शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
5
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
6
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
7
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
8
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
9
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
10
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
11
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
12
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
13
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
14
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
15
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
16
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
17
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
18
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
19
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
20
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
Daily Top 2Weekly Top 5

गोवा-उत्तर प्रदेशातील मंदिर प्रवेश बंदीवर भाजप गप्प का?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2021 04:10 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केवळ महाराष्ट्रच नव्हेतर, गोवा आणि उत्तर प्रदेशातही मंदिरांमध्ये प्रवेश बंदी आहे. मग ...

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केवळ महाराष्ट्रच नव्हेतर, गोवा आणि उत्तर प्रदेशातही मंदिरांमध्ये प्रवेश बंदी आहे. मग तेथील मंदिर प्रवेश बंदीबाबत भाजप गप्प का, असा सवाल विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी भाजपचे नाव न घेता उपस्थित केला. गुरुवारी नागपूर जिल्ह्यातील कोरोनामुक्त गावांचा आढावा घेतल्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या. राज्यात मंदिर प्रवेश सुरू करावा, यासाठी सुरू असलेल्या आंदोलनाबाबत पत्रकारांनी विचारले असता त्यांनी उपरोक्त सवाल केला.

नीलम गोऱ्हे म्हणाल्या, मंदिर प्रवेश हा सध्या एकाच पक्षाचा प्रश्न आहे. मंदिरे उघडावीत असे आम्हालाही वाटते. परंतु कोरोनाची तिसरी लाट येऊ नये म्हणून सरकार काळजी घेत आहे. मंदिरांमध्ये पूजा-अर्चना करताना संसर्ग होण्याची भीती आहे. सध्याची परिस्थिती पाहता अधिक विज्ञानवादी होणे गरजेचे आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले. या वेळी त्यांनी कोरोना व लसीकरणासंदर्भात केंद्र सरकारचे नियोजन योग्य नसल्याकडेही लक्ष वेधले. देशात जानेवारीमध्ये लसीकरणाला सुरुवात झाली. त्यापूर्वी जगभरात डिसेंबरमध्येच लसीकरणाला सुरुवात झाली होती. सर्वांचे एकत्रित लसीकरण करता आले असते. परदेशातून येणाऱ्या प्रवाशांना बंदी घालता आली असती. व्हॅक्सिन डिप्लोमसी तेव्हा न करता आता करता आली असती, असे उदाहरणही त्यांनी दिले. यासोबतच कोरोनासारख्या महामारीशी पहिल्यांदाच सर्वांना सामना करावा लागला. केंद्र सरकारसाठीही ते नवीन असल्याचेही त्यांनी या वेळी सांगितले. याप्रसंगी आ. आशिष जयस्वाल आणि आ. दुष्यंत चतुर्वेदी उपस्थित होते.

- संसद गुंडाळावी लागली हे योग्य नाही

संसदेमध्ये जो काही प्रकार घडला आणि त्यामुळे संसद गुंडाळावी लागली ते योग्य झाले नाही. संसदीय कामकाज योग्यपणे पार पाडण्यासाठी गटनेत्यांची बैठक घेतली जाते. त्यात दिवसभराचे कामकाज ठरविले जाते. गटनेत्यांना विश्वासात घेऊन जर कामकाज झाले तर असे प्रकार टाळता येतात, असे उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी संसदेत घडलेल्या घटनेसंदर्भात सांगितले.