शहरं
Join us  
Trending Stories
1
९ जुलैला भारत बंद, २५ कोटी कामगार संपावर; शाळा, कॉलेज, बँका आणि बाजारासह काय-काय बंद राहणार? जाणून घ्या
2
तिरुपतीला गेलेल्या अहिल्यानगरच्या तिघांचा दुर्वैवी मृत्यू; कार उलटल्याने झाला भीषण अपघात
3
'भारतासह ब्रिक्स देशांना द्यावा लागणार अतिरिक्त १० टक्के कर"; व्यापार करारापूर्वी ट्रम्प यांचे विधान
4
"एक स्पष्ट आदेश... पक्षातील कोणीही..."; मराठीचा मुद्दा गाजत असतानाच राज ठाकरेंची फेसबूक पोस्ट
5
"रेल्वे कर्मचाऱ्याला तमीळ येत नव्हतं, म्हणून दुर्घटना घडली", आता तामिळनाडू रेल्वे-व्हॅन अपघातातही भाषेची एन्ट्री!
6
२ कोटींच्या विम्यासाठी मित्राला गाडीत जिवंत जाळलं; नऊ महिने सुरु होती प्लॅनिंग, पत्नीचाही सहभाग
7
भारताचे INS महेंद्रगिरी शत्रूला पाणी पाजायला तयार! चीन-पाकिस्तानची झोप उडणार, काय आहे यात खास? जाणून थक्क व्हाल!
8
ठाकरे बंधूंची युती होईल का, किती टिकेल? स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वतींची मोठी भविष्यवाणी
9
मराठी शाळा बंद, ५००० शिक्षकाचं आंदोलन, मुख्यमंत्र्यांनी त्याकडे लक्ष द्यावं- सुप्रिया सुळे
10
“ज्येष्ठ कलाकार मनमोहन माहिमकर यांना बेघर होऊ देणार नाही”; DCM एकनाथ शिंदेंनी दिली ग्वाही
11
महाराष्ट्रातील सीईटी कक्षाकडून घेण्यात येणाऱ्या प्रवेश नोंदणीला मुदतवाढ; विद्यार्थी हितासाठी निर्णय!
12
टॉप 10 अब्जाधिशांच्या यादीतून बिल गेट्स बाहेर, संपत्तीत मोठी घसरण
13
कोट्यवधी लोकांना खूशखबर, पीएफच्या खात्यात जमा झाले व्याजाचे पैसे, असा तपासा बॅलन्स
14
१४ वर्षांच्या पोराचा आणखी एक पराक्रम! आता वैभव सूर्यंवशीनं मोडला शुबमन गिलचा विक्रम
15
११ तासांत काय घडलं? अविनाश जाधव यांनी सगळं सांगितलं; अटक, सुटका ते मोर्चाची Inside Story
16
येमेनमध्ये भारतीय नर्स निमिषा प्रियाला फाशीची शिक्षा; न्यायालयाने तारीख ठरवली
17
इतके पैसे कुठून आणता? निशिकांत दुबेंचा ठाकरे बंधूंवर निशाणा; मालमत्तांची यादीच शेअर केली
18
हिंदी भाषेची सक्ती कुणी केली? अजित पवार आणि एकनाथ शिंदेंचं नाव घेत सुप्रिया सुळे म्हणाल्या...
19
भारतीय क्रिकेटर स्मृती मन्धानाला इंग्लंडमध्ये मिळाला 'लाल गुलाब'; फोटो व्हायरल, रंगली चर्चा
20
गोपाल खेमका हत्याकांडात मोठा गौप्यस्फोट, एका व्यावसायिकानेच दिली होती सुपारी, समोर आलं असं कारण

व्यावसायिकांच्या हितासाठी रखडले जुन्या भंडारा रोडचे रुंदीकरण

By admin | Updated: March 13, 2015 02:39 IST

अतिक्रमणधारक रहिवासी व व्यावसायिकांच्या हितासाठी महानगरपालिका जुन्या भंडारा रोडच्या रुंदीकरणास टाळाटाळ करीत असल्याचा आरोप संबंधित याचिकाकर्त्यांनी केला आहे.

नागपूर : अतिक्रमणधारक रहिवासी व व्यावसायिकांच्या हितासाठी महानगरपालिका जुन्या भंडारा रोडच्या रुंदीकरणास टाळाटाळ करीत असल्याचा आरोप संबंधित याचिकाकर्त्यांनी केला आहे.मेयो रुग्णालय ते गांजाखेत चौक, गांजाखेत चौक ते शहीद चौक व शहीद चौक ते सुनील हॉटेल या जुन्या भंडारा रोडच्या रुंदीकरणासाठी मनपा स्थायी समितीचे माजी अध्यक्ष रवींद्र पैगवार व मध्य नागपूर विकास आघाडीचे अध्यक्ष भूषण दडवे यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात जनहित याचिका दाखल केली आहे. याप्रकरणात त्यांनी महापालिकेच्या उत्तरावर प्रत्युत्तर सादर करून प्रशासनाच्या भूमिकेवर संशय व्यक्त केला आहे. नगरविकास विभागाने ७ जानेवारी २००० रोजी मंजूर केलेल्या विकास आराखड्यानुसार जुना भंडारा रोड १८ मीटर रुंद आहे. या रोडवर ९ मीटरपर्यंत अतिक्रमण करण्यात आले आहे. १३ जानेवारी २०१० रोजी महाराष्ट्र नगर रचना कायद्याच्या कलम २६ अनुसार अतिक्रमणधारकांना नोटीस बजावण्यात आली होती. याविरुद्ध अतिक्रमणधारकांनी उच्च न्यायालयात तीन वेगवेगळ्या रिट याचिका दाखल केल्या होत्या. १९ नोव्हेंबर २०१० रोजी न्यायालयाने तिन्ही याचिका निकाली काढून मनपाला कारवाई करण्याचे आदेश दिले होते. परंतु, यानंतर काहीच झाले नाही. रोडचे रुंदीकरण केल्यास ४०० व्यक्तींना फटका बसेल. तसेच, निधीच्या कमतरतेमुळे रुंदीकरणाची योजना मागे ठेवण्यात आली, असे मनपातर्फे सांगण्यात आले आहे. परंतु, हा मुद्दा प्रतिज्ञापत्रात आलेला नाही. यावरून मनपा जनहिताच्या प्रश्नाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असल्याचे सिद्ध होते, असे याचिकाकर्त्यांनी नमूद केले आहे. इतवारीतील मारवाडी चौक ते गोळीबार चौकापर्यंतचा रोड कोणाचीही जमीन न घेता रुंद करण्यात आला आहे. केळीबाग रोडच्या रुंदीकरणासाठी मोजमाप झाले आहे. चंद्रशेखर मनपा आयुक्त असताना व्हेरायटी चौक ते मुंजे चौकापर्यंतचा रोड रात्रीत १८ मीटर रुंद करण्यात आला होता. ही कामे करताना एकाही जमीन मालकाला मोबदला देण्याची गरज भासली नाही. असे असताना जुना भंडारा रोडच्या रुंदीकरणासाठी टीडीआर किंवा अतिरिक्त एफएसआय देण्याची मनपाची भूमिका निरर्थक आहे. राज्यघटनेनुसार प्रशासनाने व्यापक जनहिताचा विचार करणे आवश्यक आहे. रस्ते रुंद झाल्यास वाहतूक सुरळीत होईल व वाहनचालकांना त्रास सहन करावा लागणार नाही, असे मत याचिकाकर्त्यांनी व्यक्त केले आहे. याचिकाकर्त्यांतर्फे अ‍ॅड. पी. के. मिश्रा यांनी बाजू मांडली. (प्रतिनिधी)