शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्राचे सुपुत्र बी. आर. गवई देशाचे नवे सरन्यायाधीश; राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंनी दिली शपथ
2
भाजपा मंत्र्याच्या नेमप्लेटवर शाई, काँग्रेसची निदर्शनं; कर्नल सोफिया कुरेशी यांच्याबाबत वादग्रस्त विधान भोवलं
3
Video: भारत-पाकिस्तान शस्त्रसंधीचे श्रेय घेणारा अमेरिका दहशतवादाच्या प्रश्नावर गप्प...
4
सरन्यायाधीशांना मिळतो पंतप्रधानांपेक्षा जास्त पगार; सोबत भत्ते आणि मिळतात 'या' खास सुविधा
5
कर्नल सोफिया कुरेशींबाबत आक्षेपार्ह विधान करणाऱ्या भाजपा मंत्र्याला दणका; वरिष्ठांचे आदेश आले, अन्...
6
रितेश देशमुखनं विचारलं 'मोठं होऊन काय होणार?' लहानग्याचं उत्तर ऐकून तुम्हालाही वाटेल अभिमान!
7
बर्फ वितळेल, जास्त पाऊस पडेल, गंगा नदीचा प्रवाह ५० टक्क्यांनी वाढेल..; IIT रुरकीचा रिपोर्ट
8
विराटशिवाय 'टेस्ट' झाली फिकी; प्रीती झिंटानं बोलून दाखवली मनातली गोष्ट
9
पाकिस्ताननं जितक्या रकमेसाठी IMF मध्ये नाक कापून घेतलं, भारताला त्यापेक्षा अधिक तर 'गिफ्ट'च मिळणारे; प्रकरण काय?
10
अनुष्का सेनवर चिडला नील नितीन मुकेश? आगामी सीरिजच्या प्रमोशनल इव्हेंटमधील व्हिडिओ व्हायरल
11
एकामागोमाग एक दिग्गज कंपन्या निर्णय घेतायत; मायक्रोसॉफ्ट ६००० कर्मचाऱ्यांना कामावरून काढणार
12
Rohit Sharma : कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर रोहित शर्मा मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला, कारण काय ?
13
ब्रेकअपनंतर प्रेयसीचे ’तसले’ व्हिडीओ पॉर्न साईटवर? कोल्हापूरच्या प्रियकरावर पुण्यात गुन्हा
14
परराष्ट्र मंत्री एस जयशंकर आता बुलेटप्रुफ कारमधून ये-जा करणार; पाकिस्तानमुळे वाढली सुरक्षा
15
मोठी बातमी! अकोल्यातील पाच सराफा दुकानांवर आयकरची धाड; सकाळपासून शोधमोहिम सुरू
16
पाकिस्तानला शस्त्रास्त्रे देणाऱ्या तुर्कीवर पुण्यातून ट्रेड स्ट्राईक; उदयपूरचे संगमरवर व्यापारीही माल आणणार नाहीत
17
कोण आहे कशिश चौधरी?; वयाच्या २५ व्या वर्षी या हिंदू मुलीनं पाकिस्तानात रचला इतिहास
18
भारत-पाकिस्तान तणावामुळे आलिया भटने घेतला हा मोठा निर्णय, वाचून कराल तिचं कौतुक
19
हेअर ट्रान्सप्लांटमुळे एक नव्हे २ इंजिनिअरचा मृत्यू; डॉ. अनुष्का तिवारीचा नवा कांड उघड
20
Stock Market Today: या वृत्तानं बदलला बाजाराचा मूड; १३० अंकांच्या तेजीसह उघडला सेन्सेक्स, IT-Metal स्टॉक्समध्ये तेजी

यंदा ९४वे मराठी साहित्य संमेलन होणार का?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2021 04:10 IST

प्रवीण खापरे / लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : कोरोना संक्रमणाच्या तीव्रतेवर लॉकडाऊनचा निर्णय शासन घेते आणि ते उठवतेही. मात्र, ...

प्रवीण खापरे / लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : कोरोना संक्रमणाच्या तीव्रतेवर लॉकडाऊनचा निर्णय शासन घेते आणि ते उठवतेही. मात्र, संक्रमणाच्या धोक्याने छोट्या छोट्या कुटुंबांच्या नियोजनाचा बोजवारा उडलाय. जेथे शासन, प्रशासन, यंत्रणा हतबल झाले, तेथे मोठमोठी महामंडळे, संस्थांची काय बिशाद. साहित्य व सांस्कृतिक क्षेत्राचे तर पार हाल झाले आहेत. या सगळ्यांचा विचार करताना नाशिक येथे नियोजित ९४वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होईल का, हा प्रश्न उपस्थित व्हायला लागला आहे.

जानेवारी २०२० मध्ये ९३वे साहित्य संमेलन उस्मानाबाद (धाराशिव) येथे पार पडल्यानंतर कोरोना संक्रमणाच्या पहिल्या लाटेने आक्रमण केले आणि मार्च २०२० पासून संपूर्ण भारत लॉकडाऊनमध्ये गेला. लाट ओसरल्यानंतर अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाने ९४व्या संमेलनाची तयारी केली. अनेक वादावादीनंतर नाशिक हे संमेलनस्थळ म्हणून निश्चित झाले आणि मार्च महिन्यातील तारखाही निश्चित झाल्या. मात्र, दरम्यान फेब्रुवारीपासून पुन्हा एकदा कोरोना संक्रमणाने तोंड काढले आणि पहिल्या पेक्षाही दुसरी लाट चौपटीने भयंकर ठरली. कोणत्याही स्थितीत संमेलन पार पडणार, असे म्हणणारे महामंडळ अध्यक्ष कौतिकराव ठाले-पाटील यांनी अखेर संमेलन स्थगित करण्याचा निर्णय घेतला. तेव्हापासून महामंडळ क्वारंटाईनमध्ये गेल्याची स्थिती आहे. संमेलन स्थगित झाल्यानंतर महामंडळाच्या संपूर्ण हालचालीच बंद पडल्या आहेत. संक्रमणाचा जोर ओसरत असून, टप्प्याटप्प्यात लॉकडाऊनही मागे घेतले जात आहे. मात्र, संक्रमणाच्या पहिल्या लाटेनंतरचा गाफीलपणा आणि वर्तमानातील भयानक स्थिती बघता शासन सार्वजनिक कार्यक्रमांवर कठोर निर्बंध आणणार हे निश्चित. अशा स्थितीत नाशिक येथील नियोजित ९४वे साहित्य संमेलन यंदा होणार की नाही, असा प्रश्न उपस्थित व्हायला लागला आहे. त्यातच कोरोना काळात पार पडलेल्या इतर लहानमोठ्या साहित्य संमेलनांप्रमाणे महामंडळ ऑनलाईनचा पर्याय निवडेल का, हा एक प्रश्न निर्माण झाला आहे.

----------------

विश्व मराठी संमेलन ऑनलाईन

गेल्याच महिन्यात विश्व मराठी परिषदेच्या वतीने ऑनलाईन संमेलन पार पडले. या संमेलनात देश-विदेशातून मोठ्या संख्येने साहित्यप्रेमींनी सहभाग नोंदविला होता. त्याच अनुषंगाने १ जुलैपासून पुन्हा एकदा परिषदेतर्फे विविध ऑनलाईन कार्यक्रम राबविण्यात येत आहेत. याच धर्तीवर नव्या युगाची नवी हाक आणि गरज म्हणून साहित्य महामंडळानेही असला प्रयोग राबविण्यास हरकत नसल्याची चर्चा साहित्य वर्तुळात सुरू आहे.

----------------

ऑनलाईनचा पर्याय शक्यच नाही

इतर कुठल्याही कार्यक्रमांची आणि मराठी साहित्य संमेलनाची तुलना करणे शक्य नाही. साहित्य संमेलन म्हणून प्रत्यक्ष भेटी-गाठीतून विचारांचे आदान-प्रदान होणारा हा हक्काचा सोहळा आहे. आम्ही संमेलन घेण्यास उत्सुक आहोत. त्यासाठी कोरोना संक्रमणाच्या स्थितीचे अवलोकन केले जाईल. या संदर्भात जुलैच्या अखेर बैठक बोलाविण्यात येईल. मात्र, शासन-प्रशासनाचे काय नियम असतात, त्यावरच बैठक आणि संमेलनाच्या नियोजनाचे ठरणार आहे.

- कौतिकराव ठाले-पाटील, अध्यक्ष : अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळ

...............