शहरं
Join us  
Trending Stories
1
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
2
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
3
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
4
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
5
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
6
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
7
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
8
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
9
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
10
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
11
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
12
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
13
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान
14
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
15
अशोक चव्हाणांसारखा ‘वनवास’ सर्वांना मिळो हीच कार्यकर्त्याची भावना; काँग्रेसचा खोचक टोला
16
"आम्हीही खूप काही बोलू शकतो, मी जर तिथे असतो तर..."; हस्तांदोलन प्रकरणावर शोएब अख्तर बरळला
17
अणुबॉम्बसारखा स्फोट! भर समुद्रात ज्वालामुखी उद्रेक; जीव वाचवण्यासाठी पर्यटकांची धावाधाव...
18
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
हैदराबाद गॅजेट टिकवणे सरकारची जबाबदारी, अन्यथा सरकारला सुट्टी नाही; मनोज जरांगेंचा इशारा
20
बिंग फुटले, आता चौकशी करतायत...! युक्रेनने भारताकडून आयात करत असलेले डिझेल रोखले 

‘एनडीसीसी’ बँकेचे नुकसान भरून निघेल का?

By admin | Updated: May 8, 2017 02:15 IST

मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने गेल्या गुरुवारी शासनाची खरडपट्टी काढल्यामुळे नागपूर जिल्हा

विश्वासघात : सुनील केदार यांच्या अडचणी वाढणार लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने गेल्या गुरुवारी शासनाची खरडपट्टी काढल्यामुळे नागपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतील १५ वर्षे जुने १२४.६० कोटी रुपयांच्या सरकारी रोखे खरेदी-विक्री घोटाळ्याचे प्रकरण तडीस जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. ही घडामोड घोटाळ्याच्या इतिहासाला उजाळा देणारी ठरली आहे. या घोटाळ्यामध्ये बँकेचे तत्कालीन अध्यक्ष व सावनेरचे विद्यमान आमदार सुनील केदार मुख्य आरोपी आहेत. घोटाळ्याचा उगम त्यांच्याच डोक्यातून झाल्याचे पुरावे आढळून आले आहेत. त्यामुळे केदार यांच्या अडचणी पुन्हा वाढणार आहेत. त्या काळात आघाडीवर असलेल्या नागपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची जोमाने प्रगती करण्याच्या उद्देशाने सुनील केदार यांच्याकडे विश्वासाने अध्यक्षपदाची सूत्रे सोपविण्यात आली होती. परंतु, केदार यांनी बँकेच्या विकासालाच खीळ बसवली. ४ नोव्हेंबर १९११ पासून कार्यरत असलेल्या ही बँक १२४.६० कोटी रुपयांच्या सरकारी रोखे खरेदी-विक्री घोटाळ्यामुळे अचानक आर्थिक डबघाईस आली. २००१-२००२ मध्ये बँकेने होम ट्रेड लिमिटेड मुंबई, इंद्रमणी मर्चंट्स प्रा. लि. कोलकाता, सेंच्युरी डीलर्स प्रा. लि. कोलकाता, सिंडिकेट मॅनेजमेंट सर्व्हिसेस अहमदाबाद व गिल्टेज मॅनेजमेंट सर्व्हिसेस मुंबई या कंपन्यांच्या माध्यमातून १२४.६० कोटी रुपयांचे सरकारी रोखे खरेदी केले होते. त्यानंतर कंपन्यांनी सरकारी रोखे दिले नाही व रक्कमही परत केली नाही. याप्रकरणात २५ एप्रिल २००२ रोजी सुनील केदार यांनी गणेशपेठ पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली होती. त्यावरून कंपन्यांविरुद्ध भादंविच्या कलम ४०६, ४२०, ३४ अन्वये गुन्हे नोंदविण्यात आले होते. दरम्यान, याप्रकरणाला कलाटणी मिळाली. विशेष लेखापरीक्षक विश्वनाथ असवार यांनी बँकेचे लेखापरीक्षण केले असता त्यात या घोटाळ्यामध्ये केदारही सामील असल्याचे पुढे आले. परिणामी असवार यांनी २९ एप्रिल २००२ रोजी गणेशपेठ पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यावरून गणेशपेठ पोलिसांनी केदारसह अन्य आरोपींविरुद्ध भादंविच्या कलम ४०६, ४०९, ४६८, ४७१, १२०-ब, ३४ अन्वये गुन्हा नोंदविला होता. अद्याप शेवटाला गेले नाही प्रकरण त्या काळात हे प्रकरण चांगलेच पेटले. ठिकठिकाणी आंदोलने झालीत. प्रकरणाचा सखोल तपास करून आरोपींना कठोर शिक्षा करण्याची मागणी करण्यात आली. परिणामी शासनाने प्रकरणाची चौकशी सीआयडीकडे सोपविली होती. सीआयडीने प्रकरणाचा तपास करून प्रथम श्रेणी न्याय दंडाधिकारी न्यायालयात आरोपींविरुद्ध दोषारोपपत्र दाखल केले आहे. हा खटला अद्याप प्रलंबित आहे. तसेच, महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियमांतर्गत करावयाची चौकशीही विविध कारणांनी रखडली आहे. त्यामुळे १५ वर्षे जुने हे प्रकरण अद्याप शेवटाला गेले नसून बँकेचे नुकसान कधी भरून निघेल व आरोपींना कधी शिक्षा होईल, असा प्रश्न विचारला जात आहे.