लाेकमत न्यूज नेटवर्क
कळमेश्वर : शहरालगतच्या चाैरस्त्यावर अपघात टाळण्यासाठी काेणत्याही उपाययाेजना करण्यात आल्या नाहीत. दाेन दिवसांपूर्वी झालेल्या अपघातात कंटेनरचालकाचा मृत्यू झाला. त्यानंतर या ठिकाणी उपाययाेजना करणे अपेक्षित असताना तिथे प्रशासनाने साधा दिशादर्शक फलक देखील लावला नाही. या ठिकाणी हाेणाऱ्या अपघातांचे प्रमाण लक्षात घेता याेग्य उपाययाेजना कराव्या, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
गाेंडखैरी-कळमेश्वर-सावनेर मार्गाच्या चाैपदरीकरणाचे काम सुरू असून, या कामाचे कंत्राट दिलीप बिल्डकाॅन नामक कंपनीला दिले आहेत. या मार्गावरील चाैरस्त्यावर दाेन दिवसांपूर्वी झालेल्या अपघातात पप्पू रा. हाथरस (उत्तर प्रदेश) या कंटेनरचालकाचा मृत्यू झाला. ताे एचआर-४७/डी-७०८४ क्रमांकाच्या कंटेनरने गोंडखैरीहून सावनेरकडे जात होता. याच मार्गावर सेलू (ता. कळमेश्वर) शिवारात कळमेश्वर-सावंगी मार्गावर उड्डाण पुलाचे बांधकाम सुरू आहे.
त्या ठिकाणी कंत्राटदार कंपनीने दिशादर्शक फलक लावले नसून, सर्व्हिस अथवा बायपास राेडही तयार केला नाही. त्यामुळे हा कंटेनर निर्माणाधीन उड्डाणपुलाच्या बांधकामात फसला आणि चालक कंटेनरच्या केबिनमध्ये अडकून गंभीर जखमी झाला. पाेलिसांनी त्याला बाहेर काढून उपचारासाठी नागपूर येथील मेयाे रुग्णालयात भरती केले. तिथे उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. अपघातानंतर या ठिकाणी उपाययाेजना करणे गरजेचे हाेते. मात्र, कंत्राटदार कंपनीने त्या ठिकाणी मुरुमाचे ढिगारे टाकून मार्ग बंद करण्याशिवाय काेणत्याही उपाययाेजना केल्या नाही. दुसरीकडे, या ठिकाणी दिशादर्शक फलक लावून याेग्य उपाययाेजना करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.