शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांचा ४ वेळा फोन, पण PM मोदींचा बोलण्यास नकार; जर्मन वृत्तपत्राचा दावा
2
'सर्व भारतीयांचा DNA एकच; हिंदू राष्ट्र म्हणजे...', RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे विधान
3
जरांगे पाटलांबद्दल आक्षेपार्ह पोस्ट टाकल्याने तरुणाला काळं फासलं; समर्थकांकडून तरुणाला मारहाण
4
मराठा आरक्षणासाठी ३५ वर्षीय तरुणाने केला आत्महत्येचा प्रयत्न; लातूर जिल्ह्यातील घटना
5
डीएचएलसह अनेक कंपन्यांनी अमेरिकेकडे पाठवणारे पार्सल थांबवले! डोनाल्ड ट्रम्प यांच्यामुळे उडाला गोंधळ
6
विकासकामांत तोडली जाणारी झाडे वाचवण्याचा अनोखा उपक्रम! पुण्यात 'वृक्ष पुनर्रोपण' अभियान
7
फोनमधील 'या' सेटिंग्ज बदलाल तर वाचेल बराच इंटरनेट डेटा! अनेकांना माहीत नाहीत सोप्या टिप्स
8
प्रेरणादायी अध्यात्मिक वक्त्या जया किशोरी यांच्या हस्ते होणार श्रीमंत भाऊसाहेब रंगारी बाप्पाची प्राणप्रतिष्ठा!
9
सिंहगडावर 'त्या' ५ दिवसांत काय काय घडलं? बेपत्ता झालेल्या गौतम गायकवाडने सांगितला थरार
10
काश्मीर खोऱ्यातील तीन मंडळांना गणेश मूर्ती प्रदान; पुनीत बालन यांच्यासह मानाच्या गणेश मंडळाचा स्तुत्य उपक्रम!
11
वैष्णोदेवी यात्रा मार्गावर मोठा अपघात; भूस्खलनामुळे ५ भाविकांचा मृत्यू, १४ जखमी
12
Vidarbha Weather Alert: पावसाचा विदर्भाकडे मोर्चा; अनेक ठिकाणी मुसळधार कोसळणार; कोणत्या जिल्ह्यांना अलर्ट?
13
आणखी एक 'निक्की', हुंड्याने घेतला संजूचा जीव; मुलीसह स्वतःला पेटवलं, चिठ्ठीत म्हणाली...
14
किचनमधील 'या' वस्तूंमुळे दुप्पट वाढतो कॅन्सरचा धोका; डॉक्टर म्हणाले, आताच उचला अन् बाहेर फेका
15
७ मुलांची आई २२ वर्षांच्या भाच्याच्या प्रेमात पडली, पळून जायचा प्लॅन केला अन् पतीचे तीन लाखही केले लांपास!
16
बदल्याची आग! लव्ह मॅरेजनंतर पहिल्यांदा गावी आलं कपल; कुटुंब झालं हैवान, केली जावयाची हत्या
17
"मुंबईत येणारच, न्यायदेवता नक्कीच न्याय देईल", हायकोर्टाच्या निर्णयानंतरही मनोज जरांगे ठाम
18
पाकिस्तानला आसिम मुनीर यांचं किती कौतुक! 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये आपटल्यानंतरही सरकारने दिलं मोठ बक्षीस
19
दक्षिण कोरियाचे राष्ट्राध्यक्ष ली व्हाईट हाऊसमध्ये, ट्रम्प यांची घेतली भेट! चर्चेत झाला किम जोंग उनचा उल्लेख
20
झाली का गणपती पूजेची तयारी? काय राहिलं, काय घेतलं? झटपट तपासून घ्या पूजा साहित्य 

शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळणार कधी?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 15, 2021 04:12 IST

लाेकमत न्यूज नेटवर्क नरखेड : सन २०२० च्या खरीप हंगामात अतिवृष्टी आणि राेग व किडींच्या प्रादुर्भावामुळे संत्रा, माेसंबी, कपाशी, ...

लाेकमत न्यूज नेटवर्क

नरखेड : सन २०२० च्या खरीप हंगामात अतिवृष्टी आणि राेग व किडींच्या प्रादुर्भावामुळे संत्रा, माेसंबी, कपाशी, साेयाबीनच्या पिकांचे प्रचंड नुकसान झाले हाेते. शासनाच्या आदेशान्वये या नुकसानीचे सर्वेक्षण करून १० महिन्यापूर्वी त्याचा अहवाल राज्य शासनाकडे सादर करण्यात आला. मात्र, नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना अद्यापही भरपाई मिळाली नाही. ती मिळणार कधी, असा प्रश्न पंचायत समितीचे माजी सभापती वसंत चांडक यांच्यासह शेतकऱ्यांनी उपस्थित केला आहे.

मागील वर्षी सततच्या व परतीच्या पावसामुळे नरखेड तालुक्यातील खरीप पिकांचे प्रचंड नुकसान झाले हाेते. त्यातच प्रतिकूल वातावरणामुळे कपाशी व साेयाबीनच्या पिकावर कीड व राेगाचा तर संत्रा व माेसंबीवर ब्राऊन राॅटचा प्रादुर्भाव झाला हाेता. संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी राज्य शासनाने खरीप पिकासाठी प्रति हेक्टरी १० हजार रुपये तर फळबागांसाठी प्रति हेक्टरी २५ हजार रुपये नुकसान भरपाई देण्याची घाेषणा राज्य शासनाने केली हाेती.

त्या अनुषंगाने कृषी व महसूल विभागातील कर्मचाऱ्यांनी या नुकसानीचे सर्वेक्षण करून १५ ऑक्टाेबर २०२० राेजी राज्य शासनाला अहवाल सादर केला हाेता. याला १० महिने पूर्ण झाले तरी शासनाने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना एक रुपयाचीही नुकसान भरपाई दिली नाही. या नुकसानीतून नरखेड तालुका वगळण्यात आल्याने नवी समस्या निर्माण झाली हाेती. त्यामुळे शासनाने जुन्या दराने तालुक्यातील शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देणे अपेक्षित हाेते. ही नुकसान भरपाईदेखील मिळाली नसल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.

...

नरखेड तालुक्याला वगळले

राज्य शासनाने या नुकसान भरपाईतून नरखेड तालुक्याला वगळले हाेते. तालुक्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना नवीन दराने नुकसान भरपाई मिळणार नसल्याचेही त्यावेळी सांगण्यात आले हाेते. त्यामुळे पिकांसाठी प्रति हेक्टरी ६,८०० रुपये व फळबागांसाठी प्रति हेक्टरी १८,००० रुपये या जुन्या दराने तालुक्यातील शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळणे अपेक्षित हाेते.

...

२१.८३ काेटी रुपयांची आवश्यकता

मागील वर्षीच्या खरीप हंगामात नरखेड तालुक्यातील ३६,७३९ शेतकऱ्यांचे एकूण २७,३२८.६६ हेक्टरमधील विविध पिकांचे नुकसान झाले हाेते. त्यांना नुकसान भरपाई देण्यासाठी एकूण २१ काेटी ८३ लाख ७६ हजार ४७२ रुपयांची आवश्यकता आहे. तालुक्यातील २३,०२८ शेतकऱ्यांचे १५,४९४.५९ हेक्टरमधील साेयाबीन पिकाचे नुकसान झाले हाेते. या साेयाबीन उत्पादकांना नुकसान भरपाई देण्यासाठी १० काेटी ५३ लाख ६३ हजार २१२ रुपयांची तर, १३,७११ शेतकऱ्यांचे ११,८३४.०७ हेक्टरमधील संत्रा व माेसंबीचे नुकसान झाल्याने त्यांना नुकसान भरपाई देण्यासाठी २१ काेटी ३० लाख १३ हजार २६० रुपयांची आवश्यकता आहे.

...

राज्य शासनाकडे निधी उपलब्ध नसल्यामुळे शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळू शकली नाही. आता केंद्र सरकारने राज्याला ७०० कोटी रुपये दिले आहेत. त्या निधीतून नरखेड तालुक्यातील शेतकऱ्यांना राज्य शासनाने नुकसान भरपाई द्यायला हवी.

- वसंत चांडक, माजी सभापती,

पंचायत समिती, नरखेड.