शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारत धर्मशाळा नाही, जिथं जगातील शरणार्थींना ठेवू शकतो..."; सुप्रीम कोर्टाची टिप्पणी
2
Mumbai Covid: मुंबईतील केईएम रुग्णालयात दोन रुग्णांचा कोविडमुळे मृत्यू; रुग्णालयाने अखेर काय सांगितलं?
3
७ वर्षांनी 'टीम मोदी'मध्ये परतले एमजे अकबर; केंद्रीय मंत्रिपदाचा का द्यावा लागला होता राजीनामा?
4
Mumbai Fire: विधान भवनाच्या प्रवेशद्वाराजवळ आग; शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याची माहिती
5
'सिमकार्ड नको, आता काहीतरी मोठे करा...', हरियाणाच्या तारीफला पाकिस्तानने दिले होते 'हे' काम!
6
बाजारात चढ-उतार! इन्फोसिससह 'हे' शेअर्स घसरले; तुमच्या पोर्टफोलिओवर काय परिणाम?
7
Mumbai: नाल्यात अडकलेल्या मुलीला वाचवण्याच्या प्रयत्नात एका तरुणाचा दुर्दैवी मृत्यू
8
"त्यांनी माझं पॅकअप केलं होतं..", आमिर खानमुळे 'तारक मेहता...' फेम अभिनेत्याची गेली नोकरी
9
IPL 2025: "धोनीचे फॅन्स खरे आहेत, बाकीच्यांचे..."; हरभजन सिंगने विराट कोहलीवर केला शाब्दिक हल्ला?
10
अभिनेत्री शिल्पा शिरोडकरला कोरोनाचं निदान, सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत दिली माहिती
11
८व्या वेतन आयोगानंतर पगार आणि पेन्शन किती वाढेल? कधी लागू होईल? कोणाला मिळेल फायदा?
12
"आजाराबद्दल ऐकून काळजी वाटली, आम्ही तुमच्या सोबत..."; PM मोदींनी जो बायडेनना दिला धीर
13
एसीची सर्व्हिसिंग करण्याची योग्य वेळ तुम्हाला माहितीय का? अन्यथा बसेल मोठा फटका
14
मोसादचा सर्वात खतरनाक गुप्तहेर...! एली कोहेनला चौकात फाशी दिलेली, त्याला आज ६० वर्षे झाली; इस्रायलचे सिक्रेट ऑपरेशन
15
CJI साठी काय असतो प्रोटोकॉल? महाराष्ट्र दौऱ्यावर आलेले सरन्यायाधीश गवई झाले नाराज
16
10th Pass Job: दहावी पास उमेदवारांसाठी बँकेत चांगल्या पगाराची नोकरी, लगेच करा अर्ज!
17
पाकिस्तानला माहिती देणे चूक नाही, गंभीर गुन्हा...राहुल गांधींची जयशंकर यांच्यावर घणाघाती टीका
18
India Pakistan War : मोठा खुलासा! सीमेवरील तणावाच्या काळात चीनने पाकिस्तानसाठी हेरगिरी केली
19
मीठ ते विमान... पण सुरुवात कुठून? जमशेदजी टाटांच्या पहिल्या व्यवसायाची अनोखी गोष्ट
20
ज्योती मल्होत्रा, अन् नवांकुर चौधरीसह ते 10 लोक कोण, ज्यांच्यावर देशद्रोहाचा आरोप?

नागपुरातील युवकांनी दंडकारण्यात घुसून नक्षल्यांचे स्मारक केले उद्ध्वस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2021 04:13 IST

- स्वातंत्र्यदिनी युवकांचे धाडस : घटनेचे व्हिडिओ झाले सोशल मीडियावर व्हायरल लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : एकीकडे सबंध देशात ...

- स्वातंत्र्यदिनी युवकांचे धाडस : घटनेचे व्हिडिओ झाले सोशल मीडियावर व्हायरल

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : एकीकडे सबंध देशात स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव जल्लोषात साजरा केला जात असताना, दुसरीकडे नागपुरातील युवकांनी दंडकारण्यात घुसून नक्षलवाद्यांचे स्मारक उद्ध्वस्त करत नागरिकांमधील नक्षलवाद्यांची भीती दूर करण्याचा प्रयत्न केला.

नागपुरातील जनसंघर्ष समिती ही गेल्या काही वर्षांपासून दंडकारण्य अर्थात गडचिरोलीतील नक्षली प्रभाव असलेल्या दुर्गम भागात जाऊन सेवाकार्य करत आहे. तेथील नागरिकांना स्वातंत्र्याचा अर्थ समजावून सांगताना आरोग्य व्यवस्था, शिक्षण व्यवस्था पोहोचविण्याचे कार्य करत आहे. त्याच पार्श्वभूमीवर या भागातील आदिम जनजातींमध्ये असलेले नक्षली कारवायांचे भय दूर करण्यासाठी क्रांतिकारी पावलेही समितीमार्फत उचलली जात आहेत. त्याच श्रुंखलेत भामरागडपासून २२ किमी अंतरावर असलेल्या आरेवाडा या गावालगत रस्त्याच्या कडेला नक्षल्यांनी उभे केलेले स्मारक या कार्यकर्त्यांनी जाळून उद्ध्वस्त केले. त्यानंतर ‘भारत माता की जय’च्या घोषणा दिल्या. या कृतीचे व्हिडिओही देशभरात प्रसारित झाले आहेत. विशेष म्हणजे, कार्यकर्त्यांनी केलेल्या या कार्याची माहिती प्रशासनापर्यंत पोहोचण्यास उशीर झाल्याने मोठीच तारांबळ उडाली आहे.

दरम्यान, सोमवारी नागरिकांना रस्त्याच्या कडेला स्मारक जाळल्याचे दिसले. हे कुणी जाळले याबद्दल दुपारपर्यंत पोलीस व नागरिकांमध्ये संभ्रम होता. नंतर नागपुरातील जनसंघर्ष समितीच्या कार्यकर्त्यांनीच हे स्मारक जाळल्याचे स्पष्ट झाले.

स्मारक जाळल्याची घटना खरी

या संदर्भात अधिक माहिती घेण्यासाठी लोकमतने भामरागडचे उपविभागीय अधिकारी डॉ. कुणाल सोनवणे यांच्याकडे विचारणा केली असता, स्मारक जाळल्याची घटना खरी असल्याचे त्यांनी सांगितले. एका सामाजिक संघटनेकडून हे स्मारक जाळले गेले असले तरी त्यांनी पोलिसांकडून यासाठी मदत मागीतली नव्हती. तसेच या घटनेची पोलिसात नोंद नसल्याचे त्यांनी सांगितले.

मुरंगलमध्ये पहिल्यांदाच स्वातंत्र्यदिन सोहळा

भामरागडपासून २२ किमी अंतरावर असलेल्या मुरंगलमध्ये पोलिसांच्या पुढाकाराने जनसंघर्ष समितीच्या वतीने अमृतमहोत्सवी स्वातंत्र्यदिन साजरा करण्यात आला. स्वातंत्र्य मिळाल्याच्या ७४ वर्षात प्रथमच या गावाने स्वातंत्र्यदिनाचा सोहळा पाहिला, हे विशेष. यावेळी समितीकडून मुलांना शालेय साहित्य व नागरिकांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटपही केले.

...................