शहरं
Join us  
Trending Stories
1
तुमच्या आकांसमोर झुकू नका, सॅलरी कापणार नाहीत; सुप्रीम कोर्टाने केली IPS अधिकाऱ्याची कानउघडणी
2
चुकीचा निवडणूक डेटा पोस्ट करणं संजय कुमारांना भोवलं; महाराष्ट्र निवडणूक आयोगाची मोठी कारवाई
3
वासनांध भोंदूबाबाचा प्रताप, महिलेसोबत अश्लील कृत्य; तंत्रमंत्राने कुटुंबियांना भस्म करण्याची धमकी
4
पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी
5
राजधानी दिल्ली तिहेरी हत्याकांडानं हादरली; एकाच घरात ३ मृतदेह सापडले, कारण समजताच पोलीस हैराण
6
ODI Rankings मध्ये गडबड घोटाळा! ICC चा रिव्ह्यू अन् टॉप ५ मध्ये पुन्हा झळकलं रोहित-विराटचं नाव
7
अमेरिकेत ५ तास थांबणे व्लादिमीर पुतिन यांना महागात पडले! डोनाल्ड ट्रम्प यांनी २.२ कोटी आकारले; नेमके प्रकरण काय?
8
खराब अन् खड्डेमय रस्त्यांसाठी टोल घेणे योग्य नाही; सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय
9
रुग्णालयाने भरती करण्यास दिला नकार, 12 वर्षाच्या मुलाने बापाच्या खांद्यावरच सोडला जीव
10
जिओ वापरकर्त्यांसाठी वाईट बातमी! दररोज १.५ जीबी डेटासह ८४ दिवसांचा प्लॅन बंद
11
'मी अटक होण्यापूर्वीच राजीनामा दिला होता', अमित शाहांनी सोडलं मौन; वादाचा मुद्दा काय?
12
थयथयाट होणार! रशियाने भारताला कच्च्या तेलावर ५ टक्के सूट सुरुच ठेवली; पुतीन ट्रम्पना भेटून येताच...
13
एरिया मॅनेजरचा पराक्रम! टारगेट पूर्ण करण्यासाठी रेव्ह पार्टी दिली, ३७ जणांना अडकवलं अन्...
14
'ऑनलाइन गेमिंग विधेयक' लोकसभेत मंजूर; Online Games खेळणाऱ्यांसाठी काय आहे शिक्षेची तरतूद?
15
'मोठा धक्का बसला, पण आता...', हल्ल्यानंतर मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांची पहिली प्रतिक्रिया
16
'रॅपिडो'ला जबर झटका! १० लाखांचा दंड, ग्राहकांना पैसे करण्याचे कंपनीला आदेश; प्रकरण काय?
17
महाराष्ट्रातील कोणकोणत्या टोल नाक्यांवर चालणार ३ हजार रूपयांचा वार्षिक FASTag पास? वाचा यादी
18
लोकसभेत मोठा गोंधळ, विरोधकांनी फाडले विधेयक; कागद अमित शाहांच्या दिशेने भिरकावले, काय घडलं?
19
ऑनलाईन दरोडा! दरवर्षी ४५ कोटी भारतीय गमावताहेत २० हजार कोटी रुपये
20
धाडसाला सलाम; पती आणि मुलाचा जीव वाचवण्यासाठी मगरीशी लढल्या, गावातून कौतुकाचा वर्षाव

कोण खोटे बोलतेय?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 26, 2020 04:21 IST

मंगेश व्यवहारे नागपूर : आरटीईची थकीत प्रतिपूर्ती गेल्या तीन वर्षांपासून शाळांना मिळाली नाही. राज्य सरकारकडे शिक्षण संस्थाचालकांनी जाब विचारला ...

मंगेश व्यवहारे

नागपूर : आरटीईची थकीत प्रतिपूर्ती गेल्या तीन वर्षांपासून शाळांना मिळाली नाही. राज्य सरकारकडे शिक्षण संस्थाचालकांनी जाब विचारला असता, केंद्र सरकारकडून निधीच मिळाला नसल्याचे सांगण्यात येते. दुसरीकडे माहितीच्या अधिकारात केंद्र सरकारकडून मिळालेल्या माहितीनुसार राज्याला कोट्यवधींचा निधी दिल्याचे गोषवाऱ्यातून दिसून येते. त्यामुळे नेमके कोण खोटे बोलत आहे, असा सवाल शाळा संचालकांकडून करण्यात येत आहे.

बालकांच्या मोफत व सक्तीच्या शिक्षणाच्या अधिकार अधिनियम २००९ अन्वये दुर्बल व वंचित घटकासाठी शाळांच्या प्रवेश क्षमतेच्या २५ टक्के जागा आरक्षित करण्यात येतात. त्यासाठी शासनाकडून शाळांना निधी देण्यात येतो. ६० टक्के केंद्र सरकार व ४० टक्के राज्य सरकारचा यात वाटा असतो. परंतु गेल्या तीन वर्षांपासून शाळांना आरटीइची प्रतिपूर्ती मिळाली नाही, त्यामुळे शाळा संचालकांनी केंद्र व राज्याकडून काही माहिती मागितली. या माहितीत विद्यार्थ्यांच्या प्रवेश प्रतिपूर्तीचे दर, केंद्राकडून राज्याला मिळालेले अनुदान, मंजूर तरतूद, प्राप्त तरतूद, शाळांना वितरित केलेली रक्कम व राज्य शासनाकडून वाटप झालेली रक्कम यात प्रचंड तफावत दिसून येत आहे. लोकमतने ‘राज्य शासनाकडून शाळांची दिशाभूल’ या आशयाचे वृत्त १७ नोव्हेंबरच्या अंकात प्रकाशित केले होते. या वृत्तात राज्य शासन शाळांची दिशाभूल करत असल्यासंदर्भात तथ्य उपस्थित केले होते. शिक्षण विभागाच्या प्राथमिक शिक्षण संचालयाने वृताची दखल घेत राज्य शासनाने २०१२ पासून २०१८ पर्यंत शाळांना दिलेल्या प्रति विद्यार्थी प्रतिपूर्तीचा दर, केंद्र शासनाकडून राज्य शासनाला मिळालेला निधी आणि संचालयाकडून वितरित झालेला निधी याचा गोषवारा दिला. या गोषवाऱ्यातसुद्धा मोठ्या प्रमाणात तफावत दिसून येत आहे.

आरटीईच्या केंद्राकडून राज्याला व राज्याकडून शाळांना वितरित झालेल्या निधीचा तपशील

वर्ष -केंद्राकडून राज्याला प्राप्त झाले- राज्य म्हणते एवढेच मिळाले

२०१२-१३------

२०१३-१४------

२०१४-१५ ८०४ कोटी २४.२७ कोटी

२०१५-१६ ६२२ कोटी---

२०१६-१७ ७३१ कोटी १४ कोटी

२०१७-१८ ७४२ कोटी २४४ कोटी

२०१८-१९ ७८७ कोटी १२० कोटी

२०१९-२० ७१३ कोटी ८२ कोटी

एकूण ४४०१ कोटी ४८४ कोटी

- हे दोन्ही तपशील केंद्र व राज्य सरकारचे

आरटीई फाऊंडेशन या संस्थेने आरटीई अंतर्गत केंद्राकडून राज्याला किती निधी मिळाला याची माहिती माहितीच्या अधिकारात मागितली. राज्याच्या प्राथमिक शिक्षण संचालनालयानेही केंद्राकडून मिळालेल्या निधीचा गोषवारा दिला. दोन्ही आकडे सरकारी आहेत मात्र त्यातील तफावत लक्षात घेता कोण खरे आणि कोण खोटे बोलतेय, हे समजण्यास संस्थाचालक संभ्रमात आहेत.

- केंद्राकडून आणि राज्याकडून मिळणाऱ्या आरटीईच्या निधीसंदर्भातील वस्तुस्थितीवर शिक्षणमंत्र्यांनी लक्ष घालून गेल्या ३ वर्षापासून शाळांच्या थकीत असलेल्या प्रतिपूर्तीचे वितरण करावे, एवढीच अपेक्षा आहे.

सचिन काळबांडे, अध्यक्ष, आरटीई फाऊंडेशन