शहरं
Join us  
Trending Stories
1
“भावाला न्याय मिळत नाही तोपर्यंत चप्पल घालणार नाही”; संतोष देशमुख यांच्या बहिणीचा निर्धार
2
वादग्रस्त आयएएस प्रशिक्षणार्थी पूजा खेडकर पुणे पोलिसांत हजर; मनाने आलेली नाही, सामाजिक कार्यकर्त्यांचा आरोप 
3
केवळ १००० रुपयांनी गुंतवणूक करून तुमच्या मुलांना बनवू शकता कोट्यधीश; कोणती आहे ही स्कीम?
4
पाकिस्तानने भारताची भीती घेतली! पीओकेमधील हॉटेल्स अन् गेस्ट हाऊसमध्ये सैन्य; मदरसे बंद
5
पाकिस्तानने अटारी, वाघा बॉर्डरचे गेट उघडले; धास्ती एवढी की पाकिस्तानींनाही घेत नव्हते...
6
प्रेक्षकांचा सूरज चव्हाणला 'गोलीगत धोका', 'झापुक झुपूक'ने पहिल्या आठवड्यात केली फक्त इतकी कमाई
7
श्रीराम दर्शनाची ओढ लागली, ३०० वर्षे जुनी परंपरा मोडली; हनुमानगढीचे महंत मंदिराबाहेर पडले!
8
हवाई दलाचं जबरदस्त शक्तिप्रदर्शन, हायवेवर उतरवली मिराज, राफेलसह ही लढाऊ विमानं
9
सिद्धार्थ-मितालीच्या घरी आला छोटा पाहुणा, फोटो शेअर करत दिली गुड न्यूज
10
WhatsApp वेबवर व्हॉइस आणि व्हिडीओ कॉलिंग फीचर लाँच; आता तुम्ही थेट करू शकता कॉल
11
बजाज चेतकला एप्रिल फूल बनविले; टीव्हीएस पहिल्यांदाच नंबर १, विक्रीत ओला कुठे...
12
पाकिस्तानी हवाई क्षेत्र बंद; एअर इंडियाला 5000 कोटी रुपयांचा फटका बसण्याचा अंदाज...
13
दारूच्या व्यसनाने आई आणि चुलतीचा खून; बीड जिल्हा दोन हत्येच्या घटनांनी हादरला
14
पंकजा मुंडेंना कॉल अन् पाठवला अश्लील मेसेज, पुण्यातील तरुणाला पोलिसांनी केली अटक
15
CEOs चा १ तासाचा पगार सामान्य कर्मचाऱ्याच्या वर्षाच्या पगाराइतका, एका रिपोर्टमध्ये झाले अनेक आश्चर्यकारक खुलासे
16
अन्न पुन्हा गरम करणं आरोग्यासाठी ठरतंय घातक; 'या' ५ गोष्टी टाळाल तरच ठणठणीत राहाल
17
 संतापजनक! मासिक पाळीत स्वयंपाक करणं महिलेच्या जीवावर बेतलं,नणंद आणि सासूने खून केल्याचा आरोप, दोन मुलं अनाथ
18
नवी मुंबईत ठाकरे गटाला खिंडार! माजी नगरसेवकांचे उद्धवसेनेला जय महाराष्ट्र, शिंदेसेनेत प्रवेश
19
"मॅडम येत आहेत, त्यांना..."; पोलीस असल्याचं सांगून दुकानात घुसले अन् २ लाखांचे दागिने चोरले
20
ISI कडून मिळाले आदेश, बेताब खोऱ्यात लपवली शस्त्रे; NIA च्या अहवालात धक्कादायक खुलासा

चूक कॉलेजची, भुर्दंड विद्यार्थ्यांना

By admin | Updated: May 3, 2017 02:17 IST

सावनेर येथील हरिभाऊ आदमने महाविद्यालय हे वादांचे केंद्रच झाले आहे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर

४२ जणांचे वर्ष वाया जाणार : हरिभाऊ आदमने महाविद्यालयाचा प्रताप नागपूर : सावनेर येथील हरिभाऊ आदमने महाविद्यालय हे वादांचे केंद्रच झाले आहे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या उन्हाळी परीक्षांमध्ये या महाविद्यालयातील गोंधळ समोर आला आहे. महाविद्यालयाच्या हलगर्जीपणामुळे ‘बीकॉम’ अंतिम वर्षाचे ४२ विद्यार्थी परीक्षेपासून वंचित राहिले आहेत. विद्यापीठाने या विद्यार्थ्यांची पुन:परीक्षा घेण्यास नकार दिला असून विद्यार्थी व पालकांमध्ये महाविद्यालयाबाबत असंतोषाचे वातावरण निर्माण झाले आहे. या चुकीला जबाबदार असणाऱ्या प्राचार्यांवर काय कारवाई होणार, असा संतप्त सवाल त्यांच्याकडून करण्यात येत आहे. अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांना ‘फंक्शनल मॅनेजमेंट’ किंवा ‘एन्ट्रप्रेनरशिप डेव्हलपमेंट’ हे वैकल्पिक विषय असतात. तर ‘कॉम्प्युटराईज्ड अकाऊंटिंग’ हा नियमित विषय असतो. हरिभाऊ आदमने महाविद्यालयाच्या २०१६-१७ च्या माहितीपुस्तिकेत ‘फंक्शनल मॅनेजमेंट’ हा विषय नियमित दाखविण्यात आला होता तर ‘कॉम्प्युटराईज्ड अकाऊंटिंग’ या विषयाला ‘एन्ट्रप्रेनरशिप डेव्हलपमेन्ट’ हा विषय वैकल्पिक दाखविण्यात आला होता. विद्यार्थ्यांनी माहितीपुस्तिकेनुसारच विषयांची निवड केली तसेच परीक्षा अर्जातदेखील तसेच नमूद केले. ‘फंक्शनल मॅनेजमेंट’ हा विषय नियमित समजून तेथील प्राध्यापकांनी ७६ विद्यार्थ्यांच्या वर्षभर तासिकादेखील घेतल्या. वैकल्पिक म्हणून ३४ विद्यार्थ्यांना ‘कॉम्प्युटराईज्ड अकाऊंटिंग’ तर ४२ विद्यार्थ्यांना ‘एन्ट्रप्रेनरशिप डेव्हलपमेन्ट’ हा विषय शिकविण्यात आला. अंतर्गत मूल्यमापनाच्या परीक्षादेखील यानुसारच झाल्या. पुन:परीक्षा शक्य नाही यासंदर्भात प्रतिक्रियेसाठी परीक्षा व मूल्यमापन संचालक डॉ. नीरज खटी यांच्याशी संपर्क केला असता नव्या विद्यापीठ कायद्यात पुन:परीक्षेची तरतूदच नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. महाविद्यालयाच्या प्राध्यापकांनी कमीत कमी वेळापत्रक तरी तपासायला हवे होते. त्यांच्या हलगर्जीपणामुळे विद्यार्थ्यांचे नुकसान झाले आहे. नियमात नसल्यामुळे विद्यार्थ्यांना आम्ही दिलासादेखील देऊ शकत नाही. मात्र संबंधित प्रकरण शिस्तपालन समितीकडे पाठविण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. कुणावर कारवाई होणार ? संबंधित प्रकरणात महाविद्यालयाची चूक असल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केला आहे. मात्र विद्यार्थ्यांनीदेखील वेळापत्रक पाहण्याची तसदी घेतली नाही. महाविद्यालयाच चुकीच्या पद्धतीने विषय कसे काय शिकविण्यात आले व प्राचार्यांचे याकडे लक्ष नव्हते का, हा प्रश्नदेखील उपस्थित होत आहे.