शहरं
Join us  
Trending Stories
1
"खडा हूं आज भी वहीं..."; मतचोरीच्या आरोपांवरून जेपी नड्डांनी घेतली राहुल गांधींची 'फिरकी', VIDEO शेअर करत सगळंच उघडं पाडलं!
2
ट्रम्प यांनी भारतावर का लावलंय मोठ्या प्रमाणात टॅरिफ, अखेर व्हाईट हाऊसनं सांगितलं कारण
3
'नोरा फतेहीसारखी फिगर बनव'; पतीने केला पत्नीचा अतोनात छळ, चिडलेल्या तिने शिकवला 'असा' धडा!
4
‘दोन शून्यां’ची बेरीज केली, त्यावर कितीही शून्य जोडले तरी…; भाजपाचा ठाकरे बंधूंना खोचक टोला
5
CM रेखा गुप्तांवर हल्ला करणाऱ्या व्यक्तीचा फोटो आला समोर, आरोपी गुजरातचा रहिवासी
6
Mumbai Rain Updates Live: मुंबईसाठी हवामान विभागाचा ऑरेंज अलर्ट, मुंबई रेल्वेची वाहतूक धीम्या गतीनं सुरू
7
गृहकर्जाचे हप्ते डोईजड झालेत? सरकार स्वस्तात देतंय २५ लाख रुपयांपर्यंतचे कर्ज; कोण घेऊ शकतो लाभ?
8
'मुंबईचा फौजदार' सिनेमाचा रिमेक येणार? गश्मीर म्हणाला- "मी सिनेमा बनवेन पण प्राजक्ता माळीला..."
9
India China Talks: व्यापारापासून ते थेट उड्डाणांपर्यंत; भारत-चीन यांच्यातील चर्चेत अनेक समस्यांवर निघाला तोडगा
10
Ritul: मासिक पाळीदरम्यान केस का धुवू नयेत? जाणून घ्या शास्त्र आणि विज्ञान!
11
BMC: पावसाळ्यात कुठे अडकलात तर काय कराल? मुंबई महानगरपालिकेची महत्त्वाची पोस्ट!
12
'हिला भुतांनी पछाडलेले आहे'; तांत्रिक गरम सळीने चटके देत राहिला, वेदनेने मुलीचा मृत्यू झाला
13
खळबळजनक! बीडमधील कोर्टात सरकारी वकिलाने स्वतःला संपवलं; कारण काय?
14
"चहलने तो टीशर्ट स्टंट खरंच केला? माझा विश्वासच बसत नव्हता..", धनश्री वर्माने व्यक्त केल्या भावना
15
पंतप्रधान अन् मुख्यमंत्र्यांनाही पदावरुन हटवण्याची तरतूद; केंद्र सरकारच्या नवीन विधेयकात नेमकं काय?
16
BEST Election Results: ना ठाकरे बंधू, ना भाजपा; शशांक राव यांच्या पॅनलला १४ जागा, आकडेवारी पाहाच
17
आधी बोलत होता, अचानक हात खेचला, धक्का दिला; रेखा गुप्ता यांच्यावर कसा हल्ला झाला? प्रत्यक्षदर्शी म्हणाले...
18
Toll: खराब रस्त्यांवर टोल नाही; सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय!
19
दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांच्यावर हल्ला; जनसुनावणीदरम्यान कागद हातात दिला, केस ओढले अन्....
20
रात्रीच्या वेळी शेतामध्ये प्रियकरासोबत आक्षेपार्ह अवस्थेत होती मुलगी; मागून गेलेल्या वडिलांनी बघितलं, उचललं टोकाचं पाऊल अन्...

महिला जिंकल्या; दारू हरली!

By admin | Updated: August 5, 2014 01:02 IST

‘गावात एवढ्या साऱ्या आत्महत्या झाल्या. आमच्या आयाबहिणींचे कुंकू पुसल्या गेले. अनेकांचे संसार उघड्यावर आले. दारूमुळे हा सारा सत्यानाश झाला, असे असताना आणखी किती बळी घेणार’

नांदच्या महिलांनी केली ‘दारू नको’ ची गर्जनानांद : ‘गावात एवढ्या साऱ्या आत्महत्या झाल्या. आमच्या आयाबहिणींचे कुंकू पुसल्या गेले. अनेकांचे संसार उघड्यावर आले. दारूमुळे हा सारा सत्यानाश झाला, असे असताना आणखी किती बळी घेणार’ असा सडेतोड सवाल करत ‘गावात पुन्हा देशी दारूची दुकाने नकोत’ अशी गर्जना नांद येथील महिलांनी करीत राजरोसपणे सुरू असलेले ‘अवैध धंदे हटाव’चा नारा दिला. नांदच्या सरपंच भारती भैसारे यांनी सोमवारी ‘विशेष महिला ग्रामसभा’ आयोजित केली होती. यामध्ये देशी दारूचे दुकान पूर्ववत सुरू करण्याबाबतचा विषय होता. याबाबतच्या विषयाची नोटीस निघताच गावात विविध चर्चेला ऊत आला. अशातच ‘लोकमत’मध्ये २ आॅगस्टच्या अंकात ‘देशी दारूची दुकाने पुन्हा सुरू करण्याचा घाट’ या मथळ्याखाली वृत्त प्रकाशित होताच घरोघरी याप्रकरणाची खमंग चर्चा रंगली. मागील पाच वर्षापासून बंद असलेली देशी दारूची दुकाने पुन्हा सुरू झाली तर आपले गाव व्यसनाच्या आहारी जाऊ शकते, या विचाराने साऱ्यांचीच झोप उडाली. या चर्चेतच आज, सोमवारी सकाळी ११ वाजता ग्रामसभेला सुरुवात झाली. परंतु सभेच्या अध्यक्षस्थानी कुणाचीही घोषणा करण्यात आली नाही. शिवाय सभेचा वृत्तांत नोंदविण्यासाठी कुणीही हजर नव्हते. त्यामुळे ही कसली ग्रामसभा असा सूर महिलांचा होता. अशातच सभा सुरू होताच उपस्थित महिलांनी देशी दारूचे दुकान सुरू करायचे नाही, असा सूर आळवला. सभेला उपस्थित सुमारे २०० महिलांनी एकजुटीने देशी दारूच्या दुकानाला विरोध दर्शवित, दारूबंदीच्या लढ्यात आता माघार घ्यायची नाही, या निर्धाराने आपला संताप व्यक्त केला. या सभेत महिलांनी सरपंच भारती भैसारे यांच्यावर जोरदार टीका करीत देशी दारू दुकाने सुरू करण्याबाबतचा डाव हाणून पाडला. सोबतच गावात राजरोजपणे सुरू असलेल्या अवैध धंद्यांवरही लगाम लावण्याची जोरदार मागणी केली. पोलिसांच्याच आशीर्वादाने अवैध धंदे सुरू असल्याचाही घणाघात यावेळी महिलांनी केला. तीन तास चाललेल्या या घमासान चर्चेत कोणताही निर्णय घेण्यात आला नाही. अखेरीस महिलांनी ग्रामसभेवर बहिष्कार टाकत, सभात्याग केला. अशातच दारू दुकाने सुरू करण्याबाबतचा कोणताही निर्णय झालेला नाही, अशी घोषणा सरपंच भारती भैसारे यांनी करत सभा संपल्याचे जाहीर केले. यामुळे दोन देशी दारूंची दुकाने पूर्ववत सुरू करण्याबाबतचा निर्णय घेण्यासाठी आयोजित विशेष महिला ग्रामसभा कोणताही निर्णय न होता बारगळली. सभेनंतर महिलांच्या एकजुटीमुळेच पुन्हा एकदा ‘महिला जिंकल्या अन् दारू हरली’ अशा प्रतिक्रिया नांदवासीयांमध्ये दिसून आल्या. ग्रामसभेला उमरेडचे उपविभागीय पोलीस अधिकारी शंकरसिंग राजपूत यांची प्रामुख्याने उपस्थिती होती. येत्या काही दिवसात अवैध धंदे पूर्णपणे बंद होतील, असे आश्वासन राजपूत यांनी यावेळी दिले. जिल्हा परिषद सदस्या नंदा नारनवरे यांनीही आपले विचार मांडत ही ग्रामसभा कायदेशीर नसल्याचा आरोप करीत महिलांच्या सोबतीला असल्याचा विश्वास व्यक्त केला. गावात काही काळ तणावाचे वातावरण होते. परंतु, चोख पोलीस बंदोबस्तामुळे कोणताही अनुचित प्रकार घडला नाही. (वार्ताहर)