शहरं
Join us  
Trending Stories
1
तीन हजार महिला सेवा सहकारी संस्थांना सरकारी कामे देणार,मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
2
अमेरिकेत ५.५ कोटी व्हिसाधारकांची चौकशी; ५० लाख भारतीयांचाही समावेश, आता ट्रक चालकांनाही व्हिसा नाही
3
पालिका बँक निवडणुकीत ठाकरे, दरेकर गटाला धक्का, सहकार पॅनलने मारली बाजी
4
आजचे राशीभविष्य, २४ ऑगस्ट २०२५: दैनंदिन कामे निर्विघ्नपणे पार पडतील; संसारात समाधान राहील
5
काँग्रेसच्या गॅम्बलर आमदाराला अटक; १२ कोटींची राेकड जप्त
6
अनिल अंबानी सीबीआयच्या रडारवर; मुंबईतील घरी छापे, ३,०७३ कोटींचे कथित कर्ज घोटाळा प्रकरण
7
निवडणूक लढवायची? मग मतदारयाद्या तपासायला घ्या, राज ठाकरे यांची इच्छुकांना सूचना
8
"वर्ष अखेरीस मेड इन इंडिया सेमीकंडक्टर बाजारात येणार, तसेच ६ जी..."; PM नरेंद्र मोदींची घोषणा
9
"मी मांसाहार खाल्लेलं माझ्या पांडुरंगाला चालतं, तुम्हाला काय प्रॉब्लेम..?"; सुप्रिया सुळेंच्या विधानानं नवा वाद
10
गणेशोत्सवात परीक्षा नको, अमित ठाकरे यांनी केली मागणी
11
वन नेशन, वन इलेक्शन...! भाजपानं रणनीतीत केला बदल; विरोधकांना शह देण्यासाठी नवा 'मेगा प्लॅन'
12
दीड वर्षाच्या मुलाला मिठीत घेऊन BSF जवानानं मारली गंगा नदीत उडी; कारण ऐकून डोळ्यात पाणी येईल
13
अमेरिकन नागरिकांना १३० कोटींना गंडा घातला, ईडीने बनावट कॉल सेंटरचा पर्दाफाश केला; ८ आलिशान कार जप्त
14
सुरतमधून आणलं अन् मुंबईत हत्या; ट्रेनच्या टॉयलेटमध्ये सापडलेल्या पाच वर्षाच्या मुलाला मावशीच्या मुलानेच...
15
रोनाल्डोनं रचला नवा इतिहास! अशी कामगिरी करणारा फुटबॉल जगतातील ठरला पहिला खेळाडू
16
लग्नस्थळ पाहायला गेलेल्या पित्यासह दोघांचा बुडून मृत्यू; पिंपळनेरजवळ अपघात, कार कॅनॉलमध्ये उलटली
17
Video: थैलीत नवजात बाळाचा मृतदेह; बाप जिल्हाधिकाऱ्यांसमोर ढसा ढसा रडला; म्हणाला, 'डॉक्टरांनी...'
18
"बंद दाराआड जे घडलं ते...." श्रेयस अय्यरसंदर्भात एबी डिव्हिलियर्सनं मांडलं रोखठोक मत
19
भोग भोगावे लागतील, शेतकऱ्यांनी नुकसानीची सवय करून घ्यावी; भाजपा नेते पाशा पटेलांचा अजब सल्ला
20
पतीने केली मृत्यूची भविष्यवाणी, पत्नीनं खरी करून दाखवली; साडीच्या पदरानं गळा दाबून मारलं, मग...

इंदूरला जमले नागपूरला का नाही?

By admin | Updated: May 6, 2017 02:59 IST

२०११-१२ मध्ये इंदूर ६१ व्या क्रमांकावर होते तर २०१४ मध्ये १४९ व्या क्रमांकावर घसरले होते.

नागपूरचे देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री. नागपूरचे नितीन गडकरी केंद्रात हेवीवेट मंत्री. नागपुरात भाजपचे अजय संचेती आणि डॉ. विकास महात्मे हे दोन राज्यसभा सदस्य. नागपूरचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे ऊर्जा आणि उत्पादन शुल्क अशा दोन खात्यांचा कार्यभार. नागपुरात सहाही आमदार भाजपचेच. महापालिकेत १० वर्षांपासून सत्ता याच पक्षाची. असे भाजपसाठी सर्वत्र अनुकूल आणि सुजलाम सुफलाम् वातावरण असतानाही उपराजधानीचे हे शहर स्वच्छतेच्या बाबतीत देशात तब्बल १३७व्या क्रमांकावर माघारणे ही साऱ्यांसाठीच लाजिरवाणी बाब ठरली आहे. भाजपासाठी ही जशी शोकांतिका आहे तसेच हे नागपुरातील नागरिकांचे अपयशही आहे. मध्यप्रदेशातील इंदूर हे शहर देशातील सर्वोच्च स्वच्छ शहर म्हणून बहुमान पटकावू शकते. इंदूरला जे जमले ते गडकरी, फडणवीसांच्या नागपूरला का नाही, असा प्रश्न यानिमित्ताने कुणी विचारला तर स्वाभाविकच ठरविला गेला पाहिजे. इंदूरच्या महापौर मालिनी गौड यांनी उलगडले यशाचे रहस्य : महापालिका बोध घेणार का ? कमलेश वानखेडे । लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : २०११-१२ मध्ये इंदूर ६१ व्या क्रमांकावर होते तर २०१४ मध्ये १४९ व्या क्रमांकावर घसरले होते. त्यामुळे या शहराला स्वच्छतेचा किताब मिळवून देणे तेवढे सोपे नव्हते. मात्र, तेथील महापौर मालिनी गौड, आयुक्त, नगरसेवक, अधिकारी, सफाई कर्मचारी व नागरिक यांनी आपापले कर्तव्य बजावले. स्वच्छतेला प्राधान्य दिले व इंदूरच्या शिरपेचात देशातील सर्वात स्वच्छ शहर होण्याचा मानाचा तुरा रोवला गेला. या यशाबाबत ‘लोकमत’ने इंदूरच्या महापौर मालिनी लक्ष्मणसिंह गौड यांच्याशी संपर्क साधला. गौड यांनी स्वच्छतेचा ’इंदूर पॅटर्न’ मांडत मनात आणले तर शहर स्वच्छ करणे कठीण नाही, असे इतर शहरांसाठी प्रेरणादायी ठरणारे मत व्यक्त केले. महापौर गौड म्हणाल्या, पूर्वी इंदूर शहरात दररोज ६०० ते ७०० टन कचरा उचलला जायचा. असे असले तरी सुमारे २०० टन कचरा रस्ते व कचऱ्या पेट्यांमध्ये पडून रहायचा. कचरा उचलण्याचे कंत्राट देण्यात आलेली कंपनी ‘ए टू झेड’ चे काम समाधानकारक नसल्यामुळे सर्वप्रथम या कंपनीला हटविण्यात आले. महापालिकेने स्वत:ची यंत्रणा उभी केली. सुमारे १५०० अधिकारी- कर्मचाऱ्यांची नवी टीम तयार करण्यात आली. आमच्या शहराची सफाई आम्हालाच करू द्या, अशी विनंती मुख्यमंत्र्यांना केली. स्वच्छ भारत मोहिमेंतर्गत मिळालेल्या निधीतून कचरा उचलण्यासाठी ८५ गाड्या खरेदी केल्या. जुन्या डंपर गाड्यांची दुरुस्ती केली. घराघरातून कचरा उचलण्यास सुरुवात केली. विशेष स्वच्छतेवर लक्ष ठेवण्यासाठी महापौर, आयुक्त, नगरसेवक यांची एक यंत्रणा उभारण्यात आली. यापैकी कुणालाही कुठे कचरा पडलेला आढळला तर त्यांनी महापालिका प्रशासनाला थेट वायरलेसवर माहिती कळवावी, अशी सोय करून देण्यात आली. यात नगरसेवकांनी चांगला पुढाकार घेतला. कचरा दिसताच तक्रारी होऊ लागल्या. आयुक्त मनीष सिंग यांचे परिश्रम व सहकार्य या कामी महत्त्वाचे राहिले. आपण स्वत:ही महापौर म्हणून बऱ्याचदा सकाळी शहराचा पाहणी दौरा केला. त्यामुळे प्रशासनालाही अलर्ट रहावे लागले. शेवटी सर्वांच्या सहकार्यातून शहर स्वच्छ झाले. रस्त्यांची धुलाई सुरू केली शहरातील प्रमुख रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात धूळ, माती जमा व्हायची. सफाई केल्यानंतरही माती निघत नव्हती. त्यामुळे प्रमुख रस्त्यांची वेगवेगळ्या मशीन वापरून सफाई सुरू करण्यात आली. काही रस्ते रात्री धुण्यास सुरुवात केली. त्यामुळे रस्ते चकाचक दिसू लागले. होळकर यांच्या काळानंतर पहिल्यांदाच इंदूरमध्ये रस्ते धुण्याचा उपक्रम राबविण्यात आला. स्वच्छ केलेल्या रस्त्यांवर पुन्हा कुणी कचरा फेकू नये म्हणून पथकाद्वारे पाळत ठेवण्यात आली. कारवाईमुळे कर्मचारी लागले सफाईला इंदूर महापालिकेत सुमारे सहा हजार सफाई कर्मचारी आहेत. या कर्मचाऱ्यांवर दररोजच्या सफाईची जबाबदारी होती. मात्र यापैकी सुमारे साडेचार हजार कर्मचारी प्रत्यक्षात सफाईचे कामच करीत नव्हते. आरोग्य निरीक्षक किंवा तत्सम अधिकाऱ्यांशी हातमिळवणी करून फक्त पगार घेत होते. महापालिका प्रशासनाने कडक कारवाई करीत ५०० सफाई कर्मचाऱ्यांना कार्यमुक्त केले. यामुळे इतर कर्मचारी वठणीवर आले. नियमित सफाई करू लागले. जगजागृतीसाठी स्वयंसेवी संस्थांची मदत घराघरातून कचरा उलण्यास सुरुवात केल्यानंतर या मोहिमेला नागरिकांचा प्रतिसाद मिळणे आवश्यक होते. त्यामुळे जनजागृतीसाठी ४०० स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी व सामाजिक संघटनांची मदत घेण्यात आली. याशिवाय स्वच्छतेचे महत्त्व, फायदे पटवून देणारे होर्डिंग्ज, बॅनर, पोस्टर शहरात लावण्यात आले. चित्रपटगृहांमध्ये याची जाहिरात करण्यात आली. सोशल मीडियाचीही मदत घेण्यात आली. कचरा गाड्यांवर सुरेल गाणी घरोघरी कचरा उचलण्यासाठी जाणाऱ्या गाड्यांवर लाऊड स्पीकर लावण्यात आले. त्यावर दररोज ‘स्वच्छ भारत का इरादा कर लिया हमने’ हे महापालिकेने तयार करून घेतलेले गाणे लावले जायचे. शहरात स्वच्छता अभियान राबविले जात असून सुजाण नागरिक म्हणून स्वच्छता राखणे ही आपलीही जबाबदारी आहे, याची जाणीव नागरिकांना करून देण्यात आली. या सकारात्मक परिणाम दिसून आला. नागरिकांनी