शहरं
Join us  
Trending Stories
1
"सकाळी उठा, व्होटर डेलीट करा अन् पुन्हा झोपी जा...", राहुल गांधींचा ECI वर पुन्हा हल्लाबोल; BJP चा पलटवार!
2
टॉस पूर्वीची ती चार मिनिटे...! भारत सरकारची मंजुरी अन् BCCIचा मॅच रेफरींना संदेश पोहोचला...
3
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
4
'या अली' गाण्यामागचा आवाज हरपला, प्रसिद्ध गायक जुबीनचा स्कुबा डायव्हिंग करताना मृत्यू
5
परप्रांतीयांना भाड्याने घरं देऊ नका, पंजाबमध्ये ठिकठिकाणी आवाहन; यूपी-बिहारींना हाकलण्याची मागणी
6
"काय अर्थ निघतील, याचाही विचार केला पाहिजे", CM फडणवीसांनी गोपीचंद पडळकरांचे टोचले कान
7
तीन सख्ख्या बहिणींवर नातेवाईकच २०२० पासून करत होता बलात्कार; अहिल्यानगरमधील संतापजनक घटना
8
विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांच्या नियुक्तीला 'खासदारकी'मुळे आव्हान, न्यायालयाने काय दिला निकाल?
9
स्कँडल, कर्ज आणि घसरते शेअर्स... जगातील सर्वात मोठ्या फूड कंपनीला वाचवू शकतील का नवे बॉस?
10
VIDEO: अरे देवा! 'मोटूलाल'ने प्यायली ७२ लाखांची दारू, जमीनही विकली; मुलाखत झाली व्हायरल
11
इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत संघात स्थान का मिळालं नाही? कुलदीपचं गंभीरबाबत मोठं विधान, म्हणाला...
12
'सकाळी उठतात, डोळे चोळत काहीही पोस्ट करतात...', कंगना राणौतचा राहुल गांधींवर पलटवार
13
तुम्हालाही छोट्या छोट्या गोष्टींचा राग येतो, आताच ठेवा ताबा नाहीतर हार्ट अटॅकचे ठराल बळी
14
तुमचा मारुती, ह्युंदाई, टाटावर विश्वास पण डीलर्सचा? या कंपन्या त्यात नाहीच...
15
महायुती सरकारमध्ये सहकारी होण्याचा निर्णय का घेतला? पक्षाच्या चिंतन शिबिरात दादांनी स्पष्टच सांगितलं!
16
कोण होईल रशियाचा पुढचा राष्ट्राध्यक्ष? राजकीय वारसदाराबद्दल व्लादिमीर पुतिन यांचा खुलासा
17
Gold Silver Price 19 September: सोन्याच्या दरात घसरण, पण चांदीच्या किमतीत जोरदार उसळी; कॅरेटनुसार पाहा सोन्याचे नवे दर
18
'हाफिज सईदला भेटलो, याबद्दल मनमोहन सिंग यांनी आभार मानले', यासिन मलिकचा खळबळजनक दावा
19
‘मोहरा’ मध्ये सुनिल शेट्टीसोबत रोमान्स करणारी ही अभिनेत्री आता दिसते अशी, ओळखणंही झालं कठीण
20
अनिल अंबानी यांना दणका; येस बँक कर्ज घोटाळा प्रकरणात CBI कडून चार्जशीट दाखल

कामगाराचा खून

By admin | Updated: October 1, 2015 03:10 IST

जरीपटक्यातील बाराखोली परिसरात गुन्हेगारांनी हप्ता वसुलीसाठी एका गरीब कामगाराला मारहाण करून त्याचा खून केला.

हप्ता वसुलीतून घडली घटना : अर्धा तास सुरू होती मारहाणनागपूर : जरीपटक्यातील बाराखोली परिसरात गुन्हेगारांनी हप्ता वसुलीसाठी एका गरीब कामगाराला मारहाण करून त्याचा खून केला. घटनेनंतर नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. राकेश बापूराव रामटेके (४५) असे मृताचे नाव आहे. पोलिसांनी आरोपी सूरज मानवटकर (२५), विश्वास ऊर्फ गुड्डु दहिवले (२५), कमलेश ऊर्फ काम्या पाटील (३०) यांना अटक केली आहे.राकेश मजुरी करीत होता. त्याच्या कुटुंबात पत्नी वैशाली, मुलगा अभय आणि मुलगी प्रियंका आहे. अभय आयटीआय करीत असून, प्रियंका बी.कॉम.च्या द्वितीय वर्षाला शिकत आहे. आरोपी सूरज आणि विश्वास गुन्हेगारीवृत्तीचे आहेत. त्यांची बाराखोली परिसरात दहशत आहे. काही दिवसांपासून ते राकेशला कामावरून परत येताना थांबवून दारूसाठी पैसे मागत होते. आरोपींची दहशत असल्यामुळे राकेशने अनेकदा त्यांना ५० ते १०० रुपये दिले. यामुळे आरोपींचे मनसुबे वाढले. आरोपी दररोज पैसे मागू लागल्याने राकेशने आपला रस्ता बदलवून घरी जाणे सुरू केले. याची माहिती मिळताच मंगळवारी रात्री ११.३० वाजता आरोपी राकेशच्या घरी पोहोचले. त्यांनी राकेशला आवाज दिला. राकेश बाहेर आल्यानंतर तिन्ही आरोपींनी त्याला घेरून पैशाची मागणी केली. घरी पत्नी आणि मुलगी असल्यामुळे राकेशने आरोपींना अशा पद्धतीने घरी येण्याबाबत आक्षेप नोंदविला. यामुळे चिडून आरोपींनी राकेशला लाठी आणि लोखंडी रॉडने मारहाण सुरू केली. त्यांच्या भांडणाचा आवाज ऐकून राकेशची पत्नी वैशाली आणि मुले मदतीसाठी धावले. ते राकेशला सोडून देण्याची विनवणी करीत होते. वस्तीतील नागरिकही गोळा झाले. आरोपींनी लाठी उगारून वैशाली आणि तिच्या मुलांना घरात जाण्यास सांगितले. थोडी फार मारहाण करून पतीला सोडून देतील, असा विचार करून वैशाली मुलांसह घरात गेली. त्यानंतर आरोपी राकेशवर तुटून पडले. वैशालीने या घटनेची पोलिसांना माहिती दिली. तिने घराबाहेर येऊन पुन्हा आरोपींना विनवणी केली. त्यानंतर आरोपींनी वैशाली आणि वस्तीतील नागरिकांना मारण्याची धमकी देऊन घरात जाण्यास सांगितले. अर्धा तास राकेशला ते मारहाण करीत होते. राकेश बेशुद्ध झाल्यानंतर ते फरार झाले. त्यानंतर वस्तीतील नागरिकांनी राकेशला मेयो रुग्णालयात दाखल केले. तेथे डॉक्टरांनी त्यास मृत घोषित केले. (प्रतिनिधी)उशिराने पोहोचले पोलीसराकेशच्या पत्नीने सूचना देऊनही जरीपटक्यातील दोन पोलीस शिपाई अर्ध्या तासाने घटनास्थळी पोहोचले. त्यामुळे आरोपी पळून जाण्यात यशस्वी ठरले. पोलीस वेळीच पोहोचले असते तर राकेशला वाचविता आले असते, असे त्याच्या कुटुंबीयांचे म्हणणे आहे. यात नागरिकांनीही आरोपींना थांबविण्याची किंवा समजविण्याची हिंमत केली नाही. उपासमारीची वेळघटनेमुळे राकेशची पत्नी आणि मुलांवर उपासमारीची पाळी आली आहे. मुलांना उच्च शिक्षण देण्याचे स्वप्न राकेशने पाहिले होते. त्याच्या मृत्यूमुळे त्याच्या कुटुंबीयांचे उपजीविकेचे साधन उरले नाही.