शहरं
Join us  
Trending Stories
1
"हा वादाचा नव्हे, समाजाचा विषय; आरोग्य अन् आस्था..."; CM फडणवीसांचे कबुतरखाना वादावर विधान
2
Palghar Crime: धक्का लागला म्हणून कुऱ्हाडीने केले वार, लोकांनी झाडाला बांधून आरोपी चोपला
3
"आम्हाला नाही माहीत, पाकिस्तानला...!"; ऑपरेशन सिंदूर दरम्यान एफ-१६ लढाऊ विमान पाडलं गेलं? अमेरिकेनं दिलं असं उत्तर
4
सावरकरांवरील विधानांमुळे माझ्या जीवितास धोका, राहुल गांधींचा दावा, महात्मा गांधींचा उल्लेख करत म्हणाले... 
5
Kabutar Khana: 'तुम्ही असा आदेश कसा काढू शकता?', उच्च न्यायालयाने मुंबई महापालिकेला झापले; काय घडलं?
6
दोन नाही, युट्यूबर अरमान मलिकच्या चार पत्नी; कोर्टाने पाठवले समन्स; धक्कादायक कारण आले समोर
7
भारताचं नागरिकत्व घेण्यापूर्वीच मतदार यादीत नोंदवलं गेलं होतं सोनिया गांधींचं नाव, भाजपाचा गंभीर आरोप
8
'झपाटलेला'मधील लक्ष्याची आवडी आठवतेय का?, सध्या या मालिकेत करतेय काम
9
"संतोष देशमुखांच्या कार्याने गावाला दिल्लीचा मान"; मस्साजोगच्या सरपंचांना PM मोदींकडून निमंत्रण
10
"Muscles असलेल्या बिपाशाशीच लग्न कर", म्हणणाऱ्या मृणाल ठाकूरला अभिनेत्रीचं चोख उत्तर, म्हणाली- "एक स्त्री..."
11
कबुतरखाना बंदी वाद राज ठाकरेंनी मध्यस्थी करून संपवावा; जैन मुनींनी घातली साद, म्हणाले...
12
SBI च्या ग्राहकांना मोठा झटका! १५ ऑगस्टपासून 'या' सेवेसाठी लागणार शुल्क, वाचा नवे नियम
13
Maharashtra Politics : एकनाथ शिंदे अन् आदित्य ठाकरे एकाच मंचावर येणार,नेमकं कारण काय?
14
पुढच्या ५ वर्षात २० हजार जणांना नोकरी देण्याचं लक्ष्य; PWC कंपनीने जाहीर केले 'व्हिजन २०३०'
15
ऑपरेशन सिंदूरवेळी सीमेवरील गावातील ग्रामस्थांनी केलं असं काम, आता सरपंचांचा स्वातंत्र्य दिनी होणार सन्मान
16
एकही सामना न खेळता Rohit Sharma ला अचानक 'प्रमोशन'; पाकिस्तानच्या माजी कर्णधाराने केली मदत
17
500 KM रेंज देणारी Maruti e-Vitara किती तारखेला लॉन्च होणार? खास असतील फीचर्स, जाणूनघ्या किंमत!
18
“...तरच दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येऊ शकतात”; पुतण्याची काकांना थेट ऑफर; पण ठेवली मोठी अट
19
अमेरिका पाहत राहणार...! ऑटोमोबाईलचा किंग भारताला लढाऊ विमानांचे इंजिन देणार, मोठ्या डीलच्या दिशेने
20
ट्रम्प यांचे टॅरिफ वॉर, त्यात पाकिस्तान...; ऑपरेशन सिंदूर: भारताचे ४०० सैनिक अमेरिकेला जाणार

वनक्षेत्रावरील कुरण विकास योजनेत पाळीव प्राणी कशाला ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 6, 2020 04:09 IST

नागपूर : तृणभक्षी वन्यजीव आणि पाळीव प्राण्यांसाठी वन विभागाकडून वनक्षेत्रांवर ‘वन कुरण व वन चराई क्षेत्र विकास कार्यक्रम’ राबविण्याची ...

नागपूर : तृणभक्षी वन्यजीव आणि पाळीव प्राण्यांसाठी वन विभागाकडून वनक्षेत्रांवर ‘वन कुरण व वन चराई क्षेत्र विकास कार्यक्रम’ राबविण्याची घोषणा वनमंत्र्यांनी केली आहे. त्यासाठी ५० कोटी रुपयाचा निधहीही उपलब्ध करून दिला आहे. मात्र वनमंत्र्यांच्या या घोषणेचा वन्यजीवप्रेमींनी विरोध व्यक्त केला आहे.

२ डिसेंबरला वनमंत्री संजय राठोड यांनी वन कुरण आणि वन चराई क्षेत्र विकास कार्यक्रमाची घोषणा केली आहे. पुढील वर्षासाठी ८ हजार ३०० हेक्टर क्षेत्रावर कुरण आणि चराई क्षेत्राच्या विकासासाठी ५० कोटी रुपयाचा निधी उपलब्ध करून देण्याची घोषणा करण्यासोबतच पुढील चार वर्षांमध्ये २०० कोटी निधी उपलब्ध केला जाणार आहे. राज्यातील अवर्षणग्रस्त क्षेत्रात शेतीसोबतच पशुपालन हा दुष्काळात तारणारा पूरक व्यवसाय आहे. शेतकऱ्यांना आधार ठरणाऱ्या या व्यवसायासाठी कुरण व वन चराई क्षेत्र विकास कार्यक्रम राबविणे व त्यातून तृणभक्षी वन्यजीव आणि शेतकऱ्यांच्या पशुपालनविषयक गरजा भागवून वनावरील ताण कमी करण्याचा हेतू वनमंत्र्यांनी जाहीर केला आहे. मात्र, पाळीव प्राण्यांसाठी वनक्षेत्रावर कुरण विकास करू नये, असा सूर आता व्यक्त होत आहे. वन्यप्रेमींचा यातील पाळीव प्राणी या शब्दाला आक्षेप आहे. यामुळे वनक्षेत्र पूर्णत: धोक्यात येण्याची भीती व्यक्त होत आहे. वनजमीन वापरण्याऐवजी सरकारने पाळीव जनावरांसाठी राज्यात राखीव असलेली गायरान जमीन वापरावी, असे सुचविले जात आहे.

निवृत्त वन अधिकारी अशोक खुणे यांनी प्रतिक्रया व्यक्त करताना वनजमिनींवर होणाऱ्या अतिक्रमणाकडे लक्ष वेधले. कितीतरी अनधिकृत अतिक्रमण असताना आता पुन्हा पाळीव प्राण्यांसाठी चराई क्षेत्र देणे भविष्याच्या दृष्टीने योग्य ठरणार नसल्याचे म्हटले आहे.

राज्यातील ३ लाख ७ हजार चौ.कि.मी. क्षेत्रापैकी ५३ हजार ४८४ चौरस किलोमीटर क्षेत्र पडिक आहे तर, ६२ हजार चौ. कि.मी. क्षेत्रावर वने आहेत. या जंगलव्याप्त क्षेत्रापैकी २ हजार चौ. कि.मी. क्षेत्र हे कुरण व चराई क्षेत्र विकासासाठी राखीव आहे. मात्र, पाळीव प्राण्यांसाठी वनक्षेत्रावर कुरण विकास योजना राबविण्याऐवजी गायरान जमिनीवर नियोजन करावे, असा सूर आता उमटत आहे.