शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
4
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
5
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
6
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
7
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
8
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
9
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
10
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
11
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
12
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
13
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
14
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
15
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
16
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
17
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
18
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
19
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
20
“नगरपालिका निवडणुकीतील महायुतीचा विजय निवडणूक आयोगाच्या आशिर्वादाने”: हर्षवर्धन सपकाळ
Daily Top 2Weekly Top 5

वाघाचा बंदाेबस्त करायचा कुणी?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2021 04:09 IST

लाेकमत न्यूज नेटवर्क पारशिवनी : पेंच व्याघ्र प्रकल्पाच्या नागलवाडी रेंजअंतर्गत येणाऱ्या पारशिवनी तालुक्यातील ढवलापूर व सावंगी शिवारात वाघाचा वावर ...

लाेकमत न्यूज नेटवर्क

पारशिवनी : पेंच व्याघ्र प्रकल्पाच्या नागलवाडी रेंजअंतर्गत येणाऱ्या पारशिवनी तालुक्यातील ढवलापूर व सावंगी शिवारात वाघाचा वावर वाढला आहे. या वाघाने चालू पंधरवड्यात चार शेतकऱ्यांच्या पाच गुरांची शिकार केली. त्यामुळे या भागातील शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. वन विभागाला वारंवार विनंती करूनही वाघाचा बंदाेबस्त केला जात नसल्याने त्याचा बंदाेबस्त करायचा कुणी, असा प्रश्न संतप्त शेतकऱ्यांनी उपस्थित केला आहे.

या वाघाने मयाराम सरियाम, रा. ढवलापूर या शेतकऱ्याच्या बैलाची रविवारी (दि. १९) शिकार केली. तत्पूर्वी, त्याने राजेंद्र लक्ष्मीचंद उईके यांचे दाेन बैल तर परमेश्वर दयाराम उईके यांचा एक बैल व सुधाकर सुखदेव उईके यांच्या एका गाईची शिकार केली आहे. या सर्व घटना शेतात शेतकरी व शेतमजुरांच्या समाेर घडल्या आहेत. त्याने पाेळ्याच्या दिवशी सकाळी राजेंद्र उईके यांच्या बैलाची शिकार केली. सहज खाद्य व पाणी मिळत असल्याने वाघ हा शिवार साेडायला तयार नाही. शिवाय, वन अधिकारी त्याचा बंदाेबस्त करायला तयार नाही.

शिकार केल्यानंतर वन कर्मचारी त्यांच्या सवडीने पंचनामा करतात. सहा ते १० महिन्यांनी त्या जनावराची तुटपुंजी नुकसान भरपाई देऊन बाेळवण करतात, असा आराेपही शेतकऱ्यांनी केला आहे. दरम्यान, काँग्रेसचे पदाधिकारी उदयसिंग यादव यांनी साेमवारी (दि.२०) या भागाची प्रत्यक्ष पाहणी करून शेतकऱ्यांशी संवाद साधला. वन विभागाने या वाघाचा कायम बंदाेबस्त करावा तसेच पिकाचे व मृत जनावरांची नुकसान भरपाई बाजारभावाप्रमाणे व तातडीने द्यावी, अशी मागणी ढवलापूरच्या सरपंच प्रीती उईके, ललित घंगारे, झोलबा इनवाते, संदीप करनाके, मिथुन उईके, प्रदीप धुर्वे, बाकेराव उईके, भोजराज परतेकी, नीलेश उईके यांच्यासह शेतकऱ्यांनी केली आहे.

...

नरभक्षी हाेण्याची शक्यता

या भागातील प्रत्येक व्यक्ती कामासाठी शेतात नियमित जातात. वाघाने शेतकऱ्यांसमाेर त्यांच्या गुरांची शिकार केली आहे. प्रत्येक वेळी शेतकऱ्यांनी त्याला पिटाळून लावले आहे. त्या वाघाला हळूहळू माणसाची सवय हाेत चालली असून, पुढे ताे शेतकऱ्यांवर हल्ला चढविण्याची शक्यता बळावली असेल. तसे झाल्याने ताे वाघ नरभक्षी हाेईल. तेव्हा त्याची जबाबदारी स्वीकारणार काेण, असा प्रश्नही जाणकार व्यक्तींनी उपस्थित केला आहे.

...

ग्रामस्थांवर गुन्हे दाखल

या भागातील नागरिकांची आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने काही शेतमजूर जंगलात तेंदूपत्ता संकलन व माेहफूल गाेळा करायला जायचे. वन अधिकाऱ्यांनी काहीही दाेष नसताना काही मजुरांवर गुन्हे नाेंदविले. हल्ली ही गरीब माणसे न्यायालयाच्या पायऱ्या झिजवीत आहेत. यात त्यांचा पैसा व वेळ खर्च हाेत असून, त्यांना त्या दिवशीच्या मजुरीवर पाणी फेरावे लागत आहे.

...