शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
कसा आहे मेस्सीचा भारत दौरा? कोलकाता येथे पहिला मुक्काम; PM मोदींच्या भेटीसह सांगता; जाणून घ्या सविस्तर
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

अधिवेशनामुळे वाढणार ‘कोरोना’चा धोका?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 12, 2020 23:55 IST

Winter Session, Corona Virus, Nagpur Newsऑक्टोबरनंतर ‘कोरोना’चा धोका वाढण्याची शक्यता असल्याचे वैद्यकीय जगताकडून सांगण्यात येत आहे. अशा स्थितीत ७ डिसेंबरपासून होणारे हिवाळी अधिवेशन नागपुरात आणखी समस्या निर्माण करणारे होऊ शकते.

ठळक मुद्देयंत्रणा सरकारच्या सेवेत, मग जनतेचे काय होणार? : राज्यभरातून येणारे लोक पसरवू शकतात संक्रमण

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : नागपूर करारानुसार दरवर्षी नागपुरात एक विधिमंडळ सत्र घेणे अनिवार्य आहे. नागपुरात होणाऱ्या अधिवेशनात विदर्भाचे प्रश्न मार्गी लागतील यामुळे कालावधी वाढवावा अशी एरवी अपेक्षा असते. मात्र यंदा नेमकेउलटे चित्र आहे. ऑक्टोबरनंतर ‘कोरोना’चा धोका वाढण्याची शक्यता असल्याचे वैद्यकीय जगताकडून सांगण्यात येत आहे. अशा स्थितीत ७ डिसेंबरपासून होणारे हिवाळी अधिवेशन नागपुरात आणखी समस्या निर्माण करणारे होऊ शकते. सरकारच्या सेवेत अर्धी वैद्यकीय यंत्रणा राबेल. अगोदर अपुरी वैद्यकीय सुविधा असताना अशा स्थितीत जनतेकडे लक्ष कोण देणार, हा कळीचा मुद्दा आहे. एकूणच स्थिती पाहता कराराचे पालन करणे महत्त्वाचे की नागरिकांचे आरोग्य, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

मंत्री, आमदार यांच्या दिमतीला वैद्यकीय विभागातर्फे मेयो-मेडिकलचे विशेष पथक लावण्यात येईल. अगोदरच नागपुरात वैद्यकीय तज्ज्ञांच्या अभावामुळे मनपाला प्रचंड अडचणींचा सामना करावा लागतो. अशा स्थितीत डिसेंबर महिन्यात तर त्यात आणखी वाढ होईल. अधिवेशन सुरू होण्याच्या अगोदरच सचिवालयाचे नागपुरात काम सुरू होईल व त्यासाठी मुंबईतून कर्मचारी-अधिकारी शहरात येतील. त्यामुळे संसर्ग वाढण्याचा धोका निर्माण होऊ शकतो. अपुऱ्या सुविधांचा सामना करत असलेल्या नागपूरसमोर यामुळे मोठे संकट उभे ठाकू शकते. त्यामुळेच यंदा अधिवेशन नागपुरात नको अशी जनसामान्यांचीदेखील भावना आहे.

कोविड सेंटर हातातून जाणार

आमदार निवासात स्थापन करण्यात आलेल्या कोविड सेंटरमध्ये १४ मार्चपासून नागरिक येत आहेत. अधिवेशनासाठी येणारे अनेक आमदार तेथे थांबत जरी नसले तर कागदावर तर त्यांना तेथील खोली देण्यात येते. त्यामुळे जनतेच्या हक्काचे व सोयीचे कोविड सेंटरदेखील बंद होणार आहे. रविभवनात कोरोना बाधितांच्या सेवेत असणारे डॉक्टर राहत आहेत. शिवाय तेथे ‘आरटीपीसीआर’ चाचणी केंद्रदेखील आहे. तेदेखील बंद करावे लागेल व डॉक्टरांच्या राहण्याचा प्रश्न निर्माण होईल.

मोर्चे ठरू शकतात ‘कोरोना कॅरिअर’

हिवाळी अधिवेशनात विदर्भातील प्रश्नांवर खरोखरच किती चर्चा होते व न्याय मिळतो हा संशोधनाचा विषय असला तरी मोर्चेकऱ्यांमध्ये मोठा उत्साह असतो. ‘कोरोना’ कालावधीत मोर्चांना परवानगी देण्यात येणार आहे. अशा स्थितीत गर्दीचे नियंत्रण करण्याचे मोठे आव्हान पोलीस यंत्रणेसमोर राहणार आहे. हे मोर्चेदेखील ‘कोरोना कॅरिअर’ ठरु शकतात, अशी भीती व्यक्त करण्यात येत आहे.

अधिवेशनाच्या निमित्ताने बंदोबस्तासाठी राज्यभरातून पोलीस नागपुरात येत असतात. अनेकदा त्यांना दाटीवाटीनेच रहावे लागते. एकूण सुविधा लक्षात घेता ‘कोरोना’ काळात ‘फिजिकल डिस्टन्सिंग’ राखणे हे पोलिसांसाठीदेखील मोठे आव्हान ठरणार आहे. विशेषत: अनेक पोलिसांची व्यवस्था ही पोलीस लाईन टाकळी येथे करण्यात येते. अशात एखादा जरी पोलीस कोरोनाबाधित निघाला तर मोठी समस्या निर्माण होऊ शकते.

मोर्चकऱ्यांनादेखील धोका

विविध मागण्यांसाठी अधिवेशनावर मोर्चा काढणारे मोर्चेकरी हेदेखील राज्याच्या विविध भागांतून येतात. अनेकदा ते खचाखच भरलेल्या खासगी वाहनांतून येतात. मोर्चांमुळे सीताबर्डी, टेंपल बाजार मार्ग, सदर, यशवंत स्टेडियम या परिसरात गर्दी होते. डिसेंबरपर्यंत ‘कोरोना’ जाणे अशक्य असल्याचे डॉक्टर्सचे म्हणणे आहे. अशा स्थितीत मोर्चेकरी ‘फिजिकल डिस्टन्सिंग’ पाळतात की नाही, ‘मास्क’ लावतात की नाही याकडे कुणाचेही लक्ष राहणार नाही. यामुळे मोर्चकऱ्यांदेखील संसर्गाचा धोका होऊ शकतो.

टॅग्स :Winter Session Maharashtraविधानसभा हिवाळी अधिवेशनcorona virusकोरोना वायरस बातम्या