शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
2
Nagpur Election News: CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल?
3
Sanjay Raut : "'तेच' आकडे, 'तेच' मशीन, १२०-१२५..."; संजय राऊतांचा वेगळाच तर्क! संपूर्ण निकालावरच प्रश्नचिन्ह
4
T20 World Cup 2026: शुभमन गिलला का वगळलं? गंभीरला एअरपोर्टवर प्रश्न; काय मिळालं उत्तर?
5
नगर परिषदा, पंचायत निवडणुकीत भाजपाला भरघोस यश; प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण म्हणाले...
6
'घरी बसणाऱ्यांना मतदारांनी नाकारले' ; नगरपरिषद निवडणुकांवर एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
7
वर्षाखेरीस IPO बाजारात 'धुमधडाका'! या आठवड्यात ११ नवीन कंपन्यांचे आगमन; गुंतवणुकीची मोठी संधी
8
चांदेकरवाडीत पाणंद रस्त्यावर लिंबू आणि बाहुली, अंधश्रद्धेचा प्रकार, ग्रामस्थांत भीतीची सावली
9
"मला मारताहेत, जबरदस्तीने काहीतरी खायला..."; विवाहितेचा ढसाढसा रडत आईला शेवटचा कॉल
10
दोन पराभवांनंतर अखेर संजयकाका पाटलांनी मैदान मारले, आर. आर. आबांचा रोहित पाटील पराभूत
11
Siddhi Vastre: अवघ्या २२ वर्षांची तरुणी भाजपवर पडली भारी; मोहोळमध्ये इतिहास घडवणारी सिद्धी वस्त्रे आहे तरी कोण?
12
"दरवाजे उघडून बाहेरच्यांना प्रवेश दिल्याचा हा परिणाम"; चंद्रपूरातील पराभवानंतर मुनगंटीवारांचा घरचा आहेर
13
Maharashtra Local Body Election Results 2025 : अख्खं मंत्रिमंडळ ईश्वरपुरात, तरीही जयंत पाटलांनी महायुतीला दिला धक्का; सांगली जिल्ह्यातील नगराध्यक्षांची यादी एका क्लिकवर
14
विमा घेताय? केवळ जाहिरातींवर जाऊ नका; 'या' ४ तांत्रिक गोष्टी तपासा, अन्यथा क्लेमवेळी होईल पश्चात्ताप!
15
उद्धवसेना-मनसे युतीची बोलणी संपली, संजय राऊतांनी दिली महत्त्वाची माहिती; "अजूनही ७२ तास..."
16
"म्हणून पुन्हा एकदा सांगतो, शून्य अधिक शून्य...", निकाल लागताच भाजपचा उद्धव ठाकरेंवर पहिला प्रहार
17
Shrivardhan Nagar Parishad Election Result 2025: रायगडमध्ये मोठा ट्विस्ट! श्रीवर्धनमधील ठाकरे गटाचा विजयी नगराध्यक्ष शिंदेसेनेत प्रवेश करणार?
18
Maharashtra Nagaradhyaksha Winners List: महाराष्ट्रातील नगरपरिषद, नगरपंचायतींमध्ये कोण झालं नगराध्यक्ष? वाचा, पक्षनिहाय यादी
19
Muktainagar Nagar Panchayat Election Result 2025: “रक्षा खडसे भाजपात एकाकी पडल्या”; मुक्ताईनगरातील शिंदेसेनेच्या विजयानंतर एकनाथ खडसेंचा दावा
20
"पैसे भरा, मृतदेह न्या", पोटच्या पोरासाठी बापाने मागितली भीक; घर गहाण ठेवलं, कर्ज काढलं, पण...
Daily Top 2Weekly Top 5

कोण खोटे बोलतेय?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 26, 2020 04:21 IST

मंगेश व्यवहारे नागपूर : आरटीईची थकीत प्रतिपूर्ती गेल्या तीन वर्षांपासून शाळांना मिळाली नाही. राज्य सरकारकडे शिक्षण संस्थाचालकांनी जाब विचारला ...

मंगेश व्यवहारे

नागपूर : आरटीईची थकीत प्रतिपूर्ती गेल्या तीन वर्षांपासून शाळांना मिळाली नाही. राज्य सरकारकडे शिक्षण संस्थाचालकांनी जाब विचारला असता, केंद्र सरकारकडून निधीच मिळाला नसल्याचे सांगण्यात येते. दुसरीकडे माहितीच्या अधिकारात केंद्र सरकारकडून मिळालेल्या माहितीनुसार राज्याला कोट्यवधींचा निधी दिल्याचे गोषवाऱ्यातून दिसून येते. त्यामुळे नेमके कोण खोटे बोलत आहे, असा सवाल शाळा संचालकांकडून करण्यात येत आहे.

बालकांच्या मोफत व सक्तीच्या शिक्षणाच्या अधिकार अधिनियम २००९ अन्वये दुर्बल व वंचित घटकासाठी शाळांच्या प्रवेश क्षमतेच्या २५ टक्के जागा आरक्षित करण्यात येतात. त्यासाठी शासनाकडून शाळांना निधी देण्यात येतो. ६० टक्के केंद्र सरकार व ४० टक्के राज्य सरकारचा यात वाटा असतो. परंतु गेल्या तीन वर्षांपासून शाळांना आरटीइची प्रतिपूर्ती मिळाली नाही, त्यामुळे शाळा संचालकांनी केंद्र व राज्याकडून काही माहिती मागितली. या माहितीत विद्यार्थ्यांच्या प्रवेश प्रतिपूर्तीचे दर, केंद्राकडून राज्याला मिळालेले अनुदान, मंजूर तरतूद, प्राप्त तरतूद, शाळांना वितरित केलेली रक्कम व राज्य शासनाकडून वाटप झालेली रक्कम यात प्रचंड तफावत दिसून येत आहे. लोकमतने ‘राज्य शासनाकडून शाळांची दिशाभूल’ या आशयाचे वृत्त १७ नोव्हेंबरच्या अंकात प्रकाशित केले होते. या वृत्तात राज्य शासन शाळांची दिशाभूल करत असल्यासंदर्भात तथ्य उपस्थित केले होते. शिक्षण विभागाच्या प्राथमिक शिक्षण संचालयाने वृताची दखल घेत राज्य शासनाने २०१२ पासून २०१८ पर्यंत शाळांना दिलेल्या प्रति विद्यार्थी प्रतिपूर्तीचा दर, केंद्र शासनाकडून राज्य शासनाला मिळालेला निधी आणि संचालयाकडून वितरित झालेला निधी याचा गोषवारा दिला. या गोषवाऱ्यातसुद्धा मोठ्या प्रमाणात तफावत दिसून येत आहे.

आरटीईच्या केंद्राकडून राज्याला व राज्याकडून शाळांना वितरित झालेल्या निधीचा तपशील

वर्ष -केंद्राकडून राज्याला प्राप्त झाले- राज्य म्हणते एवढेच मिळाले

२०१२-१३------

२०१३-१४------

२०१४-१५ ८०४ कोटी २४.२७ कोटी

२०१५-१६ ६२२ कोटी---

२०१६-१७ ७३१ कोटी १४ कोटी

२०१७-१८ ७४२ कोटी २४४ कोटी

२०१८-१९ ७८७ कोटी १२० कोटी

२०१९-२० ७१३ कोटी ८२ कोटी

एकूण ४४०१ कोटी ४८४ कोटी

- हे दोन्ही तपशील केंद्र व राज्य सरकारचे

आरटीई फाऊंडेशन या संस्थेने आरटीई अंतर्गत केंद्राकडून राज्याला किती निधी मिळाला याची माहिती माहितीच्या अधिकारात मागितली. राज्याच्या प्राथमिक शिक्षण संचालनालयानेही केंद्राकडून मिळालेल्या निधीचा गोषवारा दिला. दोन्ही आकडे सरकारी आहेत मात्र त्यातील तफावत लक्षात घेता कोण खरे आणि कोण खोटे बोलतेय, हे समजण्यास संस्थाचालक संभ्रमात आहेत.

- केंद्राकडून आणि राज्याकडून मिळणाऱ्या आरटीईच्या निधीसंदर्भातील वस्तुस्थितीवर शिक्षणमंत्र्यांनी लक्ष घालून गेल्या ३ वर्षापासून शाळांच्या थकीत असलेल्या प्रतिपूर्तीचे वितरण करावे, एवढीच अपेक्षा आहे.

सचिन काळबांडे, अध्यक्ष, आरटीई फाऊंडेशन