शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: माजी मंत्री तानाजी सावंत यांचा बंगला पाण्याखाली; दोन-दोन टोयोटा फॉर्च्युनर पुरात बुडाल्या...
2
जीएसटीने आणखी अवघड केले...! पार्ले-जी बिस्कीट पुडा ५ रुपयांचा आता ४.४५ ला, १ रुपयाचे चॉकलेट ८८ पैशांना...
3
Gold Silver Price Today: आजही सोन्या-चांदीचे भाव नव्या विक्रमी पातळीवर; सोन्याच्या दरात प्रति तोळा ₹१,३४३ तर चांदी ₹१,१८१ ने महागली
4
...म्हणून डोंबिवलीत काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्याला भाजपाच्या कार्यकर्त्यांनी नेसवली साडी, व्हिडीओ व्हायरल
5
"निरपराध लोकांची काय चूक होती? आम्ही निषेध करणार"; हवाई हल्ल्यात ३० जणांचा मृत्यू, पाकिस्तानमधील जनता संतापली
6
GST कपातीनंतर सरकारची आणखी एक गुड न्यूज! २५ लाख महिलांना मिळणार मोफत गॅस कनेक्शन
7
ओला दुष्काळ जाहीर करणार का? देवेंद्र फडणवीस म्हणाले, 'त्याकरिता जेवढ्या पद्धतीची..."
8
"...ही चांगली गोष्ट नाही!"; राहुल गांधी यांच्या 'मत चोरी' संदर्भातील आरोपांवरून शरद पवार यांचं मोठं विधान, नेमकं काय म्हणाले?
9
Maharashtra Rain Alert: नवरात्रोत्सवात पावसाचाच 'गरबा', जाता जाता तडाखा देणार; IMD कडून सतर्कतेचा इशारा
10
Viral Video : घर नव्हे हा तर अजूबा! अवघ्या ५२ इंचांच्या दोन मजली घरात डोकावून बघाल, तर हादरून जाल!
11
उडणाऱ्या कारचा जगातील पहिलाच अपघात; दोन फ्लाइंग कार एकमेकांवर आदळल्या, एक बनली आगीचा गोळा...
12
बिहारमध्ये NDAचा जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला, हा पक्ष लढवणार सर्वाधिक जागा
13
अतूट बंध! महागडे गिफ्टस नको तर 'या' ८ गोष्टींनी फुलवा नातं, आयुष्यभर राहा एकमेकांचे सोबती
14
Maharashtra Rain: संपूर्ण आठवडा पावसाचा, शुक्रवारनंतर मुसळधार पावसाची शक्यता, बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र
15
नवरात्री २०२५: विनायक चतुर्थी कधी? व्रताचा संकल्प करा; गणपती पूजन ठरेल वरदान, कायम कृपा-लाभ!
16
USA Hanuman Statue: आता अमेरिकेचा हनुमानावरही आक्षेप; म्हणाले, 'खोट्या देवांची मूर्ती....'
17
Navratri 2025: नवरात्रीत लावलेला अखंड दिवा घालवतो 'अकाल मृत्यू'ची भीती; मात्र... 
18
"आधी नवरा गेला, आता मुलगी..."; विद्यार्थिनीचा शाळेत संशयास्पद मृत्यू, आईने फोडला टाहो
19
नवरात्री २०२५: अखंड ज्योत संकल्प केला, अचानक दिवा विझला तर...; देवी कोप-अशुभ-अवकृपा होईल का?
20
आर अश्विन पुन्हा मैदानात दिसणार; निवृत्तीनंतर परदेशातील ४ संघाकडून खेळण्याची ऑफर!

भिवापुरात पाण्यासाठी महिलांचा आक्रोश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 29, 2021 04:08 IST

भिवापूर : ‘त्या’ प्रभागात प्रत्येक घरी नळ असला तरी, त्यातून पाण्याचा थेंब सुध्दा पडत नाही. महिनाभरात तीनवेळा निवेदन दिले. ...

भिवापूर : ‘त्या’ प्रभागात प्रत्येक घरी नळ असला तरी, त्यातून पाण्याचा थेंब सुध्दा पडत नाही. महिनाभरात तीनवेळा निवेदन दिले. मात्र नगरपंचायतीने केवळ आश्वासनांची पाने पुसली. नगरपंचायत पिण्याचे पाणी देण्यास सपशेल अपयशी ठरली. अखेरीस पाण्यावाचून संतापलेल्या २०० वर महिला शुक्रवारी दुपारच्या सुमारास भर उन्हात नगरपंचायतीवर धडकल्या व त्यांनी प्रशासनाविरोधात घोषणा देत मडके फोडले.

शहरातील बहुतांश भाग कृत्रिम पाणीटंचाईने ग्रासला आहे. त्यातही प्रभाग क्र. ११ मध्ये चक्रधर स्वामी मंदिर परिसरातील भागात पिण्याच्या पाण्यासाठी पायपीट करावी लागत आहे. या परिसरात प्रत्येक घरी नळ आहे. मात्र नळाला पाणी येत नाही. नगरपंचायतीचा नियोजनशून्य कारभार आणि लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष त्याला कारणीभूत ठरले आहे. उन्हाळ्यात तर ही समस्या अधिकच तीव्र बनली आहे. त्यामुळे येथील महिला भर उन्हात पाण्यासाठी दाहीदिशा पायपीट करत आहेत. यासंदर्भात येथील महिलांनी महिनाभरात तीनवेळा नगरपंचायतीला निवेदने दिली. टँकरची सुविधा केवळ दिखाव्यापुरतीच मर्यादित आहे. त्यामुळे सदर परिसरातील संतापलेल्या दोनशेवर महिला डोक्यावर मातीचे मडके घेऊन शुक्रवारी दुपारच्या सुमारास नगरपंचायतीवर धडकल्या. नगरपंचायत प्रशासन व लोकप्रतिनिधी यांच्याविरोधात त्यांनी घोषणाबाजी केली. मुख्याधिकारी सुवर्णा दखणे रजेवर असल्याने अधीक्षकांनी तहसीलदार अनिरुद्ध कांबळे यांना कळविले. तोवर या महिलाभगिनी तब्बल दोन तास उन्हात ठिय्या मांडून होत्या. दरम्यान, महिलांनी डोक्यावरील मातीचे मडके फोडत आक्रोश व्यक्त केला. त्यानंतर तहसीलदार कांबळे यांनी नगरपंचायत कार्यालयात येऊन महिलांशी संवाद साधला. पाणी पुरवठा अभियंता नीलेश नरपाचे यांच्याकडून पाणी टंचाईची कारणे जाणून घेत, आवश्यक त्या सूचना दिल्या.

यावेळी ललिता भोयर, विशाखा मोटघरे, नीशा उके, मालती मेश्राम, वनीता जनबंधू, छाया सुरईकर, दर्शना रामटेके, सुकेशना गजभीये, नंदा गजभीये, भावना गजभीये, सोनू नागदेवते, गीता भोयर, निकिता भजभूजे, इंदू धनविजय, गीता नागपुरे, रूपाली गेडाम, आचल नागपुरे आदी महिलांसह गुलाब जनबंधू, रोशन गायधने उपस्थित होते. सहायक पोलीस निरीक्षक शरद भस्मे व पोलीस कर्मचारी सुध्दा यावेळी तैनात होते.

पर्यायी नको, कायमस्वरूपी योजना पाहिजे

आमच्या परिसरात १४ वर्षांपासून पाण्याची समस्या आहे. त्यामुळे आता टँकर पाठवून पर्यायी व्यवस्था नको, तर कायमस्वरूपी उपाय पाहिजे, अशी कैफियत महिलांनी मांडली. शिवाय काही घरी टिल्लू पंपाचा वापर होत असल्यामुळे आमच्या घरी पाणी पोहोचत नाही. काहींच्या घरी दोन-दोन नळ कनेक्शन्स आहेत. पाणी पुरवठ्याचे सुरू असलेले काम रखडले आहे, असे त्या म्हणाल्या.