शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसंख्येतील बदल घुसखोरीपेक्षाही घातक...! असं का म्हणाले पंतप्रधान मोदी? देशाला दिला गंभीर इशारा
2
'ओला दुष्काळ जाहीर करा', उद्धव ठाकरेंनी दाखवले CM फडणवीसांचे पत्र, म्हणाले, "मलाही वेदना झाल्या.."
3
CM फडणवीसांचा ‘तो’ Video विरोधकांनी दाखवला; म्हणाले, “गांभीर्याने विचार करा, असले राजकारण...”
4
शौक बड़ी चीज है! १७ व्या वर्षी iPhone 4, iPad 2 साठी विकली किडनी, आता आयुष्यभराचं दुखणं
5
पुतीन यांची दहशत...! 27 देशांनी घेतला रशियाचा धसका; जगात पहिल्यांदाच तयार होणार 'ड्रोन वॉल', कसं काम करणार?
6
'देशद्रोह्यांनी मॅच एन्जॉय केली असेल', IND-PAK सामन्यावरुन उद्धव ठाकरेंची बोचरी टीका
7
Upcoming Smartphones: वनप्लस १५, विवो एक्स ३०० आणि बरंच काही; ऑक्टोबरमध्ये लॉन्च होत आहेत 'हे' ६ फोन!
8
"गुरूजी म्हणाले, 'दाताखाली जीभ आली म्हणून आपण दात पाडत नाही"; मोदींनी सांगितली आठवण
9
दिवाळासाठी एसटीने केलेली १० टक्के भाडेवाढ रद्द; पूरस्थितीच्या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदेंनी केली घोषणा
10
Dussehra 2025: दसऱ्याला रावण दहनानंतरची राख, घरी का आणतात माहितीय? काय आहे परंपरा?
11
DA Hike: दिवाळीपूर्वी केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी गुडन्यूज, महागाई भत्त्यात 3% वाढ; आता 'एवढा' पगार मिळणार
12
खोलीत पेटती लाईट, आत मृतदेह, अन् बाहेरून कुलूप, अशी पकडली गेली १६ वर्षांची आरोपी मुलगी   
13
IND vs AUS : प्रितीच्या मोहऱ्यांची टीम इंडियाकडून हवा! ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वनडेत कुटल्या ४१३ धावा
14
“मोदींची सत्ता उलथवून टाकण्यासाठी राहुल गांधींसोबत एकत्र यायला अडचण नाही”: प्रकाश आंबेडकर
15
नोकरीच्या संधी कमी होणार? देशातील उत्पादन वाढ महिन्यांच्या नीचांकी पातळीवर; 'या' कारणांचा थेट फटका
16
1 लाख 34 हजार रुपयांचा iphone 17 Pro Max बनवण्यासाठी किती खर्च येतो? आकडे ऐकून चक्रावून जाल...
17
दसरा मेळाव्यासाठी ६३ कोटींचा खर्च, शेतकऱ्यांना द्या; भाजपच्या मागणीवर ठाकरे म्हणाले, "उद्या बिल पाठवतो"
18
Dussehra 2025: दसऱ्याच्या मुहूर्तावर ११ लवंगांचा 'हा' विधी, दहन करेल तुमच्या आर्थिक अडचणी!
19
दिवाळीनंतर लगेच निवडणुकीचा धुराळा! राज्यातील जिल्हा परिषद, पंचायत समिती मतदारसंघ आरक्षणाचा कार्यक्रम जाहीर
20
“शिशुपालाप्रमाणे RSSची शंभरी भरली, मनुस्मृती, बंच ऑफ थॉटचे दहन करून संघ विसर्जित करा”: सपकाळ

रेल्वे ‘फ्लायओव्हर’ बांधणार कधी?

By admin | Updated: December 28, 2014 00:39 IST

स्थानिक रमानगरात असलेले रेल्वे फाटक तासन्तास बंद असते. त्यामुळे फाटकाच्या दोन्ही बाजूला वाहनांच्या रांगा लागतात. अशावेळी शाळेला उशीर होऊ नये म्हणून चिमुकले त्यांच्या

रमानगरात वाहतुकीची कोंडी : फाटक ओलांडताना चिमुकल्यांचा जीव धोक्यात कामठी : स्थानिक रमानगरात असलेले रेल्वे फाटक तासन्तास बंद असते. त्यामुळे फाटकाच्या दोन्ही बाजूला वाहनांच्या रांगा लागतात. अशावेळी शाळेला उशीर होऊ नये म्हणून चिमुकले त्यांच्या पालकांसोबत फाटकाच्या खालून रेल्वे लाईन ओलांडतात. या जीवघेण्या प्रकाराला आळा घालण्यासाठी तसेच वाहतुकीची कोंडी सोडविण्यासाठी या ठिकाणी रेल्वे ‘फ्लायओव्हर’चे बांधकाम करणे आवश्यक आहे.नागपूर-हावडा ही रेल्वे लाईन कामठीहून जाते. कामठी शहरातील रमानगरात या रेल्वे लाईनवर फाटक तयार करण्यात आले आहे. या रेल्वे लाईनवरून हावडा व नागपूरकडे धावणाऱ्या रेल्वेगाड्यांची संख्या अधिक असल्याने, सदर फाटक वारंवार बंद केले जाते. त्यामुळे वाहनचालक व पादचाऱ्यांना रेल्वे जाईपर्यंत ताटकळत उभे राहावे लागते.सदर रेल्वे फाटक कामठी-घोरपड-महालगाव मार्गावर असून, या फाटकाच्या अलीकडे कामठी शहर आणि पलीकडे घोरपड, लिहीगाव, महालगाव, शिरपूर, पवनगाव आदी गावे तसेच रविदासनगर, यशोदरानगर आदी नागरी वसाहती आहेत. तसेच या मार्गावर औद्योगिक प्रशिक्षण संस्था (आयटीआय), अभियांत्रिकी महाविद्यालय, पॉलिटेक्निक कॉॅलेज, फार्मसी कॉलेज, शारीरिक शिक्षण महाविद्यालय यासह अन्य शैक्षणिक संस्थादेखील आहेत. त्यामुळे या मार्गावरून विद्यार्थ्यांची सतत वर्दळ असते. तालुक्यातील घोरपड, लिहीगाव, महालगाव, पवनगाव यासह अन्य गावातील नागरिक याच मार्गाने कामठीला येत असून, शेतीमालाची वाहतूकही याच मार्गाने करतात. त्यांना कामठीला येण्यासाठी या मार्गाशिवाय दुसरा सोईचा मार्ग नाही. कामठी हे तालुक्याचे ठिकाण असल्याने कामठीत पोलीस ठाणे, तहसील कार्यालय, पंचायत समिती कार्यालय, उपजिल्हा रुग्णालय, खासगी हॉस्पिटलसह अन्य शासकीय कार्यालये तसेच बाजारपेठ असल्याने ग्रामीण भागातील नागरिकांना कोणत्या ना कोणत्या कामासाठी कामठीला यावे लागते.कामठी-महालगाव मार्गावर नवीन नागरी वस्त्या तयार होत आहेत. त्यामुुळे भविष्यात ही समस्या आधी उग्र रूप धारण करणार आहे. येथील वाहतुकीची कोंडी सोडविण्यासाठी येथे रेल्वे फ्लायओव्हर तयार करण्याची मागणी केली जात आहे. मात्र, ही मागणी स्थानिक लोकप्रतिनिधी व संबंधित विभागाचे अधिकारी गांभीर्याने घेत नसल्याने, ही समस्या दिवसेंदिवस गंभीर होत चालली आहे. (तालुका प्रतिनिधी)