शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्याला दिलं हृदय त्यानेच घेतला जीव! प्रेमविवाह करणाऱ्या अंजलीचा शेवट कसा झाला?; आरोपी पतीला अटक
2
खासदार श्रीकांत शिंदेंच्या बंगल्यातही शिरलं पाणी; विकासकामांवर बोलायचं नाही, मनसेचा खोचक टोला
3
Mumbai Rain Updates Live: शाळा-कॉलेजला २० ऑगस्टला सुट्टी जाहीर केल्याचा मेसेज खोटा - BMC
4
जग पाहण्याआधीच बाळाचा जीव गेला, आईनं गमावलं लेकरू; महाराष्ट्रात आरोग्य सेवेचे धिंडवडे निघाले
5
School Holiday: मुसळधार पावसाचा इशारा, प्रशासन सतर्क; २० ऑगस्टला कोणकोणत्या जिल्ह्यात शाळांना सुट्टी? वाचा
6
उपराष्ट्रपती निवडणूक: सी.पी राधाकृष्णन विरुद्ध सुदर्शन रेड्डी लढतीत कुणाचं पारडं मजबूत?
7
४० तोळं सोने अन् २० लाख खर्च करून लग्न लावलं; २ वर्षात पोरीनं स्वत:ला कायमचं संपवलं
8
मोनो रेल्वे बंद का पडली? CM देवेंद्र फडणवीसांनी दिले चौकशीचे आदेश, प्रवाशांना न घाबरण्याचं आवाहन
9
भारतातील श्रीमंत कुटुंबे रशियन तेलाचा फायदा घेत आहेत, डोनाल्ड ट्रम्प यांच्या मंत्र्यांचे मोठे विधान
10
Asia Cup 2025 : गिल वर्षभरानंतर संघात आला अन् उप-कर्णधार झाला! सूर्यकुमार यादवनं सांगितली आतली गोष्ट
11
पावसामुळे लोकल ठप्प, स्टेशनवर प्रवाशांची गर्दी; मुंबईकरांचे प्रचंड हाल, घरी परतण्यासाठी तारांबळ
12
भारताकडे शक्तिशाली क्षेपणास्त्रे, आमचे अनेक हवाई तळ उडवले; शरीफ यांच्या सहकाऱ्याने पाकिस्तानची पोलखोल केली
13
India Cotton Imports: केंद्र सरकारने कापूस आयातीवरील सीमा शुल्क हटवले; कुणाला फायदा?
14
Monorail: मोठी बातमी! मुंबईत प्रवाशांनी भरलेली मोनो रेल्वे मध्येच बंद पडली, प्रवासी अडकले; काच ब्रेक करण्याचे प्रयत्न सुरू (Video)
15
सेंच्युरीसह मुंबईकर पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दुसऱ्या बाजूला पुणेकर ऋतुराजनं घातला घोळ, अन्...
16
मुंबईसह राज्यात २० ऑगस्टपासून पावसाचा जोर ओसरणार; हवामान खात्याचा अंदाज, १२ तासांसाठी रेड अलर्ट
17
महिंद्राच्या कर्मचाऱ्याने महिला खासदाराला दिली अत्याचार, मारण्याची धमकी; कंपनी म्हणते...
18
सुदर्शन रेड्डींमुळे चंद्राबाबू-जगन मोहन यांच्यासमोर धर्म संकट; उपराष्ट्रपतिपदासाठी विरोधकांची खेळी
19
आता आणखी दोन नव्या कलर ऑप्शन्ससह आली Tata Punch EV, मिळणार फास्ट चार्जिंग स्पीड! असे आहेत सेफ्टी फीचर्स
20
राहुल गांधींच्या गाडीची पोलिसाला धडक, 'ही तर जनतेला चिरडणारी यात्रा', भाजपची बोचरी टीका

ऐतिहासिक रामटेक गडमंदिराच्या दुरावस्थेचे ग्रहण कधी सुटेल?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 15, 2021 04:07 IST

नागपूर : मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने गेल्या ११ वर्षांत विकास व संवर्धनासंदर्भात वेळोवेळी आवश्यक आदेश दिल्यानंतरही रामटेक येथील ...

नागपूर : मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने गेल्या ११ वर्षांत विकास व संवर्धनासंदर्भात वेळोवेळी आवश्यक आदेश दिल्यानंतरही रामटेक येथील ऐतिहासिक गडमंदिराची दुरावस्था कायम आहे. त्यामुळे राज्य सरकार, रामटेक नगर परिषद व पुरातत्व विभागावर आत्मपरीक्षण करण्याची वेळ आली आहे. गडमंदिराच्या दुरावस्थेचे ग्रहण कधी सुटेल हा प्रश्न आता सर्वांना भेडसावत आहे.

यासंदर्भात न्यायालयात २०१० पासून जनहित याचिका प्रलंबित आहे. या प्रकरणातील न्यायालय मित्र वरिष्ठ वकील ॲड. आनंद जयस्वाल यांनी ४ जुलै २०२१ रोजी संबंधित सरकारी अधिकाऱ्यांसाेबत मिळून गडमंदिर व परिसराचे निरीक्षण केले. सरकारी अधिकाऱ्यांमध्ये पुरातत्व विभागाच्या सहायक संचालक जया वहाणे, रामटेकचे उप-विभागीय अधिकारी जोगेंद्र कटयारे, रामटेक नगर परिषदेचे मुख्याधिकारी हर्षल गायकवाड, सार्वजनिक बांधकाम विभागाचे सहायक अभियंता सुनीलकुमार दमाहे व सहायक सरकारी वकील ॲड. दीपक ठाकरे यांचा समावेश होता. त्यानंतर ॲड. जयस्वाल यांनी १२ जुलै रोजी न्यायालयात प्रतिज्ञापत्र सादर करून गडमंदिराच्या दुरावस्थेची माहिती दिली.

--------------

अशी आहे दुरावस्था

१ - गडमंदिर परिसरात वराह, शिरपूर, भैरव व गोकुल अशी चार प्रवेशद्वारे असून त्यांची प्रचंड दुरावस्था झाली आहे. पुरातत्व विभागाने १२ जुलै २०१९ रोजी प्रतिज्ञापत्र सादर करून चारही प्रवेशद्वारांची दुरुस्ती करण्याची ग्वाही दिली होती. परंतु, अद्याप कामाला सुरुवात करण्यात आली नाही.

२ - गोकुल प्रवेशद्वाराचा प्रशासकीय कार्यालय व बुकस्टॉलकरिता उपयोग केला जात आहे. त्यामुळे या प्रवेशद्वाराचे पौराणिक सौंदर्य हरवले आहे. पर्यटकांना प्राचिनतेचा अनुभव घेता येत नाही.

३ - मंदिर परिसरात अनेक अनधिकृत पक्की बांधकामे करण्यात आली आहेत. त्यामुळे मंदिराच्या सौंदर्याला बाधा पोहचत आहे. ही बांधकामे पाडण्याची आणि येथील अगस्त्य मुनी आश्रमाची वैधता तपासण्याची आवश्यक आहे. आश्रमाचा ताबा खासगी व्यक्तींकडे आहे.

४ - स्वच्छता व भाविकांच्या सुविधेसाठी गडमंदिरापर्यंत पुरेसा पाणी पुरवठा करण्याची गरज आहे. पाण्याची समस्या अद्याप सोडवण्यात आली नाही. यासाठी सरकारकडे निधीची मागणी केल्याची माहिती नगर परिषदेने दिली आहे.

५ - नियमित देखभाल व दुरुस्ती केली जात नसल्यामुळे गडमंदिराची सर्वाधिक हानी झाली आहे. सध्या दगडांच्या बांधकामात वनस्पती व शेवाळ वाढले आहे. मंदिरातील कुंडेही खराब झाली आहेत.

६ - उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर मंदिर परिसरातील दुकानांचे अतिक्रमण हटवण्यात आले होते. त्यानंतर दुकानदारांनी पुन्हा अतिक्रमण केले आहे. त्यांना दुसऱ्यांदा हटवण्याचे प्रयत्न करण्यात आले नाही.

७ - गडमंदिर परिसरात रुद्र नरसिम्हा मंदिर, केवल मंदिर, वराह मंदिर व त्रिविक्रम मंदिर ही वाकाटककालीन मंदिरे असून ती गडमंदिरापेक्षाही प्राचीन आहेत. ही मंदिरे सम्राट चंद्रगुप्त यांची कन्या प्रभावती गुप्त यांनी बांधली आहेत. ही मंदिरेदेखील दुर्लक्षित आहेत. या मंदिरांच्या इतिहासाची व्यापक प्रसिध्दी करण्यात आली नाही. त्यामुळे नागरिकांना त्याविषयी काहीच माहिती नाही.

---------------

सरकारला उत्तर सादर करण्यासाठी वेळ

या प्रकरणावर बुधवारी न्यायमूर्तीद्वय सुनील शुक्रे व अनिल किलोर यांच्यासमक्ष सुनावणी झाली. त्यानंतर न्यायालयाने ॲड. जयस्वाल यांचे प्रतिज्ञापत्र रेकॉर्डवर घेऊन राज्य सरकारला यावर उत्तर सादर करण्यासाठी दोन आठवड्याचा वेळ दिला. सरकारतर्फे ॲड. दीपक ठाकरे तर, नगर परिषदेतर्फे ॲड. महेश धात्रक यांनी कामकाज पाहिले.