शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारमध्ये झालेले विक्रमी मतदान कोणाच्या बाजूने? एनडीए आणि महाआघाडीत रस्सीखेच, पहिल्या टप्प्यात ६१.७८% मतदान
2
'मेक इन लातूर'; 'वंदे भारत'चा स्लीपर कोच जूनपासून रुळांवर धावणार, देखभाल दुरुस्ती राजस्थानला होणार
3
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
4
वादग्रस्त पोस्ट मास्तर जनरल मधाळे निलंबित, अधिनस्थ अधिकाऱ्याचा छळ, चिमटे अन् गुदगुल्या भोवल्या
5
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
6
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी
7
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली
8
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
9
खुर्चीसाठी भांडल्या, व्हिडिओ वायरल आणि आता निलंबन ! पीएमजी शोभा मधाळे यांचे अनिश्चित काळासाठी निलंबन
10
धावत्या दुचाकीवर तरुणीची छेडछाड, 'त्या' रॅपिडो चालकाला बेड्या; व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांची कारवाई
11
नार्को टेस्ट होणार? धनंजय मुंडेंच्या आरोपानंतर मनोज जरांगे पाटील यांचा थेट पोलीस अधीक्षकांकडे अर्ज 
12
'या' राज्यात स्थानिक निवडणुकीत भाजपानं बिनविरोध ७५% जागा जिंकल्या; आज निकालातही 'क्लीन स्वीप'
13
आधी विष घेतलं पण वाचला, नंतर सागरने तलावात उडी घेत संपवले आयुष्य; असं काय घडलं? 
14
पाकिस्तानने अफगाणिस्तानातील निवासी भागाला लक्ष्य केले, सहा नागरिकांचा मृत्यू
15
अमेरिकन प्रेस सेक्रेटरीवर फिदा, 'या' देशाच्या पंतप्रधानांची मोठी ऑफर, डोनाल्ड ट्रम्पही हैराण
16
"ही आमच्यासमोरील डोकेदुखी आहे, पण..." ऑस्ट्रेलियात मैदान मारूनही असं का म्हणाला सूर्या?
17
Mumbai Local Mega Block: रविवारी तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक; कधी, कुठे आणि कितीवाजेपर्यंत गाड्या बंद? वाचा
18
"भैया क्या कर रहे हो...!"; बेंगलोरमध्ये Rapido कॅप्टनच्या महिलेसोबतच्या कृत्यावर कंपनीची रिअ‍ॅक्शन
19
बिहारमध्ये रस्त्यावर सापडल्या VVPAT स्लिप्स! निवडणूक आयोगाने ARO ला निलंबित केले, FIR दाखल करण्याचे आदेश दिले
20
Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना मुंबई पोलिसांचे समन्स; १० नोव्हेंबरला तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्याचे निर्देश!

वनक्षेत्रावरील कुरण विकास योजनेत पाळीव प्राणी कशाला ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 6, 2020 04:09 IST

नागपूर : तृणभक्षी वन्यजीव आणि पाळीव प्राण्यांसाठी वन विभागाकडून वनक्षेत्रांवर ‘वन कुरण व वन चराई क्षेत्र विकास कार्यक्रम’ राबविण्याची ...

नागपूर : तृणभक्षी वन्यजीव आणि पाळीव प्राण्यांसाठी वन विभागाकडून वनक्षेत्रांवर ‘वन कुरण व वन चराई क्षेत्र विकास कार्यक्रम’ राबविण्याची घोषणा वनमंत्र्यांनी केली आहे. त्यासाठी ५० कोटी रुपयाचा निधहीही उपलब्ध करून दिला आहे. मात्र वनमंत्र्यांच्या या घोषणेचा वन्यजीवप्रेमींनी विरोध व्यक्त केला आहे.

२ डिसेंबरला वनमंत्री संजय राठोड यांनी वन कुरण आणि वन चराई क्षेत्र विकास कार्यक्रमाची घोषणा केली आहे. पुढील वर्षासाठी ८ हजार ३०० हेक्टर क्षेत्रावर कुरण आणि चराई क्षेत्राच्या विकासासाठी ५० कोटी रुपयाचा निधी उपलब्ध करून देण्याची घोषणा करण्यासोबतच पुढील चार वर्षांमध्ये २०० कोटी निधी उपलब्ध केला जाणार आहे. राज्यातील अवर्षणग्रस्त क्षेत्रात शेतीसोबतच पशुपालन हा दुष्काळात तारणारा पूरक व्यवसाय आहे. शेतकऱ्यांना आधार ठरणाऱ्या या व्यवसायासाठी कुरण व वन चराई क्षेत्र विकास कार्यक्रम राबविणे व त्यातून तृणभक्षी वन्यजीव आणि शेतकऱ्यांच्या पशुपालनविषयक गरजा भागवून वनावरील ताण कमी करण्याचा हेतू वनमंत्र्यांनी जाहीर केला आहे. मात्र, पाळीव प्राण्यांसाठी वनक्षेत्रावर कुरण विकास करू नये, असा सूर आता व्यक्त होत आहे. वन्यप्रेमींचा यातील पाळीव प्राणी या शब्दाला आक्षेप आहे. यामुळे वनक्षेत्र पूर्णत: धोक्यात येण्याची भीती व्यक्त होत आहे. वनजमीन वापरण्याऐवजी सरकारने पाळीव जनावरांसाठी राज्यात राखीव असलेली गायरान जमीन वापरावी, असे सुचविले जात आहे.

निवृत्त वन अधिकारी अशोक खुणे यांनी प्रतिक्रया व्यक्त करताना वनजमिनींवर होणाऱ्या अतिक्रमणाकडे लक्ष वेधले. कितीतरी अनधिकृत अतिक्रमण असताना आता पुन्हा पाळीव प्राण्यांसाठी चराई क्षेत्र देणे भविष्याच्या दृष्टीने योग्य ठरणार नसल्याचे म्हटले आहे.

राज्यातील ३ लाख ७ हजार चौ.कि.मी. क्षेत्रापैकी ५३ हजार ४८४ चौरस किलोमीटर क्षेत्र पडिक आहे तर, ६२ हजार चौ. कि.मी. क्षेत्रावर वने आहेत. या जंगलव्याप्त क्षेत्रापैकी २ हजार चौ. कि.मी. क्षेत्र हे कुरण व चराई क्षेत्र विकासासाठी राखीव आहे. मात्र, पाळीव प्राण्यांसाठी वनक्षेत्रावर कुरण विकास योजना राबविण्याऐवजी गायरान जमिनीवर नियोजन करावे, असा सूर आता उमटत आहे.