शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
2
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
3
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
4
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
5
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
6
नव्या भारताकडे दहशवाद्यांना मातीत गाडण्याची अन् शत्रूला घरात घुसून संपवण्याची क्षमता- योगी आदित्यनाथ
7
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
8
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
9
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स
10
"...अन् कुंदन डोळे उघडतो", 'रांझणा'चा AI व्हिडिओ पाहिलात का? थिएटरमध्ये शिट्ट्यांचा कडकडाट
11
ब्रह्मोस क्षेपणास्त्र मिळाल्याने चीनचा 'हा' शत्रू झाला खूश! करतोय अमेरिकेला धक्का देण्याची तयारी
12
कोकणातील प्रसिद्ध Red Soil Stories युट्युब चॅनेलच्या शिरीष गवस यांचं आकस्मिक निधन 
13
मानवी हाडे, लाल ब्लाऊजचा तुकडा अन् ATM कार्ड...; जमिनीत गाडलेल्या शेकडो मृतदेहाचे रहस्य उलगडणार
14
पीएम किसान योजनेच्या २०व्या हप्त्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा, असा तपासा स्टेटस
15
"अरुण जेटलींनी मला धमकावलं होतं"; राहुल गांधींच्या आरोपावर जेटलींच्या मुलाचे प्रत्युत्तर, "पर्रिकरांसोबतही तुम्ही..."
16
मुंबईत शिंदेसेना आक्रमक, काँग्रेसच्या टिळक भवनावर मोर्चा; पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखले
17
शाळांना राजकारणापासून दूर ठेवा; आंध्र प्रदेश सरकारचा कौतुकास्पद निर्णय, नवी नियमावली वाचा
18
रशियाकडून कच्चं तेल खरेदी करणं बंद केलंय का? ट्रम्प यांच्या दाव्यावर भारतानं दिलं उत्तर
19
राज्यसभेत भाजपाचं 'शतक' पार! ३ वर्षांनी पुन्हा गाठली शंभरी; 'असा' रेकॉर्ड करणारा दुसरा पक्ष ठरला
20
Shravan Shanivar 2025: श्रावण शनिवारी केलेले 'हे' सोपे उपाय देतात शनी पीडेपासून मुक्ती!

जागतिक क्षयरोग दिन; तरुणांभोवती एमडीआर, एक्सडीआर टीबीचा विळखा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2018 09:56 IST

गेल्या ११ वर्षात नागपूर विभागात ‘एमडीआर’चे १३१९ रुग्ण तर ‘एक्सडीआर’चे ५३ रुग्ण आढळून आले. धक्कादायक म्हणजे, या दोन्ही रोगाचे सर्वाधिक रुग्ण २५ ते ३४ वयोगटातील आहेत.

ठळक मुद्दे२५ ते ३४ वयोगटातील सर्वाधिक रुग्ण ० ते १४ वयोगटात एमडीआरची टक्केवारी ०.९८

सुमेध वाघमारे ।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : क्षयरोगाचे जे रुग्ण व्यवस्थित औषधी (डॉट्स) घेत नाही किंवा अर्धवट घेतात त्यांना क्षयरोगाची पुढची पायरी ‘मल्टीड्रग रेझिसटन्ट ट्युबरक्युलॉसिस’ (एमडीआर-टीबी) आणि त्याहीपुढे जाऊन ‘एक्सटेसिव्ह ड्रग रेझिसटन्ट ट्युबरक्युलॉसिस’ (एक्सडीआर-टीबी) होतो. गेल्या ११ वर्षात नागपूर विभागात ‘एमडीआर’चे १३१९ रुग्ण तर ‘एक्सडीआर’चे ५३ रुग्ण आढळून आले. धक्कादायक म्हणजे, या दोन्ही रोगाचे सर्वाधिक रुग्ण २५ ते ३४ वयोगटातील आहेत.सध्या क्षयरोगाचा (टीबी) प्रसार मोठ्या प्रमाणात होत असून, देशात प्रत्येक वर्षी २९ लाख जणांना नव्याने या संसर्गजन्य रोगाची लागण होते. महाराष्ट्रात २०१७ मध्ये दोन लाख नव्या क्षयरोग रुग्णांची नोंद झाली असून, त्यातील १ हजार रुग्णांना पुरेसा उपचार न मिळाल्याने त्यांचा मृत्यू झाल्याचे वास्तव सरकारी आकडेवारीतून समोर आले आहे. गरीब नागरिकांमध्ये पुरेसे उपचार आणि कुपोषण यामुळे क्षयरोगाचे प्रमाण जास्त असून, देशात प्रत्येक वर्षी सरासरी ४.२० लाख गरीब नागरिकांना क्षयरोगाची बाधा होत आहे. यातही जे रुग्ण व्यवस्थित औषध घेत नाही किंवा अर्धवट औषध घेतात त्यांना ‘एमडीआर’ व नंतर ‘एक्सडीआर’ला सामोरे जावे लागत आहे. हे एक नव्हे आव्हान वैद्यकीय क्षेत्रासमोर आहे.

तरुणांमध्ये एमडीआर टीबी ३०.२५ टक्केआरोग्य विभागाने उपलब्ध करून दिलेल्या माहितीनुसार, नागपूर विभागात २००७ ते २८ फेब्रुवारी २०१८ पर्यंत ‘एमडीआर टीबी’चे १३१९ रुग्ण आढळून आले. यात २५ ते ३४ वयोगटात सर्वाधिक म्हणजे ३९९ रुग्ण आढळून आले. याची टक्केवारी ३०.२५ टक्के आहे. ० ते १४ या वयोटात या रोगाची टक्केवारी ‘०.९८’ टक्के, त्या खालोखाल १५ ते २४ वयोगटात १९ .८६ टक्के, ३५ ते ४४ वयोगटात २२.३६ टक्के, ४५ ते ५४ वयोगटात १६.५२ टक्के, ५५ ते ६४ वयोगटात ६.२१ टक्के तर ६५ व त्यावरील वयोगटात ३.७९ टक्के प्रमाण आहे.

क्षयरोगाने दरवर्षी सात लाख रुग्णांचा मृत्यूडॉ. सुशांत मेश्राम यांनी आपल्या प्रास्तविकात म्हटले की, देशात क्षयरोगाचे सुमारे २८ लाख रुग्ण आहेत. यात दरवर्षी ७ लाख रुग्णांचा मृत्यू होतो. धक्कादायक म्हणजे, या रोगामुळे साधारण ३ लाख मुलांना शाळा सोडावी लागते. कर्तापुरुष क्षयरोगाला बळी पडत असल्याने दरवर्षी १ लाख महिला विधवा होतात. क्षयरोग पूर्णत: बरा होऊ शकत असताना ही आकडेवारी भयावह आहे. यामुळे केवळ वैद्यकीय क्षेत्रच नव्हे तर प्रत्येक क्षेत्राने यात पुढाकार घेऊन क्षयरोगाशी लढा देणे आवश्यक आहे.

एक्सडीआर टीबीचे प्रमाण ३३.९६ टक्केनागपूर विभागात २००७ ते २८ फेब्रुवारी २०१८ पर्यंत ‘एक्सडीआर टीबी’चे ५३ रुग्ण आढळून आले. यात २५ ते ३४ वयोगटात सर्वाधिक म्हणजे १८ रुग्णांची नोंद झाली असून याची टक्केवारी ३३.९६ आहे. १५ ते २४ या वयोगटात १५.०९ टक्के, ३५ ते ४४ वयोगटात २२.६४ टक्के, ४५ ते ५४ या वयोगटात १६.९८ टक्के, ५५ ते ६४ वयोगटात ९.४३ टक्के तर ६५ व त्यावरील वयोगटात १.८८ टक्के रुग्ण आढळून आले आहे.

हार्माेनल बदल, तणाव व स्वत:कडे दुर्लक्ष२५ ते ३४ वयोगटातील तरुणांमध्ये ‘एमडीआर टीबी’ व ‘एक्सडीआर टीबी’चे रुग्ण मोठ्या संख्येत आढळून येतात. या मागील कारण म्हणजे, लहान वयात क्षयरोगाचे संक्रमण झाल्यानंतर व्यवस्थीत किंवा अर्धवट औषधे घेतल्याने होतो. शिवाय या वयात हार्माेनल बदल होतात. ताण वाढलेला असतो. पुरेशी झोप घेतली जात नाही. आहाराकडे दुर्लक्ष केले जाते, याच वयात वाईट सवयी व व्यसन लागते. याचा परिणाम रोगप्रतिकारक्षमतेवर होतो. हे कमी होताच या दोन्ही रोगाचा विळखा घट्ट होतो.-डॉ. सुशांत मेश्राम, विभाग प्रमुख, रेस्पीरेटरी मेडिसीन विभाग, मेडिकल

टॅग्स :Healthआरोग्य