शहरं
Join us  
Trending Stories
1
रशियाचा पुन्हा एकदा युक्रेनवर मोठा हल्ला; ६२९ मिसाईल आणि ड्रोन डागले, अनेकांचा मृत्यू
2
Navi Mumbai Traffic: मराठा मोर्चा नवी मुंबईच्या वेशीवर, वाहतुकीत मोठे बदल; कोणते रस्ते बंद, कोणते खुले?
3
संजय गायकवाडांच्या आमदारकीचं काय होणार? ठाकरेंच्या नेत्याने ठोठावले उच्च न्यायालयाचे दार
4
संभल समितीनं CM योगींना सादर केला अहवाल, करण्यात आले खळबळजनक खुलासे; जिल्ह्यात फक्त १५% हिंदू उरले!
5
निक्की भाटी प्रकरणात वृद्ध शेजाऱ्याने केला धक्कादायक खुलासा; म्हणाला, 'निक्की जळत होती तेव्हा विपिन...'
6
भारतासाठी गुड न्यूज! अमेरिकेला मागे टाकत बनू शकतो जगातील दुसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था; EY च्या रिपोर्टमध्ये काय?
7
१ वर्षात केली स्पर्धा परीक्षेची तयारी, पहिल्याच प्रयत्नात यश; MBBS डॉक्टर बनली IAS अधिकारी
8
केस कलर करण्याची हौस बेतली जीवावर; तरुणीसोबत घडलं भयंकर, अवस्था पाहून बसेल धक्का
9
TCS-एचसीएलसह आयटी क्षेत्रात 'भूकंप'! बाजार ७०६ अंकांनी घसरला; या कारणामुळे मोठी घसरण
10
४ महिन्यांपूर्वी झाले होते लग्न, क्षणार्धात मोडले सुखी संसाराचे स्वप्न; वैष्णो देवी दुर्घटनेत चांदनीने गमावला जीव
11
"माझी एवढीच अपेक्षा आहे की कुठलेही..."; मनोज जरांगेंच्या आंदोलनावर CM फडणवीसांनी मांडली स्पष्ट भूमिका
12
'चिता' झेपावला, जवान बनले 'देवदूत'; मृत्यूच्या दाढेतून २७ जणांना बाहेर काढले, पूरग्रस्त भागात लष्कराची सेवा
13
अमेरिकन लढाऊ विमानाला हवेतच आग लागली, अलास्कामध्ये F-35 विमान कोसळले
14
प्रेमासाठी काय पण...! क्वांटम डेटिंग म्हणजे काय, नव्या पिढीमध्ये का वाढतोय हा ट्रेंड?
15
शी जिनपिंग यांचं सीक्रेट लेटर, मैत्रीसाठी पुढाकार; भारत-चीन संंबंध सुधारण्यामागची Inside Story
16
रोज फोनवर बोलता बोलता मित्राच्या पत्नीवर जीव जडला, अडथळा ठरलेल्या नवऱ्याचा प्रियकरानेच खेळ खल्लास केला! 
17
भयंकर! तांत्रिकाच्या सांगण्यावरून ११ वीतील युवकाचा दिला नरबळी; शीर धडापासून वेगळे केले, अन्...
18
बॉयफ्रेंडने लाथा-बुक्क्यांनी मारलं, सर्व पैसे चोरले, माझं घर घेतलं; प्रसिद्ध गायिकेचा गंभीर आरोप
19
ना चित्रपट ना जाहिरात, तरीही सोनू सूदने कमावले ३.१० कोटी रुपये; काय आहे उत्पन्नाचा स्त्रोत?
20
पहिलाच टी-२० सामना ठरला शेवटचा; जाणून घ्या 'त्या' ५ भारतीय खेळाडूंबद्दल!

शेतकऱ्यांना ऑनलाईन बियाणे देताना लॉटरी पद्धती कशाला ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2021 04:08 IST

नागपूर : यंदाच्या हंगामापासून शेतकऱ्यांना ऑनलाईन बियाणे उपलब्ध करून देण्याचा निर्णय अलीकडेच कृषी मंत्र्यांनी जाहीर केला आहे. यासाठी शेतकऱ्यांना ...

नागपूर : यंदाच्या हंगामापासून शेतकऱ्यांना ऑनलाईन बियाणे उपलब्ध करून देण्याचा निर्णय अलीकडेच कृषी मंत्र्यांनी जाहीर केला आहे. यासाठी शेतकऱ्यांना १५ मेपर्यंत महाबीजच्या पोर्टलवर ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहनही कृषी विभागाकडून करण्यात आले आहे. मात्र, या निर्णयाचे शेतकरी वर्गात काही ठिकाणी स्वागत तर काही ठिकाणी नाराजी व्यक्त होत आहे.

नागपूर विभागाच्या खरीप पेरणी आढाव्यासाठी कृषी मंत्री आले असता त्यांनी ही माहिती दिली होती. शेतकऱ्यांनी ऑनलाईन बियाणे देताना अनुदान दिले जाईल, असे म्हटले होते. ही पद्धत अवलंबताना शेतकऱ्यांना ऑनलाईन पद्धतीने बियाणे उपलब्ध करून दिले जाणार आहे. त्यावर मात्र काही शेतकऱ्यांची नाराजी व्यक्त होताना दिसत आहे.

राष्ट्रीय अन्नसुरक्षा अभियानांतर्गत गळीतधान्य, अन्नधान्य पिके, सोयाबीन, भात, तूर, मूग, उडीद, तीळ, बी.टी. कापूस, ज्वारी, मका, बाजरी हे बियाणे शेतकऱ्यांना उपलब्ध करून दिले जाणार आहे. यासाठी महाडीबीटी पोर्टलवरून अर्ज करताना आधार कार्ड, सात-बारा, नमुना आठ-अ, राष्ट्रीय बँकेचे पासबुक द्यावे लागणार आहे. मात्र, लॉटरी पद्धतीने बियाणांचा पुरवठा झाल्यास ते किती शेतकऱ्यांना मिळेल, याबद्दल उमरेड येथील कृषी केंद्र संचालक अतुल पालंदूरकर यांनी शंका व्यक्त केली आहे. सरकारने शेतकऱ्यांकडून टोकन रक्कम घेऊन बियाणे कृषी सहायकांमार्फत द्यायला हवे होते, असे ते म्हणाले.

शेतकऱ्यांकडे पैसा नाही. पेरणीचा एकरी खर्च बियाणांसह ३ हजार रुपयांच्या जवळपास येतो. अशा वेळी पेरणीच्या खर्चाचा बोजा शेतकऱ्यांवरून कमी करण्याच्या दृष्टीने सरकारने विचार करावा, अशी अपेक्षाही शेतकऱ्यांकडून व्यक्त होत आहे. ग्रामीण भागांमध्ये सेतू केंद्रांची संख्या मोजकी असते. त्यातल्या त्यात कनेक्टिव्हिटीचीही अडचण असते. ऐन हंगामात अशी अडचण झाल्यास शेतकऱ्यांची पेरणी खोळंबू शकते. त्यामुळे सेतू केंद्रांची संख्या वाढवावी, अशी मागणी होत आहे.

असे असले तरी शेतकऱ्यांना सबसिडीवर बियाणे देणारा हा निर्णय चांगला असल्याच्या स्वागतार्ह प्रतिक्रियाही उमटत आहेत. सरांडी येथील शेतकरी रवि मालवंडे म्हणाले, बियाणांची ३० किलोची बॅग २,२०० ते २,४०० पडते. ती ५० टक्के अनुदानावर मिळाल्यास शेतकऱ्यांवरील पेरणीचा अर्धा बोजा कमी होऊ शकतो. दरम्यान, काही तालुक्यातील शेतकऱ्यांनी शेतकरी गटांच्या मार्फतही खत आणि बियाणांची मागणी केली आहे. ऑनलाईन बियाणांया वाटपात अडचण आल्यास हा ऐन वेळेचा पर्याय ठरू शकतो, असे शेतकऱ्यांचे मत आहे.