शहरं
Join us  
Trending Stories
1
"राज्यात पाच महिन्यात १ लाख ६० हजार गुन्हे, ९२४ हत्या", अंबादास दानवे यांनी मांडली धक्कादायक आकडेवारी
2
विधिमंडळात पडळकर आणि आव्हाडांच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी; CM फडणवीस म्हणाले, 'हे योग्य नाही'
3
काल पडळकर आणि आव्हाडांमध्ये वाद, आज दोन्ही नेत्यांचे कार्यकर्ते भिडले, विधानभवन परिसरात पुन्हा राडा, पाहा VIdeo
4
VIDEO: अंबरनाथ पालिकेत दोन ठेकेदारांमध्ये पोलिसांसमोरच सुरू झाली फ्री-स्टाइल हाणामारी
5
"भगवद्गीता वाचून हिंदू झालो, पण हिंदू होण्यासाठी...?" बाबा बागेश्वर आणि पाकिस्तानचे आरिफ अजाकिया यांच्यातील प्रश्नोत्तर व्हायरल
6
अहमदाबादमधील विमान अपघात वैमानिकांच्या चुकीमुळे? AAIBने स्पष्टच सांगितलं, ते दावे फेटाळले
7
"महाराष्ट्र झाले २० टक्के कमिशनचे राज्य, राज्यात सत्ताधारी टॉवेल बनियन गँगचा धुमाकूळ’’, विजय वडेट्टीवार यांची टीका  
8
IND vs ENG : नो रिस्क; बुमराह चौथा कसोटी सामना खेळणार हे जवळपास फिक्स! प्रशिक्षकांनीच दिली हिंट
9
CM फडणवीस म्हणाले त्रिभाषा सूत्र लागू करणार; उद्धव ठाकरेंनी हिंदीला विरोध करणारे पुस्तकच भेट दिलं
10
Ghatkopar Wall Collapse: घराच्या दुरुस्तीदरम्यान भिंत कोसळल्याने कामगाराचा मृत्यू, घाटकोपर येथील घटना!
11
दिसला गं बाई दिसला... अखेर सारा तेंडुलकर अन् शुबमन गिलचा 'तो' VIDEO सापडलाच..!!
12
२४ तासांत ३० किलो वजन कमी करण्याची हमी, शस्त्रक्रियेनंतर लगेच महिलेचा मृत्यू   
13
यूपी पोलिसांच्या एन्काउंटरमध्ये २३८ गुन्हेगार ठार, तर ९ हजारांहून अधिक गोळीबारात जखमी
14
IND W vs ENG W : वनडेत एक नंबर कामगिरी! स्मृती-प्रतिका सलामी जोडीनं सेट केला वर्ल्ड रेकॉर्ड
15
"बिहारमध्ये बांगलादेशी-रोहिंग्या सापडले, पण पहलगामचे दहशतवादी..."; ओवैसींची सरकारवर टीका
16
भारतीय ग्रँडमास्टर्स समोर 'बुद्धी' चालेना! आर. प्रज्ञानंद याने वर्ल्ड नंबर वन कार्लसनला दिला शह
17
२ राजयोग करणार ९ राशींची भरघोस भरभराट, अडकलेली कामे होतील; हाती पैसा राहील, शुभ वरदान काळ!
18
चिनी विद्यार्थिनीला युक्रेनियन तरुणासोबत शारीरिक संबंध ठेवल्याची शिक्षा, विद्यापीठानं उचललं टोकाचं पाऊल
19
नॅशनल पार्कमधील ‘वनराणी’चे रुपडे पालटले; व्हिस्टाडोमसह नव्या अवतारात सेवेत, कधी सुरू होणार?
20
आरोपीच्या बोलावण्यावरून वारंवार हॉटेलमध्ये का गेलात? पती असताना परपुरुषाशी...! बलात्काराचा आरोप करणाऱ्या महिलेला सुप्रीम कोर्टानं फटकारलं

कोण होणार विद्यापीठ कुलसचिव?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 5, 2021 04:06 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाला अखेरीस पूर्णवेळ नियुक्त कुलसचिव मिळणार आहेत. सोमवार व मंगळवारी ...

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाला अखेरीस पूर्णवेळ नियुक्त कुलसचिव मिळणार आहेत. सोमवार व मंगळवारी कुलसचिव पदासाठी मुलाखती होणार आहे. या पदावर निवड व्हावी, यासाठी अनेक अनुभवी उमेदवार रिंगणात आहेत. काही उमेदवार स्वत:च्या कर्तृत्वावर तर काही उमेदवार राजकीय माध्यमातून नियुक्ती होईल, या आशेवर आहेत. तब्बल ४६ उमेदवार रिंगणात असून, मंगळवार किंवा बुधवारी नाव अंतिम होऊ शकते, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

नागपूर विद्यापीठाचे कुलसचिवपद नेहमीच चर्चेत असते. डॉ. अशोक गोमाशे यांनी मुदत पूर्ण होण्याअगोदरच राजीनामा दिला होता. त्यानंतर डॉ. पूरण मेश्राम यांच्याकडे पदाची धुरा आली. परंतु न्यायालयाच्या निर्देशानंतर त्यांनादेखील पदाचा राजीनामा द्यावा लागला. डॉ. नीरज खटी यांच्याकडे प्रभारी जबाबदारी होती. २०१९ मध्ये झालेल्या कुलसचिवपदाच्या मुलाखतींमध्ये डॉ. नीरज खटी यांचीच निवड झाली होती. मात्र डॉ. खटी यांनी तांत्रिक कारणे देत पद स्वीकारण्यास असमर्थतता दाखविली. त्यानंतर अचानकपणे डॉ. अनिल हिरेखण यांची या पदावर राज्य शासनातर्फेच नियुक्ती करण्यात आली. याबाबत विद्यापीठ वर्तुळात अनेकांची आश्चर्य व्यक्त केले होते व राज्य शासनाचा हस्तक्षेप असल्याची चर्चा सुरू झाली होती. अखेरीस विद्यापीठाने कुलसचिवपदाच्या भरतीसाठी जाहिरात काढली.

महाराष्ट्रातून मोठ्या प्रमाणावर उमेदवारांनी अर्ज केले. यात प्रामुख्याने कुलसचिव डॉ. अनिल हिरेखण, वित्त व लेखा अधिकारी डॉ. राजू हिवसे, एआयसीटीईचे सल्लागार डॉ. राजेंद्र काकडे, विद्यार्थी कल्याण संचालक डॉ. अभय मुद्गल, कविकुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठाचे माजी कुलसचिव डॉ. अरविंद जोशी, भूषण महाजन, डॉ. श्याम कोरेटी इत्यादींचा समावेश आहे.

राजकीय धावाधाव

कुलसचिव पदाच्या मुलाखतीच्या अगोदर अनेक उमेदवारांची राजकीय धावाधाव सुरू होती. कुणी राज्यातील मंत्र्यांकडे शब्द टाकला आहे, तर काही उमेदवारांनी शिक्षण मंचाच्या माध्यमातून दावा केला आहे. शिक्षण मंचानेदेखील पूर्ण ताकद पणाला लावली आहे. अशा स्थितीत निवड समिती राजकीय संबंधांना जास्त महत्त्व देते की खरोखर क्षमता असलेल्या उमेदवाराला संधी मिळणार, याकडे विद्यापीठ वर्तुळाचे लक्ष लागले आहे.