शहरं
Join us  
Trending Stories
1
जग पाहण्याआधीच बाळाचा जीव गेला, आईनं गमावलं लेकरू; महाराष्ट्रात आरोग्य सेवेचे धिंडवडे निघाले
2
मुसळधार पावसाचा इशारा, प्रशासन सतर्क; २० ऑगस्टला कोणकोणत्या जिल्ह्यात शाळांना सुट्टी? वाचा
3
उपराष्ट्रपती निवडणूक: सी.पी राधाकृष्णन विरुद्ध सुदर्शन रेड्डी लढतीत कुणाचं पारडं मजबूत?
4
४० तोळं सोने अन् २० लाख खर्च करून लग्न लावलं; २ वर्षात पोरीनं स्वत:ला कायमचं संपवलं
5
मोनो रेल्वे बंद का पडली? CM देवेंद्र फडणवीसांनी दिले चौकशीचे आदेश, प्रवाशांना न घाबरण्याचं आवाहन
6
भारतातील श्रीमंत कुटुंबे रशियन तेलाचा फायदा घेत आहेत, डोनाल्ड ट्रम्प यांच्या मंत्र्यांचे मोठे विधान
7
Asia Cup 2025 : गिल वर्षभरानंतर संघात आला अन् उप-कर्णधार झाला! सूर्यकुमार यादवनं सांगितली आतली गोष्ट
8
पावसामुळे लोकल ठप्प, स्टेशनवर प्रवाशांची गर्दी; मुंबईकरांचे प्रचंड हाल, घरी परतण्यासाठी तारांबळ
9
भारताकडे शक्तिशाली क्षेपणास्त्रे, आमचे अनेक हवाई तळ उडवले; शरीफ यांच्या सहकाऱ्याने पाकिस्तानची पोलखोल केली
10
India Cotton Imports: केंद्र सरकारने कापूस आयातीवरील सीमा शुल्क हटवले; कुणाला फायदा?
11
Monorail: मोठी बातमी! मुंबईत प्रवाशांनी भरलेली मोनो रेल्वे मध्येच बंद पडली, प्रवासी अडकले; काच ब्रेक करण्याचे प्रयत्न सुरू (Video)
12
सेंच्युरीसह मुंबईकर पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दुसऱ्या बाजूला पुणेकर ऋतुराजनं घातला घोळ, अन्...
13
मुंबईसह राज्यात २० ऑगस्टपासून पावसाचा जोर ओसरणार; हवामान खात्याचा अंदाज, १२ तासांसाठी रेड अलर्ट
14
महिंद्राच्या कर्मचाऱ्याने महिला खासदाराला दिली अत्याचार, मारण्याची धमकी; कंपनी म्हणते...
15
Mumbai Rain Mithi River: दोरी फेकली, पण अंदाज चुकला; मिठी नदीच्या पुरात तरुण गेला वाहून
16
सुदर्शन रेड्डींमुळे चंद्राबाबू-जगन मोहन यांच्यासमोर धर्म संकट; उपराष्ट्रपतिपदासाठी विरोधकांची खेळी
17
आता आणखी दोन नव्या कलर ऑप्शन्ससह आली Tata Punch EV, मिळणार फास्ट चार्जिंग स्पीड! असे आहेत सेफ्टी फीचर्स
18
राहुल गांधींच्या गाडीची पोलिसाला धडक, 'ही तर जनतेला चिरडणारी यात्रा', भाजपची बोचरी टीका
19
याला म्हणतात शेअर...! 24 तासांत 1 लाखाचे केले 88 लाख, एवढी तेजी आली की ट्रेडिगच थांबवावी लागली! नेमकं काय घडलं?
20
जिओने खिसा कापला...! १ जीबी, २८ दिवसांचा प्लॅन बंद केला; आता २९९ रुपये मोजावे लागणार

विषारी औषध प्राशन करून तरुणाची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2021 04:11 IST

मेंढला : पायाला झालेल्या जखमेचा त्रास असह्य झाल्याने तरुणाने शेतात विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केली. ही घटना जलालखेडा ...

मेंढला : पायाला झालेल्या जखमेचा त्रास असह्य झाल्याने तरुणाने शेतात विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केली. ही घटना जलालखेडा (ता. नरखेड) पाेलीस ठाण्याच्या हद्दीतील बानाेर (चंद्र) येथे रविवारी (दि. २२) सकाळी घडली.

अर्जुन सुखदेव धुर्वे (२४, रा. बानाेरचंद्र, ता. नरखेड) असे मृत तरुणाचे नाव आहे. अर्जुनची शेती जंगलालगत असून, शेतात वन्यप्राण्यांचा वावर आहे. वन्यप्राणी त्याच्या शेतातील पिकाची नासाडी करीत असल्याने ताे पिकाचे रक्षण करण्यासाठी राेज रात्री शेतात जायचा. एक दिवस अंधारात त्याच्या पायाला जखम झाली. उपचार करूनही ती जखम बरी न हाेता वाढत गेली. त्या जखमेचा त्रास असह्य झाला हाेता.

त्यातच ताे रविवारी सकाळी शेतात गेला. शेतात कुणीही नसताना त्याने फवारणीचे विषारी कीटकनाशक प्राशन केले. त्याची प्रकृती खालावत असल्याचे लक्षात येताच कुटुंबीयांनी त्याला लगेच मेंढला (ता. नरखेड) येथील प्राथमिक आराेग्य केंद्रात आणले. तिथे वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रणाली गजभिये यांनी तपासणीअंती त्याला मृृत घाेषित केले. याप्रकरणी जलालखेडा पाेलिसांनी अकस्मात मृत्यूची नाेंद केली असून, तपास संजय इंगोले व शरद घोरमाडे करीत आहेत.

...

वन्यप्राण्यांचा बंदाेबस्त करा

मेंढला परिसरातील प्रत्येक गावात वन्यप्राण्यांचा वावर वाढला असून, ते पिकांची प्रचंड नासाडी करते. यातून अप्रत्यक्षरीत्या अर्जुनला दुखापत झाली आणि त्याने आत्महत्या केली. वनविभाग या घटनेची नैतिक जबाबदारी स्वीकारणार काय, असा प्रश्नही शेतकऱ्यांनी उपस्थित केला आहे. वन विभागाने वन्य प्राण्यांचा कायम बंदाेबस्त करावा अथवा त्यांची शिकार करण्याची रीतसर परवानगी द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.