शहरं
Join us  
Trending Stories
1
Operation Sindoor: 'पहलगाममध्ये दहशतवाद्यांच्या पापाचा घडा भरला अन् त्यानंतर...', भारताचे डीजीएमओ घई काय बोलले?
2
'याचना नहीं, अब रण होगा...' कवितेने सुरुवात; आर्मीने दाखवला 'ऑपरेशन सिंदूर'चा नवा व्हिडिओ
3
Operation Sindoor : "हौसले बुलंद हो, तो..." क्रिकेटचा किस्सा ऐकवत DGMO नी दिला स्पष्ट मेसेज, पाकचा 'खेळ खल्लास' कसा केला ते सांगितलं!
4
भारत-पाकिस्तान डीजीएमओंची हॉटलाईन कनेक्ट होऊ शकली नाही; थोड्या वेळाने पुन्हा प्रयत्न करणार
5
जग कधीच विसरू शकणार नाही विराट कोहलीचे हे 10 कसोटी विक्रम; कुण्याही भारतीयाला जमला नाही असा पराक्रम
6
"मी विराटचे अश्रू पाहिलेत..."; 'किंग कोहली'च्या कसोटी निवृत्तीनंतर अनुष्का शर्माची भावनिक पोस्ट
7
स्मिता पाटील यांच्या मृत्यूनंतर प्रतीकला दत्तक घेणार होती बॉलिवूडची 'ही' प्रसिद्ध जोडी! अभिनेत्याचा मोठा खुलासा 
8
Kangana Ranaut : "जितके संयमी, तितकेच धाडसी"; ऑपरेशन सिंदूरच्या यशाने कंगना राणौत खूश, मोदींचं केलं कौतुक
9
'युद्ध रोमँटिक चित्रपट नाही, गंभीर मुद्दा आहे', माजी लष्करप्रमुख मनोज नरवणे यांचे सूचक विधान
10
संरक्षण दलांसोबत अधिक समन्वयाने काम करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे सुतोवाच
11
सेव्हिंग अकाऊंटमध्ये पैसे ठेवूनही मिळेल FD इतकं व्याज; फक्त करावं लागेल 'हे' महत्त्वाचं काम
12
भारताच्या सीमेवर अवकाशातूनही करडी नजर; ISRO लॉन्च करणार RISAT-1B, काय आहे खास वैशिष्टे?
13
विराट कोहलीच्या कसोटी निवृत्तीवर 'हेड कोच' गौतम गंभीरचे ट्विट, सिंहाशी तुलना करत म्हणाला...
14
अमेरिका आणि चीनमधील व्यापार युद्धाला अखेर पूर्णविराम; ट्रम्प आता किती टॅरिफ आकारणार?
15
Technology: तुटलेल्या केबलचे चार्जर वापरणे ताबडतोब थांबवा; होईल मोठे नुकसान!
16
एल्विशची सिस्टम हँग होणार! सापाचे विष आणि ड्रग्जच्या वापराप्रकरणात युट्यूबरला कोर्टाचा दणका
17
पाकिस्तानात आज पुन्हा भूकंपाचे धक्का; ७ दिवसांत तिसऱ्यांदा हादरली पाकची जमीन
18
सचिन वर्सेस विराट; कसोटीत कोण ठरलं भारी! इथं पाहा खास रेकॉर्ड
19
एका झटक्यात सोन्याच्या दरात २००० रुपयांपेक्षा अधिक घसरण; खरेदीपूर्वी पाहा सोन्या-चांदीचे नवे दर
20
Mehraj Malik : "रेशनचा मोठा तुटवडा; दुकानांमध्ये पीठ, तांदूळ, साखर उपलब्ध नाही, जनतेमध्ये भीतीचं वातावरण"

‘कॉर्निआ रिसर्च लेबॉरेटरीज’ची प्रतीक्षा कधी संपणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2021 04:22 IST

नागपूर : जगात साधारण तीन कोटी ९० लाख अंधव्यक्ती आहेत. जवळपास एक कोटी ५० लाख केवळ भारतात आहे. ...

नागपूर : जगात साधारण तीन कोटी ९० लाख अंधव्यक्ती आहेत. जवळपास एक कोटी ५० लाख केवळ भारतात आहे. यात १ लाख २० हजार लोकांना दरवर्षी बुबुळासंबंधी अंधत्व येते. मात्र सुमारे ५० हजार नेत्रदान होते. मेडिकलचा नेत्ररोग विभागाने यात पुढाकार घेत अंधत्वावर मात करण्यासाठी ‘कॉर्निआ रिसर्च लेबॉरेटरीज’चा प्रस्ताव तयार करून अधिष्ठात्यांकडे पाठविला होता. अधिष्ठाता बदलेले मात्र तीन वर्षांपासून हा प्रस्ताव पुढेच सरकला नाही. पालकमंत्री नितीन राऊत यांनी यात पुढाकार घेतल्यास ही ‘लॅब’ तयार होऊन एका नेत्रदानातून तीन रुग्णांमध्ये बुबूळ प्रत्यारोपण करणे शक्य होईल, असे तज्ज्ञाचे म्हणणे आहे.

अलीकडे नेत्रदानाचे प्रमाण वाढले असलेतरी नेत्रदानाबद्दलच्या समाजाच्या चुकीच्या मान्यतेमुळे मृत्यूनंतर पन्नास टक्केही नेत्रदान होत नाही. भारतात दरवर्षी ८४ लाख लोक मृत्युमुखी पडतात. मात्र यातील ४९ हजार ५१० म्हणजे ०.५८ टक्केच नेत्रदान होते. यामुळे एका नेत्रदानातून तीन रुग्णांमध्ये बुबूळ प्रत्यारोपणाची प्रक्रिया होणे आवश्यक असून यासाठी मेडिकलच्या नेत्ररोग विभागाने तीन वर्षांपूर्वी ‘कॉर्निआ रिसर्च लेबॉरेटरीज’चा प्रस्ताव तयार केला. तत्कालीन अधिष्ठाता डॉ. सजल मित्रा यांच्याकडे हा प्रस्ताव पाठविला. त्यांनीही यासाठी पुढाकार घेतला होता. परंतु प्रस्तावित जागेवर ‘दीनदयाल थाळी’ प्रकल्प उभारण्यात आल्याने हा प्रस्ताव मागे पडला. त्यानंतर अधिष्ठाता डॉ. सजल मित्रा यांनी नव्याने प्रस्ताव तयार करण्यास सांगितले. परंतु त्यानंतरही हा प्रस्ताव पुढे गेला नाही. सध्या कोरोनाचा काळ असल्याने २०१९च्या तुलनेत २०२०मध्ये २५ टक्केही नेत्रदान झाले नाही. यामुळे बुबुळांच्या प्रत्यक्षात असलेल्यांची यादीत वाढ झाली आहे.

- बुबूळ प्रत्यारोपणाची संख्या वाढविण्यासाठी ‘लॅब’ची गरज

बुबुळावर पाच स्तर असतात. यातील वरील दोन स्तर खराब झालेले असलेतरी उर्वरित तीन स्तराचा उपयोग अंधत्व दूर करण्यासाठी केला जातो. यासाठी ‘कॉर्निआ रिसर्च लेबॉरेटरीज’च्या माध्यमातून ही ‘लॅमीलर केरॅटोप्लास्टी’ करणे शक्य असते. संपूर्ण बुबूळ प्रत्यारोपणाच्या तुलनेत ‘लॅमीलर केरॅटोप्लास्टी’ शस्त्रक्रियेचा यशाचा दर दुप्पट असतो. या शिवाय, ‘लेबॉरेटरीज’मुळे २० दिवसांपर्यंत बुबूळ ‘फ्रीज’ करणे शक्य होईल. सोबतच पीजीच्या विद्यार्थ्यांना नवे संशोधन करण्यास वाव मिळून याचा फायदा रुग्णाला होऊ शकेल, असेही तज्ज्ञाचे म्हणणे आहे.