शहरं
Join us  
Trending Stories
1
जीएसटी नंतर MRP वर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; सामान्यांच्या थेट खिशावर परिणाम होणार...
2
"सकाळी उठा, व्होटर डिलीट करा अन् पुन्हा झोपी जा...", राहुल गांधींचा ECI वर पुन्हा हल्लाबोल; BJP चा पलटवार!
3
टॉस पूर्वीची ती चार मिनिटे...! भारत सरकारची मंजुरी अन् BCCIचा मॅच रेफरींना संदेश पोहोचला...
4
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
5
वसईत ट्रॅफिकमुळे गेला २ वर्षाच्या मुलाचा बळी; मुंबई अहमदाबाद महामार्गावर पाच तास अडकून होती रुग्णवाहिका
6
'या अली' गाण्यामागचा आवाज हरपला, प्रसिद्ध गायक जुबीनचा स्कुबा डायव्हिंग करताना मृत्यू
7
परप्रांतीयांना भाड्याने घरं देऊ नका, पंजाबमध्ये ठिकठिकाणी आवाहन; यूपी-बिहारींना हाकलण्याची मागणी
8
"काय अर्थ निघतील, याचाही विचार केला पाहिजे", CM फडणवीसांनी गोपीचंद पडळकरांचे टोचले कान
9
तीन सख्ख्या बहिणींवर नातेवाईकच २०२० पासून करत होता बलात्कार; अहिल्यानगरमधील संतापजनक घटना
10
विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांच्या नियुक्तीला 'खासदारकी'मुळे आव्हान, न्यायालयाने काय दिला निकाल?
11
स्कँडल, कर्ज आणि घसरते शेअर्स... जगातील सर्वात मोठ्या फूड कंपनीला वाचवू शकतील का नवे बॉस?
12
VIDEO: अरे देवा! 'मोटूलाल'ने प्यायली ७२ लाखांची दारू, जमीनही विकली; मुलाखत झाली व्हायरल
13
इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत संघात स्थान का मिळालं नाही? कुलदीपचं गंभीरबाबत मोठं विधान, म्हणाला...
14
'सकाळी उठतात, डोळे चोळत काहीही पोस्ट करतात...', कंगना राणौतचा राहुल गांधींवर पलटवार
15
तुम्हालाही छोट्या छोट्या गोष्टींचा राग येतो, आताच ठेवा ताबा नाहीतर हार्ट अटॅकचे ठराल बळी
16
तुमचा मारुती, ह्युंदाई, टाटावर विश्वास पण डीलर्सचा? या कंपन्या त्यात नाहीच...
17
महायुती सरकारमध्ये सहकारी होण्याचा निर्णय का घेतला? पक्षाच्या चिंतन शिबिरात दादांनी स्पष्टच सांगितलं!
18
कोण होईल रशियाचा पुढचा राष्ट्राध्यक्ष? राजकीय वारसदाराबद्दल व्लादिमीर पुतिन यांचा खुलासा
19
Gold Silver Price 19 September: सोन्याच्या दरात घसरण, पण चांदीच्या किमतीत जोरदार उसळी; कॅरेटनुसार पाहा सोन्याचे नवे दर
20
'हाफिज सईदला भेटलो, याबद्दल मनमोहन सिंग यांनी आभार मानले', यासिन मलिकचा खळबळजनक दावा

भविष्यात गहू, ज्वारीची गुणवत्ता, उत्पादकता संकटात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2021 04:09 IST

उदय अंधारे नागपूर : हवामान बदलाचे भयकारी संकेत आता दिसायला लागले आहेत. सर्वाधिक परिणाम भविष्यात कृषी क्षेत्राला भाेगावे लागणार ...

उदय अंधारे

नागपूर : हवामान बदलाचे भयकारी संकेत आता दिसायला लागले आहेत. सर्वाधिक परिणाम भविष्यात कृषी क्षेत्राला भाेगावे लागणार आहेत. यामुळे महाराष्ट्रातील शेतीचे पॅटर्न प्रभावित हाेणार आहे. विदर्भ, मराठवाडा व खान्देशात पिकणाऱ्या गहू, ज्वारी या रब्बी पिकांची उत्पादकता आणि गुणवत्ता संकटात येण्याची भीती तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.

‘इन्स्टिट्यूट ऑफ सस्टेनेबल कम्युनिटी’ ने भविष्यात कृषी क्षेत्रावर हाेणाऱ्या हवामान बदलाच्या परिणामांचा केलेला अभ्यास या संकटाचे संकेत देणारा आहे. तज्ज्ञांच्या मते पेरणीच्या काळात जमिनीत थाेडा ओलावा असणे गरजेचा आहे, जाे मान्सूनच्या परतीच्या प्रवासामुळे मिळताे. मात्र अभ्यासानुसार २०२१ ते २०५० या ३० वर्षाच्या काळात पर्जन्यमान घटणार असल्याने जमिनीत पुरेसा ओलावा राहणार नाही आणि पेरणीवर परिणाम हाेईल. शेतकऱ्यांच्या अनुभवानुसार बियाणे पेरणीनंतर बीजांकुर निघेपर्यंत १०० दिवस हवामान थंड असणे गरजेचे आहे, ज्यामुळे पिकांच्या व उत्पादकतेच्या वाढीस मदत हाेते. मात्र भविष्यात हवामानातील पुरेसा थंडावा मिळेल, याची शास्वती राहणार नाही. पुढच्या ३० वर्षात सरासरीपेक्षा तापमानात वाढ हाेणार असल्याने झाडांचा पाेतच बिघडण्याची शक्यता आहे.

पुढच्या ३० वर्षात पिकांची पेरणी आणि दाणे भरण्याच्या काळात एकीकडे पर्जन्यमानाची कमतरता असेल तर दुसरीकडे गरजेपेक्षा अधिक पाऊस हाेईल. मात्र तापमान वाढलेले असेल. येत्या ३० वर्षात गव्हाच्या पिकाचा विचार केल्यास पिकाच्या सुरुवातीच्या काळात पावसाची गरज अधिक असताना पाऊस कमी असेल आणि फेब्रुवारी-मार्चमध्ये कापणीच्या काळात जेव्हा पावसाची गरज नसेल तेव्हा अधिक पाऊस असेल. ज्वारीचा विचार केल्यास भविष्यात ज्वारीचा पेरणीचा काळच बदलण्याची शक्यता आहे. कारण ऐन पेरणीच्या काळात उच्च तापमान आणि अधिक पावसामुळे पिकांना फंगल राेगाचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता आहे. मात्र पीक वाढीच्या काळात पुन्हा तापमानात वाढ आणि पावसाच्या कमतरतेचा परिणाम हाेईल. येत्या काळात तापमानात २ ते ३ अंश वाढ हाेण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. मात्र बहाराच्या काळात किमान तापमान आवश्यक तापमानापेक्षा कमी असेल. तापमानात हाेणारी वाढ ही दाणा भरण्याच्या प्रक्रियेवर नकारात्मक परिणाम करणारी असेल. शिवाय जमिनीतील ओलावा घटणार असल्याने पिकांचा तणाव वाढण्याची शक्यता आहे. कापणीच्या काळात ढगाळ वातावरण आणि अधिक पावसाचा सामना करावा लागणार आहे.

- पिकांच्या गुणवत्तेला बसेल फटका

भविष्यात तापमान आणि पर्जन्य पॅटर्नमध्ये वारंवार हाेणाऱ्या बदलामुळे कापूस, साेयाबीन, गहू, ज्वारी या विदर्भ, मराठवाडा व खान्देशातील पिकांच्या वाढीवर परिणाम हाेईल. साेयाबीन आणि कापसाच्या विकसित हाेण्याच्या काळात अधिक पावसामुळे उत्पादन आणि गुणवत्तेवर लक्षणीय परिणाम हाेण्याची शक्यता आहे. गहू व ज्वारीसारख्या रब्बी पिकांच्या दाणे भरण्याच्या काळात अधिक तापमानामुळे पिकांच्या गुणवत्तेवर गंभीर परिणाम हाेतील.

- विवेक अढिया, राष्ट्रीय संचालक, इन्स्टिट्यूट ऑफ सस्टेनेबल कम्युनिटी