शहरं
Join us  
Trending Stories
1
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
2
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
3
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
4
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
5
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
6
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
7
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
8
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
9
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
10
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
11
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
12
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
13
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान
14
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
15
अशोक चव्हाणांसारखा ‘वनवास’ सर्वांना मिळो हीच कार्यकर्त्याची भावना; काँग्रेसचा खोचक टोला
16
"आम्हीही खूप काही बोलू शकतो, मी जर तिथे असतो तर..."; हस्तांदोलन प्रकरणावर शोएब अख्तर बरळला
17
अणुबॉम्बसारखा स्फोट! भर समुद्रात ज्वालामुखी उद्रेक; जीव वाचवण्यासाठी पर्यटकांची धावाधाव...
18
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
हैदराबाद गॅजेट टिकवणे सरकारची जबाबदारी, अन्यथा सरकारला सुट्टी नाही; मनोज जरांगेंचा इशारा
20
बिंग फुटले, आता चौकशी करतायत...! युक्रेनने भारताकडून आयात करत असलेले डिझेल रोखले 

शेतकऱ्यांनी धान विकायचा कुणाला?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2021 04:08 IST

कैलास निघाेट लाेकमत न्यूज नेटवर्क देवलापार : शेतकऱ्यांकडील धानाला चांगला भाव मिळावा म्हणून राज्य शासनाने रामटेक तालुक्यात आदिवासी विकास ...

कैलास निघाेट

लाेकमत न्यूज नेटवर्क

देवलापार : शेतकऱ्यांकडील धानाला चांगला भाव मिळावा म्हणून राज्य शासनाने रामटेक तालुक्यात आदिवासी विकास महामंडळ आणि महाराष्ट्र राज्य पणन महामंडळाच्या माध्यमातून धान खरेदी केंद्र सुरू केले हाेते. ही सर्व केंद्र नाेंदणीकृत शेतकऱ्यांकडे शिल्लक असलेल्या धानाचे पूर्णपणे माेजमाप न करता ३१ मार्च राेजी बंद करण्यात आली. त्यामुळे या शेतकऱ्यांनी त्यांच्याकडील धान विकायचा कुणाला, असा प्रश्न निर्माण झाला आहे. हा धान व्यापाऱ्यांना विकाला तर शेतकऱ्यांना प्रतिक्विंटल १,२०० ते १,३०० रुपयांचे नुकसान सहन करावे लागते.

या दाेन्ही शासकीय संस्थांनी त्यांचे धान खरेदी केंद्र उशिरा म्हणजेच डिसेंबरमध्येे सुरू केले. मध्यंतरी केंद्रांवरील धानाच्या पाेत्यांची उचल करण्यात न आल्याने ते केंद्र किमान महिनाभर बंद हाेते. ते पुढे फेब्रुवारीमध्ये सुरू करण्यात आले. त्यातच या केंद्रावरील धानाच्या माेजमापाचा वेगही खूप संथ हाेता. या केंद्रांवर धानाची विक्री करण्यासाठी शेतकऱ्यांनी शासनाच्या नियमानुसार नाेंदणीही केली हाेती. धान माेजणीसाठी आपला नंबर लागेल या प्रतीक्षेत असताना शासनाने धान खरेदी केंद्र बंद केले आणि शेतकरी अडचणीत सापडले.

सध्या ग्रामीण भागात काेराेनाचे संक्रमण वाढत असून, भीतीपाेटी नागरिक काेराेना टेस्ट करायला तयार नाहीत. रिपाेर्ट पाॅझिटिव्ह आल्यावर सरकारी दवाखान्यात उपचारासाठी जागा नाही आणि खासगी डाॅक्टरांकडे उपचार करण्यास पैसा नाही. त्यातच घरात धान विक्रीविना पडून आहेत, अशा प्रतिक्रिया शेतकऱ्यांनी व्यक्त केल्या. आदिवासी विकास महामंडळाच्या धान खरेदी केंद्रावर खूप त्रास झाल्याची माहिती शेतकऱ्यांनी दिली. या केंद्रावर धानाच्या पाेत्यांची उचल न केल्याने नवीन पाेती ठेवायला जागा नाही, असे सांगून महिनाभर खान खरेदी बंद ठेवण्यात आली. त्यामुळे शासनाने धान खरेदीला किमान महिनाभराची मुदतवाढ द्यायला हवी हाेती, असेही काही शेतकऱ्यांनी सांगितले. या केंद्रांवर धानाचे माेजमाप मुद्दाम संथगतीने करण्यात आले, असा आराेपही शेतकऱ्यांनी केला आहे.

...

आठवड्यातील तीन दिवस माेजमाप

बंद केलेली काही धान खरेदी केंद्रं जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांच्या आदेशान्वये १८ दिवसांनी सुरू करण्यात आली. बांद्रा व टुयापार येथील धान खरेदी केंद्र आदिवासी विविध कार्यकारी सोसायटीला दिले हाेते. या साेसायटीच्या कार्यकारी मंडळाची निवडणूक झाली नसल्याने सोसायटीवर प्रशासकाची नियुक्ती केली हाेती. त्यांना एक नव्हे दाेन खरेदी केंद्र सुरू करण्याची परवानगी देण्यात आली. त्याच्याकडे पुरेसे मनुष्यबळ नसल्याने त्यांनी या दाेन्ही केंद्रांवर आठवड्यातील तीन दिवस धानाचे माेजमाप केले आणि चार दिवस केंद्र बंद ठेवले हाेते. या बाबी शासनाने ग्राह्य धरायला पाहिजे.

...

दरवर्षी गुदामे फुल्ल

रामटेक तालुक्यात सहा ठिकाणी धान खरेदी केंद्र सुरू करण्यात आले हाेते. यातील बेर्डेपारवगळता सर्वच केंद्रांच्या गुदामांची क्षमता कमी आहे. या गुदाम क्षमतेबाबत सर्वांनाच इत्थंभूत माहिती असून, दरवर्षी गुदाम फुल्ल असल्याचे कारण सांगून खरेदी केंद्र बंद केले जाते. मात्र, गुदामांची क्षमता वाढविणे किंवा पर्यायी व्यवस्था केली जात नाही. या केंद्रांवर धानाचे माेजमाप करताना घाेळ केला जाताे. मर्जीतील शेतकऱ्यांची एकाचवेळी नाेंदणी व धानाचे माेजमाप करण्यात आल्याचे तसेच आधी नाेंदणी केलेल्या शेतकऱ्यांकडील धानाचे अद्याप माेजमाप न केल्याची अनेक उदाहरणे आहेत. बहुतांश केंद्रांवर व्यापाऱ्यांकडील धानाची खरेदी केली जाते. मात्र, या गंभीर प्रकाराकडे कुणीही लक्ष देत नाही.