लाेकमत न्यूज नेटवर्क
सावनेर : सावनेर-खापा मार्गावरील रेल्वे फाटकाजवळ दाेन्ही बाजूला माेठमाेठे खड्डे तयार झाले आहेत. त्यात पावसाचे पाणी साचले आहे. वाहनचालकांना याच खड्ड्यांमधून मार्गक्रमण करावे लागते. हे खड्डे अपघातांना कारणीभूत ठरत असून, ते बुजविणार कधी, असा प्रश्नही नागरिकांनी उपस्थित केला आहे. याकडे नगरपालिकेचा बांधकाम विभाग व रेल्वे प्रशासन दुर्लक्ष करीत असल्याचा आराेप नागरिकांनी केला आहे.
सावनेर शहरातून नागपूर-छिंदवाडा (मध्य प्रदेश) ही रेल्वे लाईन गेली आहे. ही रेल्वे लाईन सावनेर-खापा मार्गाला छेदून गेल्याने शहरातील पंचशीलनगरात रेल्वे फाटक तयार केले आहे. या फाटकाच्या दाेन्ही बाजूला माेठमाेठे खड्डे तयार झाले असून, त्यात पावसाचे पाणी साचले आहे. या खड्ड्यांमधून मार्गक्रमण करताना वाहनचालकांना कसरत करावी लागते. खड्डे चुकविण्याच्या नादात दुचाकी वाहने स्लीप हाेऊ अपघात घडतात, तर खड्ड्यांमधून वाहन गेल्याने वाहनांचे नुकसानही हाेते. खड्ड्यांमधून वाहन जात असल्याने शरीराला धक्के लागतात आणि त्यातून नागरिकांना पाठ, कंबर व मणक्याचा त्रास उद्भवताे, अशी माहिती डाॅक्टरांनी दिली.
या मार्गाची देखभाल व दुरुस्ती जबाबदारी ही स्थानिक नगरपालिका प्रशासनाची आहे. या खड्ड्यांमुळे हाेणाऱ्या त्रासाबाबत पालिका प्रशासनाला इत्थंभूत माहिती आहे. मात्र, हे खड्डे बुजविण्यासाठी कुणीही पुढाकार घ्यायला तयार नाही. परिणामी, भविष्यातील अपघात टाळण्यासाठी पालिका प्रशासनाने हे खड्डे व्यवस्थित बुजवावे, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
...
चिखलामुळे मनस्ताप
खड्ड्यामधील पाणी व राेडलगतची व वाहनांच्या चाकांची माती यामुळे या परिसरात माेठ्या प्रमाणात चिखल तयार झाला आहे. या चिखलामुळे दुचाकी वाहने घसरून अपघात हाेत आहेत. शिवाय, माेठ्या वाहनांच्या चाकांमुळे चिखल व डबक्यांमधील पाणी दुचाकीचालकांसह इतरांच्या अंगावर उडत असल्याने कपडे खराब हाेतात. त्यामुळे अनेकांना विनाकारण मनस्ताप सहन करावा लागताे.