शहरं
Join us  
Trending Stories
1
उत्पन्न वाढवण्याचा 'मोदी मंत्र'! पंतप्रधानांचा शेतकऱ्यांना सल्ला; ३५,४४० कोटी रुपयांच्या दोन मोठ्या योजना सुरू
2
कामगारांसाठी आनंदवार्ता! आता पीएफमधून १००% रक्कम काढता येणार, 'ईपीएफओ'चा निर्णय
3
ड्रॅगनच्या डॅम योजनेला भारत मोठी टक्कर देणार! मोदी सरकारनं तयार केला 77 बिलियन डॉलरचा 'मास्टर प्लॅन'
4
अखेर युद्ध थांबले; हमास-इस्रायल शांतता प्रस्ताव अमलात; २० इस्रायली ओलिसांची सुटका; २ हजार पॅलेस्टाइन बंदिवानही सोडले
5
खड्यांमुळे मृत्यू, तर कुटुंबाला ६ लाख भरपाई; रस्त्यांवरील खड्यांना अधिकारी, कंत्राटदार जबाबदार : उच्च न्यायालय
6
संपूर्ण मुंबईतील वाहतूककोंडी अखेर फुटणार; तब्बल ७० किमी भुयारी मार्गांचे जाळे उभारणार
7
चंद्रशेखरन यांच्या नेतृत्वावर पुन्हा विश्वास; टाटा समूहाचा निवृत्ती धोरणापलीकडचा विचार; टाटा सन्सची मंजुरी अपेक्षित
8
टाटा कॅपिटलची शेअर बाजारात एन्ट्री; मूल्यांकन १.३८ लाख कोटी
9
"मी युद्ध सोडवण्यात तज्ज्ञ..." पाकिस्तान-अफगाणिस्तान सीमा वादावर ट्रम्प यांचं भाष्य!
10
अभ्यासाला लागा! दहावी आणि बारावीच्या परीक्षेच्या तारखा जाहीर, असं आहे वेळापत्रक 
11
राज्यासमोर मोठं संकट! जगभरात थैमान घालणाऱ्या आजाराचा पहिला रुग्ण सापडल्याने खळबळ
12
SA W vs BAN W : निर्णायक षटकात अख्तरची धुलाई; रंगतदार सामन्यात दक्षिण आफ्रिकेनं मारली बाजी
13
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महायुती एकत्रित लढणार!
14
४८ तासात 'सोनेरी सफर'च्या दोन घटना उघड , रेल्वेच्या तपास यंत्रणा खडबडून जाग्या 
15
डिस्काउंटचा धमाका! १० हजारांपेक्षा कमी किंमतीत मिळतायेत 'हे' जबरदस्त फोन
16
६००० रुपयांचा बोनस आणि...; एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांची दिवाळी तिप्पट गोड!
17
Video: आधी कानाखाली मारल्या, नंतर धरली मान; मॅच सुरू असतानाच स्टेडियमध्ये 'बाई, काय हा प्रकार'
18
ठाणे-वसईकरांचे हाल! घोडबंदर मार्गावर चार-चार तास वाहतूक कोंडी
19
पाकिस्तानात शरणार्थी, मशिदीतून शिक्षणाची सुरुवात; तालिबानी परराष्ट्रमंत्री मुत्ताकी किती शिक्षित आहेत? जाणून घ्या...
20
ईतवारी एक्सप्रेसमध्ये सापडले सोन्याचे घबाड, एकाला अटक; साडेतीन कोटींचे सोने जप्त!

रेल्वे वर्कशॉपमध्ये कामगाराचा मृत्यू

By admin | Updated: September 11, 2016 02:12 IST

जरीपटका पोलीस ठाण्याच्या हद्दीत कामठी मार्गावर असलेल्या दपूम रेल्वेच्या वर्कशॉपमध्ये शनिवारी

क्रेनचालकाचा बेजबाबदारपणा : कुटुंबास आर्थिक मदत देण्याची मागणीनागपूर : जरीपटका पोलीस ठाण्याच्या हद्दीत कामठी मार्गावर असलेल्या दपूम रेल्वेच्या वर्कशॉपमध्ये शनिवारी सकाळी क्रेनच्या खाली आल्यामुळे एका २२ वर्षीय कामगाराचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली. अक्षय बमनोटे रा. बेलीशॉप रेल्वे कॉलनी असे मृत कामगाराचे नाव आहे. दरम्यान मृत कामगाराच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत देण्याची मागणी रेल्वे वर्तुळातून होत आहे.मृत अक्षयचे वडील राजन बमनोटे रेल्वेचे कर्मचारी आहेत. वर्कशॉपमध्ये कंत्राटदार गोपाल राव यांना कोचच्या चेचिसच्या सफाईचे काम देण्यात आलेले आहे. या कंत्राटदाराकडे अक्षय काम करीत होता. नेहमीच्या पद्धतीने कोचच्या चेचिसला रेती प्रक्रियेद्वारे साफ केल्यानंतर जेसीबीच्या मदतीने चेचिस रेल्वे रुळावर ठेवण्याचे काम सुरू होते. संतुलन राखण्यासाठी जेसीबीने चेचिस उचलल्यानंतर चेसीसला हा युवक पकडून ठेवत होता. सकाळी ११.१५ वाजता जेसीबी चालक चेसिस उचलत असताना अचानक जेसीबी त्याच्या नियंत्रणाबाहेर जाऊन अक्षय गंभीर जखमी झाला. त्यानंतर जेसीबीचा चालक फरार झाला. मृत अक्षय रेल्वेचा कर्मचारी नसल्यामुळे रेल्वे प्रशासनाने त्याच्या उपचारासाठी कोणतेही वाहन उपलब्ध करून दिले नाही. जवळपास दोन तास तो घटनास्थळीच पडून होता. या घटनेमुळे रेल्वे वर्कशॉपमध्ये काम करणाऱ्या कामगारांच्या सुरक्षिततेबाबत प्रश्न उपस्थित करण्यात येत आहेत. घटनेची माहिती मिळताच जरीपटक्याचे पोलीस निरीक्षक चक्षुपाल बहादुरे आणि पोलीस घटनास्थळी रवाना झाले. त्यांनी आरोपी क्रेन चालकाच्या विरुद्ध बेजबाबदारपणे जेसीबी चालविण्याचा गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान अक्षयच्या मृत्यूनंतर त्याच्या कुटुंबीयांना संबंधित कंत्राटदार आणि रेल्वे प्रशासनाने आर्थिक मदत करण्याची मागणी होत आहे.(प्रतिनिधी)अतिशय दुर्दैवी घटनादक्षिण पूर्व मध्य रेल्वेच्या नागपूर विभागाचे विभागीय रेल्वे व्यवस्थापक अमितकुमार अग्रवाल यांनी घडलेली घटना अतिशय वाईट असल्याचे सांगितले. मोतीबाग वर्कशॉपचे नियंत्रण बिलासपूर मुख्यालयातून करण्यात येते. त्यामुळे या घटनेच्या तपासासाठी कमिटीचे गठन झोन कार्यालयातून होणार असल्याचे ते म्हणाले. रेल्वे कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्हदपूम रेल्वे मजदूर कॉंग्रेसचे विभागीय संयोजक एल. पीतांबर आणि रेल्वे कामगार सेनेचे कार्याध्यक्ष मनोज समर्थ यांनी ही घटना अत्यंत दुर्दैवी असल्याचे सांगितले. या घटनेमुळे या वर्कशॉपमध्ये काम करणाऱ्या रेल्वे कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह लागले आहे. अशी घटना पुन्हा घडू नये यासाठी रेल्वे प्रशासनाने वेळीच खबरदारी न घेतल्यास संघटनेच्या वतीने आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे.