शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळणार कधी?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 15, 2021 04:12 IST

लाेकमत न्यूज नेटवर्क नरखेड : सन २०२० च्या खरीप हंगामात अतिवृष्टी आणि राेग व किडींच्या प्रादुर्भावामुळे संत्रा, माेसंबी, कपाशी, ...

लाेकमत न्यूज नेटवर्क

नरखेड : सन २०२० च्या खरीप हंगामात अतिवृष्टी आणि राेग व किडींच्या प्रादुर्भावामुळे संत्रा, माेसंबी, कपाशी, साेयाबीनच्या पिकांचे प्रचंड नुकसान झाले हाेते. शासनाच्या आदेशान्वये या नुकसानीचे सर्वेक्षण करून १० महिन्यापूर्वी त्याचा अहवाल राज्य शासनाकडे सादर करण्यात आला. मात्र, नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना अद्यापही भरपाई मिळाली नाही. ती मिळणार कधी, असा प्रश्न पंचायत समितीचे माजी सभापती वसंत चांडक यांच्यासह शेतकऱ्यांनी उपस्थित केला आहे.

मागील वर्षी सततच्या व परतीच्या पावसामुळे नरखेड तालुक्यातील खरीप पिकांचे प्रचंड नुकसान झाले हाेते. त्यातच प्रतिकूल वातावरणामुळे कपाशी व साेयाबीनच्या पिकावर कीड व राेगाचा तर संत्रा व माेसंबीवर ब्राऊन राॅटचा प्रादुर्भाव झाला हाेता. संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी राज्य शासनाने खरीप पिकासाठी प्रति हेक्टरी १० हजार रुपये तर फळबागांसाठी प्रति हेक्टरी २५ हजार रुपये नुकसान भरपाई देण्याची घाेषणा राज्य शासनाने केली हाेती.

त्या अनुषंगाने कृषी व महसूल विभागातील कर्मचाऱ्यांनी या नुकसानीचे सर्वेक्षण करून १५ ऑक्टाेबर २०२० राेजी राज्य शासनाला अहवाल सादर केला हाेता. याला १० महिने पूर्ण झाले तरी शासनाने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना एक रुपयाचीही नुकसान भरपाई दिली नाही. या नुकसानीतून नरखेड तालुका वगळण्यात आल्याने नवी समस्या निर्माण झाली हाेती. त्यामुळे शासनाने जुन्या दराने तालुक्यातील शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देणे अपेक्षित हाेते. ही नुकसान भरपाईदेखील मिळाली नसल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.

...

नरखेड तालुक्याला वगळले

राज्य शासनाने या नुकसान भरपाईतून नरखेड तालुक्याला वगळले हाेते. तालुक्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना नवीन दराने नुकसान भरपाई मिळणार नसल्याचेही त्यावेळी सांगण्यात आले हाेते. त्यामुळे पिकांसाठी प्रति हेक्टरी ६,८०० रुपये व फळबागांसाठी प्रति हेक्टरी १८,००० रुपये या जुन्या दराने तालुक्यातील शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळणे अपेक्षित हाेते.

...

२१.८३ काेटी रुपयांची आवश्यकता

मागील वर्षीच्या खरीप हंगामात नरखेड तालुक्यातील ३६,७३९ शेतकऱ्यांचे एकूण २७,३२८.६६ हेक्टरमधील विविध पिकांचे नुकसान झाले हाेते. त्यांना नुकसान भरपाई देण्यासाठी एकूण २१ काेटी ८३ लाख ७६ हजार ४७२ रुपयांची आवश्यकता आहे. तालुक्यातील २३,०२८ शेतकऱ्यांचे १५,४९४.५९ हेक्टरमधील साेयाबीन पिकाचे नुकसान झाले हाेते. या साेयाबीन उत्पादकांना नुकसान भरपाई देण्यासाठी १० काेटी ५३ लाख ६३ हजार २१२ रुपयांची तर, १३,७११ शेतकऱ्यांचे ११,८३४.०७ हेक्टरमधील संत्रा व माेसंबीचे नुकसान झाल्याने त्यांना नुकसान भरपाई देण्यासाठी २१ काेटी ३० लाख १३ हजार २६० रुपयांची आवश्यकता आहे.

...

राज्य शासनाकडे निधी उपलब्ध नसल्यामुळे शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळू शकली नाही. आता केंद्र सरकारने राज्याला ७०० कोटी रुपये दिले आहेत. त्या निधीतून नरखेड तालुक्यातील शेतकऱ्यांना राज्य शासनाने नुकसान भरपाई द्यायला हवी.

- वसंत चांडक, माजी सभापती,

पंचायत समिती, नरखेड.