शहरं
Join us  
Trending Stories
1
'लाडकी बहीण'नंतर आणखी एका योजनेची घोषणा; महायुती सरकारची नोकरदार महिला वर्गाला मोठी भेट
2
"मर्सिडिज, महागडा फोन अन् ३५ लाख दिले तरीही..."; मृत्यूपूर्वी युवकाचा भाजपा नेत्यावर गंभीर आरोप
3
घर सोडले, गाव सोडले अन् निघाल्या थेट मुंबईकडे; टीसीच्या सतर्कतेमुळे 'त्या' दोघी सुखरूप बचावल्या
4
अमेरिकेच्या 'टॅरिफ'विरुद्ध चीन भारतासोबत उभा! चीनच्या राजदूताने डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका केली
5
"शेर हमेशा शेर ही रहता है..."  २०२६ ची निवडणूक स्वबळावर; DMK, भाजपासोबत युती नाही, विजयची घोषणा
6
१८ किमी अंतर, २० मिनिटांचा वेळ...फिल्मी स्टाईलनं अर्चना तिवारीनं बदलला लूक, CCTV मध्ये कैद
7
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
8
CSK च्या अकादमीत MI अन् RCB चे चाहते! ऋतुराज म्हणाला; प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवीन! (VIDEO)
9
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
10
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
11
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
12
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
13
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
14
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
15
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
16
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
17
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
18
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
19
Shreyas Iyer: बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
20
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!

लाखोंची लेनदेन काळजी कोण घेणार ?

By admin | Updated: June 26, 2015 02:41 IST

लाखोंची लेनदेन करताना पुरेशी खबरदारी घेतली जात नाही. त्यामुळे उपराजधानीत चोर-लुटारूंचे फावते आहे.

हलगर्जीपणा भोवतोय : व्यापाऱ्यांसोबतच पोलिसही अस्वस्थनागपूर : लाखोंची लेनदेन करताना पुरेशी खबरदारी घेतली जात नाही. त्यामुळे उपराजधानीत चोर-लुटारूंचे फावते आहे. इतवारीतील धर्मेंद्र झिलपे या धान्य दलालाचे पाच लाख रुपये लुटारूंनी बुधवारी सायंकाळी झटक्यात लंपास केले. त्यानंतर पुन्हा एकदा व्यापारी आणि लुटमारीचा विषय चर्चेला आला आहे. ८ जूनला दिवसाढवळ्या सराफा व्यावसायिक कक्कड यांचे आठ लाख रुपये लुटण्यात आले होते. त्यानंतर १३ जून रोजी भंडारा रोडवरील राऊत यांच्या शोरुममधून १७ लाख रुपये चोरण्यात आले. या घटनांची उकल व्हायची असतानाच आता परत पाच लाख रुपये लुटण्यात आले. त्यामुळे व्यापाऱ्यांवर गुन्हेगार सूक्ष्म नजर ठेवून असल्याचे दिसून येते. विशेष म्हणजे, अशी लुटमार झाल्यानंतर व्यापारी पोलिसांच्या नावाने ओरडतात. पोलीस प्रामाणिकपणे गस्त करीत नाहीत. गुन्हेगारांवर पोलिसांचा जरब नाही, असे आरोप करतात. या घटनेमुळे पुन्हा एकदा व्यापारीबांधवांमध्ये दहशत आणि असुरक्षिततेची भावना निर्माण झाली असून, व्यापारी पोलिसांवर रोष व्यक्त करीत आहेत. दुसरीकडे वरिष्ठ पोलीस अधिकारीही या घटनेमुळे अस्वस्थ झाले असून, ‘स्ट्रीट क्राईम’ रोखण्यासाठी कोणत्या झोनमधून कोणते प्रयत्न केले गेले, त्याचा आढावा पोलीस आयुक्त शारदा प्रसाद यादव यांनी घेतला आहे. रस्त्यावर होणारी गुन्हेगारी (स्ट्रीट क्राईम) रोखण्यासाठी शक्य ते सर्व प्रयत्न करा, अन्यथा निष्क्रिय पोलिसांवरच कारवाई करण्यात येईल, असा सज्जड इशाराही पोलीस आयुक्तांनी दिला आहे. या पार्श्वभूमीवर, बुधवारी काही ठाणेदारांच्या अंतर्गत बदल्याही करण्यात आल्या. कुठे आहेत सीसीटीव्हीगुन्हेगारांचा छडा लावण्यासाठी सीसीटीव्हीचा मोठा फायदा होऊ शकतो. काही वर्षांपूर्वी राज्य सरकारने पायलट प्रोजेक्टच्या नावाखाली उपराजधानीतील मुख्य चौकात सीसीटीव्ही कॅमेरे लावण्याचा निर्णय घेतला होता. महापालिका आणि पोलीस विभागाने त्यासाठी एक प्रस्ताव पाठविला. मात्र, प्रस्तावात सीसीटीव्हीचा खर्च कोट्यवधीत असल्याचे पाहून तो थंडबस्त्यात टाकण्यात आला. त्यानंतर उपराजधानीतील ८०० ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे लावण्याचा प्रस्ताव पाठविण्यात आला. १४ कोटींच्या या प्रस्तावालाही सरकारने थंडबस्त्यात टाकले. त्यानंतर वाहतूक शाखेचे तत्कालीन उपायुक्त चंद्रकिशोर मीणा यांनी दोन कोटींचा प्रस्ताव तयार केला. महत्वाच्या २०० ठिकाणी सीसीटीव्ही लावण्याची योजना या प्रस्तावात होती. मात्र, त्यालाही अद्याप मंजुरी मिळाली नाही.