शहरं
Join us  
Trending Stories
1
“राज ठाकरे यांना जवळ करणे राजकीय सोय, ठाकरे गटाचे ७५ नगरसेवक शिंदेंकडे गेले”: चंद्रकांत पाटील
2
पंढरपूर नगरीत भक्तीचा महापूर, वारकऱ्यांचा महासागर; दर्शनासाठी पाच किलोमीटरपर्यंत रांग...!
3
एवढा वेळ घेऊनही प्रवाशांच्या जीवाशी खेळ! पलावा पूल खुला, पण रस्त्याचा खुळखुळा; पाहा Video
4
लढाई संपलेली नाही...; सरकारच्या डॉ. नरेंद्र जाधव समितीविरोधात आझाद मैदानात धरणे आंदोलन
5
आता १४ वर्षीय वैभव सूर्यंवशीला द्विशतक ठोकायचंय! वर्ल्ड रेकॉर्डनंतर मनात सेट केलंय हे टार्गेट
6
पाऊस थांबला! लगेच आकाश दीपचा 'हमला'! बॅक टू बॅक ओव्हरमध्ये दोन विकेट्स अन् इंग्लंडचा अर्धा संघ तंबूत (VIDEO)
7
मतदारयाद्यांतील गैरप्रकार रोखण्यास काँग्रेसची समिती; अध्यक्ष पृथ्वीराज चव्हाण अहवाल देणार
8
अंत्यसंस्कारासाठी मृतदेह घेऊन निघाले अन् घरी जिवंत सापडली 'ती' व्यक्ती; जळगावातील प्रकार
9
४० वर्षीय रणवीरचा २० वर्षीय अभिनेत्रीसोबत रोमान्स; धुरंधरमध्ये झळकलेली सारा अर्जुन कोण?
10
“जीवनात ही घडी अशीच राहू दे”; फोटो शेअर करत बाळा नांदगावकरांची पांडुरंगाकडे प्रार्थना
11
मनातलं सगळंच सांगितलं; प्रताप सरनाईकांचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ३ पानी खुलं पत्र
12
बर्मिंगहॅमच्या मैदानात पावसाची बॅटिंग! इंग्लंडच्या ७ विकेट्स घेण्यासाठी टीम इंडियाला किती षटके मिळणार?
13
“एकाचं भाषण अपूर्ण अन् दुसऱ्याचं अप्रासंगिक, तर पूर्ण कार्यक्रम अवास्तव”; भाजपाची टीका
14
१६ वर्षे अत्याचार झालेल्या मुलींच्या मृतदेहाची लावत होता विल्हेवाट; एका घटनेमुळे केला खुलासा
15
आधी कॅब चालकांची करायचे हत्या, दऱ्यांमध्ये फेकायचे मृतदेह; सीरियल किलरला अखेर अटक
16
शेतकऱ्यांसाठी खुशखबर! पीएम किसानचा २०वा हप्ता 'या' दिवशी खात्यात येणार? आत्ताच यादी तपासा!
17
राज्यात सुरू असलेल्या भाषा वादावर बाबा रामदेव यांची पहिली प्रतिक्रिया, स्पष्टच बोलले; दिला असा सल्ला
18
सोलापूर : 'तुझ्यामुळेच माझी बायको...'; सावत्र दिराने भावजयीच्या मानेवर कुऱ्हाडीने केला वार, जागेवरच गेला जीव
19
“विठ्ठला...! सरकारला कर्जमाफी देण्याची सद्बुद्धी दे...”; आषाढी एकादशीला बच्चू कडूंची पोस्ट
20
ऐकवं ते नवलंच! पोलिसात भरती झाला, पण १२ वर्षे ड्युटीवरच गेला नाही; तरीही मिळाली ₹२८ लाख पगार

आपलीच शाळा आहे सेंटर, मग कशाची भीती?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 29, 2021 04:05 IST

नागपूर : कोरोनामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक सत्र अक्षरश: बुडाल्यासारखेच झाले. शाळा सुरू झाल्या नाहीत, अभ्यास पूर्ण झाला नाही. लिखाणाचा सराव ...

नागपूर : कोरोनामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक सत्र अक्षरश: बुडाल्यासारखेच झाले. शाळा सुरू झाल्या नाहीत, अभ्यास पूर्ण झाला नाही. लिखाणाचा सराव सुटला, बैठकीची सवय सुटली. हो नाही करता करता परीक्षाही तोंडावर आल्या. अडचणींच्या सावटात परीक्षा कशा देणार, असा प्रश्न विद्यार्थ्यांपुढे होता; परंतु शिक्षणमंत्र्यांनी विद्यार्थ्यांना कोरोनाच्या पार्श्वभूमीवर काहीसा दिलासा दिला. ज्या शाळेत विद्यार्थी प्रवेशित आहे, तीच शाळा विद्यार्थ्यांना परीक्षेचे केंद्र मिळणार आहे. त्यामुळे ज्यांचे वर्षभर वर्ग झाले नाहीत. ज्यांनी अभ्यासाची पुस्तकेही उघडली नाहीत, अशा ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी समाधानाची उसंत घेतली आहे.

कोरोनाने विद्यार्थ्यांना परीक्षा न देता नववीतून दहावीत व अकरावीतून बारावीत ढकलेले. अख्खे सत्र विना शिक्षणाचे आटोपले आणि आता तोंडावर परीक्षा आल्यात. शासनाने यंदा अभ्यासक्रमात २५ टक्के कपात केली; पण ७५ टक्केही अभ्यासक्रम पूर्ण होऊ शकला नाही. अभ्यासक्रम पूर्ण न झाल्याने विद्यार्थी चिंतेत होते. ऑनलाइनचे शिक्षण अनेक विद्यार्थ्यांच्या डोक्यावरून गेले. ग्रामीण भागात ऑनलाइनचा पर्याय अपयशी ठरला. त्यामुळे अनेकांनी पुस्तकेही उघडली नाही. परीक्षेची तयारी न झाल्यामुळे वर्ष वाया जाईल, अशी भीती विद्यार्थ्यांना होती. शाळेचा निकाल यंदा घरसेल अशी चिंता शिक्षकांना होती; पण बोर्डाकडून यंदा विद्यार्थ्यांना काही बाबतीत शिथिलता मिळाली. स्वत:ची शाळा सेंटर देऊन बोर्डाने अनेक विद्यार्थ्यांची चिंताच मिटविली. या निर्णयाबद्दल शिक्षकांनीही अनेक मतमतांतरे व्यक्त केली आहेत. परीक्षेची गंभीरता राहणार नाही; पण सुरक्षेची हमी राहील, अशीही भावना शिक्षकांची आहे.

- ज्या विद्यार्थ्यांनी अभ्यास केला आहे त्यांच्या मनात न्यूनगंड निर्माण होईल. या परीक्षेत असेही होईल की मेहनत करणाऱ्या विद्यार्थ्याला कमी व पुस्तकाला हातही न लावलेल्या विद्यार्थ्यांना अधिक गुण मिळतील.

-बाळा आगलावे, शिक्षक

- बोर्डाने कोरोनाचे संक्रमण लक्षात घेता, विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून ही प्रशासकीय व्यवस्था निर्माण केली आहे; पण विद्यार्थी पूर्णपणे परीक्षेसाठी तयार झालेला नाही. यावर्षी विद्यार्थ्याला पास व्हायला अडचणीचे नाही; पण क्वॉलिटी मिळणार नाही. तसे तर आपली शाळा आपले सेंटर कसे हाताळावे, याची जबाबदारी मुख्याध्यापकांची आहे.

-दीपक नागपुरे, शिक्षक

- माझी शाळा माझे सेंटर असल्याची विद्यार्थ्यांची भावना बरोबर नाही. ही बोर्डाची परीक्षा आहे. बोर्डाचे नियंत्रण राहणार आहे. परीक्षेचे गांभीर्य परीक्षकांना ठेवावेच लागेल. विद्यार्थ्यांना जेवढे सोपे वाटते तेवढे सहज शक्य नाही.

-संदीप उरकुडे, शिक्षक

- बोर्डाने सुरक्षेच्या दृष्टीने ही सोय केली आहे. काही सेंटरमध्ये त्याचा गैरफायदाही घेतल्या जाईल; पण पुढच्या शिक्षणासाठी विद्यार्थ्यांसाठीच ही बाब चुकीची राहील.

-मिलिंद वानखेडे, शिक्षक

- पालकांची धास्ती घालविण्यासाठी व विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून ही उपाययोजना आहे. याचा दुरुपयोग होऊ नये. परीक्षा परीक्षेसारखी व्हायला हवी. विद्यार्थ्यांनी अभ्यास करूनच परीक्षा द्यावी.

-प्रदीप बिबटे, शिक्षक