शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! छगन भुजबळांची महायुती सरकारमध्ये घरवापसी! सकाळी दहा वाजता मंत्रि‍पदाचा शपथविधी
2
ज्योती मल्होत्राच्या मोबाईलममध्ये ISI च्या शाकिरचा नंबर कोणत्या नावाने? पाकिस्तानमध्ये भेटलेले ते दोन अधिकारी कोण?
3
MI vs DC : वानखेडेचं मैदान मारा अन् Playoffs चं तिकीट मिळवा! मुंबई इंडियन्स फक्त एक पाऊल दूर, पण...
4
SRH नं पंतच्या LSG चा खेळ केला खल्लास! आता MI अन् DC मध्ये प्लेऑफ्सची चुरस
5
शस्त्रसंधीची चर्चा भारत-पाकिस्तानमध्येच, डोनाल्ड ट्रम्प यांचा काहीही संबंध नाही; विक्रम मिस्रींनी संसदीय समितीला सगळं सांगितलं
6
IPL 2025 : भर मैदानात अभिषेक अन् दिग्वेश यांच्यात वाजलं; नेमकं काय घडलं? (VIDEO)
7
'काश्मीरला जा आणि लष्कराच्या छावणीचे फोटो घेऊन ये"; ISI एजंटने भारतातील गुप्तहेराला कोणते काम दिले होते?
8
साताऱ्यात चीड आणणारी घटना! चुलत भावाकडून १३ वर्षीय बहिणीवर अनेकदा बलात्कार
9
राष्ट्रवादी काँग्रेसमधील नेतृत्वात लवकरच बदल दिसेल; रोहित पवारांचं विधान
10
कॅपिटल गेन टॅक्स काय असतो, कोणत्या प्रकारे आणि किती द्यावा लागतो? सगळं गणित समजून घ्या
11
लातूर : पाठीमागून येणाऱ्या दुचाकीची भयंकर धडक; आई, मुलासह जावयाचा मृत्यू
12
'मीदेखील या गोष्टीला बळी पडलोय', सरन्यायाधीश प्रोटोकॉल प्रकरणावर उपराष्ट्रपतींची प्रतिक्रिया
13
निक्की आधी बॅटिंगला येऊन पंतचा पुन्हा फ्लॉप शो! Sanjiv Goenka यांनी असा काढला राग
14
'ऑपरेशन सिंदूर' आधी पाकिस्तानला दिली होती माहिती?; परराष्ट्र सचिवांनी संसदीय समितीत केला खुलासा
15
IPL 2025 : विदर्भकराचं स्वप्न झालं साकार! पण विकेटमागे इशान किशननं घोळ घातला, नाहीतर...
16
Rain update: साताऱ्यात धडाम् धूम! वळवाची दमदार हजेरी, शहरातील वीजपुरवठा खंडित
17
ट्रॅक्टर-ऑटोचा भीषण अपघात, तीन जागीच ठार; लातूर-बार्शी महामार्गावरील घटना
18
Shocking: व्हिडीओ कॉलसमोर प्रेमीयुगुलानं केलं विषप्राशन; प्रेयसीचा मृत्यू, प्रियकर आयसीयूमध्ये!
19
Jalana: कामाहून परतणाऱ्या तीन कष्टकरी मित्रांवर वीज कोसळली; दोघांचा मृत्यू
20
भुईमूग बाजारात नेला अन् पावसामुळे वाहून गेला; महाराष्ट्रातील शेतकऱ्याला थेट केंद्रीय कृषिमंत्र्याचा कॉल; म्हणाले...

शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळणार कधी?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 15, 2021 04:12 IST

लाेकमत न्यूज नेटवर्क नरखेड : सन २०२० च्या खरीप हंगामात अतिवृष्टी आणि राेग व किडींच्या प्रादुर्भावामुळे संत्रा, माेसंबी, कपाशी, ...

लाेकमत न्यूज नेटवर्क

नरखेड : सन २०२० च्या खरीप हंगामात अतिवृष्टी आणि राेग व किडींच्या प्रादुर्भावामुळे संत्रा, माेसंबी, कपाशी, साेयाबीनच्या पिकांचे प्रचंड नुकसान झाले हाेते. शासनाच्या आदेशान्वये या नुकसानीचे सर्वेक्षण करून १० महिन्यापूर्वी त्याचा अहवाल राज्य शासनाकडे सादर करण्यात आला. मात्र, नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना अद्यापही भरपाई मिळाली नाही. ती मिळणार कधी, असा प्रश्न पंचायत समितीचे माजी सभापती वसंत चांडक यांच्यासह शेतकऱ्यांनी उपस्थित केला आहे.

मागील वर्षी सततच्या व परतीच्या पावसामुळे नरखेड तालुक्यातील खरीप पिकांचे प्रचंड नुकसान झाले हाेते. त्यातच प्रतिकूल वातावरणामुळे कपाशी व साेयाबीनच्या पिकावर कीड व राेगाचा तर संत्रा व माेसंबीवर ब्राऊन राॅटचा प्रादुर्भाव झाला हाेता. संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी राज्य शासनाने खरीप पिकासाठी प्रति हेक्टरी १० हजार रुपये तर फळबागांसाठी प्रति हेक्टरी २५ हजार रुपये नुकसान भरपाई देण्याची घाेषणा राज्य शासनाने केली हाेती.

त्या अनुषंगाने कृषी व महसूल विभागातील कर्मचाऱ्यांनी या नुकसानीचे सर्वेक्षण करून १५ ऑक्टाेबर २०२० राेजी राज्य शासनाला अहवाल सादर केला हाेता. याला १० महिने पूर्ण झाले तरी शासनाने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना एक रुपयाचीही नुकसान भरपाई दिली नाही. या नुकसानीतून नरखेड तालुका वगळण्यात आल्याने नवी समस्या निर्माण झाली हाेती. त्यामुळे शासनाने जुन्या दराने तालुक्यातील शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देणे अपेक्षित हाेते. ही नुकसान भरपाईदेखील मिळाली नसल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.

...

नरखेड तालुक्याला वगळले

राज्य शासनाने या नुकसान भरपाईतून नरखेड तालुक्याला वगळले हाेते. तालुक्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना नवीन दराने नुकसान भरपाई मिळणार नसल्याचेही त्यावेळी सांगण्यात आले हाेते. त्यामुळे पिकांसाठी प्रति हेक्टरी ६,८०० रुपये व फळबागांसाठी प्रति हेक्टरी १८,००० रुपये या जुन्या दराने तालुक्यातील शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळणे अपेक्षित हाेते.

...

२१.८३ काेटी रुपयांची आवश्यकता

मागील वर्षीच्या खरीप हंगामात नरखेड तालुक्यातील ३६,७३९ शेतकऱ्यांचे एकूण २७,३२८.६६ हेक्टरमधील विविध पिकांचे नुकसान झाले हाेते. त्यांना नुकसान भरपाई देण्यासाठी एकूण २१ काेटी ८३ लाख ७६ हजार ४७२ रुपयांची आवश्यकता आहे. तालुक्यातील २३,०२८ शेतकऱ्यांचे १५,४९४.५९ हेक्टरमधील साेयाबीन पिकाचे नुकसान झाले हाेते. या साेयाबीन उत्पादकांना नुकसान भरपाई देण्यासाठी १० काेटी ५३ लाख ६३ हजार २१२ रुपयांची तर, १३,७११ शेतकऱ्यांचे ११,८३४.०७ हेक्टरमधील संत्रा व माेसंबीचे नुकसान झाल्याने त्यांना नुकसान भरपाई देण्यासाठी २१ काेटी ३० लाख १३ हजार २६० रुपयांची आवश्यकता आहे.

...

राज्य शासनाकडे निधी उपलब्ध नसल्यामुळे शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळू शकली नाही. आता केंद्र सरकारने राज्याला ७०० कोटी रुपये दिले आहेत. त्या निधीतून नरखेड तालुक्यातील शेतकऱ्यांना राज्य शासनाने नुकसान भरपाई द्यायला हवी.

- वसंत चांडक, माजी सभापती,

पंचायत समिती, नरखेड.