शहरं
Join us  
Trending Stories
1
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
2
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
3
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
4
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
5
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...
6
रितेशच्या आधी जिनिलियाचं जॉनसोबत झालं होतं लग्न? इतक्या वर्षांनी पुजाऱ्याच्या दाव्यावर अभिनेत्रीनं केला खुलासा
7
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?
8
Mumbai Rains Live Updates: मुंबईत मुसळधार! पुढील ३ तासांसाठी रेड अलर्ट जारी, कुठे-काय परिस्थिती?
9
इस्रायलमध्ये पहिल्यांदाच इतका विनाश, इराणच्या हल्ल्यानंतर काय झालं बघाच...
10
Israel Iran War : मोठं काहीतरी घडणार! अमेरिकेचे विमानवाहू जहाज मध्य पूर्वेकडे रवाना; इस्रायल-इराण युद्ध भडकणार?
11
भारतावर पुन्हा युक्रेनसारखी परिस्थिती! १५०० विद्यार्थी इराणमध्ये अडकले; एअर इंडियालाच काहीतरी करावे लागणार...
12
सिट्रोएनने खास स्पोर्ट कार आणली; Citroen C3 चे अंतर-बाह्य रुपडे पालटले... 
13
Navi Mumbai Rains Video: नशीब बलवत्तर! एक व्यक्ती पायऱ्या उतरत होता, तितक्यात मागून नाल्याची भिंत खचली; ९ दुचाकी, टेम्पोचे नुकसान
14
'फॅण्ड्री' फेम शालूला मराठी इंडस्ट्रीतल्या ग्रुपिझमचा बसला मोठा फटका, हातातून निसटल्या मराठी मालिका
15
Shardul Thakur wife: शार्दुल ठाकूरची पत्नी मिताली आहे यशस्वी उद्योजिका; हा आहे तिचा मुख्य व्यवसाय, जाणून घ्या
16
३ बायका ४ मुलं! संजय कपूर यांच्या १०,००० कोटींचा वारसदार कोण? करिश्माच्या मुलांना काय मिळणार?
17
"सकाळी उठल्यावर मी आधी.."; प्राजक्ता माळीने सांगितलं फिटनेस आणि सौंदर्याचं खास रहस्य
18
"प्रेम करतोस तर जीव देऊन दाखव"; गर्लफ्रेंडची मागणी बॉयफ्रेंडनं पूर्ण केली! तरुणाचा दुर्दैवी अंत
19
कुलदीप यादवने अचानक साखरपुड्याचे फोटो डिलीट केले; उलट-सुलट चर्चांना उधाण...

गरिबांच्या जीवाला मोल नाय का ... ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 29, 2021 04:07 IST

- सरकारी यंत्रणेची अनास्था - मृतांचे परिवार वाऱ्यावर - सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल - चाैकशीत गुरफटली कारवाई - ...

- सरकारी यंत्रणेची अनास्था

- मृतांचे परिवार वाऱ्यावर

- सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल

- चाैकशीत गुरफटली कारवाई - नरेश डोंगरे

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर - वाडी येथील वेलट्रिट हॉस्पिटलमधील भीषण अग्निकांडाला आता पावणेदोन महिने झाले. या अग्निकांडात चाैघांचे बळी गेल्यानंतर त्यावेळी दु:खाने होरपळलेल्या कुटुंबीयांच्या भावनांवर नेते आणि सरकारी अधिकाऱ्यांनी आश्वासनांची कोरडी फुंकर घातली. मात्र, आता पावणेदोन महिने होऊनही त्यांना कसलीही आर्थिक मदत मिळाली नाही. पोलिसांनी हॉस्पिटल प्रशासनाविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला. मात्र, अटकेसारखी ठोस कारवाईही झाली नाही. त्यामुळे मृतांच्या कुटुंबीयांच्या भावना चिघळल्या आहेत. आम्हा गरिबाचा कुणी वाली नाही का, आमच्या जीवाला मोल नाही का, असे प्रश्न मृतांचे शोकसंतप्त नातेवाईक उपस्थित करीत आहेत.

वाडीतील वेलट्रिट हॉस्पिटलला ९ एप्रिलला रात्री हॉस्पिटलला भीषण आग लागली. आगीत तुळशीराम सापकन पारधी, शिवशक्ती भगवान सोनबरसे, प्रकाश बापूरावजी बोळे आणि रंजना मधुकर कडू या चाैघांचा होरपळून मृत्यू झाला. काहीजण श्वास गुदमरून, तर काही भाजून जखमी झाले. उपचारादरम्यान ते बचावले. मात्र, त्यांच्याही मनावरही या घटनेच्या खोल जखमा झाल्या आहेत. या अग्निकांडानंतर त्यावेळी अनेक नेत्यांनी मृतांच्या नातेवाइकांबाबत कोरडी सहानुभूती व्यक्त केली. त्यांना शासकीय नियमानुसार योग्य ती आर्थिक मदत दिली जाईल, असेही नेते मंडळींनी तसेच अधिकाऱ्यांनी खासगीत पत्रकारांना सांगितले. त्यासाठी तातडीचे प्रयत्न केले जात असल्याचेही त्यावेळी सुतोवाच केले. मात्र, आता पावणेदोन महिने झाले. मृतांच्या नातेवाइकांना सरकारकडून साधी दमडीही सानुग्रह मदत म्हणून मिळाली नाही. भंडारा येथील रुग्णालयात झालेल्या मृत्यू प्रकरणात पहिल्याच दिवशी सरकारकडून आर्थिक मदतीची घोषणा झाली अन् वाटपही झाले. वेलट्रिटच्या अग्निकांडातील मृतांचे नातेवाईक वाऱ्यावर सोडले गेले आहेत. त्यामुळे त्यांच्या भावना तीव्र आहेत. या संबंधाने एका मृताचे नातेवाईक प्रवीण महंत आणि पारधी यांचा मुलगा शुभम यांनी आमच्या नातेवाइकांच्या जीवाला काहीच मोल नाही का, असा प्रश्न उपस्थित केला आहे.

दरम्यान, अग्निकांडाची चाैकशी करण्यासाठी प्रशासकीय यंत्रणा आणि पोलीस त्यावेळी आपापल्या पातळीवर स्वतंत्रपणे सक्रिय झाले होते. वीज विभाग आणि अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनीही आगीचे कारण जाणून घेत तसा अहवाल सरकारी यंत्रणेला दिला. त्यानंतर पोलिसांनी वेलट्रिट हॉस्पिटलचे डॉ. राहुल ठवरे आणि हॉस्पिटल प्रशासनाला जबाबदार धरून डॉ. ठवरे तसेच प्रशासनातील मंडळींविरुद्ध सदोष मनुष्यवधाचे कलम ३०४ भा.दं.वि. ३४ नुसार गुन्हा दाखल केला. मात्र, अद्याप कसलीही ठोस कारवाई संबंधित आरोपींवर झालेली नाही. त्यामुळे मृतांच्या भावना जास्तच तीव्र झाल्या आहेत.

----

जिल्हा प्रशासनाकडून नो रिस्पॉन्स

वारंवार चकरा मारूनही जिल्हा प्रशासनाकडून आम्हाला कवडीची मदत मिळाली नाही, असे प्रवीण महंत म्हणतात. या संबंधाने माहिती घेण्यासाठी

लोकमतने जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांच्याकडे वारंवार संपर्क करण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांचा मोबाइल ‘नो रिस्पॉन्स’ होता.

----

चाैकशी सुरू, दोषींवर कारवाई होणारच - अमितेशकुमार

सदोष मणुष्यवधाचा गुन्हा दाखल होऊन ४५ दिवस झाले तरी अटकेची कारवाई का झाली नाही, अशी विचारणा पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांच्याकडे केली असता काही तांत्रिक मुद्द्यांची चाैकशी सुरू आहे. ती पूर्ण झाल्यानंतर दोषींवर नक्की कारवाई होईल, असे ते म्हणाले.

---