शहरं
Join us  
Trending Stories
1
सीरियावरील हल्ल्यांमुळे इराण संतापला; इस्रायलला जन्माची अद्दल घडवण्यासाठी आखला प्लॅन
2
ना कॉल ना गिफ्ट...! शमीची पोस्ट बघून हसीन जहाँच्या मनात आली ही गोष्ट, म्हणाली...
3
उद्योगपती कल्याणींच्या कन्येची वडिलोपार्जित मालमत्तेवरील मालकी हक्कासाठी कराड न्यायालयात धाव
4
"आम्ही युद्धाला घाबरत नाही, आमचं संपूर्ण आयुष्य..."; सीरियाच्या राष्ट्राध्यक्षांचा इस्रायलला इशारा
5
IND vs ENG : नो रिस्क; बुमराह चौथा कसोटी सामना खेळणार हे जवळपास फिक्स! प्रशिक्षकांनीच दिली हिंट
6
VIDEO: अंबरनाथ पालिकेत दोन ठेकेदारांमध्ये पोलिसांसमोरच सुरू झाली फ्री-स्टाइल हाणामारी
7
टाटा समूहाच्या हॉटेल कंपनीला २९६ कोटींचा नफा, ५ वर्षांत गुंतवणूकदारांना केलं मालामाल; दिला बंपर परतावा!
8
"महाराष्ट्र झाले २० टक्के कमिशनचे राज्य, राज्यात सत्ताधारी टॉवेल बनियन गँगचा धुमाकूळ’’, विजय वडेट्टीवार यांची टीका  
9
"राज्यात पाच महिन्यात १ लाख ६० हजार गुन्हे, ९२४ हत्या", अंबादास दानवे यांनी मांडली धक्कादायक आकडेवारी
10
विधिमंडळात पडळकर आणि आव्हाडांच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी; CM फडणवीस म्हणाले, 'हे योग्य नाही'
11
अहमदाबादमधील विमान अपघात वैमानिकांच्या चुकीमुळे? AAIBने स्पष्टच सांगितलं, ते दावे फेटाळले
12
काल पडळकर आणि आव्हाडांमध्ये वाद, आज दोन्ही नेत्यांचे कार्यकर्ते भिडले, विधानभवन परिसरात पुन्हा राडा, पाहा VIdeo
13
"भगवद्गीता वाचून हिंदू झालो, पण हिंदू होण्यासाठी...?" बाबा बागेश्वर आणि पाकिस्तानचे आरिफ अजाकिया यांच्यातील प्रश्नोत्तर व्हायरल
14
CM फडणवीस म्हणाले त्रिभाषा सूत्र लागू करणार; उद्धव ठाकरेंनी हिंदीला विरोध करणारे पुस्तकच भेट दिलं
15
Ghatkopar Wall Collapse: घराच्या दुरुस्तीदरम्यान भिंत कोसळल्याने कामगाराचा मृत्यू, घाटकोपर येथील घटना!
16
दिसला गं बाई दिसला... अखेर सारा तेंडुलकर अन् शुबमन गिलचा 'तो' VIDEO सापडलाच..!!
17
२४ तासांत ३० किलो वजन कमी करण्याची हमी, शस्त्रक्रियेनंतर लगेच महिलेचा मृत्यू   
18
यूपी पोलिसांच्या एन्काउंटरमध्ये २३८ गुन्हेगार ठार, तर ९ हजारांहून अधिक गोळीबारात जखमी
19
IND W vs ENG W : वनडेत एक नंबर कामगिरी! स्मृती-प्रतिका सलामी जोडीनं सेट केला वर्ल्ड रेकॉर्ड
20
"बिहारमध्ये बांगलादेशी-रोहिंग्या सापडले, पण पहलगामचे दहशतवादी..."; ओवैसींची सरकारवर टीका

कॉंग्रेस-भाजपच्या ‘हात’मिळवणीत विजय कुणाचा?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 28, 2020 04:11 IST

अभय लांजेवार उमरेड : राज्यात भाजपला सत्तेपासून रोखण्यासाठी कॉंग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना या तीन पक्षांची महाआघाडी झाली. दुसरीकडे उमरेड ...

अभय लांजेवार

उमरेड : राज्यात भाजपला सत्तेपासून रोखण्यासाठी कॉंग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना या तीन पक्षांची महाआघाडी झाली. दुसरीकडे उमरेड नगर पालिकेत भलतेच चित्र समोर आले. उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीत भाजप उमेदवाराला कॉंग्रेसच्या नगरसेवकांनी मतदान केले. कॉंग्रेस-भाजपच्या या ‘हात’मिळवणीत विजय नेमका कोणत्या पक्षाचा झाला, यावर आता चर्चा रुंगू लागल्या आहेत.

उमरेड पालिकेत भाजपची सत्ता आहे. उमरेडकरांनी २५ पैकी १९ नगरसेवक भाजपचे निवडून दिले. नगराध्यक्ष म्हणून विजयलक्ष्मी भदोरिया यांना पसंती दिली. दुसरीकडे कॉंग्रेसला केवळ ६ जागेवरच करिश्मा दाखविता आला. या आकडेवारीवरून उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीत भाजपचे संपूर्ण १९ नगरसेवक एकजूट दाखवतील आणि उपाध्यक्ष ठरवतील, असे सर्वांनाच वाटले. झाले भलतेच. गंगाधर फलके आणि अरूणा हजारे हे दोन नगरसेवक एकमेकांविरूद्ध उभे ठाकले. भाजप विरुद्ध भाजप अशा लढाईत कॉंग्रेसने ‘हात’मिळवणी केली. भाजपाच्या एका गटाला संपूर्ण सहा मते बहाल केली आणि विजय आमचा झाला अशा तोऱ्यात फटाके फोडले.

साधारणत: वर्षभरानंतर पालिकेच्या निवडणुकांचे पडघम वाजणार आहे. अशावेळी एकमेकांना पाण्यात पाहण्याचे राजकारण या निवडणुकीतून समोर आले आहे. याचे पडसाद येणाऱ्या काळात नक्कीच दिसून येतील, लाभ कोणत्या पक्षाच्या पदरात पडेल हे आत्ताच सांगता येणार नाही.

एकजूट राखण्यात अपयश

माजी आमदार सुधीर पारवे, आनंद राऊत, कृऊबासचे सभापती रूपचंद कडू, शहराध्यक्ष दिलीप सोनटक्के, गटनेता डॉ. मुकेश मुदगल अशी नेत्यांची फौज भाजपात आहे. नियोजनबद्ध काम असताना आणि एकतर्फी लढाई असताना नगरसेवकांमध्ये एकजूट राखण्यात भाजप का अयशस्वी ठरली, हा चिंतनाचा विषय ठरला आहे.

कॉंग्रेसच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह

कॉंग्रेसने सुरेश चिचमलकर याला उपाध्यक्षपदाच्या मैदानात उतरविल्यानंतर चिचमलकरसह सारेच मते भाजपच्या पारड्यात गेली. यामागे नेमके कोणते गणित होते, असा प्रश्न येणाऱ्या निवडणुकीत मतदाता माजी मंत्री राजेंद्र मुळक, आमदार राजू पारवे, माजी नगराध्यक्ष गंगाधर रेवतकर, शहर अध्यक्ष सुरेश पौनीकर आदींना विचारल्याशिवाय राहणार नाही. या संपूर्ण नाट्यमय घडामोडीनंतर विजय नेमका भाजपचा झाला की कॉंग्रेसचा या प्रश्नावर ‘विनोद’ निर्मिती होत आहे.