शहरं
Join us  
Trending Stories
1
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ८५ व्या वर्षी निधन
2
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
3
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
4
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
5
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
6
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
7
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
8
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
9
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
10
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
11
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
12
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
13
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
14
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
15
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
16
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
17
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
18
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
19
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
20
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
Daily Top 2Weekly Top 5

भाषा संस्थांबाबत निर्णय घेणार का?

By admin | Updated: November 27, 2014 00:22 IST

मराठी भाषा विकास संस्था आणि राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ या संस्थांचे विलिनीकरण करण्याचा निर्णय शासनाने घेतला. दोन संस्थांवर स्वतंत्रपणे खर्च करण्यापेक्षा त्यांचे विलिनीकरण

भाषा संस्थांच्या अस्तित्वाचा प्रश्न : शासनाची चार वर्षांची उदासीनता राजेश पाणूरकर - नागपूर मराठी भाषा विकास संस्था आणि राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ या संस्थांचे विलिनीकरण करण्याचा निर्णय शासनाने घेतला. दोन संस्थांवर स्वतंत्रपणे खर्च करण्यापेक्षा त्यांचे विलिनीकरण करण्याचा निर्णय मुख्यमंत्र्यांनी जाहीर केल्यावर साहित्य, संस्कृतीच्या क्षेत्रातील मान्यवरांनी त्याला विरोध केला. अखेर नमते घेत हे प्रकरण शासनाने गेले चार वर्षे प्रलंबित ठेवले होते. त्यानंतर या संस्थांच्या विलिनीकरणाबाबत पुनर्विचार करण्यासाठी शासनाने अशासकीय सदस्यांची समिती स्थापन केली. घाईने समितीचा अहवाल मागविण्यात आला पण त्यानंतर भाषा संस्थांबाबतचा निर्णय घेण्यात शासन अपयशी ठरले. शासनाला दोन संस्थांवर खर्च करणे शक्य नसल्याचे कारण देत, या संस्थांचे विलिनीकरण करण्याचा प्रयत्न शासनाने केला. या दोन्ही विभागांचे विलिनीकरण करून एक नवीच संस्था ‘मराठी भाषा, साहित्य, संस्कृती संस्था’ निर्माण करण्याचा निर्णय शासनाने घेतला होता. यात साहित्य, संस्कृती आणि भाषा असे तीन विभाग एकाच संस्थेत आणण्याचा शासनाचा प्रयत्न होता. हा विभाग मुख्यमंत्र्यांच्याच अखत्यारित येतो. या संस्थांचे विलिनीकरण करावे वा नाही, यासंदर्भातील अहवाल सादर करण्याचे आदेश शासनाने सचिव स्तरावरील अधिकाऱ्यांना दिले होते. त्यावेळीही साहित्य क्षेत्रातून याचा विरोध करण्यात आला व भाषा, साहित्य आणि संस्कृतीच्या क्षेत्रातील तज्ज्ञ व्यक्तींची निवड समितीवर करावी, अशी जोरकस मागणी करण्यात आली. नागपूरच्या अधिवेशनात काही साहित्यिकांनी यासंदर्भात मुख्यमंत्री व शासकीय अधिकाऱ्यांशी चर्चा केली. त्यानंतर हे प्रकरण थंडबस्त्यात पडले. गेली साडेतीन वर्षे हा विषय शासनदरबारी अडला होता. अखेर मुख्यमंत्र्यांनी यासंदर्भातला योग्य अहवाल सादर करण्यासाठी एका समितीची स्थापना केली. या समितीचे अध्यक्ष महाराष्ट्र सांस्कृतिक आघाडीचे संस्थापक डॉ. श्रीपाद भालचंद्र जोशी होते. सुप्रसिद्ध विचारवंत व कवी डॉ. यशवंत मनोहर, समीक्षक डॉ. वि. स. जोग, रेखा बैजल, प्रवीण दवणे आणि मराठी भाषा विभागाचे उपसचिव यांचा समावेश होता. महसुली खर्च वाचविण्यासाठी शासनाने भाषेसंदर्भात निर्णय घेणाऱ्या या दोन संस्थांचे विलिनीकरण करू नये, यासाठी राज्यातून तीव्र विरोध करण्यात आला होता. समितीने या संदर्भातला अहवाल दोन्ही बाजूने दिलेला असून यावर शासनाला विचार करून निर्णय घ्यायचा आहे. शासनाने अद्याप काहीही निर्णय न घेतल्याने या संस्थांच्या कार्याचाही आनंदीआनंदच आहे. या संस्थांना स्वतंत्रपणे कार्य करण्याचा अधिकार दिल्यास भाषेसंदर्भातल्या अनेक मुद्यांवर तोडगा निघू शकतो. नव्या सरकारकडून या संस्थांबाबतचा सकारात्मक निर्णय व्हावा आणि भाषेच्या वृद्धीसाठी पुरेसा निधीही या शासनाने उपलब्ध करावा, अशी अपेक्षा समिती सदस्यांनी व्यक्त केली आहे.