शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासाठी मिळणार चांगली बातमी? H-1B च्या तणावादरम्यान एस जयशंकर आणि अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्र्यांची भेट
2
PAK vs SL Live Streaming : 'करो वा मरो' लढत; पाकचा रेकॉर्ड भारी! पण तरी त्यांना असेल लंकेची धास्ती; कारण...
3
ट्रम्प यांच्या 50 टक्के टॅरिफला भारतानं का दिलं नाही उत्तर? राजनाथ सिंह यांचा परदेशातून मोठा खुलासा!
4
आता तुम्हीच ओपनिंगला जा! IND vs PAK मॅचनंतर इम्रान खान यांचा PCB अध्यक्ष नक्वी यांना 'यॉर्कर'
5
'मला रिकामं ठेवू नका'; धनंजय मुंडेंच्या विनंतीवर अजित पवार म्हणाले, 'सूचनेचे पालन केलं जाईल'
6
"ED, EVM, भौकने वाले..., फौज तेरी भारी है; जंजीरों में जकड़ा हुआ जयंत पाटील..." पडळकरांच्या वक्तव्यावरून अमोल कोल्हेंचा हल्लाबोल
7
'सुप्रीम कोर्ट आता बेल कोर्ट बनलं आहे'; जामीन अर्जांची संख्या पाहून न्यायमूर्ती नागरत्ना यांनी व्यक्त केली चिंता
8
IND vs AUS : मॅच आधी टीम इंडियाचा कॅप्टन बदलला! श्रेयस अय्यर अचानक घरी परतला; कारण....
9
"सनातनी हज यात्रेला जात नाहीत, त्यांच्या लोकांनीही...; गरबा मंडपाच्या दरवाजावर गोमूत्र ठेवा!"; धीरेंद्र शास्त्री यांचा सल्ला
10
"२० ओव्हर्स टिकणार त्या दिवशी २०० धावा ठोकणार"; अभिषेक शर्मासंदर्भात मोठी भविष्यवाणी
11
बाई, काय हा प्रकार! पाकिस्तान बेक्कार हरला, तरीही हॅरिस रौफच्या बायकोने केली 'तशी' पोस्ट
12
उद्धवसेनेच्या दसऱ्या मेळाव्याला राज ठाकरे जाणार? टिझरने वेधले लक्ष, मिळाले सूचक संकेत!
13
'Before आणि After चा बोर्ड पाहून आनंद झाला', GST 2.0 बाबत PM मोदींचे देशाच्या नावे पत्र
14
India vs West Indies Test Series: गिलच्या संघातून रिषभ पंत 'आउट'; कोण घेणार त्याची जागा?
15
IND vs PAK: "तुम्ही जर पातळी सोडून वागायला लागलात तर बॅटने..."; इरफानने पाकिस्तानला सुनावलं
16
'पोलीस बाजूला ठेवा, दम असेल तर एकदा रणांगणात या'; निलेश लंकेंचा गोपीचंद पडळकरांना जाहीर इशारा
17
‘मला रिकामे ठेवू नका’, मुंडेंच्या विधानावर जरांगेची प्रतिक्रिया; म्हणाले, “रोजगार हमीवर जा”
18
'बेनिफिट ऑफ डाउट' मिळाला असता तर आम्ही जिंकलो असतो; 'त्या' निर्णयावर अख्तरची 'बोलंदाजी'
19
नेपाळमध्ये ‘Gen Z’चे आंदोलन, RSS नेत्यांचे विधान; म्हणाले, “जगात षड्‍यंत्र, हिंदू समाज...”
20
१५ दिवसात भाजपच्या दुसऱ्या नगरसेवकाला अटक; टोळीला हाताशी धरुन केला गोळीबार, पैसेही पुरवले

कॉंग्रेस-भाजपच्या ‘हात’मिळवणीत विजय कुणाचा?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 28, 2020 04:11 IST

अभय लांजेवार उमरेड : राज्यात भाजपला सत्तेपासून रोखण्यासाठी कॉंग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना या तीन पक्षांची महाआघाडी झाली. दुसरीकडे उमरेड ...

अभय लांजेवार

उमरेड : राज्यात भाजपला सत्तेपासून रोखण्यासाठी कॉंग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना या तीन पक्षांची महाआघाडी झाली. दुसरीकडे उमरेड नगर पालिकेत भलतेच चित्र समोर आले. उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीत भाजप उमेदवाराला कॉंग्रेसच्या नगरसेवकांनी मतदान केले. कॉंग्रेस-भाजपच्या या ‘हात’मिळवणीत विजय नेमका कोणत्या पक्षाचा झाला, यावर आता चर्चा रुंगू लागल्या आहेत.

उमरेड पालिकेत भाजपची सत्ता आहे. उमरेडकरांनी २५ पैकी १९ नगरसेवक भाजपचे निवडून दिले. नगराध्यक्ष म्हणून विजयलक्ष्मी भदोरिया यांना पसंती दिली. दुसरीकडे कॉंग्रेसला केवळ ६ जागेवरच करिश्मा दाखविता आला. या आकडेवारीवरून उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीत भाजपचे संपूर्ण १९ नगरसेवक एकजूट दाखवतील आणि उपाध्यक्ष ठरवतील, असे सर्वांनाच वाटले. झाले भलतेच. गंगाधर फलके आणि अरूणा हजारे हे दोन नगरसेवक एकमेकांविरूद्ध उभे ठाकले. भाजप विरुद्ध भाजप अशा लढाईत कॉंग्रेसने ‘हात’मिळवणी केली. भाजपाच्या एका गटाला संपूर्ण सहा मते बहाल केली आणि विजय आमचा झाला अशा तोऱ्यात फटाके फोडले.

साधारणत: वर्षभरानंतर पालिकेच्या निवडणुकांचे पडघम वाजणार आहे. अशावेळी एकमेकांना पाण्यात पाहण्याचे राजकारण या निवडणुकीतून समोर आले आहे. याचे पडसाद येणाऱ्या काळात नक्कीच दिसून येतील, लाभ कोणत्या पक्षाच्या पदरात पडेल हे आत्ताच सांगता येणार नाही.

एकजूट राखण्यात अपयश

माजी आमदार सुधीर पारवे, आनंद राऊत, कृऊबासचे सभापती रूपचंद कडू, शहराध्यक्ष दिलीप सोनटक्के, गटनेता डॉ. मुकेश मुदगल अशी नेत्यांची फौज भाजपात आहे. नियोजनबद्ध काम असताना आणि एकतर्फी लढाई असताना नगरसेवकांमध्ये एकजूट राखण्यात भाजप का अयशस्वी ठरली, हा चिंतनाचा विषय ठरला आहे.

कॉंग्रेसच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह

कॉंग्रेसने सुरेश चिचमलकर याला उपाध्यक्षपदाच्या मैदानात उतरविल्यानंतर चिचमलकरसह सारेच मते भाजपच्या पारड्यात गेली. यामागे नेमके कोणते गणित होते, असा प्रश्न येणाऱ्या निवडणुकीत मतदाता माजी मंत्री राजेंद्र मुळक, आमदार राजू पारवे, माजी नगराध्यक्ष गंगाधर रेवतकर, शहर अध्यक्ष सुरेश पौनीकर आदींना विचारल्याशिवाय राहणार नाही. या संपूर्ण नाट्यमय घडामोडीनंतर विजय नेमका भाजपचा झाला की कॉंग्रेसचा या प्रश्नावर ‘विनोद’ निर्मिती होत आहे.