शहरं
Join us  
Trending Stories
1
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
2
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी
3
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
4
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
5
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
6
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
7
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
8
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
9
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
10
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
11
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
12
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
13
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
14
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
15
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
16
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
17
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
18
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
19
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
20
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन

स्वयंचलित हवामान केंद्र गेले कुठे?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2017 23:57 IST

शेतकºयांना हवामानाचा अचूक अंदाज मिळावा म्हणून राज्य शासनाने महावेध प्रकल्पांतर्गत राज्यभर स्वयंचलित हवामान केंद्र स्थापन करण्याचा निर्णय घेतला.

ठळक मुद्देमहत्त्वाची उपकरणे चोरीला मुख्यमंत्र्यांनी केले होते उद्घाटन कसा मिळणार शेतकºयांना अचूक अंदाज

मंगेश व्यवहारे/ मुकेश कुकडे ।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : शेतकºयांना हवामानाचा अचूक अंदाज मिळावा म्हणून राज्य शासनाने महावेध प्रकल्पांतर्गत राज्यभर स्वयंचलित हवामान केंद्र स्थापन करण्याचा निर्णय घेतला. त्यातंर्गत ३० एप्रिल २०१७ रोजी बुटीबोरी रोडवर डोंगरगाव येथे पहिल्या स्वयंचलित हवामान केंद्र उभारण्यात आले होते. या केंद्राला पाच महिनेही पूर्ण झाले नसताना येथील उपकरण चोरीला गेले आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या केंद्राचे उद्घाटन केले होते, हे विशेष.शेतकºयांना या केंद्राचा लाभ मिळण्याआधिच ते चोरीला गेल्यामुळे अचूक हवामान नोंदणीचे कामच ठप्प पडले आहे. हवामानाचा अचूक अंदाज घेता येत नसल्याने पिकांचे मोठे नुकसान होऊनही शेतकºयांना शासनाकडूनही मदत मिळत नाही. या दुष्टचक्रातून शेतकºयांना बाहेर काढण्यासाठी शासनाने महावेध प्रकल्पांतर्गत स्वयंचलित हवामान केंद्राची स्थापना केली. राज्यात २०५९ व नागपूर जिल्ह्यात ६४ स्वयंचलित हवामान केंद्र उभारण्याचे उद्दिष्ट शासनाने ठेवले. राज्यातील पहिल्या केंद्राची स्थापना नागपूर जिल्ह्यात बुटीबोरी रोडवरील डोंगरगाव येथे झाली. ३० एप्रिल २०१७ रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर, पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे व राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्या उपस्थितीत केंद्राचे उद्घाटन झाले होते.या केंद्राला लोकमत चमूने सोमवारी भेट दिली असता केंद्रातील सौरपॅनल चोरून नेले होते. हवामानातील घटकांची नोंद घेणाºया यंत्रणेची मोडतोड करून चोरून नेली होती. १२ बाय १२ च्या जागेवर एक खांब उभा होता आणि उद्घाटनाची कोनशिला एवढेच केंद्राच्या स्थळी होते. केंद्राला चारही बाजूने लोखंडी जाळीचे कम्पाऊंड व गेट बसविले आहे. हा संपूर्ण परिसर जंगली गवत व झाडांनी व्यापला आहे. केंद्रात जायलासुद्धा सुरळीत पायवाट नाही.स्कायमेटकडे होती जबाबदारीस्वयंचलित हवामान केंद्राच्या दुरवस्थेसंदर्भात जिल्हा कृषी अधिकारी मिलिंद शेंडे यांना विचारणा केली असता ते म्हणाले की, या केंद्राची जबाबदारी ही स्कायमेट या संस्थेकडे होती. स्कायमेटच्या माध्यमातूनच ही यंत्रणा हाताळण्यात येणार होती. पहिल्या स्वयंचलित केंद्राची मोडतोड झाली असली तरी त्याच्या दुरुस्तीची जबाबदारी ही स्कायमेटची आहे.पोलिसात तक्रार करणारग्रा.पं.तर्फे तिथे एक लाईटही लावण्यात आला होता. परंतु यंत्रणेसोबतच लाईटही चोरून नेला आहे. याची तक्रार आम्ही पोलिसात करणार आहोत. भविष्यात महत्त्वाच्या यंत्रणेच्या सुरक्षेसाठी सुरक्षा रक्षकही ठेवू.- देवेंद्र गौर, सरपंच, डोंगरगाव ग्रा.पं.