शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
3
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
4
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
5
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
6
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
7
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
8
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
9
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
10
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
11
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
12
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
13
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
14
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
15
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
16
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
17
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
18
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
19
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
20
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
Daily Top 2Weekly Top 5

भिवापुरात पाण्यासाठी महिलांचा आक्रोश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 29, 2021 04:08 IST

भिवापूर : ‘त्या’ प्रभागात प्रत्येक घरी नळ असला तरी, त्यातून पाण्याचा थेंब सुध्दा पडत नाही. महिनाभरात तीनवेळा निवेदन दिले. ...

भिवापूर : ‘त्या’ प्रभागात प्रत्येक घरी नळ असला तरी, त्यातून पाण्याचा थेंब सुध्दा पडत नाही. महिनाभरात तीनवेळा निवेदन दिले. मात्र नगरपंचायतीने केवळ आश्वासनांची पाने पुसली. नगरपंचायत पिण्याचे पाणी देण्यास सपशेल अपयशी ठरली. अखेरीस पाण्यावाचून संतापलेल्या २०० वर महिला शुक्रवारी दुपारच्या सुमारास भर उन्हात नगरपंचायतीवर धडकल्या व त्यांनी प्रशासनाविरोधात घोषणा देत मडके फोडले.

शहरातील बहुतांश भाग कृत्रिम पाणीटंचाईने ग्रासला आहे. त्यातही प्रभाग क्र. ११ मध्ये चक्रधर स्वामी मंदिर परिसरातील भागात पिण्याच्या पाण्यासाठी पायपीट करावी लागत आहे. या परिसरात प्रत्येक घरी नळ आहे. मात्र नळाला पाणी येत नाही. नगरपंचायतीचा नियोजनशून्य कारभार आणि लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष त्याला कारणीभूत ठरले आहे. उन्हाळ्यात तर ही समस्या अधिकच तीव्र बनली आहे. त्यामुळे येथील महिला भर उन्हात पाण्यासाठी दाहीदिशा पायपीट करत आहेत. यासंदर्भात येथील महिलांनी महिनाभरात तीनवेळा नगरपंचायतीला निवेदने दिली. टँकरची सुविधा केवळ दिखाव्यापुरतीच मर्यादित आहे. त्यामुळे सदर परिसरातील संतापलेल्या दोनशेवर महिला डोक्यावर मातीचे मडके घेऊन शुक्रवारी दुपारच्या सुमारास नगरपंचायतीवर धडकल्या. नगरपंचायत प्रशासन व लोकप्रतिनिधी यांच्याविरोधात त्यांनी घोषणाबाजी केली. मुख्याधिकारी सुवर्णा दखणे रजेवर असल्याने अधीक्षकांनी तहसीलदार अनिरुद्ध कांबळे यांना कळविले. तोवर या महिलाभगिनी तब्बल दोन तास उन्हात ठिय्या मांडून होत्या. दरम्यान, महिलांनी डोक्यावरील मातीचे मडके फोडत आक्रोश व्यक्त केला. त्यानंतर तहसीलदार कांबळे यांनी नगरपंचायत कार्यालयात येऊन महिलांशी संवाद साधला. पाणी पुरवठा अभियंता नीलेश नरपाचे यांच्याकडून पाणी टंचाईची कारणे जाणून घेत, आवश्यक त्या सूचना दिल्या.

यावेळी ललिता भोयर, विशाखा मोटघरे, नीशा उके, मालती मेश्राम, वनीता जनबंधू, छाया सुरईकर, दर्शना रामटेके, सुकेशना गजभीये, नंदा गजभीये, भावना गजभीये, सोनू नागदेवते, गीता भोयर, निकिता भजभूजे, इंदू धनविजय, गीता नागपुरे, रूपाली गेडाम, आचल नागपुरे आदी महिलांसह गुलाब जनबंधू, रोशन गायधने उपस्थित होते. सहायक पोलीस निरीक्षक शरद भस्मे व पोलीस कर्मचारी सुध्दा यावेळी तैनात होते.

पर्यायी नको, कायमस्वरूपी योजना पाहिजे

आमच्या परिसरात १४ वर्षांपासून पाण्याची समस्या आहे. त्यामुळे आता टँकर पाठवून पर्यायी व्यवस्था नको, तर कायमस्वरूपी उपाय पाहिजे, अशी कैफियत महिलांनी मांडली. शिवाय काही घरी टिल्लू पंपाचा वापर होत असल्यामुळे आमच्या घरी पाणी पोहोचत नाही. काहींच्या घरी दोन-दोन नळ कनेक्शन्स आहेत. पाणी पुरवठ्याचे सुरू असलेले काम रखडले आहे, असे त्या म्हणाल्या.