शहरं
Join us  
Trending Stories
1
जम्मू-काश्मीर पोलिसांची मोठी कारवाई, मुफ्ती इरफानला शोपियानमधून अटक; मोठे टेरर नेटवर्क उद्ध्वस्त
2
"ही पाकची जुनी खोड..."; इस्लामाबादच्या स्फोटाचं खापर भारतावर फोडणाऱ्या पाकिस्तानला मिळालं चोख उत्तर! 
3
न्यायालयाचा दणका! महिलांना मारहाण व शिवीगाळ केल्याप्रकरणी पुणे पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश
4
लाल किल्ला स्फोटात मोठा खुलासा! सुरक्षा यंत्रणांच्या जोरदार कारवाईमुळे मोठा धोका टळला
5
शेख हसीनानंतर आता युनूस सरकारविरोधात विद्यार्थी रस्त्यावर; बांगलादेशात पुन्हा चळवळ सक्रिय
6
बिहारमध्ये प्रशांत किशोर यांची जनसुराज्य खाते उघडणार? ८ एक्झिट पोलमध्ये तेजस्वी यादवांचे गणित बिघडले
7
लग्नाला नऊ वर्षे पूर्ण झाली, पतीने आपल्याच मित्रासोबत पत्नीचे लग्न लावून दिले; धक्कादायक कारण आले समोर
8
बिहारमध्ये काँग्रेसला मोठा धक्का! दुसऱ्या टप्प्यातील निवडणूक संपताच मोठ्या नेत्याने दिला राजीनामा
9
Bihar Exit Poll : बिहारमध्ये उत्सुकता शिगेला! पहिला एक्झिट पोल आला, नितीश की तेजस्वी?
10
'तो शांत होता, त्याचे जास्त मित्र नव्हते'; दिल्ली बॉम्बस्फोटातील संशयित डॉक्टरच्या कुटुंबीयांची प्रतिक्रिया
11
राहुल द्रविडच्या लेकाची भारतीय U19 संघात वर्णी ; वैभव सूर्यवंशीचं नाव 'गायब' कारण...
12
छत्तीसगडच्या बीजापूरमध्ये मोठी चकमक, 6 नक्षलवादी ठार; मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त...
13
बॉसनं नोकरीवरून काढलं, पठ्ठ्यानं असं काही केलं की आता कंपनीला बसणार मोठा दंड!
14
फरीदाबाद मॉड्यूलचा खरा मास्टरमाईंड आला समोर; डॉक्टरांना कट्टरपंथी बनवणारा मौलवी इरफान अहमद कोण?
15
Travel : भारताशी कनेक्शन, 'या' देशात जाताच करोडपती व्हाल! परदेशवारीचा प्लॅन करताय तर नक्की विचार करा
16
ती चूक यामाहा नाही करणार...! पहिली वहिली इलेक्ट्रीक स्कूटर आली!  Aerox लूक; इतकी रेंज देणार की...
17
Delhi Red Fort Blast : जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्याचे कॉल डिटेल्स उघड; दिल्ली स्फोटाचं रहस्य उलगडलं, उमरने ‘तारिक’ नावाने घेतलं सिम कार्ड
18
Yamaha ची नव्या जमान्याची RX100...! स्टायलिश बाईक लाँच; किंमत फक्त ₹ १.** लाख!
19
IND vs SA : ईडन गार्डन्सच्या खेळपट्टीवर गंभीर नाराज; गांगुलीनं असं दिलं उत्तर
20
संत्र्याच्या साली कचरा समजून फेकून देता, थोडं थांबा... त्वचेसह घरालाही होईल मोठा फायदा

‘एनडीसीसी’ बँकेचे नुकसान भरून निघेल का?

By admin | Updated: May 8, 2017 02:15 IST

मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने गेल्या गुरुवारी शासनाची खरडपट्टी काढल्यामुळे नागपूर जिल्हा

विश्वासघात : सुनील केदार यांच्या अडचणी वाढणार लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने गेल्या गुरुवारी शासनाची खरडपट्टी काढल्यामुळे नागपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतील १५ वर्षे जुने १२४.६० कोटी रुपयांच्या सरकारी रोखे खरेदी-विक्री घोटाळ्याचे प्रकरण तडीस जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. ही घडामोड घोटाळ्याच्या इतिहासाला उजाळा देणारी ठरली आहे. या घोटाळ्यामध्ये बँकेचे तत्कालीन अध्यक्ष व सावनेरचे विद्यमान आमदार सुनील केदार मुख्य आरोपी आहेत. घोटाळ्याचा उगम त्यांच्याच डोक्यातून झाल्याचे पुरावे आढळून आले आहेत. त्यामुळे केदार यांच्या अडचणी पुन्हा वाढणार आहेत. त्या काळात आघाडीवर असलेल्या नागपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची जोमाने प्रगती करण्याच्या उद्देशाने सुनील केदार यांच्याकडे विश्वासाने अध्यक्षपदाची सूत्रे सोपविण्यात आली होती. परंतु, केदार यांनी बँकेच्या विकासालाच खीळ बसवली. ४ नोव्हेंबर १९११ पासून कार्यरत असलेल्या ही बँक १२४.६० कोटी रुपयांच्या सरकारी रोखे खरेदी-विक्री घोटाळ्यामुळे अचानक आर्थिक डबघाईस आली. २००१-२००२ मध्ये बँकेने होम ट्रेड लिमिटेड मुंबई, इंद्रमणी मर्चंट्स प्रा. लि. कोलकाता, सेंच्युरी डीलर्स प्रा. लि. कोलकाता, सिंडिकेट मॅनेजमेंट सर्व्हिसेस अहमदाबाद व गिल्टेज मॅनेजमेंट सर्व्हिसेस मुंबई या कंपन्यांच्या माध्यमातून १२४.६० कोटी रुपयांचे सरकारी रोखे खरेदी केले होते. त्यानंतर कंपन्यांनी सरकारी रोखे दिले नाही व रक्कमही परत केली नाही. याप्रकरणात २५ एप्रिल २००२ रोजी सुनील केदार यांनी गणेशपेठ पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली होती. त्यावरून कंपन्यांविरुद्ध भादंविच्या कलम ४०६, ४२०, ३४ अन्वये गुन्हे नोंदविण्यात आले होते. दरम्यान, याप्रकरणाला कलाटणी मिळाली. विशेष लेखापरीक्षक विश्वनाथ असवार यांनी बँकेचे लेखापरीक्षण केले असता त्यात या घोटाळ्यामध्ये केदारही सामील असल्याचे पुढे आले. परिणामी असवार यांनी २९ एप्रिल २००२ रोजी गणेशपेठ पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यावरून गणेशपेठ पोलिसांनी केदारसह अन्य आरोपींविरुद्ध भादंविच्या कलम ४०६, ४०९, ४६८, ४७१, १२०-ब, ३४ अन्वये गुन्हा नोंदविला होता. अद्याप शेवटाला गेले नाही प्रकरण त्या काळात हे प्रकरण चांगलेच पेटले. ठिकठिकाणी आंदोलने झालीत. प्रकरणाचा सखोल तपास करून आरोपींना कठोर शिक्षा करण्याची मागणी करण्यात आली. परिणामी शासनाने प्रकरणाची चौकशी सीआयडीकडे सोपविली होती. सीआयडीने प्रकरणाचा तपास करून प्रथम श्रेणी न्याय दंडाधिकारी न्यायालयात आरोपींविरुद्ध दोषारोपपत्र दाखल केले आहे. हा खटला अद्याप प्रलंबित आहे. तसेच, महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियमांतर्गत करावयाची चौकशीही विविध कारणांनी रखडली आहे. त्यामुळे १५ वर्षे जुने हे प्रकरण अद्याप शेवटाला गेले नसून बँकेचे नुकसान कधी भरून निघेल व आरोपींना कधी शिक्षा होईल, असा प्रश्न विचारला जात आहे.