शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
2
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
3
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
4
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
5
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
6
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
7
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
8
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
9
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
10
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
11
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
12
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
13
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
14
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
15
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
16
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
17
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
18
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
19
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
20
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

प्रशासन संसर्ग थांबण्याची हमी देणार का?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2021 04:11 IST

नागपूर : काेराेना महामारीने शहरवासीयांच्या नाकीनऊ आणले आहे. संसर्ग उच्च टप्प्यावर पाेहचल्यानंतर गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यात प्रभाव ओसरला हाेता. ...

नागपूर : काेराेना महामारीने शहरवासीयांच्या नाकीनऊ आणले आहे. संसर्ग उच्च टप्प्यावर पाेहचल्यानंतर गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यात प्रभाव ओसरला हाेता. मात्र यावर्षी फेब्रुवारी महिन्यापासून पुन्हा संक्रमणाचा वेग वाढला आहे. त्यामुळे शासन व प्रशासनाने शनिवार व रविवारी टाळेबंदी करण्याचा निर्णय घेतला व व्यापारी वर्गाने त्याचे पालनही केले. मात्र आता स्थिती नियंत्रणाबाहेर जाताना पाहून पालकमंत्री नितीन राऊत यांनी १५ ते २१ मार्चपर्यंत टाळेबंदी लावण्याची घाेषणा केली. याअंतर्गत दुकान, माॅल्स, रेस्टाॅरंट, हाॅटेल, साप्ताहिक बाजार आदी बंद राहणार आहेत. या निर्णयावर व्यापारी संघटनांनी प्रतिक्रिया देताना यामुळे लहान व्यापाऱ्यांना फटका बसणार असल्याचे मत व्यक्त केले. आधीपासूनच आर्थिक अडचणीत सापडलेल्या व्यापाऱ्यांना हाल सहन करावे लागणार आहेत. तरीही पर्याय नसल्याने त्यांना दुकाने बंद ठेवावी लागणार आहेत. मात्र यामुळे काेराेनाचा संसर्ग थांबणार का, असा सवाल व्यापारी संघटनांच्या नेत्यांनी केला आहे. टाळेबंदीच्या काळात जी दुकाने बंद राहणार आहेत, त्यांना माेबदला, सरकारी पॅकेज, इंटरेस्ट सबसिडी किंवा इतर काही दिलासा सरकारकडून मिळेल का, असा सवालही त्यांनी केला आहे.

व्यापाऱ्यांमध्ये नाराजी

नागविदर्भ चेंबर ऑफ काॅमर्सचे अध्यक्ष अश्विन मेहाडिया यांनी, पुन्हा लाॅकडाऊन करण्याच्या घाेषणेने व्यापाऱ्यांमध्ये नाराजी असल्याची भावना व्यक्त केली. मात्र नाईलाजास्तव व्यापाऱ्यांना शासनाच्या आदेशाचे पालन करावे लागेल. गेल्या वर्षी काेराेना महामारीमुळे त्यांना आर्थिक फटका बसला हाेता. आता हाेळीच्या काळातील व्यापारही ठप्प हाेणार. प्रशासनाने व्यापारी संघटनांना विश्वासात घ्यायला हवे हाेते. टाळेबंदीच्या काळात व्यापाऱ्यांना दिलासा पॅकेज मिळण्याबाबत शुक्रवारी तातडीची बैठक बाेलावण्यात आल्याचे मेहाडिया यांनी सांगितले.

लॉकडाऊन काेराेनावर उपचार नाही

नागपूर चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष विष्णुकुमार पचेरीवाला म्हणाले, वैद्यकीय सुविधांची व्यवस्था करण्यासाठी गेल्या वर्षी मार्च, एप्रिलमध्ये टाळेबंदी करण्यात आली हाेती. ही सुविधा मिळायला लागल्याने अनलाॅकची प्रक्रिया सुरू करण्यात आली. आता काेराेनावर लसही उपलब्ध झाली आहे. त्यामुळे आता टाळेबंदी करण्याचे औचित्य काय, असा सवाल त्यांनी केला. या निर्णयामुळे लहान व्यापारी व हातावर पाेट असलेल्या कामगारांना फटका बसेल. तरीही नाईलाजास्तव त्यांना दुकाने बंद ठेवावी लागतील. चेंबरने महापाैरांना टाळेबंदीचा निर्णय परत घेण्याची मागणी केली, पण त्यांनीही असमर्थता दाखविली.