शहरं
Join us  
Trending Stories
1
विंडिजची 'मसल पॉवर' संपली! रसेलची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून अचानक निवृत्ती, 'या' दिवशी शेवटची मॅच
2
व्वा रं पठ्ठ्या !! मगरीनं अचानक येऊन त्याचं डोकं जबड्यात धरलं, पण धाडसाने वाचवले स्वत:चे प्राण
3
विठुरायाच्या कृपेने अवचितराव पुन्हा स्वगृही! घर सोडून गेले अन् तब्बल २० वर्षांनी परतले मुळगावी...
4
पत्नीला पोटगी देण्यासाठी बेरोजगार बनला ‘चेनस्नॅचर’; नागपुरच्या पाच जबरी चोरीच्या गुन्ह्यांची उकल
5
धक्कादायक! नागपूर मध्यवर्ती कारागृहात अंडरविअरच्या इलॅस्टिकने कैद्याने घेतली फाशी
6
२५ लाखांची टेस्ला ६० लाखांना घ्यावी लागतेय, जबाबदार कोण? आदित्य ठाकरेंचा सवाल; म्हणाले, "अडचणी आणल्या नसत्या तर..."
7
VIDEO: घाबरलेली अँकर Live शो सोडून पळाली... स्फोटांनी हादरलं सिरिया; हल्ल्याने उडाली दाणादाण
8
खापरी–गुमगावदरम्यान ऑटोमॅटिक ब्लॉक सिग्नलिंग सिस्टम; मध्य रेल्वेकडून तंत्रज्ञानाची कास
9
कौतुकास्पद! उद्योगांच्या मदतीने राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ शिकवणार कार्पोरेट प्रशासन
10
'महाराष्ट्र मेरीटाईम समिट २०२५' मुळे राज्याच्या सागरी क्षेत्राला बळकटी मिळेल- नितेश राणे
11
विशेष मुलांचे प्रश्न सोडवण्यासाठी शासन सहकार्य करणार; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची ग्वाही
12
"सोबतचे जड झाले असतील म्हणून..."; CM फडणवीसांनी दिलेल्या ऑफरवर ठाकरेंचे प्रत्युत्तर
13
₹96 च्या IPO वर गुंतवणूकदारांच्या उड्या, 142 पट सब्सक्राइब झाला; GMP ला 43 रुपयांचा फायदा!
14
भयानक!! इस्रायलचा सीरियाच्या संरक्षण मंत्रालयावर मोठा हल्ला; संपूर्ण इमारतीच्या चिंधड्या, पाहा VIDEO
15
₹ 350 वरून थेट ₹19 वर आला हा शेअर, आता लागतंय 10% चं अप्पर सर्किट; करतोय मालामाल
16
“CM फडणवीस रामासारखे चारित्र्यवान, कृष्णासारखे चतूर”; भाजपा आमदारांकडून कौतुकाचा वर्षाव
17
नीलम गोऱ्हेंचा आग्रह अन् ठाकरेंचा नकार; उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे एकाच फ्रेममध्ये, फक्त खुर्चीचे होतं अंतर
18
CM देवेंद्र फडणवीसांच्या ऑफरवर उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले...
19
“वयाच्या १० वर्षापासून RSSशी संबंध, मी पुन्हा येईन, पण कुठून येईन ते विचारू नका”: दानवे
20
Budget Cars: कुटुंबासाठी कमी बजेटमध्ये ७-सीटर कार शोधताय? 'हे' आहेत बेस्ट ऑप्शन! 

वन विभाग ७५ हजार रुपयाचे नुकसान देणार काय?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2021 04:11 IST

लाेकमत न्यूज नेटवर्क सावरगाव : रानडुकरांनी नरखेड तालुक्यातील उमरी (सिंदी) शिवारातील अडीच एकरातील मक्याचे पीक पूर्णपणे उद्ध्वस्त केल्याने शेतकऱ्याचे ...

लाेकमत न्यूज नेटवर्क

सावरगाव : रानडुकरांनी नरखेड तालुक्यातील उमरी (सिंदी) शिवारातील अडीच एकरातील मक्याचे पीक पूर्णपणे उद्ध्वस्त केल्याने शेतकऱ्याचे बाजारभावाप्रमाणे तब्बल ७५ हजार रुपयाचे नुकसान झाले आहे. ही नुकसानभरपाई वन्यप्राण्यांकडे काडीचेही लक्ष न देणारा वन विभाग देईल काय, असा प्रश्न नुकसानग्रस्तासह तालुक्यातील शेतकऱ्यांनी केला आहे.

रूपराव दर्याजी राऊत, रा. उमरी (सिंदी) (ता. नरखेड) यांची उमरी (सिंदी) शिवारात १० एकर शेती आहे. त्यांनी यावर्षी अडीच एकरात मक्याची पेरणी केली हाेती. मक्याची पेरणी कृषी अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनात मान्सूनपूर्व केली. पिकाच्या ओलितासाठी ठिबक सिंचनाचीही साेय केली, अशी माहिती रूपराव राऊत यांनी दिली. मक्याचे पीक घेण्याचे त्यांचे यंदाचे दुसरे वर्ष हाेय.

मक्याचे पीक फलधारणेच्या काळात असताना रानडुकरांनी ते पूर्णपणे उद्ध्वस्त केले. या शेतात एकरी १५ क्विंटलप्रमाणे किमान ३५ क्विंटल मक्याचे उत्पादन झाले असते. मक्याला सध्या दाेन हजार रुपये प्रति क्विंटल भाव असून, यात आपले ७५ हजार रुपयाचे नुकसान झाले, अशी माहिती रूपराव राऊत यांनी दिली. वन्यप्राण्यांचा बंदाेबस्त न करणाऱ्या वन विभागाने ही नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणीही रूपराव राऊत यांच्यासह अन्य शेतकऱ्यांनी केली आहे.

...

वन्यप्राण्यांचा शेताकडे माेर्चा

नरखेड तालुक्यात जंगल क्षेत्र कमी असून, त्या जंगलांमध्ये अलीकडच्या काळात रानडुक्कर, राेही, ससे व इतर तृणभक्षी वन्यप्राण्यांची संख्या झपाट्याने वाढत आहे. जंगलात पुरेसे खाद्य मिळत नसल्याने वन्यप्राण्यांनी त्यांचा माेर्चा शेताकडे वळविला आहे. ते पिकांचे अताेनात नुकसान करीत असून, वन विभाग त्यांचा कायम बंंदाेबस्त करायला तयार नाही.

...

नुकसान भरपाई बाजारभावाप्रमाणे मिळावी

वन्यप्राण्यांनी केलेल्या नुकसानीचा वन विभागाच्या कर्मचाऱ्यांकडून वेळीच पंचनामा केला जात नाही. पंचनामा केल्यानंतर विविध शासकीय निकष लावून सात-आठ महिन्यांनी तुटपुंजी नुकसान भरपाई शेतकऱ्यांच्या हातावर ठेवली जाते. शिकार केल्यास शेतकऱ्यांवर वन कायद्यान्वये गुन्हे दाखल केले जातात. त्यामुळे शासनाने या प्राण्यांचा कायम बंदाेबस्त करावा किंवा नुकसानग्रस्तांना बाजारभावाप्रमाणे विना विलंब नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणीही शेतकऱ्यांनी केली आहे.