शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
2
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
3
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
4
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
5
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
6
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
7
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
8
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला मिळाली पदार्पणाची संधी
9
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
10
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
11
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
12
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
13
Video: फक्त २ वर्षातच मुलीने फेडलं ३० लाखांचं शैक्षणिक कर्ज; सांगितल्या ४ सोप्या ट्रीक
14
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
15
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
16
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
17
ना तेल घेतलं, ना गॅस..तरीही भारताने मित्राला बनवलं मालामाल; संरक्षण क्षेत्रात आणखी एक कमाल
18
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
19
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
20
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
Daily Top 2Weekly Top 5

माैदा टी-पाॅईंटवर उड्डाणपूल हाेणार कधी?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2021 04:08 IST

लाेकमत न्यूज नेटवर्क मौदा : नागपूर व भंडारा याला जाेडणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग क्र. ६ वर माैदा शहर आहे. तालुक्याचे ...

लाेकमत न्यूज नेटवर्क

मौदा : नागपूर व भंडारा याला जाेडणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग क्र. ६ वर माैदा शहर आहे. तालुक्याचे ठिकाण असलेल्या माैद्याची औद्याेगिक शहराकडे वाटचाल सुरू आहे. परिणामी याठिकाणी हजाराे नागरिकांची ये-जा असते. शहरालगतच्या महामार्गावर सतत वाहनांची वर्दळ असते. परंतु माैदा रबडीवाला टी-पाॅईंटवर उड्डाणपूल नसल्याने जीव मुठीत घेऊन रस्ता ओलांडावा लागत आहे. त्यामुळे येथे उड्डाणपूल हाेणार कधी, असा सवाल नागरिक विचारत आहेत.

या राष्ट्रीय महामार्ग क्र. ६ च्या चाैपदरीकरणाचे काम हाेऊन नऊ वर्षांचा काळ उलटला. विशेषत: मार्गाच्या चाैपदरीकरणाच्या कामादरम्यान उड्डाणपूल हाेणे गरजेचे हाेते. त्यावेळी नागपुरातील हिवाळी अधिवेशन सुरू असताना विविध संघटनांनी आंदाेलने केली. प्राधिकरण विभागाच्या अधिकाऱ्यांनी आंदाेलनस्थळी भेट देऊन लेखी आश्वासने दिली हाेती. परंतु त्यानंतर या मागणीसाठी नेमके कुठे पाणी मुरले, हे कळायला मार्ग नाही.

यामध्ये स्थानिक राजकारण आड आल्याचेही नागरिकात बाेलले जात आहे. राष्ट्रीय महामार्गावरील रबडीवाला टी-पाॅईंट परिसरात परमात्मा एक आश्रम आहे. लगतच दाेन पेट्राेल पंप, नागपूर-भंडारा व रामटेककडून येणारा मार्गही येथे जाेडला जाताे. त्यामुळे याठिकाणी जड वाहतुकीसह विविध वाहने एकत्र येतात. शिवाय, टी-पाॅईंटलगत कुही तालुक्यातील गाेसेखुर्द प्रकल्पग्रस्त चिचघाट गावाचे पुनर्वसन झाले आहे. या गावातील नागरिकांसह विद्यार्थी दरराेज माैदा येथे ये-जा करतात. दुसरीकडे परमात्मा आश्रमात येणाऱ्या सेवकांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. यामुळे टी-पाॅईंट परिसरात नागरिकांचा सतत वावर असताे. याच ठिकाणी धाेकादायक वळण असल्याने टी-पाईंट येणाऱ्या-जाणाऱ्यांसाठी डाेकेदुखी ठरत आहे. त्यामुळे येथे उड्डाणपूल हाेणे नितांत गरजेचे झाले आहे.

....

अपघाताचे सत्र सुरूच

याठिकाणी महिनाभरात तीन-चार अपघात नित्याची बाब झाली असून, अपघाताचे सत्र सुरूच आहे. मार्गाच्या चाैपदरीकरणानंतर वाहने सुसाट धावतात. असे असतानाही शासन, प्रशासनाने येथे उपाययाेजनांसाठी काेणतीही पावले उचलली नाही. २०१६-१७ मध्ये याठिकाणी उड्डाणपूल साकारणार, या चर्चेला उधाण आले हाेते. परंतु त्यानंतर चर्चाही हवेतच विरल्याचे दिसून येत आहे. अपघाताचे वाढते प्रमाण तसेच याठिकाणची वर्दळ पाहता येथे उड्डाणपुलाचे काम तातडीने सुरू करावे, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.