शहरं
Join us  
Trending Stories
1
जळगाव जिल्ह्यात ढगफुटी? गावांमध्ये शिरले पुराचे पाणी; लोकांनी रात्र काढली जागून, शाळांना सुट्टी
2
"आम्ही इन्कम टॅक्सकडून आलोय…’’, सांगलीत वॉरंट दाखवत डॉक्टरच्या घरातील कोट्यवधीचा ऐवज लुटला 
3
Post Office च्या ५ जबरदस्त स्कीम्स; छोट्या बचतीत मोठा फायदा, यापैकी दोन महिलांसाठी खास
4
Nashik: नाशिकमधील एका खाजगी शाळेला बॉम्बने उडवण्याची धमकी!
5
यूपीआयवरून रोज करा दहा लाखांचे पेमेंट; विमा, गुंतवणूक, क्रेडिट कार्ड पेमेंटसाठी फायदा
6
पितृपक्ष २०२५: एखादी व्यक्ती हरवली आणि अनेक वर्षं सापडलीच नाही तर तिचेही श्राद्ध करतात का?
7
शेअर बाजारात पुन्हा तेजी, Sensex ८१,८२० च्या जवळ; निफ्टीही ग्रीन झोनमध्ये, 'या' स्टॉक्समध्ये तेजी
8
गुंतवणूकदारांसाठी आनंदाची बातमी! सेन्सेक्सला मागे टाकत सोन्याने दिला तब्बल ५०.१ टक्के परतावा
9
'दशावतार'च्या टीमकडून खास सरप्राइज, फक्त ९९ रुपये केलं सिनेमाचं तिकीट, प्रेक्षक म्हणाले- "तिकीट कमी करू नका..."
10
पश्चात्ताप! निळ्या रंगाच्या 'ड्रम'कांडमुळे जेलमध्ये गेलेल्या आरोपी साहिलच्या आयुष्याला नवी कलाटणी
11
Siddharth Shinde: सर्वोच्च न्यायालयातील वकील सिद्धार्थ शिंदे यांचे ह्रदयविकाराने निधन, दिल्लीत घेतला अखेरचा श्वास
12
अल्पवयीन मुलीसोबत भाजपा नेत्याचा अश्लील व्हिडिओ व्हायरल; टीका होताच पक्षानं केली हकालपट्टी
13
Uttarakhand Cloudburst: डेहराडूनमध्ये ढगफुटी! दुकाने वाहून गेली, अनेक लोक बेपत्ता, बचावकार्य सुरू
14
महात्मा फुले योजनेत अवयव प्रत्यारोपणासह आता २,३९९ व्याधींवर होणार उपचार
15
"...त्यांची जीभ इतरांना जाब विचारताना अडखळत कशी नाही?"; भाजपाची शरद पवारांवर बोचरी टीका
16
ITR: इनकम टॅक्स रिटर्न भरण्याची आज अखेरची संधी! आयकर विभागाने एका दिवसाने मुदत वाढवली
17
राज्यात अतिवृष्टीचे थैमान, उभ्या पिकांचा चिखल, मुंबईत ५६ वर्षांतील तिसरा थंड दिवस
18
आजचे राशीभविष्य- १६ सप्टेंबर २०२५: मित्रांचा सहवास लाभेल, पण घरातील वातावरण बिघडण्याची शक्यता
19
पोलिस ठाण्यांत सीसीटीव्ही का नाहीत?, ही बेफिकिरीच; सर्वोच्च न्यायालय २६ सप्टेंबर रोजी आदेश देणार
20
वक्फ कायद्याला ‘स्टे’ नाही, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय; कायद्यातील तीन बदलांना अंतरिम स्थगिती

वाघाचा बंदाेबस्त करायचा कुणी?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2021 04:09 IST

लाेकमत न्यूज नेटवर्क पारशिवनी : पेंच व्याघ्र प्रकल्पाच्या नागलवाडी रेंजअंतर्गत येणाऱ्या पारशिवनी तालुक्यातील ढवलापूर व सावंगी शिवारात वाघाचा वावर ...

लाेकमत न्यूज नेटवर्क

पारशिवनी : पेंच व्याघ्र प्रकल्पाच्या नागलवाडी रेंजअंतर्गत येणाऱ्या पारशिवनी तालुक्यातील ढवलापूर व सावंगी शिवारात वाघाचा वावर वाढला आहे. या वाघाने चालू पंधरवड्यात चार शेतकऱ्यांच्या पाच गुरांची शिकार केली. त्यामुळे या भागातील शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. वन विभागाला वारंवार विनंती करूनही वाघाचा बंदाेबस्त केला जात नसल्याने त्याचा बंदाेबस्त करायचा कुणी, असा प्रश्न संतप्त शेतकऱ्यांनी उपस्थित केला आहे.

या वाघाने मयाराम सरियाम, रा. ढवलापूर या शेतकऱ्याच्या बैलाची रविवारी (दि. १९) शिकार केली. तत्पूर्वी, त्याने राजेंद्र लक्ष्मीचंद उईके यांचे दाेन बैल तर परमेश्वर दयाराम उईके यांचा एक बैल व सुधाकर सुखदेव उईके यांच्या एका गाईची शिकार केली आहे. या सर्व घटना शेतात शेतकरी व शेतमजुरांच्या समाेर घडल्या आहेत. त्याने पाेळ्याच्या दिवशी सकाळी राजेंद्र उईके यांच्या बैलाची शिकार केली. सहज खाद्य व पाणी मिळत असल्याने वाघ हा शिवार साेडायला तयार नाही. शिवाय, वन अधिकारी त्याचा बंदाेबस्त करायला तयार नाही.

शिकार केल्यानंतर वन कर्मचारी त्यांच्या सवडीने पंचनामा करतात. सहा ते १० महिन्यांनी त्या जनावराची तुटपुंजी नुकसान भरपाई देऊन बाेळवण करतात, असा आराेपही शेतकऱ्यांनी केला आहे. दरम्यान, काँग्रेसचे पदाधिकारी उदयसिंग यादव यांनी साेमवारी (दि.२०) या भागाची प्रत्यक्ष पाहणी करून शेतकऱ्यांशी संवाद साधला. वन विभागाने या वाघाचा कायम बंदाेबस्त करावा तसेच पिकाचे व मृत जनावरांची नुकसान भरपाई बाजारभावाप्रमाणे व तातडीने द्यावी, अशी मागणी ढवलापूरच्या सरपंच प्रीती उईके, ललित घंगारे, झोलबा इनवाते, संदीप करनाके, मिथुन उईके, प्रदीप धुर्वे, बाकेराव उईके, भोजराज परतेकी, नीलेश उईके यांच्यासह शेतकऱ्यांनी केली आहे.

...

नरभक्षी हाेण्याची शक्यता

या भागातील प्रत्येक व्यक्ती कामासाठी शेतात नियमित जातात. वाघाने शेतकऱ्यांसमाेर त्यांच्या गुरांची शिकार केली आहे. प्रत्येक वेळी शेतकऱ्यांनी त्याला पिटाळून लावले आहे. त्या वाघाला हळूहळू माणसाची सवय हाेत चालली असून, पुढे ताे शेतकऱ्यांवर हल्ला चढविण्याची शक्यता बळावली असेल. तसे झाल्याने ताे वाघ नरभक्षी हाेईल. तेव्हा त्याची जबाबदारी स्वीकारणार काेण, असा प्रश्नही जाणकार व्यक्तींनी उपस्थित केला आहे.

...

ग्रामस्थांवर गुन्हे दाखल

या भागातील नागरिकांची आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने काही शेतमजूर जंगलात तेंदूपत्ता संकलन व माेहफूल गाेळा करायला जायचे. वन अधिकाऱ्यांनी काहीही दाेष नसताना काही मजुरांवर गुन्हे नाेंदविले. हल्ली ही गरीब माणसे न्यायालयाच्या पायऱ्या झिजवीत आहेत. यात त्यांचा पैसा व वेळ खर्च हाेत असून, त्यांना त्या दिवशीच्या मजुरीवर पाणी फेरावे लागत आहे.

...