शहरं
Join us  
Trending Stories
1
कैमूरमध्ये मतमोजणीदरम्यान मोठा हिंसाचार; पोलिसांचा लाठीचार्ज, दगडफेकीत ३ पोलीस जखमी, स्कॉर्पिओ जाळली
2
कोपरगावजवळ भीषण अपघात; लक्झरी बसच्या धडकेत कार जळून खाक, चालकाचा जागीच मृत्यू
3
बिहारचा निकाल खरोखरच धक्कादायक; पराभवाची सखोल समीक्षा करणार: राहुल गांधी
4
२०१५ ते २०२५.... संघ सक्रियतेनंतर बिहारमध्ये भाजपचा ‘ग्राफ’ वर!
5
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
6
कर्ज फेडण्यासाठी इंजिनिअरच्या मुलानेच रचले स्वतःच्या अपहरणाचे नाटक; ५० लाखांची खंडणी मागितली अन्... 
7
बिहारमध्ये NOTA ला किती मतदान झाले? २०२० च्या तुलनेत किती टक्के वाढ झाली?
8
वैभव सूर्यवंशीचा दणका, ३२ चेंडूत केला 'शतकी धमाका'! लगावले १५ षटकार; टी२० मध्ये 'अशी' कामगिरी करणारा एकमेव खेळाडू
9
Travel : भारताचे १०००० रुपये घेऊन जा आणि मनसोक्त फिरा 'हा' देश! संस्कृती, शॉपिंग सगळ्यासाठी बेस्ट
10
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
11
पाकिस्तानच्या मंत्र्याने केले मोठे विधान; चीनचे अब्जावधी डॉलर्स वाया गेले? ड्रॅगनचे टेन्शन वाढले
12
Bihar Election 2020 vs 2025: बिहारमध्ये कोणत्या पक्षाला सर्वाधिक फटका, कोणाला पक्षाला मिळाला 'बुस्टर डोज'
13
हा बिहार नाही...! निवडणूक निकालाने उत्साहित भाजपच्या बंगालसंदर्भातील विधानावर टीएमसीची प्रतिक्रिया
14
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
15
CM उमर अब्दुल्लांना मोठा धक्का; J-K पोटनिवडणुकीत दोन्ही जागांवर पराभव, भाजपचा विजय...
16
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
17
बायकोचा महागड्या क्रिम्सवर खर्च, नवरा कंगाल होताच गेली सोडून; आता झाला डिलिव्हरी ड्रायव्हर
18
बिहारमध्ये सुशासन आणि विकासचा विजय; निवडणूक निकालावर पंतप्रधान मोदींच पहिली प्रतिक्रिया, आणखी काय म्हणाले?
19
बिबट्याने घेतला नरडीचा घोट; पाच वर्षाच्या रियांकाचा शाळेच्या पाठीमागे मिळाला मृतदेह
20
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
Daily Top 2Weekly Top 5

आरोग्य निरोगी ठेवाल तरच मुकाबला कराल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 29, 2021 04:07 IST

लोकमत न्यूज नेटवर्क उमरेड : कोरोना महामारीमध्ये प्रत्येकाने मानसिकरित्या सुदृढ राहणे गरजेचे आहे. आरोग्य निरोगी ठेवाल तरच कोरोनाच्या तिसऱ्या ...

लोकमत न्यूज नेटवर्क

उमरेड : कोरोना महामारीमध्ये प्रत्येकाने मानसिकरित्या सुदृढ राहणे गरजेचे आहे. आरोग्य निरोगी ठेवाल तरच कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा मुकाबला करू शकाल, असे विचार उमरेड येथे आयोजित ऑनलाईन राष्ट्रीय कार्यशाळेप्रसंगी मान्यवरांनी व्यक्त केले.

स्थानिक रणधीरसिंह भदोरिया महाविद्यालय व महिला कला महाविद्यालयाच्या संयुक्त विद्यमाने कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेसाठी भावनिकदृष्ट्या कसे फिट राहावे आणि जागरुकता कशी निर्माण करावी, या विषयावर कार्यशाळा घेण्यात आली. सदर कार्यशाळेत विविध विषयांवर चर्चासत्र घेण्यात आले. उद्घाटनप्रसंगी नगराध्यक्ष विजयलक्ष्मी भदोरिया, संजय दाणी, प्राचार्य डॉ. श्याम पुंडे, डॉ. जयश्री तिवारी आदींची उपस्थिती होती.

डॉ. अमृता गोखले यांनी, मानवी मानसिकता व विचारसरणी या विषयावर महामारीमध्ये कशाप्रकारे मानसिकदृष्ट्या आनंदी जीवन जगता येईल, यावर सखोल मार्गदर्शन केले. डॉ. अनिल करवंदे यांनी, आपण शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या कसे फिट होऊ शकतो यावर प्रशिक्षण दिले. बालरोगतज्ज्ञ डॉ. शिरीष मेश्राम यांनी, लहान मुले व त्यांच्या आरोग्याची काळजी या विषयावर विस्तृत मार्गदर्शन केले. डॉ. प्रग्यासा उपाध्याय यांनी, तणावमुक्त जीवनासाठी विविध प्रकारच्या उपाययोजना सांगितल्या. डॉ. रिया तिवारी यांनी, मानवी मानसिकता व रोग प्रतिकारशक्ती या विषयावर सकारात्मक विचार करण्याचा सल्ला दिला.

या ऑनलाईन कार्यशाळेत राज्यभरातून ४०० शिक्षक तसेच विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. डॉ. सरला मेश्राम, डॉ. लखपती गायकवाड, प्रा. उपेंद्र बागुल, प्रा. आरती खेवले, प्रा. सुरेखा जुनघरे, प्रा. प्रमोद मेश्राम, प्रा. आकाश पांडे, प्रा. वर्षा पांडे, तृप्ती दुरुतकर, प्रा. राहुल भुसारी, प्रा. खुशबू घिये, प्रा. रूपाली भिवापूरकर, राजेश खोपे, रजत वैद्य, लक्ष्मण फटिंग, अमित चिंचाळकर आदींनी सहकार्य केले.