शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूरवरून संसदेत गोंधळ, कामकाज स्थगित; पहलगाम हल्ल्याचे दशतवादी, ट्रम्प दावा मुख्य मुद्दे... 
2
७/११तील सर्व दोषी निर्दोष, सरकारसमोर कोणते पर्याय; पुढे काय होणार? कायदेतज्ज्ञ म्हणतात...
3
अजित पवारांविरोधात छावा संघटना आक्रमक; NCP कार्यालयावर दगडफेक, जाळण्याचाही प्रयत्न
4
७/११तील दोषींची निर्दोष मुक्तता, उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने...”
5
मुंबई: कुत्रा लचके तोडत होता आणि मालक हसत होता; घाटकोपरमध्ये ११ वर्षाच्या मुलावर पिटबुलचा हल्ला
6
नवी मुंबईत भाजपा आमदारानं मनसेला डिवचलं; मराठी भाषेत लावलेली पाटी काढून गुजरातीत लावली
7
“शिवसेनेतून फुटलेले ४ तरुण खासदार हनी ट्रॅपमुळे पळाले”; संजय राऊतांचा दावा, सरकारवर टीका
8
आता ATM मधून पैसे काढायला कार्डची गरज नाही! 'या' सोप्या पद्धतीने UPI द्वारे काढा कॅश
9
झोपेच्या गोळ्या, शॉक दिला... बॉयफ्रेंडच्या मदतीने नवऱ्याचा काढला काटा, कुटुंबाने केली 'ही' मागणी
10
नेपोकिड्सचा दाईजान! 'सैय्यारा'चं कौतुक केल्यावर करण जोहर झाला ट्रोल, उत्तर देत म्हणाला...
11
पहिल्या तिमाहीचे निकाल, बोनस आणि डिविडेंडची घोषणा; 'या' बँकेचा शेअर चमकला, तुमच्याकडे आहे?
12
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये लष्कराने लक्ष्य साध्य केले, जगाने भारताची ताकद पाहिली'; अधिवेशनाआधी पीएम मोदी म्हणाले...
13
अमेरिका-भारत व्यापार कराराकडे बाजाराचे लक्ष; तिमाही निकाल आणि परकीय गुंतवणुकीचा कस
14
IND vs ENG : टीम इंडियात नव्या चेहऱ्याची एन्ट्री; या पठ्ठ्यानं एका डावात अख्खा संघ केला होता गारद
15
Mumbai Bomb Blast 2006: शंका... १०० दिवस... बॉम्बचा प्रकार! उच्च न्यायालयाने 'हे' तीन तर्क लावत 7/11 मुंबई स्फोटाच्या दोषींना ठरवलं निर्दोष
16
रेअर अर्थ मॅग्नेट्सवर चीनची 'धक्कादायक' खेळी! जगभरातील कारखान्यांचा जीव भांड्यात, नेमकं काय केलं?
17
मोठी बातमी! मुंबई लोकल साखळी बॉम्बस्फोटातील १२ दोषींची निर्दोष मुक्तता, राज्य सरकारला दणका
18
Anthem Biosciences Ltd IPO: जबरदस्त लिस्टिंग! पहिल्याच दिवशी प्रत्येक शेअरवर ₹१५३ चा फायदा; ₹७४० पार पोहोचला भाव, गुंतवणूकदार मालामाल
19
इवलुशा राखीतून जन्म घेतील वृक्षवेली, आमचे यंदा पर्यावरणाशी रक्षाबंधन! तुमच्या शाळेत?
20
छावा संघटना मारहाण: राष्ट्रवादीचे युवा शाखेचे प्रदेशाध्यक्ष सूरज चव्हाण फरार; ११ जणांवर गुन्हा दाखल

कामगाराचा खून

By admin | Updated: October 1, 2015 03:10 IST

जरीपटक्यातील बाराखोली परिसरात गुन्हेगारांनी हप्ता वसुलीसाठी एका गरीब कामगाराला मारहाण करून त्याचा खून केला.

हप्ता वसुलीतून घडली घटना : अर्धा तास सुरू होती मारहाणनागपूर : जरीपटक्यातील बाराखोली परिसरात गुन्हेगारांनी हप्ता वसुलीसाठी एका गरीब कामगाराला मारहाण करून त्याचा खून केला. घटनेनंतर नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. राकेश बापूराव रामटेके (४५) असे मृताचे नाव आहे. पोलिसांनी आरोपी सूरज मानवटकर (२५), विश्वास ऊर्फ गुड्डु दहिवले (२५), कमलेश ऊर्फ काम्या पाटील (३०) यांना अटक केली आहे.राकेश मजुरी करीत होता. त्याच्या कुटुंबात पत्नी वैशाली, मुलगा अभय आणि मुलगी प्रियंका आहे. अभय आयटीआय करीत असून, प्रियंका बी.कॉम.च्या द्वितीय वर्षाला शिकत आहे. आरोपी सूरज आणि विश्वास गुन्हेगारीवृत्तीचे आहेत. त्यांची बाराखोली परिसरात दहशत आहे. काही दिवसांपासून ते राकेशला कामावरून परत येताना थांबवून दारूसाठी पैसे मागत होते. आरोपींची दहशत असल्यामुळे राकेशने अनेकदा त्यांना ५० ते १०० रुपये दिले. यामुळे आरोपींचे मनसुबे वाढले. आरोपी दररोज पैसे मागू लागल्याने राकेशने आपला रस्ता बदलवून घरी जाणे सुरू केले. याची माहिती मिळताच मंगळवारी रात्री ११.३० वाजता आरोपी राकेशच्या घरी पोहोचले. त्यांनी राकेशला आवाज दिला. राकेश बाहेर आल्यानंतर तिन्ही आरोपींनी त्याला घेरून पैशाची मागणी केली. घरी पत्नी आणि मुलगी असल्यामुळे राकेशने आरोपींना अशा पद्धतीने घरी येण्याबाबत आक्षेप नोंदविला. यामुळे चिडून आरोपींनी राकेशला लाठी आणि लोखंडी रॉडने मारहाण सुरू केली. त्यांच्या भांडणाचा आवाज ऐकून राकेशची पत्नी वैशाली आणि मुले मदतीसाठी धावले. ते राकेशला सोडून देण्याची विनवणी करीत होते. वस्तीतील नागरिकही गोळा झाले. आरोपींनी लाठी उगारून वैशाली आणि तिच्या मुलांना घरात जाण्यास सांगितले. थोडी फार मारहाण करून पतीला सोडून देतील, असा विचार करून वैशाली मुलांसह घरात गेली. त्यानंतर आरोपी राकेशवर तुटून पडले. वैशालीने या घटनेची पोलिसांना माहिती दिली. तिने घराबाहेर येऊन पुन्हा आरोपींना विनवणी केली. त्यानंतर आरोपींनी वैशाली आणि वस्तीतील नागरिकांना मारण्याची धमकी देऊन घरात जाण्यास सांगितले. अर्धा तास राकेशला ते मारहाण करीत होते. राकेश बेशुद्ध झाल्यानंतर ते फरार झाले. त्यानंतर वस्तीतील नागरिकांनी राकेशला मेयो रुग्णालयात दाखल केले. तेथे डॉक्टरांनी त्यास मृत घोषित केले. (प्रतिनिधी)उशिराने पोहोचले पोलीसराकेशच्या पत्नीने सूचना देऊनही जरीपटक्यातील दोन पोलीस शिपाई अर्ध्या तासाने घटनास्थळी पोहोचले. त्यामुळे आरोपी पळून जाण्यात यशस्वी ठरले. पोलीस वेळीच पोहोचले असते तर राकेशला वाचविता आले असते, असे त्याच्या कुटुंबीयांचे म्हणणे आहे. यात नागरिकांनीही आरोपींना थांबविण्याची किंवा समजविण्याची हिंमत केली नाही. उपासमारीची वेळघटनेमुळे राकेशची पत्नी आणि मुलांवर उपासमारीची पाळी आली आहे. मुलांना उच्च शिक्षण देण्याचे स्वप्न राकेशने पाहिले होते. त्याच्या मृत्यूमुळे त्याच्या कुटुंबीयांचे उपजीविकेचे साधन उरले नाही.