शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्री उदय सामंत चौथ्यांदा 'शिवतीर्थ'वर; मनसे प्रमुख राज ठाकरेंची घेतली भेट, कारण काय?
2
सीमेवर बंदुका थंडावल्या, पण एअर इंडिया, गो इंडिगोने विमानफेऱ्या रद्द केल्या; या विमानतळांवर आजही...
3
हिंडन विमानतळावरून बंगळुरू, लुधियाना, नांदेडसाठी आजपासून विमानसेवा सुरू; मुंबई, गोव्यासाठी केव्हा सुरू होणार?
4
Stock Market Today: विक्रमी तेजीनंतर शेअर बाजारात घसरण; ५०० पेक्षा जास्त अंकांनी आपटला, तरीही फार्मा सेक्टरमध्ये तेजी का?
5
सावधान! 'या' नंबरवरून पाकिस्तानी हॅकर्सचा भारतीयांना फोन; सुरक्षा यंत्रणेचा मोठा अलर्ट
6
धक्कादायक! अमृतसरमध्ये विषारी दारूमुळे १२ जणांचा मृत्यू, ५ जणांची प्रकृती गंभीर
7
India retaliatory tariff: चीननंतर भारताचं अमेरिकेला जोरदार प्रत्युत्तर, स्टील-अ‍ॅल्युमिनिअम टॅरिफवर मोठी घोषणा
8
'ऑपरेशन सिंदूर'वेळी भारतावर १५ लाख सायबर हल्ले; पाकिस्तान,बांगलादेशसह या ५ देशातील हॅकर्स
9
भीमा कोरेगाव प्रकरण: आज आयोगापुढे शरद पवार हजर राहणार?
10
स्पष्ट विजय! भारताच्या 'या' दोन मिसाइलला तोड नाही, पाकनं नांगी टाकली...; ऑपरेशन सिंदूरवर ऑस्ट्रियन इतिहासकाराचा मोठा दावा
11
गोळीबार नको, बॉर्डरवरील सैनिकांची संख्या कमी करावी; भारत-पाकिस्तान DGMO मध्ये चर्चा
12
"ज्या गोष्टी लढून मिळवायच्या, त्या मागून मिळत नाहीत..."; उद्धवसेनेचा PM मोदींवर निशाणा
13
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पाकला स्पष्ट शब्दांत ठणकावले; पाहा, भाषणातील ५६ महत्त्वाचे मुद्दे
14
आजचे राशीभविष्य १३ मे २०२५ : या राशींना आर्थिक लाभ, कसा असेल तुमचा आजचा दिवस...
15
एअर मार्शल भारती म्हणाले, “भय बिनु होइ न प्रीति, कोणत्याही आव्हानांचा मुकाबला करण्यास सज्ज”
16
१९७१नंतर प्रथमच पाकला मोठा दणका; ५२हून अधिक वायुसैनिकांचा मृत्यू; १२ एअरबेसवर भारताचे हल्ले
17
‘हे’ तीन दहशतवादी हवेत, मगच थांबेल काश्मीरचा दहशतवाद; भारताची पाककडे सातत्याने मागणी
18
धास्ती: सीमावर्ती गावांत अद्याप शेकडो जिवंत बॉम्ब, ६ ठिकाणी केले निष्क्रिय; नागरिक परतले घरी
19
जे होते ‘ऑपरेशन सिंदूर’चा चेहरा त्यांचे ट्रोलिंग; मिस्रींच्या मुलीची वैयक्तिक माहिती लीक
20
युद्ध झालेलेच नाही, तेव्हा शस्त्रसंधीचा प्रश्नच नाही; भारत-पाकच्या राजनैतिकांनाच श्रेय

शेतकऱ्यांना ऑनलाईन बियाणे देताना लॉटरी पद्धती कशाला ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2021 04:08 IST

नागपूर : यंदाच्या हंगामापासून शेतकऱ्यांना ऑनलाईन बियाणे उपलब्ध करून देण्याचा निर्णय अलीकडेच कृषी मंत्र्यांनी जाहीर केला आहे. यासाठी शेतकऱ्यांना ...

नागपूर : यंदाच्या हंगामापासून शेतकऱ्यांना ऑनलाईन बियाणे उपलब्ध करून देण्याचा निर्णय अलीकडेच कृषी मंत्र्यांनी जाहीर केला आहे. यासाठी शेतकऱ्यांना १५ मेपर्यंत महाबीजच्या पोर्टलवर ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहनही कृषी विभागाकडून करण्यात आले आहे. मात्र, या निर्णयाचे शेतकरी वर्गात काही ठिकाणी स्वागत तर काही ठिकाणी नाराजी व्यक्त होत आहे.

नागपूर विभागाच्या खरीप पेरणी आढाव्यासाठी कृषी मंत्री आले असता त्यांनी ही माहिती दिली होती. शेतकऱ्यांनी ऑनलाईन बियाणे देताना अनुदान दिले जाईल, असे म्हटले होते. ही पद्धत अवलंबताना शेतकऱ्यांना ऑनलाईन पद्धतीने बियाणे उपलब्ध करून दिले जाणार आहे. त्यावर मात्र काही शेतकऱ्यांची नाराजी व्यक्त होताना दिसत आहे.

राष्ट्रीय अन्नसुरक्षा अभियानांतर्गत गळीतधान्य, अन्नधान्य पिके, सोयाबीन, भात, तूर, मूग, उडीद, तीळ, बी.टी. कापूस, ज्वारी, मका, बाजरी हे बियाणे शेतकऱ्यांना उपलब्ध करून दिले जाणार आहे. यासाठी महाडीबीटी पोर्टलवरून अर्ज करताना आधार कार्ड, सात-बारा, नमुना आठ-अ, राष्ट्रीय बँकेचे पासबुक द्यावे लागणार आहे. मात्र, लॉटरी पद्धतीने बियाणांचा पुरवठा झाल्यास ते किती शेतकऱ्यांना मिळेल, याबद्दल उमरेड येथील कृषी केंद्र संचालक अतुल पालंदूरकर यांनी शंका व्यक्त केली आहे. सरकारने शेतकऱ्यांकडून टोकन रक्कम घेऊन बियाणे कृषी सहायकांमार्फत द्यायला हवे होते, असे ते म्हणाले.

शेतकऱ्यांकडे पैसा नाही. पेरणीचा एकरी खर्च बियाणांसह ३ हजार रुपयांच्या जवळपास येतो. अशा वेळी पेरणीच्या खर्चाचा बोजा शेतकऱ्यांवरून कमी करण्याच्या दृष्टीने सरकारने विचार करावा, अशी अपेक्षाही शेतकऱ्यांकडून व्यक्त होत आहे. ग्रामीण भागांमध्ये सेतू केंद्रांची संख्या मोजकी असते. त्यातल्या त्यात कनेक्टिव्हिटीचीही अडचण असते. ऐन हंगामात अशी अडचण झाल्यास शेतकऱ्यांची पेरणी खोळंबू शकते. त्यामुळे सेतू केंद्रांची संख्या वाढवावी, अशी मागणी होत आहे.

असे असले तरी शेतकऱ्यांना सबसिडीवर बियाणे देणारा हा निर्णय चांगला असल्याच्या स्वागतार्ह प्रतिक्रियाही उमटत आहेत. सरांडी येथील शेतकरी रवि मालवंडे म्हणाले, बियाणांची ३० किलोची बॅग २,२०० ते २,४०० पडते. ती ५० टक्के अनुदानावर मिळाल्यास शेतकऱ्यांवरील पेरणीचा अर्धा बोजा कमी होऊ शकतो. दरम्यान, काही तालुक्यातील शेतकऱ्यांनी शेतकरी गटांच्या मार्फतही खत आणि बियाणांची मागणी केली आहे. ऑनलाईन बियाणांया वाटपात अडचण आल्यास हा ऐन वेळेचा पर्याय ठरू शकतो, असे शेतकऱ्यांचे मत आहे.