शहरं
Join us  
Trending Stories
1
शेवटच्या 3 सेकंदांत 'RUN' वरून 'CUTOFF' झालं 'फ्यूल कंट्रोल स्विच' अ्न...; एअर इंडिया प्लेन क्रॅशवेळी शेवटच्या क्षणाला नेमकं काय घडलं?
2
Air India Plane Crash :'रिपोर्ट लीक कसा झाला?' अहमदाबाद विमान अपघाताच्या अहवालावर पायलट असोसिएशनने आक्षेप घेतला
3
पंतची मोठी चूक! चोरटी धाव घेण्याच्या नादात फुकटात फेकली विकेट! बेन स्टोक्सचा डायरेक्ट थ्रो अन्...
4
नरेंद्र मोदींनंतर PM म्हणून काँग्रेसकडून राहुल गांधींचा पर्याय? शं‍कराचार्यांचे मोठे विधान
5
“७५ वर्षांचा नियम RSSला लागू करायचा असेल, म्हणून मोहन भागवत तसे म्हणाले असतील”: शंकराचार्य
6
गुरु-चंद्र-राहुचा वसुमान ग्रहण योग: ७ राशींना भरभराट, भाग्योदय; पैसा-प्रतिष्ठा, कल्याण होईल!
7
सात वर्षांपूर्वीच दिला होता ७३७ जेटमधील स्विचच्या समस्येबद्दल इशारा; एअर इंडिया विमान अपघाताला ठरले कारण?
8
"जयंत पाटलांच्या राजीनाम्याची बातमी खोडसाळपणा...", प्रदेशाध्यक्षपदावरुन जितेंद्र आव्हाड यांनी स्पष्टच सांगितलं
9
पंतची कडक फटकेबाजी! चौकारासह जोफ्राचं स्वागत अन् स्टोक्सला उत्तुंग षटकार मारत साजरी केली फिफ्टी
10
Radhika Yadav : "मी मुलीचा वध केला, मला फाशी द्या"; राधिकाला संपवल्यावर भावासमोर काय म्हणाले वडील?
11
'तो मला बायको म्हणायचा', मुंबईतील शिक्षिकेचा विद्यार्थ्यासोबतच्या संबंधाबद्दल चक्रावून टाकणारा खुलासा
12
Sankashti Chaturthi 2025: चातुर्मासातली पहिली संकष्टी, बाराही राशींसाठी ठरणार खास; पूर्ण होणार प्रत्येक आस!
13
१८० प्रवाशांऐवजी केवळ १५५ जणांनाच घेऊन उडाले एअर इंडियाचे विमान! विमानतळावर गोंधळ,नेमके झाले काय?
14
पतीचा भर रस्त्यात तमाशा; पत्नीवर केले सपासप वार, जांघेत अडकली तलवार! कशावरून झाला वाद?
15
“२० देशांनी भारताच्या बाजूने मतदान केले, १२ किल्ले जागतिक वारसा स्थळ घोषित झाले”: CM फडणवीस
16
CHYD च्या नवीन पर्वात निलेश साबळेंना मिस करशील का? गौरव मोरे म्हणाला, "मी त्यांच्यासोबत..."
17
लव्ह जिहादवरील 'पुस्तका'द्वारे लोकांना भडकवायचा छांगूर बाबा, आणखी ४ सहकाऱ्यांचाही खुलासा; या जिल्ह्यांत सुरू होता धर्मांतराचा खेळ
18
ट्रम्प सरकारची नोकरदारांवरच कुऱ्हाड! १३०० कर्मचाऱ्यांना कामावरून काढणार, लवकरच पाठवणार नोटीस
19
"पैशांची एखादी बॅग देऊ...आजकल हमारा नाम बहुत चल रहा है"; शिरसाटांची मिश्कील टिप्पणी
20
“महायुतीच्या अपयशावर बोट ठेवणार, पक्षाची प्रतिष्ठा वाढवणार”; शशिकांत शिंदेंची पहिली प्रतिक्रिया

नागपुरातील युवकांनी दंडकारण्यात घुसून नक्षल्यांचे स्मारक केले उद्ध्वस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2021 04:13 IST

- स्वातंत्र्यदिनी युवकांचे धाडस : घटनेचे व्हिडिओ झाले सोशल मीडियावर व्हायरल लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : एकीकडे सबंध देशात ...

- स्वातंत्र्यदिनी युवकांचे धाडस : घटनेचे व्हिडिओ झाले सोशल मीडियावर व्हायरल

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : एकीकडे सबंध देशात स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव जल्लोषात साजरा केला जात असताना, दुसरीकडे नागपुरातील युवकांनी दंडकारण्यात घुसून नक्षलवाद्यांचे स्मारक उद्ध्वस्त करत नागरिकांमधील नक्षलवाद्यांची भीती दूर करण्याचा प्रयत्न केला.

नागपुरातील जनसंघर्ष समिती ही गेल्या काही वर्षांपासून दंडकारण्य अर्थात गडचिरोलीतील नक्षली प्रभाव असलेल्या दुर्गम भागात जाऊन सेवाकार्य करत आहे. तेथील नागरिकांना स्वातंत्र्याचा अर्थ समजावून सांगताना आरोग्य व्यवस्था, शिक्षण व्यवस्था पोहोचविण्याचे कार्य करत आहे. त्याच पार्श्वभूमीवर या भागातील आदिम जनजातींमध्ये असलेले नक्षली कारवायांचे भय दूर करण्यासाठी क्रांतिकारी पावलेही समितीमार्फत उचलली जात आहेत. त्याच श्रुंखलेत भामरागडपासून २२ किमी अंतरावर असलेल्या आरेवाडा या गावालगत रस्त्याच्या कडेला नक्षल्यांनी उभे केलेले स्मारक या कार्यकर्त्यांनी जाळून उद्ध्वस्त केले. त्यानंतर ‘भारत माता की जय’च्या घोषणा दिल्या. या कृतीचे व्हिडिओही देशभरात प्रसारित झाले आहेत. विशेष म्हणजे, कार्यकर्त्यांनी केलेल्या या कार्याची माहिती प्रशासनापर्यंत पोहोचण्यास उशीर झाल्याने मोठीच तारांबळ उडाली आहे.

दरम्यान, सोमवारी नागरिकांना रस्त्याच्या कडेला स्मारक जाळल्याचे दिसले. हे कुणी जाळले याबद्दल दुपारपर्यंत पोलीस व नागरिकांमध्ये संभ्रम होता. नंतर नागपुरातील जनसंघर्ष समितीच्या कार्यकर्त्यांनीच हे स्मारक जाळल्याचे स्पष्ट झाले.

स्मारक जाळल्याची घटना खरी

या संदर्भात अधिक माहिती घेण्यासाठी लोकमतने भामरागडचे उपविभागीय अधिकारी डॉ. कुणाल सोनवणे यांच्याकडे विचारणा केली असता, स्मारक जाळल्याची घटना खरी असल्याचे त्यांनी सांगितले. एका सामाजिक संघटनेकडून हे स्मारक जाळले गेले असले तरी त्यांनी पोलिसांकडून यासाठी मदत मागीतली नव्हती. तसेच या घटनेची पोलिसात नोंद नसल्याचे त्यांनी सांगितले.

मुरंगलमध्ये पहिल्यांदाच स्वातंत्र्यदिन सोहळा

भामरागडपासून २२ किमी अंतरावर असलेल्या मुरंगलमध्ये पोलिसांच्या पुढाकाराने जनसंघर्ष समितीच्या वतीने अमृतमहोत्सवी स्वातंत्र्यदिन साजरा करण्यात आला. स्वातंत्र्य मिळाल्याच्या ७४ वर्षात प्रथमच या गावाने स्वातंत्र्यदिनाचा सोहळा पाहिला, हे विशेष. यावेळी समितीकडून मुलांना शालेय साहित्य व नागरिकांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटपही केले.

...................