शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठीचा उल्लेख करत भारतीय भाषांबाबत लाल किल्ल्यावरून नरेंद्र मोदींनी केलं मोठं विधान, म्हणाले...
2
PM मोदींनी सर्व रेकॉर्ड मोडले, लाल किल्ल्यावर १०३ मिनिटे भाषण केले; पाहा, १० मोठे मुद्दे
3
"साहेब मी जिवंत आहे..."; मतदार यादीत ज्याला मृत घोषित केले, तो थेट निवडणूक कार्यालयात पोहचला
4
"... मग त्यासाठी जितेंद्र आव्हाड शरद पवार यांचा निषेध करणार का?"; भाजपाचा खरमरीत सवाल
5
डबेवाला बांधवांना २५.५० लाखांत ५०० चौरस फुटांचे घर; CM देवेंद्र फडणवीस यांची मोठी घोषणा
6
नवी जबाबदारी मिळताच नवाब मलिक अ‍ॅक्शन मोडवर; बैठका घेत मुंबई महापालिका निवडणूक कामाला लागले
7
पश्चिम बंगालमध्ये ट्रक आणि बसमध्ये भीषण अपघात, १० जणांचा मृत्यू, ३० जण जखमी
8
सचिन तेंडुलकरची होणारी सून सानिया, अर्जुन अन् छोटंसं कुत्र्याचं पिल्लू... पाहा UNSEEN PHOTOS
9
Independence Day 2025: "वंद्य वंदे मातरम्...", ७९व्या स्वातंत्र्यदिनाच्या सलील कुलकर्णींनी दिल्या सुरेल शुभेच्छा
10
बाबो! क्रिती सनॉनने मुंबईत खरेदी केलं पेंटहाऊस, किंमत ऐकून पायाखालची जमीनच सरकेल
11
पतीला मारलं अन् तुरुंगात गेली, नवा बॉयफ्रेंड बनवला; कैदेतून बाहेर येताच सासऱ्याचाही खेळ खल्लास केला! नेमकं झालं काय?
12
'दिवाळीत जीएसटीमध्ये होणार मोठे बदल, सामान्यांसाठी अनेक गोष्टी स्वस्त'; पंतप्रधान मोदींची घोषणा
13
“भारताच्या पाण्याने शत्रूंची शेती समृद्ध, सिंधू करार अन्यायकारक”; PM मोदींनी पाकला सुनावले
14
मेक इन इंडिया फायटर जेट इंजिन निर्मितीचे लक्ष्य; PM मोदींचे शास्त्रज्ञांना आवाहन, म्हणाले...
15
"दहशतवाद्यांचे तळ नाहीसे केले, पाकिस्तानची झोप अजूनही उडलेली आहे", PM मोदींनी केले 'ऑपरेशन सिंदूर'वर भाष्य
16
सचिन तेंडुलकरच्या होणाऱ्या सुनेची पहली झलक; सानिया चांडोकचा सर्वात लेटेस्ट फोटो आला समोर
17
डोनाल्ड ट्रम्प आणि व्लादिमीर पुतिन यांची भेट भारतासाठी फायदेशीर ठरणार? टॅरिफवर होऊ शकतो मोठा निर्णय!
18
आजचे राशीभविष्य, १५ ऑगस्ट २०२५: ५ राशींना शुभ, आर्थिक लाभ; स्वादिष्ट भोजनाचा आस्वाद घ्याल
19
भारत जगात भारी... अमेरिकेच्या टॅरिफचा परिणाम होणार नाही; एस अँड पी ग्लोबल रेटिंग्सचा दावा
20
मुंबईत फक्त मनसे आणि उद्धवसेनेचीच ताकद, तयारीला लागा; राज ठाकरेंच्या कार्यकर्त्यांना सूचना

रेल्वे ‘फ्लायओव्हर’ बांधणार कधी?

By admin | Updated: December 28, 2014 00:39 IST

स्थानिक रमानगरात असलेले रेल्वे फाटक तासन्तास बंद असते. त्यामुळे फाटकाच्या दोन्ही बाजूला वाहनांच्या रांगा लागतात. अशावेळी शाळेला उशीर होऊ नये म्हणून चिमुकले त्यांच्या

रमानगरात वाहतुकीची कोंडी : फाटक ओलांडताना चिमुकल्यांचा जीव धोक्यात कामठी : स्थानिक रमानगरात असलेले रेल्वे फाटक तासन्तास बंद असते. त्यामुळे फाटकाच्या दोन्ही बाजूला वाहनांच्या रांगा लागतात. अशावेळी शाळेला उशीर होऊ नये म्हणून चिमुकले त्यांच्या पालकांसोबत फाटकाच्या खालून रेल्वे लाईन ओलांडतात. या जीवघेण्या प्रकाराला आळा घालण्यासाठी तसेच वाहतुकीची कोंडी सोडविण्यासाठी या ठिकाणी रेल्वे ‘फ्लायओव्हर’चे बांधकाम करणे आवश्यक आहे.नागपूर-हावडा ही रेल्वे लाईन कामठीहून जाते. कामठी शहरातील रमानगरात या रेल्वे लाईनवर फाटक तयार करण्यात आले आहे. या रेल्वे लाईनवरून हावडा व नागपूरकडे धावणाऱ्या रेल्वेगाड्यांची संख्या अधिक असल्याने, सदर फाटक वारंवार बंद केले जाते. त्यामुळे वाहनचालक व पादचाऱ्यांना रेल्वे जाईपर्यंत ताटकळत उभे राहावे लागते.सदर रेल्वे फाटक कामठी-घोरपड-महालगाव मार्गावर असून, या फाटकाच्या अलीकडे कामठी शहर आणि पलीकडे घोरपड, लिहीगाव, महालगाव, शिरपूर, पवनगाव आदी गावे तसेच रविदासनगर, यशोदरानगर आदी नागरी वसाहती आहेत. तसेच या मार्गावर औद्योगिक प्रशिक्षण संस्था (आयटीआय), अभियांत्रिकी महाविद्यालय, पॉलिटेक्निक कॉॅलेज, फार्मसी कॉलेज, शारीरिक शिक्षण महाविद्यालय यासह अन्य शैक्षणिक संस्थादेखील आहेत. त्यामुळे या मार्गावरून विद्यार्थ्यांची सतत वर्दळ असते. तालुक्यातील घोरपड, लिहीगाव, महालगाव, पवनगाव यासह अन्य गावातील नागरिक याच मार्गाने कामठीला येत असून, शेतीमालाची वाहतूकही याच मार्गाने करतात. त्यांना कामठीला येण्यासाठी या मार्गाशिवाय दुसरा सोईचा मार्ग नाही. कामठी हे तालुक्याचे ठिकाण असल्याने कामठीत पोलीस ठाणे, तहसील कार्यालय, पंचायत समिती कार्यालय, उपजिल्हा रुग्णालय, खासगी हॉस्पिटलसह अन्य शासकीय कार्यालये तसेच बाजारपेठ असल्याने ग्रामीण भागातील नागरिकांना कोणत्या ना कोणत्या कामासाठी कामठीला यावे लागते.कामठी-महालगाव मार्गावर नवीन नागरी वस्त्या तयार होत आहेत. त्यामुुळे भविष्यात ही समस्या आधी उग्र रूप धारण करणार आहे. येथील वाहतुकीची कोंडी सोडविण्यासाठी येथे रेल्वे फ्लायओव्हर तयार करण्याची मागणी केली जात आहे. मात्र, ही मागणी स्थानिक लोकप्रतिनिधी व संबंधित विभागाचे अधिकारी गांभीर्याने घेत नसल्याने, ही समस्या दिवसेंदिवस गंभीर होत चालली आहे. (तालुका प्रतिनिधी)