शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहार निवडणूक: व्होटर स्लीपशिवाय मतदान नाही! सकाळी ६.३० वाजल्यापासून रांगेत असलेल्या महिलांना रोखले
2
राजा भैय्याच्या शस्त्रपूजेचा पोलिस तपास अहवाल आला; दसऱ्याला डझनभर शस्त्रांचे पूजन केले होते
3
मुलांसाठी जबरदस्त आहे 'ही' स्कीम, अनेक योजना याच्यासमोर फेल; रोज फक्त ₹८.५ रुपये वाचवून व्हाल लखपती
4
Rahul Gandhi: 'मतचोरी'च्या आरोपांत नवा ट्विस्ट! 'तो' फोटो ब्राझिलियन मॉडेलचा नाही? तर...
5
भाजपा टू भाजपा व्हाया मनसे...! महापालिका निवडणुकीपूर्वी माजी आमदार तृप्ती सावंत यांची घरवापसी
6
डिजिटल अरेस्टच्या नावाखाली तब्बल ३,००० कोटी रुपयांची फसवणूक! 'हे' लोक ठरत आहेत सायबर फ्रॉडचे बळी
7
पार्थ पवारांवर जमीन घोटाळ्याचा आरोप, CM फडणवीसांचे चौकशीचे आदेश, म्हणाले, 'अजितदादा अशा गोष्टींना...'
8
CM असताना कारपेट सोडलं नाही, आता कितीही प्रयत्न केले तरी...; फडणवीसांचा ठाकरेंवर पलटवार!
9
गर्भवती पत्नीच्या मृत्यूनं बसला धक्का; १२ तासांनी पतीनेही सोडला जीव; एकाचवेळी २ तिरडी निघणार
10
Cristiano Ronaldo: "मला माझ्या कुटुंबाला, मुलांना वेळ द्यायचा आहे" रोनाल्डो निवृत्तीच्या वाटेवर!
11
VIRAL : लग्नाच्या अगदी आधी वराची 'डिमांड लिस्ट' वाचून सासरे रडले! असं काय लिहिलं होतं?
12
लोन EMI भरतानाच कमवा व्याजाएवढा परतावा! ही 'स्मार्ट इन्व्हेस्टमेंट स्ट्रॅटेजी' माहीत आहे का?
13
“...तर मग पुढील महिन्यापासून माझ्या प्रत्येक बहिणीला २१०० रुपये द्या”; उद्धव ठाकरेंची मोठी मागणी
14
'बिग बॉस १९'च्या विजेत्याचं नाव लीक! रनर-अप आणि टॉप ५ची यादीही आली समोर
15
आनंद महिंद्रा RBL बँकेतील संपूर्ण हिस्सा विकणार; अवघ्या २ वर्षात कसा कमावला २७४ कोटींचा नफा
16
रशिया-युक्रेन युद्धाचा नवा केंद्रबिंदू; 'या' छोट्या शहरावर पुतिन यांचा डोळा, कारण काय?
17
हेअर फॉलला करा गुड बाय; लांब, काळ्याभोर केसांसाठी 'या' सोप्या सवयी, होईल मोठा फायदा
18
Vastu Shastra: मनी प्लांट चुकीच्या दिशेला ठेवाल, तर आयुष्यभर पश्चात्ताप कराल; पाहा योग्य दिशा!
19
घरी येत होता इलेक्ट्रिशियन, डॉक्टर पत्नी झाली फिदा; पतीला संपवण्याचा कट रचला, पण एका चुकीने...
20
बांगलादेशला कांद्याने रडवलं, भारताने निर्यात रोखली! एक किलोची किंमत ऐकून बसेल धक्का

आचारसंहितेत कामे अडकणार नाहीत

By admin | Updated: August 13, 2016 02:14 IST

यंदा मनपा व जिल्हा परिषदेच्या निवडणुका असल्यामुळे कोणतीच कामे आचारसंहितेत अडकणार नाहीत याची पुरेपूर काळजी आम्ही घेत आहोत.

जिल्हा नियोजन समिती आता ५२९.५५ कोटींची नागपूर : यंदा मनपा व जिल्हा परिषदेच्या निवडणुका असल्यामुळे कोणतीच कामे आचारसंहितेत अडकणार नाहीत याची पुरेपूर काळजी आम्ही घेत आहोत. सर्व कामाच्या निविदा प्रक्रिया आचारसंहितेच्या पूर्वी घेऊन कामाचे कार्यादेश देऊन कामे सुरू झाली पाहिजे असा प्रयत्न राहणार आहे. ५२९.५५ कोटींच्या खर्चासाठी सर्व विभागाच्या कामांना प्रशासकीय मान्यतेचे अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना आहे. अनुसूचित जाती उपयोजनांच्या कामांसाठी प्रशासकीय मान्यतेचे अधिकार शासनाला आहे. ते अधिकारही जिल्हाधिकाऱ्यांना मिळावेत, अशी मागणी आपण शासनाकडे करणार आहे, असेही पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले. जिल्हा नियोजन समितीची आढावा बैठक शुक्रवारी डॉ. देशपांडे सभागृहात झाली. या बैठकीला जि.प. अध्यक्षा निशा सावरकर, महापौर प्रवीण दटके, आमदार सुधाकर देशमुख, आ. सुनील केदार, आ. सुधाकर कोहळे, आ. सुधीर पारवे, आ. डी. मल्लिकार्जुन रेड्डी, आशिष देशमुख, विकास कुंभारे, आ. जोगेंद्र कवाडे, आ. प्रकाश गजभिये, आ. कृष्णा खोपडे, आ. डॉ. मिलिंद माने, आ. गिरीश व्यास, आ. नागो गाणार, आ. समीर मेघे, समितीचे सदस्य अ‍ॅड. मधुकर किंमतकर, अ‍ॅड आशिष जयस्वाल, रमेश मानकर, आनंदराव राऊत, नासुप्र सभापती डॉ. दीपक म्हैसेकर, जिल्हाधिकारी सचिन कुर्वे, जि.प. सीईओ कादंबरी भगत, जिल्हा पोलीस अधीक्षक अनंत रोकडे, वाहतूक उपायुक्त पाटील , जिल्हा नियोजन अधिकारी कृष्णा फिरके आदी उपस्थित होते. जिल्हा नियोजन समितीचा निधी मागील वर्षी ५५ कोटी व यंदा १०० कोटींनी वाढवून दिल्याबद्दल पालकमंत्र्यांसह सर्व समिती सदस्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे अभिनंदन केले. अभिनंदनाचा ठराव या सभेत मांडण्यात आला, तो सर्वांनी मंजूर केला.(प्रतिनिधी) वेतनावर खर्च होणारे १० कोटी शासनाने द्यावे आदिवासी एकात्मिक प्रकल्पावर काम करणाऱ्या अधिकाऱ्यांचा वेतनावर १० कोटी रुपये समिती खर्च करणार नाही. वेतन कामाचा खर्च शासनाने करावा. याबद्दल समिती सदस्यांचे एकमत झाले. याप्रसंगी पालकमंत्र्यांनी मांडलेल्या तिन्ही ठरावांचा शासनाकडे पाठपुरावा आमदार सुधाकर देशमुख यांनी करावा, अशी सूचना आमदार रेड्डी यांनी केली. ती मागणी मान्य करण्यात आली. उखडलेल्या रस्त्यांकडे नगरसेवकांनी वेधले लक्ष नगरसेवकांनी आपल्या समस्या डीपीसी समोर मांडल्या नगरसेवकांनी शहरातील उखडलेल्या रस्त्यांकडे पालकमंत्र्यांचे लक्ष वेधले. घरात पाणी घुसल्यामुळे शासनाकडून मिळणाऱ्या खावटीच्या पैशाकडे समितीचे लक्ष वेधण्यात आले. कस्तूरचंद पार्कचा विकास, व्यायाम शाळा, असे विविध विषय नगरसेवकांनी उपस्थित केले.आदिवासी, मिनी माडा योजना राबवताना १५६८ वस्त्यांमध्ये पिण्याच्या पाण्याच्या योजनासाठी सोलर पंपाचे प्रस्ताव तयार करण्याच्या सूचना पालकमंत्र्यांनी दिल्या.पावसामुळे जिल्ह्यातील अनेक रस्ते खराब झाले. पूर संरक्षण निधीचे विषय, तीथक्षेत्र विकास, पर्यटन असे अनेक विषय बैठकीत आले.