शहरं
Join us  
Trending Stories
1
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
2
Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
3
सोने, स्टॉक की बिटकॉइन? अब्जाधीश गुंतवणूकदार रे डॅलिओ यांनी निखिल कामतसोबत उलगडली गुपिते
4
राज्यातील महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसचे ४० स्टार प्रचारक जाहीर; पाहा, संपूर्ण यादी
5
ठाकरे एकत्र, युती लवकरच; पण मनसेला समाधानकारक जागा मिळतील का?; संदीप देशपांडेचे मोठे विधान
6
DJ वाजवण्यापासून रोखलं, लग्नाची मिरवणूक निघण्यापूर्वीच नवरदेवानं उचललं टोकाचं पाऊल
7
ईशनिंदा नव्हे...! वाद प्रमोशनचा होता अन् धर्माच्या नावानं मारून टाकलं; दीपूचंद्र दासच्या कुटुंबाचा धक्कादायक खुलासा
8
संघर्षाचं सोनं झालं अन् 'आशा' बनली नगराध्यक्ष, नीलडोहच्या भूमिका मंडपेंची प्रेरणादायी वाटचाल 
9
Amravati Crime: प्रेमजाळं, ती २६ वर्षांची, तो २१ वर्षांचा! अनेकवेळा अत्याचार, दोनदा गर्भपात अन् तरीही धनंजयचा लग्नास नकार!
10
Vijay Hazare Trophy : किंग कोहली मैदानात उतरणार; पण स्टेडियममध्ये चाहत्यांना नो एन्ट्री; कारण...
11
“मुंबईत २०० जागांवर तयारी, ५० टक्के फॉर्म्युलाचा आग्रह, काँग्रेस…”; प्रकाश आंबेडकर थेट बोलले
12
MNS Shiv Sena UBT Alliance: ऐनवेळी ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा टळली, संजय राऊतांनी सांगितली नवी वेळ
13
Chanakya Niti: रातोरात श्रीमंत व्हाल, जर चाणक्यनीतीच्या 'या' ५ सवयी आजच लावून घ्याल
14
प्रसिद्ध व्हिस्की कंपनीने अचानक उत्पादन केले बंद! तब्बल १ हजार कर्मचाऱ्यांचे भविष्य टांगणीला
15
Dhurandhar: पाकिस्तानातील कराचीमध्ये राहायचे रणवीर सिंगचे आजोबा, पण घडलं असं काही की...
16
“कुणीही एकत्र येऊ शकते, पण मराठी माणूस हा पूर्णपणे भाजपाच्या पाठीशी उभा आहे”; कुणाचा दावा?
17
"...तर मग ऑपरेशन सिंदूर तरी कुठे चुकीचे होते?" मुनीर यांच्यावर पाकिस्तानी मौलानांचा कडाडून हल्ला
18
घसरत्या रुपयाला सावरण्यासाठी आरबीआयची धडपड; बाजारात विकले तब्बल....अब्ज डॉलर
19
पंचक २०२५: सावधान! २४ ते २९ डिसेंबर दरम्यान 'पंचक' काळ; 'या' ७ राशींनी राहावे अधिक सतर्क!
20
सोन्या-चांदीचे दर गगनाला भिडले, आज सर्व जुने रेकॉर्ड मोडले! पटापट चेक करा १४ ते २४ कॅरेटपर्यंतचे 'लेटेस्ट रेट'
Daily Top 2Weekly Top 5

विकास कामासाठी झाडांची कत्तल कशाला?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 6, 2020 04:08 IST

आशु सक्सेना यांनी इंटर मॉडेल स्टेशन प्रकल्पाबाबत बोलताना लोकमतच्या मोहिमेचे कौतुक केले. त्या म्हणाल्या, अजनीच्या इंटर माॅडेल स्टेशनसाठी पर्यायाचा ...

आशु सक्सेना यांनी इंटर मॉडेल स्टेशन प्रकल्पाबाबत बोलताना लोकमतच्या मोहिमेचे कौतुक केले. त्या म्हणाल्या, अजनीच्या इंटर माॅडेल स्टेशनसाठी पर्यायाचा विचार करण्याची गरज आहे. खापरी, बुटीबाेरी, गाेधनी किंवा कामठी स्टेशनवरही त्याचा विकास हाेऊ शकतो आणि या भागात झाले तर शहरात येणारी गर्दी विभाजित हाेईल. उलट अजनी येथे माॅडेल स्टेशन झाल्यास गर्दी कमी हाेण्याऐवजी वाढेल. परिणाम पाहिल्यानंतर पुन्हा नवीन याेजना आखावी लागेल. त्यामुळे भविष्याचा विचार करून आताच नियाेजन गरजेचे आहे, असे मत सक्सेना यांनी व्यक्त केले. तसेही नागपूर रेल्वे स्टेशन, गणेशपेठ बसस्थानक, माेरभवन, अजनी स्टेशन व मेट्राे स्टेशनही फार दूर नाहीत. त्यामुळे या प्रकल्पाने लाभ मिळेलच, याचा भरवसा देता येणार नाही, अशी भावना त्यांनी व्यक्त केली. दुसरीकडे नागपूर शहरालगत १० किमीचे क्षेत्र मेट्राे रिजनमध्ये समाविष्ट करण्यात आले आहे. भविष्यात ते वाढून २५ किलाेमीटरपर्यंत वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे विकास कार्य करायचे आहे, सिमेंट राेड बनवायचे आहेत किंवा इंटर माॅडेल स्टेशन तयार करायचे आहे तर या नवीन क्षेत्राचा विचार करणे आवश्यक आहे. यामुळे जुने इन्फ्रास्ट्रक्चर शाबूत राहील आणि नवीन पर्यायही उपलब्ध हाेतील.

त्यांनी सांगितले, शहराच्या इतिहासाकडे लक्ष दिल्यास नागपूरचे संस्थापक बख्त बुलंदशाहपासून राजे रघुजी भाेसले आणि इंग्रजांनीही रिक्त जागेवर विकास कामे केली आणि जुन्या स्ट्रक्चरला नष्ट केले नाही. त्यामुळे आताच्या प्रशासनानेही जुने इन्फ्रास्ट्रक्चर आणि पर्यावरणाला नुकसान न हाेऊ देता विकास कामे करायला हवी, जे अधिक याेग्य ठरेल. त्यानुसार याेजना आखल्या पाहिजे. नागरिकांच्या टॅक्सचे पैसे असे वारेमाप खर्च करण्यात अर्थ नाही, अशी भावना त्यांनी व्यक्त केली.

वर्तमान काळात रुग्णालयाची गरज

आशु सक्सेना म्हणाल्या, काेराेनासारख्या महामारीचा धाेका लक्षात घेता वर्तमान काळात इंटर माॅडेल स्टेशनपेक्षा रुग्णालय उभारणे गरजेचे आहे. कारण शहराचा विस्तार झाला असला तरी रुग्णालयाची संख्या वाढली नाही. मेडिकल व मेयाेवर अधिक ताण पडत आहे. त्यामुळे कामठी, बुटीबाेरी, खापरी आणि गाेधनी परिसरात रुग्णालय उभारणे आवश्यक आहे. महापालिकेनेही नवीन रुग्णालय व प्राथमिक आराेग्य केंद्राची संख्या वाढविणे आवश्यक आहे. मात्र हे सर्व करताना पर्यावरणाला हानी पाेहचणार नाही, याची काळजी घ्यावी, असे आवाहनही त्यांनी केले.