शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी त्याला एवढंच बोलले की..."; कल्याण मारहाण प्रकरणातील पीडितेने सांगितला घटनाक्रम
2
दिल्ली विमानतळावर लँडिंगदरम्यान Air India च्या विमानाला आग; सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित
3
"अशाने महाराष्ट्राचं नुकसान होईल…’’, भाषावादादरम्यान तामिळनाडूमधील आठवण सांगत राज्यपालांचं मोठं विधान 
4
"त्या आरोपीला चार तासांत शोधा, अन्यथा…’’ कल्याणमध्ये मराठी तरुणीला झालेल्या मारहाणीवरून मनसे आक्रमक 
5
IND vs ENG : हरमनप्रीत कौरचा मोठा पराक्रम; मिताली राजनंतर अशी कामगिरी करणारी ठरली दुसरी भारतीय
6
डान्स क्लासला नको म्हटल्याने मुलीने तोंडाला लावली विषारी बाटली; तीन महिन्यांची मृत्यूशी झुंज अपयशी
7
VIDEO: लाथ मारली, केस ओढून खाली आपटलं... मराठी तरूणीला परप्रांतीयाकडून बेदम मारहाण
8
एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियामध्ये दीड लाख पगाराची नोकरी!
9
IND vs ENG : ठरलं! लेट एन्ट्री मारणारा थेट प्लेइंग इलेव्हनध्ये दिसणार; करुण नायरही बाकावर नाही बसणार
10
"डोनाल्ड ट्रम्प यांची हत्या करणारच’’, फतवा काढून इराणमधील मौलवींनी गोळा केले ३५० कोटी, शेजारील देशानेही दिली साथ
11
Chhangur Baba : "छांगुर बाबा बाहेर येतील, सर्वांना धडा शिकवतील"; धर्मांतर सिंडिकेटच्या गुंडांकडून धमक्या
12
बिहारच्या विधानसभेत तुफान राडा, आरजेडीचे आमदार आणि मार्शलमध्ये धक्काबुक्की
13
रजिस्ट्रेशन कधीपासून, घर कधी मिळणार? म्हाडाच्या लॉटरीसाठी अर्ज करणाऱ्यांनी 'या' तारखा ठेवा लक्षात!
14
अहिल्यानगर: कधी कुऱ्हाड, कधी कोयता... कधी लाथाबुक्क्या; पत्नीने शेतात जाऊने साडीनेच संपवले आयुष्य
15
४ दिवसांपासून अन्नाचा कणही नाही...; मुलांच्या त्रासाला कंटाळलेल्या वृद्ध दाम्पत्याची गंगेत उडी
16
Video: पाकिस्तानमध्ये ऑनर किलिंगची धक्कादायक घटना; 'तू मला फक्त गोळी...', तरुणीचे शेवटचे शब्द
17
उपराष्ट्रपती पदी कोण बसणार? 'या' तीन नावे शर्यतीत; पहिल्या क्रमांकावर कोण?
18
तरुणीनं पायावर गोंधवला माता कालीचा टॅटू, व्हिडिओ बघून युजर्स भडकले, तुमचाही संताप होईल
19
"आधार, मतदान ओळखपत्र आणि रेशन कार्ड विश्वासार्ह कागदपत्रे नाहीत"; निवडणूक आयोगाची सुप्रीम कोर्टात धक्कादायक माहिती
20
"...असे जीवन जगत राहा"; 'मिसेस मुख्यमंत्र्यां'ची देवेंद्र फडणवीसांच्या वाढदिवशी खास पोस्ट

भिवापुरात पाण्यासाठी महिलांचा आक्रोश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 29, 2021 04:08 IST

भिवापूर : ‘त्या’ प्रभागात प्रत्येक घरी नळ असला तरी, त्यातून पाण्याचा थेंब सुध्दा पडत नाही. महिनाभरात तीनवेळा निवेदन दिले. ...

भिवापूर : ‘त्या’ प्रभागात प्रत्येक घरी नळ असला तरी, त्यातून पाण्याचा थेंब सुध्दा पडत नाही. महिनाभरात तीनवेळा निवेदन दिले. मात्र नगरपंचायतीने केवळ आश्वासनांची पाने पुसली. नगरपंचायत पिण्याचे पाणी देण्यास सपशेल अपयशी ठरली. अखेरीस पाण्यावाचून संतापलेल्या २०० वर महिला शुक्रवारी दुपारच्या सुमारास भर उन्हात नगरपंचायतीवर धडकल्या व त्यांनी प्रशासनाविरोधात घोषणा देत मडके फोडले.

शहरातील बहुतांश भाग कृत्रिम पाणीटंचाईने ग्रासला आहे. त्यातही प्रभाग क्र. ११ मध्ये चक्रधर स्वामी मंदिर परिसरातील भागात पिण्याच्या पाण्यासाठी पायपीट करावी लागत आहे. या परिसरात प्रत्येक घरी नळ आहे. मात्र नळाला पाणी येत नाही. नगरपंचायतीचा नियोजनशून्य कारभार आणि लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष त्याला कारणीभूत ठरले आहे. उन्हाळ्यात तर ही समस्या अधिकच तीव्र बनली आहे. त्यामुळे येथील महिला भर उन्हात पाण्यासाठी दाहीदिशा पायपीट करत आहेत. यासंदर्भात येथील महिलांनी महिनाभरात तीनवेळा नगरपंचायतीला निवेदने दिली. टँकरची सुविधा केवळ दिखाव्यापुरतीच मर्यादित आहे. त्यामुळे सदर परिसरातील संतापलेल्या दोनशेवर महिला डोक्यावर मातीचे मडके घेऊन शुक्रवारी दुपारच्या सुमारास नगरपंचायतीवर धडकल्या. नगरपंचायत प्रशासन व लोकप्रतिनिधी यांच्याविरोधात त्यांनी घोषणाबाजी केली. मुख्याधिकारी सुवर्णा दखणे रजेवर असल्याने अधीक्षकांनी तहसीलदार अनिरुद्ध कांबळे यांना कळविले. तोवर या महिलाभगिनी तब्बल दोन तास उन्हात ठिय्या मांडून होत्या. दरम्यान, महिलांनी डोक्यावरील मातीचे मडके फोडत आक्रोश व्यक्त केला. त्यानंतर तहसीलदार कांबळे यांनी नगरपंचायत कार्यालयात येऊन महिलांशी संवाद साधला. पाणी पुरवठा अभियंता नीलेश नरपाचे यांच्याकडून पाणी टंचाईची कारणे जाणून घेत, आवश्यक त्या सूचना दिल्या.

यावेळी ललिता भोयर, विशाखा मोटघरे, नीशा उके, मालती मेश्राम, वनीता जनबंधू, छाया सुरईकर, दर्शना रामटेके, सुकेशना गजभीये, नंदा गजभीये, भावना गजभीये, सोनू नागदेवते, गीता भोयर, निकिता भजभूजे, इंदू धनविजय, गीता नागपुरे, रूपाली गेडाम, आचल नागपुरे आदी महिलांसह गुलाब जनबंधू, रोशन गायधने उपस्थित होते. सहायक पोलीस निरीक्षक शरद भस्मे व पोलीस कर्मचारी सुध्दा यावेळी तैनात होते.

पर्यायी नको, कायमस्वरूपी योजना पाहिजे

आमच्या परिसरात १४ वर्षांपासून पाण्याची समस्या आहे. त्यामुळे आता टँकर पाठवून पर्यायी व्यवस्था नको, तर कायमस्वरूपी उपाय पाहिजे, अशी कैफियत महिलांनी मांडली. शिवाय काही घरी टिल्लू पंपाचा वापर होत असल्यामुळे आमच्या घरी पाणी पोहोचत नाही. काहींच्या घरी दोन-दोन नळ कनेक्शन्स आहेत. पाणी पुरवठ्याचे सुरू असलेले काम रखडले आहे, असे त्या म्हणाल्या.