शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! कोट्यवधींचे महाघोटाळे, बोगस भरतीही; शनि शिंगणापूर मंदिर ट्रस्ट बरखास्त
2
Today Daily Horoscope : आजचे राशीभविष्य - १२ जुलै २०२५; नशिबाची उत्तम साथ; यश व कीर्ती लाभेल, आनंदवार्ता मिळेल
3
शिंदेसेना वादात, विरोधकांना संधी; आमदारांच्या व्हायरल व्हिडिओमुळे एकनाथ शिंदेंची पंचाईत
4
होमिओपॅथीची नोंद एमएमसीमध्ये करायची की नाही?; तज्ज्ञ समिती करणार अभ्यास
5
बीकेसी ते शिळफाट्यादरम्यान बुलेट ट्रेनसाठीचा बोगदा पूर्ण; प्रकल्पाला मिळणार गती
6
अखेर ६ दिवसांनी बोया सापडला पण सर्च ऑपरेशनमध्ये आढळल्या ९२४ बेकायदा मच्छीमार बोटी
7
कुजबुज! उपमुख्यमंत्र्यांच्या कपाटात दडलं काय?; आमदारांचे PA, कार्यकर्त्यांचे लक्ष वेधले
8
कॅनडावरील टॅरिफ वाढवून केला ३५%; अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांची घोषणा
9
मतदार याद्यातील घोळ, घुसखोरी आणि गोंधळ; घोळ निस्तरणे निवडणूक आयोगाला शक्य होत नाही
10
...तर गो बॅक टू द थर्ड वर्ल्ड; न्यू यॉर्कमध्ये हाताने बिर्याणी खाल्ली, काय बिघडले?
11
फास्टॅग नीट न लावल्यास चालक ब्लॅकलिस्टमध्ये; तुम्हीही वाहन चालवताना करता का 'ही' चूक?
12
Video : शिवाजीनगर येथे पीएमटी बसला आग;नागरिकांच्या तत्परतेने टळली जीवितहानी
13
Wimbledon 2025: अल्काराझनं सलग तिसऱ्यांदा गाठली फायनल! नदालनंतर अशी कामगिरी करणारा ठरला दुसरा
14
दोन भिन्न वंशावळी न्यायालयात का सादर केल्या गेल्या? सात्यकी सावरकर यांनी याचा खुलासा करावा
15
नवऱ्याने रागाच्या भरात बायकोच्या नाकाचा घेतला चावा, झाले दोन तुकडे... नेमकं घडलं तरी काय?
16
"जनसुरक्षा विधेयका'चं नाव 'भाजप सुरक्षा विधेयक' करायला हवं"; मिसा, टाडाचा उल्लेख करत उद्धव ठाकरेंचा सरकारवर हल्लाबोल
17
"नोटांनी भरलेली बॅग मी आल्याबरोबर कपाटात..."; खळबळ उडवणाऱ्या व्हिडीओवर संजय शिरसाटांनी सोडलं मौन
18
Video: तुफान राडा ! आधी 'कॅप्टन' गिल पंचांशी भांडला, मग सिराजचाही पारा चढला, काय घडलं?
19
“नव्या कायद्याची गरज का? जनतेच्या मनातील संभ्रम...”; जनसुरक्षा विधेयकाला काँग्रेसचा विरोध
20
“आम्ही राज्यपालांना जनसुरक्षा विधेयक मंजूर करू नये ही विनंती करणार”; ठाकरे गटाचा निर्धार

शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळणार कधी?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 15, 2021 04:12 IST

लाेकमत न्यूज नेटवर्क नरखेड : सन २०२० च्या खरीप हंगामात अतिवृष्टी आणि राेग व किडींच्या प्रादुर्भावामुळे संत्रा, माेसंबी, कपाशी, ...

लाेकमत न्यूज नेटवर्क

नरखेड : सन २०२० च्या खरीप हंगामात अतिवृष्टी आणि राेग व किडींच्या प्रादुर्भावामुळे संत्रा, माेसंबी, कपाशी, साेयाबीनच्या पिकांचे प्रचंड नुकसान झाले हाेते. शासनाच्या आदेशान्वये या नुकसानीचे सर्वेक्षण करून १० महिन्यापूर्वी त्याचा अहवाल राज्य शासनाकडे सादर करण्यात आला. मात्र, नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना अद्यापही भरपाई मिळाली नाही. ती मिळणार कधी, असा प्रश्न पंचायत समितीचे माजी सभापती वसंत चांडक यांच्यासह शेतकऱ्यांनी उपस्थित केला आहे.

मागील वर्षी सततच्या व परतीच्या पावसामुळे नरखेड तालुक्यातील खरीप पिकांचे प्रचंड नुकसान झाले हाेते. त्यातच प्रतिकूल वातावरणामुळे कपाशी व साेयाबीनच्या पिकावर कीड व राेगाचा तर संत्रा व माेसंबीवर ब्राऊन राॅटचा प्रादुर्भाव झाला हाेता. संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी राज्य शासनाने खरीप पिकासाठी प्रति हेक्टरी १० हजार रुपये तर फळबागांसाठी प्रति हेक्टरी २५ हजार रुपये नुकसान भरपाई देण्याची घाेषणा राज्य शासनाने केली हाेती.

त्या अनुषंगाने कृषी व महसूल विभागातील कर्मचाऱ्यांनी या नुकसानीचे सर्वेक्षण करून १५ ऑक्टाेबर २०२० राेजी राज्य शासनाला अहवाल सादर केला हाेता. याला १० महिने पूर्ण झाले तरी शासनाने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना एक रुपयाचीही नुकसान भरपाई दिली नाही. या नुकसानीतून नरखेड तालुका वगळण्यात आल्याने नवी समस्या निर्माण झाली हाेती. त्यामुळे शासनाने जुन्या दराने तालुक्यातील शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देणे अपेक्षित हाेते. ही नुकसान भरपाईदेखील मिळाली नसल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.

...

नरखेड तालुक्याला वगळले

राज्य शासनाने या नुकसान भरपाईतून नरखेड तालुक्याला वगळले हाेते. तालुक्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना नवीन दराने नुकसान भरपाई मिळणार नसल्याचेही त्यावेळी सांगण्यात आले हाेते. त्यामुळे पिकांसाठी प्रति हेक्टरी ६,८०० रुपये व फळबागांसाठी प्रति हेक्टरी १८,००० रुपये या जुन्या दराने तालुक्यातील शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळणे अपेक्षित हाेते.

...

२१.८३ काेटी रुपयांची आवश्यकता

मागील वर्षीच्या खरीप हंगामात नरखेड तालुक्यातील ३६,७३९ शेतकऱ्यांचे एकूण २७,३२८.६६ हेक्टरमधील विविध पिकांचे नुकसान झाले हाेते. त्यांना नुकसान भरपाई देण्यासाठी एकूण २१ काेटी ८३ लाख ७६ हजार ४७२ रुपयांची आवश्यकता आहे. तालुक्यातील २३,०२८ शेतकऱ्यांचे १५,४९४.५९ हेक्टरमधील साेयाबीन पिकाचे नुकसान झाले हाेते. या साेयाबीन उत्पादकांना नुकसान भरपाई देण्यासाठी १० काेटी ५३ लाख ६३ हजार २१२ रुपयांची तर, १३,७११ शेतकऱ्यांचे ११,८३४.०७ हेक्टरमधील संत्रा व माेसंबीचे नुकसान झाल्याने त्यांना नुकसान भरपाई देण्यासाठी २१ काेटी ३० लाख १३ हजार २६० रुपयांची आवश्यकता आहे.

...

राज्य शासनाकडे निधी उपलब्ध नसल्यामुळे शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळू शकली नाही. आता केंद्र सरकारने राज्याला ७०० कोटी रुपये दिले आहेत. त्या निधीतून नरखेड तालुक्यातील शेतकऱ्यांना राज्य शासनाने नुकसान भरपाई द्यायला हवी.

- वसंत चांडक, माजी सभापती,

पंचायत समिती, नरखेड.