शहरं
Join us  
Trending Stories
1
'पहिला देश, नंतर व्यापार'! डोनाल्ड ट्रम्प यांच्या 'टॅरिफ'नंतरही भारत झुकला नाही; मोदी सरकारने दिला हा संदेश
2
"जे उचकायचं ते उचका, मी कोणाच्या बापाला घाबरत नाही"; चित्रा वाघांचा मनोज जरांगेंवर पलटवार
3
पावसाचा हाहाकार! चीनमध्ये १.८४ लाख कोटींचं नुकसान; पाकिस्तानमध्ये ३०० जणांचा मृत्यू, भारतात...
4
मिनियापोलिस शहरातील शाळेवर हल्ला; तिघांचा मृत्यू, अनेक विद्यार्थी जखमी
5
कर्जाच्या ओझ्याखाली दबला पाकिस्तान; IMFच्या बेलआऊट पॅकेजनंतरही अर्धा देश उपाशी!
6
Vaishno Devi Landslide: ना सावरण्याची संधी मिळाली, ना पळण्याची... प्रत्यक्षदर्शींनी सांगितली आपबिती
7
गुगलवर चुकूनही सर्च करू नका 'या' गोष्टी, अन्यथा पोलीस पकडून घेऊन जातील!
8
'एआय'चा झटका! २२-२५ वयोगटातील तरुणांना नोकरी मिळेना, या नोकऱ्यांवर सर्वाधिक परिणाम
9
Vidarbha Rain: विदर्भातील चार जिल्ह्यांना पाऊस झोडपणार; हवामान विभागाकडून सतर्कतेचा इशारा
10
जल्लोषपूर्ण वातावरणात श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती बाप्पा विराजमान; जया किशोरी यांच्या हस्ते झाली प्राणप्रतिष्ठा!
11
विरारमध्ये दुर्घटना बचावकार्य युद्धपातळीवर सुरू, जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला बचावकार्याचा आढावा
12
Nikki Murder Case : निक्कीच्या मृत्यूचं गूढ आणखी वाढलं, 'या' पुराव्यांमुळे बदलली तपासाची दिशा, पोलीसही हैराण
13
"आता माझ्याकडे मृत्यूशिवाय पर्याय नाही, म्हणून..."; भाजपा नेत्यानं मुख्यमंत्र्यांकडे मागितलं इच्छामरण
14
गंगेचा प्रवाह धोका? गंगोत्री ग्लेशियर १० टक्के वितळला, पाणी होतंय कमी; IIT इंदूरच्या संशोधनात काय? 
15
'आम्ही तिला मारलं नाही' निक्कीच्या सासरच्या लोकांचा दावा! पण पतीच्या एका कृतीने वाढला संशय
16
ऑनलाईन गेमिंगचे व्यसन जडले, तरुणाने घरातील दागिने चोरले अन् गेममध्ये उडवले 'इतके' पैसे!
17
भारतीय औषध कंपन्यांसमोर डोनाल्ड ट्रम्प झुकले! ५० टक्के टॅरिफमधून दिली सूट, नेमके कारण काय?
18
लव्ह मॅरेज, २ आलिशान शोरूम आणि ३६ पानी पत्र...; कोट्यवधीची संपत्ती तरीही उद्योगपतीचं कुटुंब संपलं कसं?
19
शेजाऱ्यांना खुश करण्यासाठी मार्क झुकेरबर्ग वाटतायेत 'हेडफोन'; का वैतागले आहेत शेजारी?
20
टाटानं केली नव्या 'एआय अँड सर्व्हिस ट्रांसफॉर्मेशन' युनिटची स्थापन, काय असणार काम? कुणाला मिळाली जबाबदारी? जाणून घ्या

रस्त्यांची दुरुस्ती कागदावर राहणार?

By admin | Updated: June 2, 2014 02:21 IST

जिल्ह्यातील रस्ते व पुलांच्या दुरुस्तीसाठी जिल्हा परिषदेला ३२ कोटीचा निधी मिळाला.

नागपूर : जिल्ह्यातील रस्ते व पुलांच्या दुरुस्तीसाठी जिल्हा परिषदेला ३२ कोटीचा निधी मिळाला. परंतु निधी उपलब्ध होण्याला झालेला विलंव व निवडणूक आचारसंहितेमुळे रस्त्यांच्या कामांना अद्याप सुरुवात झालेली नाही. जून महिन्याला सुरुवात झाल्याने पावसाळय़ापूर्वी कामे पूर्ण होणे अशक्य असल्याने रस्त्यांची दुरुस्ती कागदावरच राहणार आहे.

गेल्या वर्षीच्या पावसाळय़ात अतवृष्टी व पुरामुळे जिल्ह्यातील रस्ते व पुलांचे प्रचंड नुकसान झाले होते. अनेक गावांचा संपर्क तुटला होता. शासनाकडे जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाने दुरुस्तीसाठी १५७ कोटीची मागणी केली होती. शासनाकडून ३२ कोटीचा निधी प्राप्त झाला. तसेच जिल्हा नियोजनातून सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून २६ कोटी रस्ते व पूल दुरुस्तीच्या कामावर खर्च केले जात आहे. अतवृष्टीसोबतच जड वाहनांच्या वाहतुकीमुळे ग्रामीण मार्ग मोठय़ा प्रमाणात नादुरुस्त झालेले आहेत. या रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी २२३ कोटींची गरज आहे.

नागपूर जिल्ह्यात ८0९१ कलोमीटर लांबीचे ग्रामीण तर २८५९ किलोमीटर लांबीचे इतर जिल्हा मार्ग आहेत. या मार्गांंंची संख्या ५ हजारांवर आहे. जून व जुलै महिन्यातील अतवृष्टी व पुरामुळे जिल्ह्यातील १,९५६ किलोमीटर लांबीचे ८0३ रस्ते नादुरुस्त झालेले आहेत तर गौण खनिजाच्या वाहतुकीमुळे १,३१५ कि.मी. लांबीचे २६१ रस्ते नादुरुस्त झालेले आहेत. या रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी ३७0 कोटीची गरज आहे.

उशिराने निधी मिळाला

लोकसभा निवडणुक ीची अचारसंहिता विचारात घेता रस्त्यांची व पुलाची दुरुस्ती चार महिन्यापूर्वीच होणे गरजेचे होते. या दृष्टीने जि.प.च्या बांधकाम विभागाने सहा महिन्यापूर्वीच शासनाकडे १५७ कोटींची मागणी केली होती. परंतु ३२ कोटी उशिराने प्राप्त झाले. त्यातच आचारसंहितेमुळे दोन महिने गेले. त्यामुळे अद्याप कामाला सुरुवात झालेली नाही. पावसाळय़ापूर्वी कामे पूर्ण होण्याची शक्यता नसल्याने पावसाळय़ात ग्रामीण भागातील लोकांना संकटाचा सामना करावा लागणार आहे.

तातडीने कामाला सुरुवात करू

जड वाहनांची वाहतूक, अतवृष्टी व पुरामुळे रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी जि.प.च्या बांधकाम विभागाकडे निधी नाही. अतवृष्टीमुळे नादुरुस्त रस्त्यांसाठी १५७ कोटींची तर जड वाहनामुळे नादुरुस्त रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी २२३ अशा ३७0 कोटींची शासनाकडे मागणी केली आहे. शासनाकडून ३२ कोटींचा निधी प्राप्त झाला आहे. याचे नियोजन झाले असून यातून तातडीने कामाला सुरुवात करण्याचा प्रयत्न आहे. सोबतच वाढीव निधीसाठी शासनाकडे पाठपुरावा सुरू असल्याची माहिती जि.प.चे उपाध्यक्ष चंद्रशेखर चिखले यांनी दिली. (प्रतिनिधी)