शहरं
Join us  
Trending Stories
1
आणखी एका हेराला अटक! वाराणसीच्या तुफैलने पाकिस्तानमध्ये भारतातील कोणत्या ठिकाणांची माहिती पाठवली?
2
हगवणे कुटुंबीय हे माझे दूरचे नातेवाईक, वैष्णवीचे मामासासरे IG सुपेकरांनी मांडली बाजू
3
Kishtwar Encounter: जम्मू- काश्मीरमध्ये दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत महाराष्ट्राच्या सुपुत्राला वीरमरण!
4
Vaishnavi Hagawane: 'पोलीस महानिरीक्षक जालिंदर सुपेकर शशांकचे मामा, त्यांची चौकशी झाली पाहिजे' अंजली दमानियांचे गंभीर आरोप
5
'पाकिस्तानला दहशतवादाला पाठिंबा देणे थांबवण्यास सांगा', भारताने तुर्कीला सुनावले
6
मयंतीला फॉलो करणाऱ्या रॉबिन उथप्पाची Live शोमध्ये गंमत; दोघांना बघून गावसकरांना पडला हा प्रश्न
7
'फक्त कॅमेऱ्यासमोरच तुमचं रक्त उसळतं' राहुल गांधींचा मोदींवर हल्लाबोल, विचारले ३ प्रश्न!
8
Vaishnavi Hagawane Death Case : ..हा तर मुलींचा छळ करणारा ‘मुळशी पॅटर्न’;तृप्ती देसाई यांच्याकडून संताप  
9
पार्किंगची सोय नसेल तर खरेदी करता येणार नाही कार, सरकार कठोर नियम लागू करण्याच्या तयारीत
10
एक भारतीय कंपनी पाकिस्तानच्या अर्थव्यवस्थेपेक्षा मोठी! हर्ष गोयंकांनी आकडेवारी मांडली
11
"...तर त्यांचे राजकारणात कसे तुकडे करायचे हे आपण ठरवू"; उद्धव ठाकरे कामगारांसमोर काय बोलले?
12
Vaishnavi Hagawane Death Case: 'जणू वैष्णवीच आमच्याकडे परतली'; बाळाला पाहताच कस्पटे कुटुंबियांच्या अश्रूंचा बांध फुटला
13
'पहलगाम हल्ल्याचे मुख्य आरोपी अजूनही मोकाट...', जयराम रमेश यांचे पंतप्रधान मोदींना 4 प्रश्न
14
"सुप्रिया सुळेंची केंद्रात मंत्री होण्याची तीव्र इच्छा, शरद पवार दुसऱ्या पक्षात जाताना दिसतील"; संजय शिरसाटांचं मोठं भाकित
15
Investment Tips by Robert Kiyosaki : 'महामंदी' येणार? 'रिच डॅड पुअर डॅड'च्या लेखकाचा इशारा! म्हणाले फक्त 'या' गोष्टीच तुमची संपत्ती वाचवतील
16
Jyoti Malhotra : "माझ्याकडे पैसे नाहीत..."; ज्योती मल्होत्राच्या वडिलांनी सरकारकडे केली 'ही' मोठी मागणी
17
लष्कर जंग जंग पछाडतंय, पण महिना झाला तरी पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी का सापडत नाही आहेत? ही आहेत कारणं
18
INDvENG: वासिम जाफरने इंग्लंडच्या कसोटी दौऱ्यासाठी निवडला भारताचा संघ; कर्णधार कुणाला केलं पाहिलंत का?
19
हा विकृतपणा अन् नीचपणाचा कळस,अशा प्रवृत्ती ठेचल्याच पाहिजेत;उदय सामंत यांची संतप्त भावना
20
Government Jobs: सरकारी नोकरी आणि पगार जवळपास २ लाख रुपये; एमपीएससीकडून भरतीची घोषणा!

वन विभाग ७५ हजार रुपयाचे नुकसान देणार काय?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2021 04:11 IST

लाेकमत न्यूज नेटवर्क सावरगाव : रानडुकरांनी नरखेड तालुक्यातील उमरी (सिंदी) शिवारातील अडीच एकरातील मक्याचे पीक पूर्णपणे उद्ध्वस्त केल्याने शेतकऱ्याचे ...

लाेकमत न्यूज नेटवर्क

सावरगाव : रानडुकरांनी नरखेड तालुक्यातील उमरी (सिंदी) शिवारातील अडीच एकरातील मक्याचे पीक पूर्णपणे उद्ध्वस्त केल्याने शेतकऱ्याचे बाजारभावाप्रमाणे तब्बल ७५ हजार रुपयाचे नुकसान झाले आहे. ही नुकसानभरपाई वन्यप्राण्यांकडे काडीचेही लक्ष न देणारा वन विभाग देईल काय, असा प्रश्न नुकसानग्रस्तासह तालुक्यातील शेतकऱ्यांनी केला आहे.

रूपराव दर्याजी राऊत, रा. उमरी (सिंदी) (ता. नरखेड) यांची उमरी (सिंदी) शिवारात १० एकर शेती आहे. त्यांनी यावर्षी अडीच एकरात मक्याची पेरणी केली हाेती. मक्याची पेरणी कृषी अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनात मान्सूनपूर्व केली. पिकाच्या ओलितासाठी ठिबक सिंचनाचीही साेय केली, अशी माहिती रूपराव राऊत यांनी दिली. मक्याचे पीक घेण्याचे त्यांचे यंदाचे दुसरे वर्ष हाेय.

मक्याचे पीक फलधारणेच्या काळात असताना रानडुकरांनी ते पूर्णपणे उद्ध्वस्त केले. या शेतात एकरी १५ क्विंटलप्रमाणे किमान ३५ क्विंटल मक्याचे उत्पादन झाले असते. मक्याला सध्या दाेन हजार रुपये प्रति क्विंटल भाव असून, यात आपले ७५ हजार रुपयाचे नुकसान झाले, अशी माहिती रूपराव राऊत यांनी दिली. वन्यप्राण्यांचा बंदाेबस्त न करणाऱ्या वन विभागाने ही नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणीही रूपराव राऊत यांच्यासह अन्य शेतकऱ्यांनी केली आहे.

...

वन्यप्राण्यांचा शेताकडे माेर्चा

नरखेड तालुक्यात जंगल क्षेत्र कमी असून, त्या जंगलांमध्ये अलीकडच्या काळात रानडुक्कर, राेही, ससे व इतर तृणभक्षी वन्यप्राण्यांची संख्या झपाट्याने वाढत आहे. जंगलात पुरेसे खाद्य मिळत नसल्याने वन्यप्राण्यांनी त्यांचा माेर्चा शेताकडे वळविला आहे. ते पिकांचे अताेनात नुकसान करीत असून, वन विभाग त्यांचा कायम बंंदाेबस्त करायला तयार नाही.

...

नुकसान भरपाई बाजारभावाप्रमाणे मिळावी

वन्यप्राण्यांनी केलेल्या नुकसानीचा वन विभागाच्या कर्मचाऱ्यांकडून वेळीच पंचनामा केला जात नाही. पंचनामा केल्यानंतर विविध शासकीय निकष लावून सात-आठ महिन्यांनी तुटपुंजी नुकसान भरपाई शेतकऱ्यांच्या हातावर ठेवली जाते. शिकार केल्यास शेतकऱ्यांवर वन कायद्यान्वये गुन्हे दाखल केले जातात. त्यामुळे शासनाने या प्राण्यांचा कायम बंदाेबस्त करावा किंवा नुकसानग्रस्तांना बाजारभावाप्रमाणे विना विलंब नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणीही शेतकऱ्यांनी केली आहे.