शहरं
Join us  
Trending Stories
1
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
2
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
3
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
4
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
5
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
6
जखमी चेहरा अन् एक पाय गमावला...; इराणी सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्याबाबत नवा खुलासा
7
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
8
सगळे बघतच राहिले, PM मोदी-राहुल गांधी एकत्र; आपुलकीने विचारपूस अन् चर्चा; नेमके काय घडले?
9
'शांतीदूत' बनल्याने पाकिस्तानचे पाप धुवून निघणार नाही! शशी थरूर यांची शेजारी राष्ट्रावर सडकून टीका
10
“अजिबात सोपे नाही, पण काही होऊ दे, होर्मुझ जलमार्ग सुरू करणारच”; डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्धार
11
हॉस्पिटलचं बिल कमी होणार? IRDAI नं बनवली एक सब कमिटी, काय असेल याचं काम?
12
'त्याच्याशीच लग्न करेन' म्हणत तरुणी अडून बसली; पोलिसांनी बोलावले तरीही घरच्यांनी दिला नकार अन् घडला थरार
13
मृणाल ठाकूरची इंडस्ट्रीतली सर्वात जवळची मैत्रीण कोण? 'या' अभिनेत्रीचं घेतलं नाव, म्हणाली...
14
Peace Of Mind: मनावर ताबा मिळवण्यासाठी आणि जीवन समृद्ध करण्यासाठी भगवान बुद्धांनी सांगितले ९ सुवर्ण मार्ग
15
PSL 2026: "उस्मान तारिकच्या बॉलिंगवर खेळणार नाही" लाईव्ह सामन्यात डॅरिल मिशेलचा आक्षेप, असं का म्हणाला?
16
संतापजनक! मराठा साम्राज्याचा विस्तार दर्शविणारा नकाशा आठवीच्या पुस्तकातून NCERT ने वगळला
17
१२० किंवा १५० रुपयांऐवजी ₹१२३ किंवा ₹१४८ चं पट्रोल का भरताहेत लोक? राऊंड फिगरमुळे कमी मिळतं का Petrol?
18
पाकिस्तानात इराण-अमेरिका चर्चा अयशस्वी ठरली तर काय असेल डोनाल्ड ट्रम्प यांना पुढचा प्लॅन?
19
वरुथिनी एकादशी २०२६: १० हजार वर्षांच्या तपश्चर्येचे फळ केवळ एका व्रतात! जाणून घ्या 'वरुथिनी एकादशी'चे पूजा विधी
20
Tripti Kalhans : डिप्रेशनवर मात अन् पाचव्या प्रयत्नात बाजी! सलग ४ वेळा नापास झालेली तृप्ती बनली IAS अधिकारी
Daily Top 2Weekly Top 5

ऐतिहासिक रामटेक गडमंदिराच्या दुरावस्थेचे ग्रहण कधी सुटेल?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 15, 2021 04:07 IST

नागपूर : मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने गेल्या ११ वर्षांत विकास व संवर्धनासंदर्भात वेळोवेळी आवश्यक आदेश दिल्यानंतरही रामटेक येथील ...

नागपूर : मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने गेल्या ११ वर्षांत विकास व संवर्धनासंदर्भात वेळोवेळी आवश्यक आदेश दिल्यानंतरही रामटेक येथील ऐतिहासिक गडमंदिराची दुरावस्था कायम आहे. त्यामुळे राज्य सरकार, रामटेक नगर परिषद व पुरातत्व विभागावर आत्मपरीक्षण करण्याची वेळ आली आहे. गडमंदिराच्या दुरावस्थेचे ग्रहण कधी सुटेल हा प्रश्न आता सर्वांना भेडसावत आहे.

यासंदर्भात न्यायालयात २०१० पासून जनहित याचिका प्रलंबित आहे. या प्रकरणातील न्यायालय मित्र वरिष्ठ वकील ॲड. आनंद जयस्वाल यांनी ४ जुलै २०२१ रोजी संबंधित सरकारी अधिकाऱ्यांसाेबत मिळून गडमंदिर व परिसराचे निरीक्षण केले. सरकारी अधिकाऱ्यांमध्ये पुरातत्व विभागाच्या सहायक संचालक जया वहाणे, रामटेकचे उप-विभागीय अधिकारी जोगेंद्र कटयारे, रामटेक नगर परिषदेचे मुख्याधिकारी हर्षल गायकवाड, सार्वजनिक बांधकाम विभागाचे सहायक अभियंता सुनीलकुमार दमाहे व सहायक सरकारी वकील ॲड. दीपक ठाकरे यांचा समावेश होता. त्यानंतर ॲड. जयस्वाल यांनी १२ जुलै रोजी न्यायालयात प्रतिज्ञापत्र सादर करून गडमंदिराच्या दुरावस्थेची माहिती दिली.

--------------

अशी आहे दुरावस्था

१ - गडमंदिर परिसरात वराह, शिरपूर, भैरव व गोकुल अशी चार प्रवेशद्वारे असून त्यांची प्रचंड दुरावस्था झाली आहे. पुरातत्व विभागाने १२ जुलै २०१९ रोजी प्रतिज्ञापत्र सादर करून चारही प्रवेशद्वारांची दुरुस्ती करण्याची ग्वाही दिली होती. परंतु, अद्याप कामाला सुरुवात करण्यात आली नाही.

२ - गोकुल प्रवेशद्वाराचा प्रशासकीय कार्यालय व बुकस्टॉलकरिता उपयोग केला जात आहे. त्यामुळे या प्रवेशद्वाराचे पौराणिक सौंदर्य हरवले आहे. पर्यटकांना प्राचिनतेचा अनुभव घेता येत नाही.

३ - मंदिर परिसरात अनेक अनधिकृत पक्की बांधकामे करण्यात आली आहेत. त्यामुळे मंदिराच्या सौंदर्याला बाधा पोहचत आहे. ही बांधकामे पाडण्याची आणि येथील अगस्त्य मुनी आश्रमाची वैधता तपासण्याची आवश्यक आहे. आश्रमाचा ताबा खासगी व्यक्तींकडे आहे.

४ - स्वच्छता व भाविकांच्या सुविधेसाठी गडमंदिरापर्यंत पुरेसा पाणी पुरवठा करण्याची गरज आहे. पाण्याची समस्या अद्याप सोडवण्यात आली नाही. यासाठी सरकारकडे निधीची मागणी केल्याची माहिती नगर परिषदेने दिली आहे.

५ - नियमित देखभाल व दुरुस्ती केली जात नसल्यामुळे गडमंदिराची सर्वाधिक हानी झाली आहे. सध्या दगडांच्या बांधकामात वनस्पती व शेवाळ वाढले आहे. मंदिरातील कुंडेही खराब झाली आहेत.

६ - उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर मंदिर परिसरातील दुकानांचे अतिक्रमण हटवण्यात आले होते. त्यानंतर दुकानदारांनी पुन्हा अतिक्रमण केले आहे. त्यांना दुसऱ्यांदा हटवण्याचे प्रयत्न करण्यात आले नाही.

७ - गडमंदिर परिसरात रुद्र नरसिम्हा मंदिर, केवल मंदिर, वराह मंदिर व त्रिविक्रम मंदिर ही वाकाटककालीन मंदिरे असून ती गडमंदिरापेक्षाही प्राचीन आहेत. ही मंदिरे सम्राट चंद्रगुप्त यांची कन्या प्रभावती गुप्त यांनी बांधली आहेत. ही मंदिरेदेखील दुर्लक्षित आहेत. या मंदिरांच्या इतिहासाची व्यापक प्रसिध्दी करण्यात आली नाही. त्यामुळे नागरिकांना त्याविषयी काहीच माहिती नाही.

---------------

सरकारला उत्तर सादर करण्यासाठी वेळ

या प्रकरणावर बुधवारी न्यायमूर्तीद्वय सुनील शुक्रे व अनिल किलोर यांच्यासमक्ष सुनावणी झाली. त्यानंतर न्यायालयाने ॲड. जयस्वाल यांचे प्रतिज्ञापत्र रेकॉर्डवर घेऊन राज्य सरकारला यावर उत्तर सादर करण्यासाठी दोन आठवड्याचा वेळ दिला. सरकारतर्फे ॲड. दीपक ठाकरे तर, नगर परिषदेतर्फे ॲड. महेश धात्रक यांनी कामकाज पाहिले.