शहरं
Join us  
Trending Stories
1
व्वा रं पठ्ठ्या !! मगरीनं अचानक येऊन त्याचं डोकं जबड्यात धरलं, पण धाडसाने वाचवले स्वत:चे प्राण
2
विठुरायाच्या कृपेने अवचितराव पुन्हा स्वगृही! घर सोडून गेले अन् तब्बल २० वर्षांनी परतले मुळगावी...
3
पत्नीला पोटगी देण्यासाठी बेरोजगार बनला ‘चेनस्नॅचर’; नागपुरच्या पाच जबरी चोरीच्या गुन्ह्यांची उकल
4
धक्कादायक! नागपूर मध्यवर्ती कारागृहात अंडरविअरच्या इलॅस्टिकने कैद्याने घेतली फाशी
5
२५ लाखांची टेस्ला ६० लाखांना घ्यावी लागतेय, जबाबदार कोण? आदित्य ठाकरेंचा सवाल; म्हणाले, "अडचणी आणल्या नसत्या तर..."
6
VIDEO: घाबरलेली अँकर Live शो सोडून पळाली... स्फोटांनी हादरलं सिरिया; हल्ल्याने उडाली दाणादाण
7
खापरी–गुमगावदरम्यान ऑटोमॅटिक ब्लॉक सिग्नलिंग सिस्टम; मध्य रेल्वेकडून तंत्रज्ञानाची कास
8
कौतुकास्पद! उद्योगांच्या मदतीने राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ शिकवणार कार्पोरेट प्रशासन
9
'महाराष्ट्र मेरीटाईम समिट २०२५' मुळे राज्याच्या सागरी क्षेत्राला बळकटी मिळेल- नितेश राणे
10
विशेष मुलांचे प्रश्न सोडवण्यासाठी शासन सहकार्य करणार; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची ग्वाही
11
"सोबतचे जड झाले असतील म्हणून..."; CM फडणवीसांनी दिलेल्या ऑफरवर ठाकरेंचे प्रत्युत्तर
12
₹96 च्या IPO वर गुंतवणूकदारांच्या उड्या, 142 पट सब्सक्राइब झाला; GMP ला 43 रुपयांचा फायदा!
13
भयानक!! इस्रायलचा सीरियाच्या संरक्षण मंत्रालयावर मोठा हल्ला; संपूर्ण इमारतीच्या चिंधड्या, पाहा VIDEO
14
₹ 350 वरून थेट ₹19 वर आला हा शेअर, आता लागतंय 10% चं अप्पर सर्किट; करतोय मालामाल
15
“CM फडणवीस रामासारखे चारित्र्यवान, कृष्णासारखे चतूर”; भाजपा आमदारांकडून कौतुकाचा वर्षाव
16
नीलम गोऱ्हेंचा आग्रह अन् ठाकरेंचा नकार; उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे एकाच फ्रेममध्ये, फक्त खुर्चीचे होतं अंतर
17
CM देवेंद्र फडणवीसांच्या ऑफरवर उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले...
18
“वयाच्या १० वर्षापासून RSSशी संबंध, मी पुन्हा येईन, पण कुठून येईन ते विचारू नका”: दानवे
19
Budget Cars: कुटुंबासाठी कमी बजेटमध्ये ७-सीटर कार शोधताय? 'हे' आहेत बेस्ट ऑप्शन! 
20
अनैतिक संबंधांसाठी पत्नीनं सोडली मर्यादा, केला गंभीर गुन्हा, तिला कठोर शिक्षा द्या म्हणत पती झाला भावूक 

भविष्यात गहू, ज्वारीची गुणवत्ता, उत्पादकता संकटात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2021 04:09 IST

उदय अंधारे नागपूर : हवामान बदलाचे भयकारी संकेत आता दिसायला लागले आहेत. सर्वाधिक परिणाम भविष्यात कृषी क्षेत्राला भाेगावे लागणार ...

उदय अंधारे

नागपूर : हवामान बदलाचे भयकारी संकेत आता दिसायला लागले आहेत. सर्वाधिक परिणाम भविष्यात कृषी क्षेत्राला भाेगावे लागणार आहेत. यामुळे महाराष्ट्रातील शेतीचे पॅटर्न प्रभावित हाेणार आहे. विदर्भ, मराठवाडा व खान्देशात पिकणाऱ्या गहू, ज्वारी या रब्बी पिकांची उत्पादकता आणि गुणवत्ता संकटात येण्याची भीती तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.

‘इन्स्टिट्यूट ऑफ सस्टेनेबल कम्युनिटी’ ने भविष्यात कृषी क्षेत्रावर हाेणाऱ्या हवामान बदलाच्या परिणामांचा केलेला अभ्यास या संकटाचे संकेत देणारा आहे. तज्ज्ञांच्या मते पेरणीच्या काळात जमिनीत थाेडा ओलावा असणे गरजेचा आहे, जाे मान्सूनच्या परतीच्या प्रवासामुळे मिळताे. मात्र अभ्यासानुसार २०२१ ते २०५० या ३० वर्षाच्या काळात पर्जन्यमान घटणार असल्याने जमिनीत पुरेसा ओलावा राहणार नाही आणि पेरणीवर परिणाम हाेईल. शेतकऱ्यांच्या अनुभवानुसार बियाणे पेरणीनंतर बीजांकुर निघेपर्यंत १०० दिवस हवामान थंड असणे गरजेचे आहे, ज्यामुळे पिकांच्या व उत्पादकतेच्या वाढीस मदत हाेते. मात्र भविष्यात हवामानातील पुरेसा थंडावा मिळेल, याची शास्वती राहणार नाही. पुढच्या ३० वर्षात सरासरीपेक्षा तापमानात वाढ हाेणार असल्याने झाडांचा पाेतच बिघडण्याची शक्यता आहे.

पुढच्या ३० वर्षात पिकांची पेरणी आणि दाणे भरण्याच्या काळात एकीकडे पर्जन्यमानाची कमतरता असेल तर दुसरीकडे गरजेपेक्षा अधिक पाऊस हाेईल. मात्र तापमान वाढलेले असेल. येत्या ३० वर्षात गव्हाच्या पिकाचा विचार केल्यास पिकाच्या सुरुवातीच्या काळात पावसाची गरज अधिक असताना पाऊस कमी असेल आणि फेब्रुवारी-मार्चमध्ये कापणीच्या काळात जेव्हा पावसाची गरज नसेल तेव्हा अधिक पाऊस असेल. ज्वारीचा विचार केल्यास भविष्यात ज्वारीचा पेरणीचा काळच बदलण्याची शक्यता आहे. कारण ऐन पेरणीच्या काळात उच्च तापमान आणि अधिक पावसामुळे पिकांना फंगल राेगाचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता आहे. मात्र पीक वाढीच्या काळात पुन्हा तापमानात वाढ आणि पावसाच्या कमतरतेचा परिणाम हाेईल. येत्या काळात तापमानात २ ते ३ अंश वाढ हाेण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. मात्र बहाराच्या काळात किमान तापमान आवश्यक तापमानापेक्षा कमी असेल. तापमानात हाेणारी वाढ ही दाणा भरण्याच्या प्रक्रियेवर नकारात्मक परिणाम करणारी असेल. शिवाय जमिनीतील ओलावा घटणार असल्याने पिकांचा तणाव वाढण्याची शक्यता आहे. कापणीच्या काळात ढगाळ वातावरण आणि अधिक पावसाचा सामना करावा लागणार आहे.

- पिकांच्या गुणवत्तेला बसेल फटका

भविष्यात तापमान आणि पर्जन्य पॅटर्नमध्ये वारंवार हाेणाऱ्या बदलामुळे कापूस, साेयाबीन, गहू, ज्वारी या विदर्भ, मराठवाडा व खान्देशातील पिकांच्या वाढीवर परिणाम हाेईल. साेयाबीन आणि कापसाच्या विकसित हाेण्याच्या काळात अधिक पावसामुळे उत्पादन आणि गुणवत्तेवर लक्षणीय परिणाम हाेण्याची शक्यता आहे. गहू व ज्वारीसारख्या रब्बी पिकांच्या दाणे भरण्याच्या काळात अधिक तापमानामुळे पिकांच्या गुणवत्तेवर गंभीर परिणाम हाेतील.

- विवेक अढिया, राष्ट्रीय संचालक, इन्स्टिट्यूट ऑफ सस्टेनेबल कम्युनिटी