शहरं
Join us  
Trending Stories
1
सर्वपक्षीय शिष्टमंडळातील समावेशामुळे काँग्रेस नाराज, आता शशी थरूर स्पष्टच बोलले, म्हणाले...  
2
Mumbai Water Storage: मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांमध्ये फक्त १८ टक्के पाणीसाठा शिल्लक
3
IPL 2025 Playoffs Race : आता MI सह ६ संघ शर्यतीत; कुणाचा पेपर सोपा कुणाला आहे सर्वाधिक धोका?
4
"आम्ही अणुबॉम्बच्या धमकीला भीक घालत नाही, पाकिस्तानला १०० किमी आत घुसून मारलं’’, अमित शाहांचा टोला
5
IPL 2025 : गत चॅम्पियन कोलकाता नाईट रायडर्स OUT! 'विराट' शक्ती प्रदर्शनासह RCB टॉपला; पण...
6
"पुतीन यांच्याशी थेट बोलणार, रशिया आणि युक्रेनमधील भीषण युद्ध थांबवणार’’, ट्रम्प यांचं मोठं विधान
7
"पाकिस्तान म्हणजे मानवतेला धोका", ओवेसींचे रोखठोक विधान; म्हणाले- 'आता भारताने..."
8
Pune: पुण्यात १५ वर्षीय मुलीला सर्पदंश, वेळेत उपचार न मिळाल्याने मृत्यू
9
तू स्वप्नातही...! राहुल द्रविडचा हिटमॅन रोहितसाठी खास मेसेज; मुंबई इंडियन्सनं शेअर केला व्हिडिओ
10
"आपल्याजवळ शक्ती असेल तर जग प्रेमाची भाषाही ऐकतं’’, सरसंघचालक मोहन भागवत यांचं मोठं विधान 
11
IPL 2025 : मोहीम फत्ते! 'दर्दी' चाहत्यांनी विराटसाठी व्हाइट जर्सीत केली गर्दी
12
बीसीसीआयकडून सचिन तेंडुलकरला मोठा सन्मान, मुंबई मुख्यालयात दिसणार 'एसआरटी १००' नावाचा बोर्ड रूम
13
ज्योती मल्होत्रा ​​कोण आहे? पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली झाली अटक
14
दर्यापूरचे सराफा दुकान फोडणारी आंतरराज्यीय टोळी अटकेत
15
पाच बायका, शाहबाज शरीफ यांची लव्ह स्टोरी ऐका, चुलत बहिणीशी केलं पहिलं लग्न, त्यानंतर...
16
नातेवाईकावर अंत्यसंस्कार करून आंघोळीसाठी नदीत उरतले, बाप-लेकासह तिघांचा बुडून मृत्यू
17
अलिशान स्पोर्ट्स कारवरील स्क्रॅच बघून संतापला रोहित शर्मा; भावावर असा काढला राग (VIDEO)
18
INDvENG: श्रेयस अय्यरला टीम इंडियात न घेण्याचं BCCIने दिलं 'टुकार' कारण, ऐकून तुम्हालाही येईल राग
19
अनाथ मुलीला दत्तक घेऊन वाढवलं, तिनेच आईला संपवलं; इन्स्टाग्रामने उलगडलं हत्येचं गूढ
20
दिल्लीत 'आप'ला मोठा धक्का; १५ नगरसेवकांनी दिला राजीनामा, नवा पक्ष स्थापन करण्याची घोषणा

भविष्यात गहू, ज्वारीची गुणवत्ता, उत्पादकता संकटात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2021 04:09 IST

उदय अंधारे नागपूर : हवामान बदलाचे भयकारी संकेत आता दिसायला लागले आहेत. सर्वाधिक परिणाम भविष्यात कृषी क्षेत्राला भाेगावे लागणार ...

उदय अंधारे

नागपूर : हवामान बदलाचे भयकारी संकेत आता दिसायला लागले आहेत. सर्वाधिक परिणाम भविष्यात कृषी क्षेत्राला भाेगावे लागणार आहेत. यामुळे महाराष्ट्रातील शेतीचे पॅटर्न प्रभावित हाेणार आहे. विदर्भ, मराठवाडा व खान्देशात पिकणाऱ्या गहू, ज्वारी या रब्बी पिकांची उत्पादकता आणि गुणवत्ता संकटात येण्याची भीती तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.

‘इन्स्टिट्यूट ऑफ सस्टेनेबल कम्युनिटी’ ने भविष्यात कृषी क्षेत्रावर हाेणाऱ्या हवामान बदलाच्या परिणामांचा केलेला अभ्यास या संकटाचे संकेत देणारा आहे. तज्ज्ञांच्या मते पेरणीच्या काळात जमिनीत थाेडा ओलावा असणे गरजेचा आहे, जाे मान्सूनच्या परतीच्या प्रवासामुळे मिळताे. मात्र अभ्यासानुसार २०२१ ते २०५० या ३० वर्षाच्या काळात पर्जन्यमान घटणार असल्याने जमिनीत पुरेसा ओलावा राहणार नाही आणि पेरणीवर परिणाम हाेईल. शेतकऱ्यांच्या अनुभवानुसार बियाणे पेरणीनंतर बीजांकुर निघेपर्यंत १०० दिवस हवामान थंड असणे गरजेचे आहे, ज्यामुळे पिकांच्या व उत्पादकतेच्या वाढीस मदत हाेते. मात्र भविष्यात हवामानातील पुरेसा थंडावा मिळेल, याची शास्वती राहणार नाही. पुढच्या ३० वर्षात सरासरीपेक्षा तापमानात वाढ हाेणार असल्याने झाडांचा पाेतच बिघडण्याची शक्यता आहे.

पुढच्या ३० वर्षात पिकांची पेरणी आणि दाणे भरण्याच्या काळात एकीकडे पर्जन्यमानाची कमतरता असेल तर दुसरीकडे गरजेपेक्षा अधिक पाऊस हाेईल. मात्र तापमान वाढलेले असेल. येत्या ३० वर्षात गव्हाच्या पिकाचा विचार केल्यास पिकाच्या सुरुवातीच्या काळात पावसाची गरज अधिक असताना पाऊस कमी असेल आणि फेब्रुवारी-मार्चमध्ये कापणीच्या काळात जेव्हा पावसाची गरज नसेल तेव्हा अधिक पाऊस असेल. ज्वारीचा विचार केल्यास भविष्यात ज्वारीचा पेरणीचा काळच बदलण्याची शक्यता आहे. कारण ऐन पेरणीच्या काळात उच्च तापमान आणि अधिक पावसामुळे पिकांना फंगल राेगाचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता आहे. मात्र पीक वाढीच्या काळात पुन्हा तापमानात वाढ आणि पावसाच्या कमतरतेचा परिणाम हाेईल. येत्या काळात तापमानात २ ते ३ अंश वाढ हाेण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. मात्र बहाराच्या काळात किमान तापमान आवश्यक तापमानापेक्षा कमी असेल. तापमानात हाेणारी वाढ ही दाणा भरण्याच्या प्रक्रियेवर नकारात्मक परिणाम करणारी असेल. शिवाय जमिनीतील ओलावा घटणार असल्याने पिकांचा तणाव वाढण्याची शक्यता आहे. कापणीच्या काळात ढगाळ वातावरण आणि अधिक पावसाचा सामना करावा लागणार आहे.

- पिकांच्या गुणवत्तेला बसेल फटका

भविष्यात तापमान आणि पर्जन्य पॅटर्नमध्ये वारंवार हाेणाऱ्या बदलामुळे कापूस, साेयाबीन, गहू, ज्वारी या विदर्भ, मराठवाडा व खान्देशातील पिकांच्या वाढीवर परिणाम हाेईल. साेयाबीन आणि कापसाच्या विकसित हाेण्याच्या काळात अधिक पावसामुळे उत्पादन आणि गुणवत्तेवर लक्षणीय परिणाम हाेण्याची शक्यता आहे. गहू व ज्वारीसारख्या रब्बी पिकांच्या दाणे भरण्याच्या काळात अधिक तापमानामुळे पिकांच्या गुणवत्तेवर गंभीर परिणाम हाेतील.

- विवेक अढिया, राष्ट्रीय संचालक, इन्स्टिट्यूट ऑफ सस्टेनेबल कम्युनिटी