दत्तक, फोटो शेअर करून दिली खुशखबर
14
बांगलादेशमध्ये पुन्हा हिंसाचार भडकला, शेख हसीना यांच्यावरील निकाल लवकरच येणार
15
मोठा खुलासा...! 8 दहशतवादी, 4 कार अन् 4 शहरे...! दिल्लीच नव्हे, संपूर्ण देशात दहशत माजवण्याचा होता प्लॅन!
16
कोणत्या देवाची उपासना ठरते शीघ्र फलदायी? प्रेमानंद महाराजांनी दिले चपखल उत्तर!
17
"सरकारने पाकिस्तानवर चकार शब्द काढला नाही", दिल्ली बॉम्बस्फोटावरुन काँग्रेसचा केंद्रावर हल्ला
18
59 लाख पेन्शनधारकांना 8व्या वेतन आयोगाचे फायदे मिळणार नाहीत? कर्मचारी संघटनेने केंद्राला पत्र
19
सोन्यानंतर आता चांदीवरही लोन घेता येणार, RBI चा मोठा निर्णय; कसं जाणून घ्या
20
पश्चिम बंगालमध्ये 34 लाख Aadhar धारक ‘मृत’, UIDAI ची निवडणूक आयोगाला माहिती

नागपुरातील युवकांनी दंडकारण्यात घुसून नक्षल्यांचे स्मारक केले उद्ध्वस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2021 04:13 IST

- स्वातंत्र्यदिनी युवकांचे धाडस : घटनेचे व्हिडिओ झाले सोशल मीडियावर व्हायरल लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : एकीकडे सबंध देशात ...

- स्वातंत्र्यदिनी युवकांचे धाडस : घटनेचे व्हिडिओ झाले सोशल मीडियावर व्हायरल

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : एकीकडे सबंध देशात स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव जल्लोषात साजरा केला जात असताना, दुसरीकडे नागपुरातील युवकांनी दंडकारण्यात घुसून नक्षलवाद्यांचे स्मारक उद्ध्वस्त करत नागरिकांमधील नक्षलवाद्यांची भीती दूर करण्याचा प्रयत्न केला.

नागपुरातील जनसंघर्ष समिती ही गेल्या काही वर्षांपासून दंडकारण्य अर्थात गडचिरोलीतील नक्षली प्रभाव असलेल्या दुर्गम भागात जाऊन सेवाकार्य करत आहे. तेथील नागरिकांना स्वातंत्र्याचा अर्थ समजावून सांगताना आरोग्य व्यवस्था, शिक्षण व्यवस्था पोहोचविण्याचे कार्य करत आहे. त्याच पार्श्वभूमीवर या भागातील आदिम जनजातींमध्ये असलेले नक्षली कारवायांचे भय दूर करण्यासाठी क्रांतिकारी पावलेही समितीमार्फत उचलली जात आहेत. त्याच श्रुंखलेत भामरागडपासून २२ किमी अंतरावर असलेल्या आरेवाडा या गावालगत रस्त्याच्या कडेला नक्षल्यांनी उभे केलेले स्मारक या कार्यकर्त्यांनी जाळून उद्ध्वस्त केले. त्यानंतर ‘भारत माता की जय’च्या घोषणा दिल्या. या कृतीचे व्हिडिओही देशभरात प्रसारित झाले आहेत. विशेष म्हणजे, कार्यकर्त्यांनी केलेल्या या कार्याची माहिती प्रशासनापर्यंत पोहोचण्यास उशीर झाल्याने मोठीच तारांबळ उडाली आहे.

दरम्यान, सोमवारी नागरिकांना रस्त्याच्या कडेला स्मारक जाळल्याचे दिसले. हे कुणी जाळले याबद्दल दुपारपर्यंत पोलीस व नागरिकांमध्ये संभ्रम होता. नंतर नागपुरातील जनसंघर्ष समितीच्या कार्यकर्त्यांनीच हे स्मारक जाळल्याचे स्पष्ट झाले.

स्मारक जाळल्याची घटना खरी

या संदर्भात अधिक माहिती घेण्यासाठी लोकमतने भामरागडचे उपविभागीय अधिकारी डॉ. कुणाल सोनवणे यांच्याकडे विचारणा केली असता, स्मारक जाळल्याची घटना खरी असल्याचे त्यांनी सांगितले. एका सामाजिक संघटनेकडून हे स्मारक जाळले गेले असले तरी त्यांनी पोलिसांकडून यासाठी मदत मागीतली नव्हती. तसेच या घटनेची पोलिसात नोंद नसल्याचे त्यांनी सांगितले.

मुरंगलमध्ये पहिल्यांदाच स्वातंत्र्यदिन सोहळा

भामरागडपासून २२ किमी अंतरावर असलेल्या मुरंगलमध्ये पोलिसांच्या पुढाकाराने जनसंघर्ष समितीच्या वतीने अमृतमहोत्सवी स्वातंत्र्यदिन साजरा करण्यात आला. स्वातंत्र्य मिळाल्याच्या ७४ वर्षात प्रथमच या गावाने स्वातंत्र्यदिनाचा सोहळा पाहिला, हे विशेष. यावेळी समितीकडून मुलांना शालेय साहित्य व नागरिकांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटपही केले.

...................