शहरं
Join us  
Trending Stories
1
Monsoon update: यंदाची दिवाळी पावसातच जाणार का? मान्सून भारतातून कधी परत जाणार?
2
डोनाल्ड ट्रम्प अन् इलॉन मस्कची 'दिलजमाई' झाली? चार्ली किर्कच्या शोकसभेत दिसले एकत्र! ‘तो’ एक फोटो चर्चेत
3
FD-RD विसरुन जाल, LIC ची ही स्कीम आहे जबरदस्त, मुलीच्या लग्नासाठी मिळेल २७ लाखांची रक्कम
4
आम्ही गरिबीत, तुमची मौज का? आणखी एका देशात लोक रस्त्यावर; जनतेच्या पैशाची लूट, पसरला असंतोष
5
बगराम तळावरून सुरु झाला नवा संघर्ष? डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीवर तालिबानचे प्रत्युत्तर
6
शेअर बाजारात मोठी घसरण, Sensex ४७५ अंकानी आपटला; Nifty मध्येही घसरण, IT शेअर्समध्ये जोरदार विक्री
7
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींवर नवदुर्गा कृपा, पद-पैसा-लाभ; अकल्पनीय यश, अनपेक्षित भरभराट!
8
"आता जे गरजेचं ते करावंच लागेल"; सरसंघचालक भागवत अमेरिकेच्या टॅरिफ आणि 'एच१ बी'बद्दल स्पष्टच बोलले 
9
Mumbai: गावी जाण्यासाठी पैसे देण्यास नकार दिल्यानं पत्नीची हत्या; कांदिवली येथील घटना!
10
देवोलिना भट्टाचार्जी पुन्हा प्रेग्नंट? फोटोशूटवरुन चर्चांना उधाण; ९ महिन्यांपूर्वीच दिला मुलाला जन्म
11
नौशादनं 'आकाश' बनून फसवलं, एका मुलाच्या आईसोबत लग्न केलं अन् ४ मित्रांसोबत मिळून...; घटना ऐकून येईल चीड!
12
आजपासून 'GST' उत्सव! मध्यम वर्गाला होणार मोठा फायदा; खरेदी वाढणार, अर्थव्यवस्थेला बूस्टर मिळणार
13
पाकिस्तानच्या नाकी नऊ आणणाऱ्या अभिषेक शर्माचा नावावर विश्वविक्रमाची नोंद, युवराजलाही टाकले मागे
14
GST कपातीनंतर आता कोणत्या वस्तूंवर सर्वाधिक टॅक्स?; यादी वाचा, अन्यथा खिशाला बसेल झळ
15
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या हस्ते 'मिशन शक्ती ५.०'चा शुभारंभ; महिला सुरक्षेवर भर, पोलिसांत महिलांचा सहभाग वाढला!
16
युक्रेनचा रशियावर ड्रोन हल्ला! क्रिमिया रिसॉर्टवरील हल्ल्यात २ जणांचा मृत्यू, १५ जण गंभीर जखमी
17
Eknath Shinde: जीएसटी सुधारणांमुळे उत्पादन आणि रोजगार वाढेल- एकनाथ शिंदे
18
'दशावतार'चे १० दिवस, कमावले 'इतके' कोटी, एकूण कमाईचा आकडा वाचून वाटेल अभिमान
19
H-1B व्हिसाने हैराण झालेल्यांना चीनची ऑफर; भारतीयांसाठीही मोठी संधी! काय आहे नवा ‘के- व्हिसा’?
20
भारत-पाकिस्तान युद्ध मीच थांबवले; ४० पेक्षा अधिक वेळा ट्रम्प यांचा दावा, आता तरी नोबेल द्या

चूक कॉलेजची, भुर्दंड विद्यार्थ्यांना

By admin | Updated: May 3, 2017 02:17 IST

सावनेर येथील हरिभाऊ आदमने महाविद्यालय हे वादांचे केंद्रच झाले आहे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर

४२ जणांचे वर्ष वाया जाणार : हरिभाऊ आदमने महाविद्यालयाचा प्रताप नागपूर : सावनेर येथील हरिभाऊ आदमने महाविद्यालय हे वादांचे केंद्रच झाले आहे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या उन्हाळी परीक्षांमध्ये या महाविद्यालयातील गोंधळ समोर आला आहे. महाविद्यालयाच्या हलगर्जीपणामुळे ‘बीकॉम’ अंतिम वर्षाचे ४२ विद्यार्थी परीक्षेपासून वंचित राहिले आहेत. विद्यापीठाने या विद्यार्थ्यांची पुन:परीक्षा घेण्यास नकार दिला असून विद्यार्थी व पालकांमध्ये महाविद्यालयाबाबत असंतोषाचे वातावरण निर्माण झाले आहे. या चुकीला जबाबदार असणाऱ्या प्राचार्यांवर काय कारवाई होणार, असा संतप्त सवाल त्यांच्याकडून करण्यात येत आहे. अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांना ‘फंक्शनल मॅनेजमेंट’ किंवा ‘एन्ट्रप्रेनरशिप डेव्हलपमेंट’ हे वैकल्पिक विषय असतात. तर ‘कॉम्प्युटराईज्ड अकाऊंटिंग’ हा नियमित विषय असतो. हरिभाऊ आदमने महाविद्यालयाच्या २०१६-१७ च्या माहितीपुस्तिकेत ‘फंक्शनल मॅनेजमेंट’ हा विषय नियमित दाखविण्यात आला होता तर ‘कॉम्प्युटराईज्ड अकाऊंटिंग’ या विषयाला ‘एन्ट्रप्रेनरशिप डेव्हलपमेन्ट’ हा विषय वैकल्पिक दाखविण्यात आला होता. विद्यार्थ्यांनी माहितीपुस्तिकेनुसारच विषयांची निवड केली तसेच परीक्षा अर्जातदेखील तसेच नमूद केले. ‘फंक्शनल मॅनेजमेंट’ हा विषय नियमित समजून तेथील प्राध्यापकांनी ७६ विद्यार्थ्यांच्या वर्षभर तासिकादेखील घेतल्या. वैकल्पिक म्हणून ३४ विद्यार्थ्यांना ‘कॉम्प्युटराईज्ड अकाऊंटिंग’ तर ४२ विद्यार्थ्यांना ‘एन्ट्रप्रेनरशिप डेव्हलपमेन्ट’ हा विषय शिकविण्यात आला. अंतर्गत मूल्यमापनाच्या परीक्षादेखील यानुसारच झाल्या. पुन:परीक्षा शक्य नाही यासंदर्भात प्रतिक्रियेसाठी परीक्षा व मूल्यमापन संचालक डॉ. नीरज खटी यांच्याशी संपर्क केला असता नव्या विद्यापीठ कायद्यात पुन:परीक्षेची तरतूदच नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. महाविद्यालयाच्या प्राध्यापकांनी कमीत कमी वेळापत्रक तरी तपासायला हवे होते. त्यांच्या हलगर्जीपणामुळे विद्यार्थ्यांचे नुकसान झाले आहे. नियमात नसल्यामुळे विद्यार्थ्यांना आम्ही दिलासादेखील देऊ शकत नाही. मात्र संबंधित प्रकरण शिस्तपालन समितीकडे पाठविण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. कुणावर कारवाई होणार ? संबंधित प्रकरणात महाविद्यालयाची चूक असल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केला आहे. मात्र विद्यार्थ्यांनीदेखील वेळापत्रक पाहण्याची तसदी घेतली नाही. महाविद्यालयाच चुकीच्या पद्धतीने विषय कसे काय शिकविण्यात आले व प्राचार्यांचे याकडे लक्ष नव्हते का, हा प्रश्नदेखील उपस्थित होत आहे.