शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठीशी तडजोड चालणार नाही! राजकीय लेबलं लावू नका, याकडे संकट म्हणून पाहा; राज ठाकरेंनी ठणकावलं
2
जय मराठी! ५ जुलैला विजयी मेळावा होईल, पण तो कोणत्याही पक्षाचा नसेल; राज ठाकरेंनी स्पष्टच सांगितलं
3
भारतात राहण्यासाठी काहीही! ५ बांगलादेशी पुरुषांनी निवडला 'विचित्र' मार्ग, कसे सापडले पोलिसांच्या तावडीत?
4
घसरणीनंतर पुन्हा वाढले सोन्याचे दर... खरेदीची संधी गेली का? २४ कॅरेटचा आजचा भाव काय?
5
हिंदी सक्ती : "समिती कोणतीही असू दे, आता सक्ती विषय..."; उद्धव ठाकरेंचा महायुती सरकारला इशारा 
6
ऐकावे ते नवलंच! एकटा दरोडेखोरांशी भिडला; कंबरेत गोळी घुसली, २ km पर्यंत कळालेही नाही...
7
रस्ते, मेट्रो, सिंचन, कुंभमेळा...सरकारने सादर केल्या 57 हजार 509 कोटींच्या पुरवणी मागण्या
8
'ChatGPT' ला हे प्रश्न विचारू नका, नाहीतर तुम्ही मोठ्या अडचणीत सापडू शकता
9
प्रेमात मिळाला धोका तेव्हा खासगी आयुष्यातील 'तो' व्हिडिओ केला लीक; क्रिकेटर अडकला होता वादात
10
अदानी ग्रीन एनर्जीचा ऐतिहासिक विक्रम! अक्षय ऊर्जा क्षेत्रात असं काम करणारी पहिलीच भारतीय कंपनी
11
सौरभ गोखले आणि अनुजा साठेला नकोय मूल, अभिनेत्री म्हणाली- "आम्हाला प्राणी जास्त आवडतात..."
12
मर्यादेपेक्षाही अधिक महाग होणार चांदी; रॉबर्ड कियोसाकी यांच्या दाव्यात किती तथ्य?
13
"मराठी बोला तुम्ही मराठी बोला...", मुंबईच्या लोकलमध्ये तरुणाईचा गजर, व्हिडिओ होतोय तुफान व्हायरल!
14
श्वेता तिवारीला एक्स पतीने कारमध्ये एका व्यक्तीसोबत पकडलं होतं रंगेहाथ, राजा चौधरीचा खुलासा
15
"ठाकरे बंधूंच्या ताकदीपुढे सरकारनं माघार घेतली; ही विजयाची पहिली पायरी, यापुढे..."
16
येत्या ७ जुलैला सार्वजनिक सुट्टी मिळणार? सोमवारी जाहीर झाली तर काय काय बंद असणार...
17
शुबमन गिलचा एक मेसेज अन् तो सासरवाडीतून थेट टीम इंडियाच्या ताफ्यात (VIDEO)
18
तेलंगणात रसायनांनी भरलेल्या टँकरचा स्फोट, किमान १० कामगारांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
19
Wimbledon 2025 : नोव्हाक जोकोविच विक्रमी २५ वे ग्रँडस्लॅम जिंकण्याचा डाव साधणार का?
20
दरोडा, खून...महाराष्ट्रासह चार राज्यांमध्ये १६ गंभीर गुन्हे; कुख्यात गुंडाचा उत्तर प्रदेशात एन्काउंटर

प्रशासन संसर्ग थांबण्याची हमी देणार का?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2021 04:11 IST

नागपूर : काेराेना महामारीने शहरवासीयांच्या नाकीनऊ आणले आहे. संसर्ग उच्च टप्प्यावर पाेहचल्यानंतर गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यात प्रभाव ओसरला हाेता. ...

नागपूर : काेराेना महामारीने शहरवासीयांच्या नाकीनऊ आणले आहे. संसर्ग उच्च टप्प्यावर पाेहचल्यानंतर गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यात प्रभाव ओसरला हाेता. मात्र यावर्षी फेब्रुवारी महिन्यापासून पुन्हा संक्रमणाचा वेग वाढला आहे. त्यामुळे शासन व प्रशासनाने शनिवार व रविवारी टाळेबंदी करण्याचा निर्णय घेतला व व्यापारी वर्गाने त्याचे पालनही केले. मात्र आता स्थिती नियंत्रणाबाहेर जाताना पाहून पालकमंत्री नितीन राऊत यांनी १५ ते २१ मार्चपर्यंत टाळेबंदी लावण्याची घाेषणा केली. याअंतर्गत दुकान, माॅल्स, रेस्टाॅरंट, हाॅटेल, साप्ताहिक बाजार आदी बंद राहणार आहेत. या निर्णयावर व्यापारी संघटनांनी प्रतिक्रिया देताना यामुळे लहान व्यापाऱ्यांना फटका बसणार असल्याचे मत व्यक्त केले. आधीपासूनच आर्थिक अडचणीत सापडलेल्या व्यापाऱ्यांना हाल सहन करावे लागणार आहेत. तरीही पर्याय नसल्याने त्यांना दुकाने बंद ठेवावी लागणार आहेत. मात्र यामुळे काेराेनाचा संसर्ग थांबणार का, असा सवाल व्यापारी संघटनांच्या नेत्यांनी केला आहे. टाळेबंदीच्या काळात जी दुकाने बंद राहणार आहेत, त्यांना माेबदला, सरकारी पॅकेज, इंटरेस्ट सबसिडी किंवा इतर काही दिलासा सरकारकडून मिळेल का, असा सवालही त्यांनी केला आहे.

व्यापाऱ्यांमध्ये नाराजी

नागविदर्भ चेंबर ऑफ काॅमर्सचे अध्यक्ष अश्विन मेहाडिया यांनी, पुन्हा लाॅकडाऊन करण्याच्या घाेषणेने व्यापाऱ्यांमध्ये नाराजी असल्याची भावना व्यक्त केली. मात्र नाईलाजास्तव व्यापाऱ्यांना शासनाच्या आदेशाचे पालन करावे लागेल. गेल्या वर्षी काेराेना महामारीमुळे त्यांना आर्थिक फटका बसला हाेता. आता हाेळीच्या काळातील व्यापारही ठप्प हाेणार. प्रशासनाने व्यापारी संघटनांना विश्वासात घ्यायला हवे हाेते. टाळेबंदीच्या काळात व्यापाऱ्यांना दिलासा पॅकेज मिळण्याबाबत शुक्रवारी तातडीची बैठक बाेलावण्यात आल्याचे मेहाडिया यांनी सांगितले.

लॉकडाऊन काेराेनावर उपचार नाही

नागपूर चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष विष्णुकुमार पचेरीवाला म्हणाले, वैद्यकीय सुविधांची व्यवस्था करण्यासाठी गेल्या वर्षी मार्च, एप्रिलमध्ये टाळेबंदी करण्यात आली हाेती. ही सुविधा मिळायला लागल्याने अनलाॅकची प्रक्रिया सुरू करण्यात आली. आता काेराेनावर लसही उपलब्ध झाली आहे. त्यामुळे आता टाळेबंदी करण्याचे औचित्य काय, असा सवाल त्यांनी केला. या निर्णयामुळे लहान व्यापारी व हातावर पाेट असलेल्या कामगारांना फटका बसेल. तरीही नाईलाजास्तव त्यांना दुकाने बंद ठेवावी लागतील. चेंबरने महापाैरांना टाळेबंदीचा निर्णय परत घेण्याची मागणी केली, पण त्यांनीही असमर्थता दाखविली.