शहरं
Join us  
Trending Stories
1
“२० देशांनी भारताच्या बाजूने मतदान केले, १२ किल्ले जागतिक वारसा स्थळ घोषित झाले”: CM फडणवीस
2
१८० प्रवाशांऐवजी केवळ १५५ जणांनाच घेऊन उडाले एअर इंडियाचे विमान! विमानतळावर गोंधळ,नेमके झाले काय?
3
"जयंत पाटलांच्या राजीनाम्याची बातमी खोडसाळपणा...", प्रदेशाध्यक्षपदावरुन जितेंद्र आव्हाड यांनी स्पष्टच सांगितलं
4
लव्ह जिहादवरील 'पुस्तका'द्वारे लोकांना भडकवायचा छांगूर बाबा, आणखी ४ सहकाऱ्यांचाही खुलासा; या जिल्ह्यांत सुरू होता धर्मांतराचा खेळ
5
ट्रम्प सरकारची नोकरदारांवरच कुऱ्हाड! १३०० कर्मचाऱ्यांना कामावरून काढणार, लवकरच पाठवणार नोटीस
6
"पैशांची एखादी बॅग देऊ...आजकल हमारा नाम बहुत चल रहा है"; शिरसाटांची मिश्कील टिप्पणी
7
राज ठाकरेंचा मुद्दा, आशिष शेलारांनी दिले उत्तर; आभार मानत म्हणाले, 'त्यांनी उपस्थित केलेल्या मुद्द्याबद्दल...'
8
“महायुतीच्या अपयशावर बोट ठेवणार, पक्षाची प्रतिष्ठा वाढवणार”; शशिकांत शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
9
IPO पूर्वी Flipkart चं मोठं गिफ्ट, ७५०० पेक्षा अधिक कर्मचाऱ्यांना होणार फायदा
10
स्वीडिश अभिनेत्रीच्या प्रेमात पडला आशिष चंचलानी? मराठी सिनेमातही दिसली; डेटिंगच्या चर्चा
11
छांगूर बाबाने मालमत्तेत भरपूर पैसे गुंतवले; पण स्वत:च्या नावावर एकही जमीन ठेवली नाही
12
सकाळ, दुपार, रात्र... दिवसातून ३ वेळा पराठा खाल्ला तर काय होईल, आरोग्यावर कसा होतो परिणाम?
13
'माझा व्हिडीओ मॉर्फ करून बनवला,अब्रुनुकसानीची नोटीस पाठवणार'; संजय शिरसाटांचा इशारा
14
८ व्या वेतन आयोगाच्या शिफारसी केव्हापर्यंत लागू होणार, केंद्रीय कर्मचाऱ्यांना माहीत करुन घेणं गरजेचं
15
भलं करायच्या नादात, ट्रम्प कापताहेत आपल्याच लोकांचे खिसे; आकडेवारी पाहून डोक्यावर हात माराल
16
१२ किल्ल्यांचा युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समावेश; शरद पवारांनी मानले मोदी सरकारचे आभार
17
Astrology: जोडीदार 'क्लिक' होत नाही अशी तरुणांची सबब; हा ग्रहांचा परिणाम समजावा का?
18
छत्तीसगडच्या सुकमामध्ये २३ नक्षलवाद्यांनी एकत्र आत्मसमर्पण केले, त्यांच्यावर १.१८ कोटी रुपयांचे होते बक्षीस
19
IND vs ENG 3rd Test: मोहम्मद सिराजनं सांगितलं त्याच्या आगळ्यावेगळ्या सेलिब्रेशनमागचं कारण!
20
लग्नाच्या रात्रीच नवरी करणार होती कांड, पण नवरदेव निघाला भलताच हुशार! मित्रांना घरी बोलावलं अन्... 

मातामृत्यू शून्यावर येणार कधी?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 10, 2016 01:59 IST

सशक्त पिढी निर्माणासाठी आई सशक्त होणे, ही काळाची गरज आहे. माता मृत्यूचे प्रमाण कमी व्हावे, यासाठी राज्याचा आरोग्य

पूर्व विदर्भात प्रमाण वाढीस : आॅडिट’बाबत उदासिनताचसुमेध वाघमारे/ योगेश पांडे ल्ल नागपूरसशक्त पिढी निर्माणासाठी आई सशक्त होणे, ही काळाची गरज आहे. माता मृत्यूचे प्रमाण कमी व्हावे, यासाठी राज्याचा आरोग्य विभाग प्रयत्नशील असला तरी पाहिजे त्याप्रमाणात अद्यापही यश आलेले दिसून येत नाही. विशेषत: नागपूर विभागामधील सहा जिल्हे मिळून २०११-१२ मध्ये मातामृत्यूची संख्या २३९ होती, ती २०१५-१६मध्ये २५६ वर गेली आहे. यात वर्धा व नागपूर जिल्हा आघाडीवर असल्याचे वास्तव आहे. मातामृत्यूच्या ‘आॅडिट’बाबत शासकीय पातळीवर उदासिनताच असल्याचे दिसून येत आहे. अशास्थितीत मातामृत्यूचा दर शून्यावर कधी व कसा येणार, असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे.शासन आणि आरोग्य यंत्रणा यांच्या माध्यमातून कोट्यवधींच्या योजनांचा पाऊस पाडला जातो. परंतु, हलगर्जीपणासोबतच गंभीर रक्तस्राव, संसर्ग, इजा, एनिमिया, वाढलेला रक्तदाब आणि मुलाच्या जन्माच्या वेळी झालेली दुखापत यामुळे प्रसूतीच्या वेळी मातांचे मृत्यू होत आहेत, हे कटू सत्य नाकारता येत नाही.सार्वजनिक आरोग्य विभागाच्या नागपूर उपसंचालक कार्यालयाने उपलब्ध करून दिलेल्या माहितीनुसार, २०११-१२ मध्ये भंडारा जिल्ह्यात १८, गोंदियात १७, चंद्रपुरात ३२, गडचिरोलीत ३१, वर्धेत १५, नागपूर जिल्ह्यात ९, नागपूर शहरात ११७ असे मिळून नागपूर सर्कलमध्ये २३९ मातामृत्यूची नोंद आहे. मातामृत्यूचे ‘आॅडिट’ आवश्यकप्रसिद्ध स्त्रीरोग प्रसुती तज्ज्ञ डॉ. नोझेर शेरियार या म्हणाल्या, महाराष्ट्रात प्रसूत होणाऱ्या एक लाख महिलांपैकी १०६ माता दगावतात. तामिळनाडूमध्ये हे प्रमाण ९७ तर केरळमध्ये ८१ आहे. केरळचा पॅटर्न आपल्याकडे लागू करायचा असेल तर आरोग्यसाठी स्वतंत्र कॅडर निर्माण होणे आवश्यक आहे. विशेष म्हणजे, याचे ‘डेथ आॅडिट’ होऊन व्यवस्थेतील त्रुटी दूर करणे महत्त्वाचे आहे. असे झाल्यास जास्तीत जास्त मातांचे प्राण वाचविले जाऊ शकतील. ग्रामीण भागात आजही घरी प्रसूत होण्याचे प्रमाण मोठे आहे. असुरक्षित गर्भपातमुळेही माता मृत्यूचे प्रमाण वाढत आहे. माता मृत्यूची खरी कारणे समोर आणण्यासाठी पारदर्शकपणे ‘डेथ आॅडिट ’ होणे आवश्यक आहे. अनेक पाश्चात्त्य देशांनी आपल्या आरोग्य धोरणांत बालके आणि गरोदर मातांना प्राधान्य दिले आहे.