शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांना ऑनलाईन बियाणे देताना लॉटरी पद्धती कशाला ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2021 04:08 IST

नागपूर : यंदाच्या हंगामापासून शेतकऱ्यांना ऑनलाईन बियाणे उपलब्ध करून देण्याचा निर्णय अलीकडेच कृषी मंत्र्यांनी जाहीर केला आहे. यासाठी शेतकऱ्यांना ...

नागपूर : यंदाच्या हंगामापासून शेतकऱ्यांना ऑनलाईन बियाणे उपलब्ध करून देण्याचा निर्णय अलीकडेच कृषी मंत्र्यांनी जाहीर केला आहे. यासाठी शेतकऱ्यांना १५ मेपर्यंत महाबीजच्या पोर्टलवर ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहनही कृषी विभागाकडून करण्यात आले आहे. मात्र, या निर्णयाचे शेतकरी वर्गात काही ठिकाणी स्वागत तर काही ठिकाणी नाराजी व्यक्त होत आहे.

नागपूर विभागाच्या खरीप पेरणी आढाव्यासाठी कृषी मंत्री आले असता त्यांनी ही माहिती दिली होती. शेतकऱ्यांनी ऑनलाईन बियाणे देताना अनुदान दिले जाईल, असे म्हटले होते. ही पद्धत अवलंबताना शेतकऱ्यांना ऑनलाईन पद्धतीने बियाणे उपलब्ध करून दिले जाणार आहे. त्यावर मात्र काही शेतकऱ्यांची नाराजी व्यक्त होताना दिसत आहे.

राष्ट्रीय अन्नसुरक्षा अभियानांतर्गत गळीतधान्य, अन्नधान्य पिके, सोयाबीन, भात, तूर, मूग, उडीद, तीळ, बी.टी. कापूस, ज्वारी, मका, बाजरी हे बियाणे शेतकऱ्यांना उपलब्ध करून दिले जाणार आहे. यासाठी महाडीबीटी पोर्टलवरून अर्ज करताना आधार कार्ड, सात-बारा, नमुना आठ-अ, राष्ट्रीय बँकेचे पासबुक द्यावे लागणार आहे. मात्र, लॉटरी पद्धतीने बियाणांचा पुरवठा झाल्यास ते किती शेतकऱ्यांना मिळेल, याबद्दल उमरेड येथील कृषी केंद्र संचालक अतुल पालंदूरकर यांनी शंका व्यक्त केली आहे. सरकारने शेतकऱ्यांकडून टोकन रक्कम घेऊन बियाणे कृषी सहायकांमार्फत द्यायला हवे होते, असे ते म्हणाले.

शेतकऱ्यांकडे पैसा नाही. पेरणीचा एकरी खर्च बियाणांसह ३ हजार रुपयांच्या जवळपास येतो. अशा वेळी पेरणीच्या खर्चाचा बोजा शेतकऱ्यांवरून कमी करण्याच्या दृष्टीने सरकारने विचार करावा, अशी अपेक्षाही शेतकऱ्यांकडून व्यक्त होत आहे. ग्रामीण भागांमध्ये सेतू केंद्रांची संख्या मोजकी असते. त्यातल्या त्यात कनेक्टिव्हिटीचीही अडचण असते. ऐन हंगामात अशी अडचण झाल्यास शेतकऱ्यांची पेरणी खोळंबू शकते. त्यामुळे सेतू केंद्रांची संख्या वाढवावी, अशी मागणी होत आहे.

असे असले तरी शेतकऱ्यांना सबसिडीवर बियाणे देणारा हा निर्णय चांगला असल्याच्या स्वागतार्ह प्रतिक्रियाही उमटत आहेत. सरांडी येथील शेतकरी रवि मालवंडे म्हणाले, बियाणांची ३० किलोची बॅग २,२०० ते २,४०० पडते. ती ५० टक्के अनुदानावर मिळाल्यास शेतकऱ्यांवरील पेरणीचा अर्धा बोजा कमी होऊ शकतो. दरम्यान, काही तालुक्यातील शेतकऱ्यांनी शेतकरी गटांच्या मार्फतही खत आणि बियाणांची मागणी केली आहे. ऑनलाईन बियाणांया वाटपात अडचण आल्यास हा ऐन वेळेचा पर्याय ठरू शकतो, असे शेतकऱ्यांचे मत आहे.